सुश्री शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “महाभारताचा सारांश…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
– – फक्त थोडक्यात महाभारताचा सारांश समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोकांचे सार आहे.
तुम्ही हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे,
तुम्ही स्त्री असो वा पुरुष,
तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,
तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,
— —
- जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… “कौरव”
- तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… “कर्ण”
- तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… “अश्वत्थामा”
- अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… “भीष्म पितामह”
- संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते… “दुर्योधन”
- सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल… “धृतराष्ट्र”
- ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल… “अर्जुन”
- फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही… “शकुनी”
- जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही…“युधिष्ठिर”
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