श्री सुहास रघुनाथ पंडित

? २४ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

प्रसिद्ध मराठी कथालेखक श्री.अरविंद विष्णू गोखले यांचा 24 ऑक्टोबर हा स्मृतीदिन(1992). त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. शिक्षण पुणे, मुंबई येथे झाले. एम्. एस्सी.बाॅटनी, तसेच अमेरिकेतील व्हिस्काॅन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्र विद्या अभ्यास पूर्ण करून एम.एस् ही पदवी मिळवली. पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. नंतर त्यानी मुंबईत धरमसी कंपनीत नोकरी केली.

पण हे सर्व करत असताना त्यांचे लेखन व प्रामुख्याने कथा लेखन ही चालू होते. त्यांची पहिली कथा ‘हेअर कटिंग सलून’ वयाच्या सोळाव्या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढील आयुष्यात त्यांनी 350 हून अधिक कथा लिहील्या. कातरवेळ, मंजुळा, रिक्ता, कॅक्टस, विघ्नहर्ती या त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांच्या अनेक कथांचे भारतीय व युरोपीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांनीही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद केले आहेत.

त्यांचे काही कथासंग्रह: अक्षता, कथाई,  कथाष्टके, गंधवार्ता, चाहूल, देशांतर, माणूस आणि कळस, अनामिका, मिथिला इ.

कादंबरी: आय.सी. 814, शपथ

आत्मकथन: शुभा

अनुभवकथन: आले पाक

प्रवासवर्णन: अमेरिकेस जाऊन पहावे, असाही पाकिस्तान.

याशिवाय माहितीपर, संपादित कथा, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच काही कथांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अशा या चतुरस्त्र लेखकास स्मृतीदिनानामित्त अभिवादन.

 

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments