श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “सत्य पण… परंतु…” ☆ श्री जगदीश काबरे

परीक्षेत चांगले “गुण” सगळ्यांनाच मिळवावेसे वाटतात…

परंतू “गुणवत्ता” वाढवावीशी वाटत नाही.

 

“सुविचारां”चा सुकाळ आहे…

परंतू त्यांच्या “आचारणा”चा दुष्काळ आहे.

 

“कचरा” सर्वांनाच नकोय…

परंतू “स्वच्छता” कुणालाच ठेवावीशी वाटत नाही.

 

“भ्रष्टाचारा”पासून मुक्ती हवीय…

परंतू “नियम” मात्र कुणालाच पाळावेसे वाटत नाहीत.

 

“मरायचं” एकदा सर्वाना आहे…

परंतू “मरावंस” कोणालाच वाटत नाही.

 

“धर्म” सगळ्यांनाच हवा आहे…

परंतू “अंधश्रद्धा” सोडावीशी वाटत नाही.

 

“अन्न” सर्वांनाच हवंय…

परंतू “शेती” शेतकऱ्यालाही करावीशी वाटत नाही.

 

“पाणी”” सर्वांनाच हवंय…

परंतू “पाणी” वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.

 

“सावली” सर्वांनाच हवीय…

परंतू “झाडे” लावावी, ती जगवावी असे कोणालाच वाटत नाही.

 

“सून”” सर्वनाच हवी आहे…

परंतु “मुलगी” वाचवावीशी कोणालाच वाटत नाही.

 

“विज्ञाना”चे सगळे फायदे हवे आहेत…

परंतु “वैज्ञानिक दृष्टिकोन” मात्र रुजवावासा वाटत नाही.

 

आजचे विदारक सत्य असे आहे…

परंतु विचार कोणालाच करावासा वाटत नाही.

 

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान आणि खरे विचार मांडले कवितेतून