श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर हे मराठी हास्य-व्यंग चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली. त्यांच्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शने झाली. ते उत्तम व्याख्यातेही होते. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकरांचे ते धाकटे बंधू. वडलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. लेखन  आणि व्यंगचित्रे दोन्ही डगरींवर त्यांनी सफलतापूर्वक पाय रोवले.वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी कॅरीकेचार हा प्रकार हाताळला.

मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके

 १.भुईचक्र, २.रंगरेषा व्यंगरेषा, ३. संडे मूड,

संडे मूडमध्ये ५३ लेख आहेत आणि तेवढीच व्यंगचित्रे आहेत.

नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले काही सुप्रसिद्ध लेख –

अतिक्रमण, कुणी पानपतो अजून काळोख , चौकटीतल्या आत्म्याला, व्यंगचित्रांची भाषा, व्यंगचित्रातून संवाद साधताना, इ. 

पुरस्कार – संडे मूड या पुस्तकाला वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार   , महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार. 

☆ ☆ ☆ ☆ ☆

शांताराम नांदगावकर  (१९ ऑक्टोबर १९३६ – ११ जुलै २००९)

अनेक उत्तम चित्रपट गीते, भावगीते लिहिणारे कवी म्हणून शांताराम नांदगावकर यांची ओळख मराठी रसिकांना आहे. ते कोकणातील कणकवलीजवळच्या नांदगावचे. पुढे मुंबईत परळ येथील शिरोडे हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९८५ साली महाराष्ट्र विधान परिषदेवर ते निवडून आले.

कारकीर्द –

अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जमंत, तू सुखकरता, धुमधडाका, नवरी मिळे नवर्या ला, पैजेचा विडा इ. चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली.

शांताराम नांदगावकर  यांची गाजलेली गीते –

१.    अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने

२.    अश्विनी ये ना

३.    अष्टविनायका तुझा महिमा कसा

४.    असाच यावा पहाटवारा

५.    कुठं कुठं जायाचं हनिमूनला

६.      तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला

७.      दाटून कंठ येतो

८.      धुंदीत गांधीत होउनी सजणा

९.      दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा

१०.      हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा 

इ. अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली. १९८७ सालली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘दलितांचा राजा ‘ या आल्बमसाठी त्यांनी अप्रतिम गाणी लिहिली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुहास शिरवळकर (१५ नोहेंबर १९४८ – ११ जुलै २००३ )

सुहास शिरवळकर हे सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक आणि कादंबरीकार. १९७४ साली त्यांनी आपल्या कथालेखनास सुरुवात केली. १९७९ पर्यन्त त्यांच्या छोट्या- मोठ्या २५०  लिहून झाल्या. १९८० पासून त्यांनी सामाजिक कादंबर्यास लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी काही लघुकथाही इहिल्या. त्यांचेही संग्रह झाले. त्यांनी बालकथादेखील लिहिल्या.

त्यांच्या देवकी या कादंबरीवर मराठी चित्रपट झाला, तर ’दुनियादारी’ आणि ‘कोवळीक’ दूरचित्रवाणी मालिका तयार झाल्या. त्यांची बरीचशी पुस्तके दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. 

सुहास शिरवळकर यांची काही पुस्तके –

१.    वेशीपालीकडे, २. ऑब्जेक्शन युयर ऑनर, ३. वंडर ट्वेल्व्ह, ४. शब्दवेध ५. इंसनियत, ६. सालं, ७. सॉरी सर ८. जाई, ९. हॅलो… हॅलो’, १० जस्ट हॅपनिंग

एके काळी त्यांच्या रहस्यकथांवर तरुणाई अतिशय खूश असायची.

मंगेश तेंडुलकर, शांताराम नांदगावकर, सुहास शिरवळकर या तिघाही प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments