मराठी साहित्य – विविधा ☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ लाडकी बाहुली… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लहानमोठ्या सगळ्या माणसांना खेळायला आवडतं. खेळ म्हणजे मनोरंजन किंवा शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा, कोणतीही ऍक्टव्हिटी. खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.खेळ आपल्याला व्यथा, चिंता विसरायला लावतात. खेळांमुळे विरंगुळा मिळतो. शरीर आणि मन ताजेतवाने होते. मैदानी खेळांचे फायदे तर पुष्कळ आहेत. कब्बडी, खो खो सारख्या खेळांमुळे भरपूर व्यायाम होतो, शरीर बळकट,काटक बनते. चिकाटी, दमदारपणा, खिलाडूवृत्ती असे अनेक गुण वाढीस लागतात.

आजच्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या लहानपणी भरपूर खेळायला मिळालं. अभ्यास कमी आणि खेळ दंगा जास्त. खरंखुरं निरागस, बिनधास्त बालपण या पिढीनं अनुभवलं. आधुनिक खेळ, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या पासून अनभिज्ञ राहिलेली ही मुलं छोट्या छोट्या गोष्टीत रममाण होत असत. गोट्या, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे,लगोऱ्या असे खेळ खेळत ही मुलं मोठी झाली. सूरपारंब्या, मामाचं पत्र हरवलं, लपंडाव अशा खेळांना वेगळं साहित्य लागत नसे. पैसे तर बिल्कुल लागत नसत. लागत असे फक्त खेळण्याची, सवंगड्यांची ओढ. या खेळांनी ही पिढी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झाली. हातात महागडे खेळ नसतानाही आनंद लुटायला शिकली. या पिढीला बडबडगीतांनी, बालकथा, बालगाणी यांनीही समृद्ध केलं. राजाराणीच्या गोष्टीत रमली. ऐतिहासिक, पौराणिक कथा, इसापनीतीच्या बोधकथांनी संस्कारित झाली. आजी आजोबांचं बोट धरून, प्रवचन किर्तनातून, ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी शिकली. घरात बोलायला इतकी माणसं असत की टॉकिंग टॉमची गरज भासत नसे. या मुलींच्या बाहुल्या अबोल होत्या.तरीही भावला भावलींचं लुटूपुटूच्या लग्नात अख्खं घरदार खेळे . चिंध्यांची बाहुली, चिंध्यांचाच बाहुला, पण त्यांना नटवण्यात कल्पकता वापरली जाई. हलू न शकणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या या बाहुल्या, या ठका, ठकी सगळ्या आळीला बोलकं करत.

‘लाडकी बाहुली होती माझी एक ‘ या कवितेत कवयित्री इंदिरा संतांनी बाहुली हरवली म्हणून झुरणाऱ्या मुलीचं केलेलं वर्णन अविस्मरणीय आहे. खेळायला दिलेली  लाडकी बाहुली  . . .  . बाहुली हरवली म्हणून हिरमुसलेली बालिका, दुसऱ्या कितीही बाहुल्या जवळ असल्या तरी तीच बाहुली हवी , यासाठी झुरणारी बालिका डोळ्यासमोर येते.. माळावर खेळणाऱ्या मैत्रिणी, गवत, पाऊस हे सगळं आज दुर्लभ झालंय. पावसात भिजून खराब झालेली, गायीनं तुडवल्यामुळं आकार बिघडलेली, केसांच्या झिपऱ्या झालेली तीच बाहुली त्या बालिकेला प्रिय आहे हे सांगणारी. .

