सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवघेव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

देवघेव – – – 

चिटी चावल ले चली,

बीच में मिल गई दाल ।

कहे कबीर दो ना मिले,

इक ले, इक डाल ॥” 

 – – अतिशय गहन अर्थ आहे..

अर्थात :

“मुंगी” तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है’ देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली. पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली !

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई!  तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार !

* देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो !

– – कबीरांच्या या दोह्यात असा मोठा “अर्थ” दडला आहे.

…… चला तर मग आनंदी जीवन जगू या ‼

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments