समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापने पासूनच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रा पर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक,साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका आणि आईचा ममत्वभाव जपणाऱ्या व मातृस्थानी असणाऱ्या सर्वार्थाने आदरणीय डाॅ. तारा भवाळकर उर्फ ताराबाई यांना अतिशय मानाचा असा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रुपये एक लाख आणि मानपत्र असे स्वरूप असणारा हा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.डॉ.तारा भवाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा….
ताराबाईंचा व माझा स्नेह गेल्या पस्तीस वर्षाचा आहे.असंख्य कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मी सहभागी झालो आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी एक तब्बल आठ तासांची मुलाखत आकाशवाणी सांगलीमध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती.तसेच ‘प्रातिभसंवाद’ या पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांनी डॉ.रा.चिं.ढेरे ते उमा व विरूपाक्ष कुलकर्णी आदींच्या घेतलेल्या मुलाखती आहेत तसेच त्यात डॉ.तारा भवाळकर यांची मी घेतलेली तब्बल दीडशे छापील पानांची मुलाखतही आहे. या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिज्ञासूंनी ती जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत जरूर वाचावी असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
तसेच या निमित्ताने मी पूर्वी एकदा व्यक्त केलेले मत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त करतो की,डॉ.तारा भवाळकर यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव झाला पाहिजे.खरेतर हा सन्मान यापूर्वीच व्हायला हवा होता.पण साहित्य महामंडळ व संबंधित संस्थानी यावर्षी ती उणीव भरून काढावी असे प्रामाणिकपणे वाटते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी साहित्यात संशोधन व लेखन स्वरूपाची चाळीसावर पुस्तकांच्या रूपाने सातत्यपूर्ण सकस भर घालणाऱ्या डॉ.तारा भवाळकर या वर्तमान महाराष्ट्रातील अग्रक्रमावरील विदुषी आहेत यात शंका नाही. अगदी गेल्या आठवड्यात त्यांचे ” ” “मायवाटेचा मागोवा ” ( स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन ) हे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अशा या थोर विदुषी डॉ.ताराबाईंना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन व भरभरून शुभेच्छा..!
लेखक – श्री प्रसाद कुलकर्णी
मो.9850830290
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी)–श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे≈
ई-अभिव्यक्ती (मराठी) या समुहातील लेखिका सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई यांना, विज्ञान प्रसार निबंध स्पर्धेत मिळालेल्या पुरस्काराप्राप्ती बद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांचा हा निबंध दोन भागात आपल्या वाचकांसाठी देत आहोत.
ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ई-अभिव्यक्ती (मराठी) च्या लेखिका कवयित्री सौ. दीप्ति कुलकर्णी यांनी, करवीर येथील ललित लेखन स्पर्धेत प्राप्त केलेल्या द्वितीय पुरस्काराबद्द्ल त्यांचे समुहातर्फे
हार्दिक अभिनंदन!
सौ. दिप्ती कुलकर्णी यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ई–अभिव्यक्तीशी अलीकडेच जोडल्या गेलेल्या तासगावच्या लेखिका सौ.सुचित्रा पवार यांच्या ‘मायेचा पाऊस ‘ या कथेला , नाशिकच्या ‘ज्ञानसिंधू’ प्रकाशनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच्या अंकात त्यांची कथा वाचा… सगुणा ….
सौ. सुचित्रा पवार यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
विपुलश्री मासिक दर वर्षी वासंतिक कथास्पर्धेचे आयोजन करते. यदाच्या वर्षी ई – अभिव्यक्तीच्या 2 साहित्यिकांना कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे.
श्री अरविंद लिमये आणि सौ. नीला देवल.श्री अरविंद लिमये यांना स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, तर सौ. नीला देवल यांना उत्तेजनार्थ कथा म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
निगडी, पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकुर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या स्वा.सावरकर यांच्या वरील लघुलेखन स्पर्धेत, ई- अभिव्यक्ती (मराठी) च्या सहसंपादिका सौ. मंजुषा मुळे यांना या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सर्व साहित्यिकांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ई-अभिव्यक्ती (मराठी) या समुहातील कवयित्री सौ.मनिषा रायजादे पाटील यांना, मराठी कवी लेखक संघटना.करवीर यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय ों लाइन स्पर्धेत (गझल लेखन) प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
1) आपल्या ई अभिव्यक्ती (मराठी) साठी लेखन करणार्या साहित्यिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या साहित्याबरोबरच त्यांची वैयक्तिक व कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांचा परिचय व फोटो या अंकात देत असतो. अद्यापही अनेकांचे फोटो व परिचय उपलब्ध झालेले नाहीत.
तरी सर्वांना नम्र विनंती की ज्यांचे फोटो व परिचय आमचेकडे पाठवलेले नाहीत त्यांनी त्यांच्या पुढील लेखनाबरोबर ते पाठवावेत व सर्वांना आपला परिचय करून द्यावा.
2) काही कथा व लेख हे एकापेक्षा जास्त भागांमध्ये प्रकाशित होत असतात.असे लेखन पाठवत असताना काही वेळेला त्याचे भाग पाडताना योग्य ती काळजी घेतली जात नाही,असे दिसते.तरी आवश्यक ती काळजी घ्यावी.उदाहरणार्थ:
– पहिला भाग संपला की क्रमशः असे लिहावे.
– पुढचा भाग लिहीताना ,पहिल्या भागातील अंतीम मजकुराचा उल्लेख करावा. म्हणजे वाचताना क्रम लक्षात येईल. तसेच भाग पाठवताना क्रम पहावा.
दर्जेदार साहित्य सादर करणे हे आपले सर्वांचेच उद्दिष्ट असल्याने आपण आमच्या अडचणी समजून घ्याल अशी खात्री आहे.