‘परी आवडली ती तशीच मजला राणी ‘

ही ओळ खूप काही सांगून जाते. आजकालच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात रोज नवा हट्ट, नवा खाऊ, नवं खेळणं, नवे कपडे असा बालहट्ट सहज पुरवला जातो.  मोकळ्या मनानं, मोकळ्या मैदानात, मनसोक्त दंगामस्ती करायच्या वयात आजचे किड्स एसीत बसून फक्त अंगठ्याचा व्यायाम करताना दिसतात.ही पिढी उत्क्रांतीच्या नियमानुसार आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त हुशार आहे, कुशल आहे. पण टेक्नॉलॉजीच्या जटील जाळ्यात अडकली आहे. टेक्नॉलॉजी वाईट नक्कीच नाही. पण तिचा उपयोग गरजे पुरताच, मर्यादीत स्वरूपातच केला पाहिजे,हे सांगायला जुन्या पिढीनं सरसावलं पाहिजे, गदिमांच्या नाचणाऱ्या मोराला घेऊन, इंदिरा संतांच्या लाडक्या भावलीला घेऊन, गवतफुला बरोबर वाऱ्यावर डोलत, माळावर पतंग उडवत, झुकझुक गाडीत बसून खंडाळ्याच्या घाटातून, निसर्गाच्या कुशीत नव्या पिढीला हळूच घेऊन जायला हवं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढासळत चाललय काळीज (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ढासळत चाललय काळीज (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

सामानाचा शेवटचा कंटेनर ट्रकवार चढला होता. मुलांना आपल्या सामानाने भरलेल्या ट्रकसोबत निघण्याची घाई होती. आपल्या गाडीत बसून ते हात न हलवताच निघून गेले होते. मी रिकाम्या रस्त्याकडे बघत, हात हलवत तशीच काही क्षण उभी राहिले. मग आपलं असलं वागणं आसपासच्या शेजार्‍यांनी बघितलं तर नसेल ना, या विचाराने मी खजील झाले.

उदास होऊन मी घरात पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या निस्तब्ध शांततेनं मला जसं काही खेचून घेतलं. माझं जुनं घर सोडताना अशी निस्तब्ध शांतता मी माझ्यात कैद केली होती. मी ते जुनं घर सोडून या नव्या घरात आले, त्यावेळचे ते क्षण मी पुन्हा अनुभवू लागले. त्या घरात मी चांगली बारा वर्षे राहिले होते आणि ते माझ्या जीवनातले सगळ्यात चांगले दिवस होते. आई म्हणायची, ‘बारा वर्षांनंतर तर घराभोवतालच्या उकिरड्याचे दिवसही फिरतात.’ न जाणे, कुणाचे दिवस फिरले? माझे? की घराचे? माझे दिवस तर त्या घरात चांगले गेले. कदाचित मी यासाठी ते घर सोडून आले की माझ्यानंतर त्या ठिकाणी येणार्‍या परिवाराला ते घर माझ्यापेक्षाही जवळिकीचं, अधीक आत्मीय वाटावं.

ते घर लावण्यात, सजवण्यात मी माझा जीव ओतला होता, ही गोष्ट वेगळी. अगदी मनापासून मी ते सजवलं होतं. खोलीतील प्रत्येक भिंतीवर माझ्या हाताची चित्रकारी होती. प्रत्येक बल्ब आणि झुंबराचा प्रकाश माझ्या डोळ्यांनी पसंत केलेला होता. माझी खुर्ची, माझं टेबल, आणि माझा पलंग हे सगळं मिळून मला पंचतारांकित हॉटेलचा अनुभव द्यायचे. मी त्या घरट्यावर खूप खूप प्रेम केलं होतं आणि त्या बदल्यात त्यानेही मला काही दिलं होतं. तिथे राहून मी नाव, पैसा, यश सगळं काही मिळवलं. इतकं सगळं असूनही मग काय झालं की ते घर सोडायचा निर्णय मी घेतला?  कदाचित माझ्या घरातल्या लोकांचे विचार त्या घराला मागास मानू लागले. खरं तर त्याचं मन खूप मोठं होतं , इतकं की आम्ही सगळे त्यात मावत होतो. एक एक करत गरजांची यादी वाढली आणि घराच्या भिंती लहान होऊ लागल्या. इतक्या लहान की माझी तीव्र इच्छाशक्ती माझ्या मन-बुद्धीतून वाळूसारखी घसरत गेली.

डॉ. हंसा दीप

मला आठवलं, जेव्हा आम्ही त्या घरात नव्याने राहायला गेलो, तेव्हा मी अतिशय आनंदाने, उत्साहाने घरी आलेल्या पाहुण्यांना तिथल्या खास गोष्टींचं वर्णन करून सांगायची.   ‘ हे बघा ना, इथून सीएन टॉवर दिसतो. पानगळीच्या दिवसातल्या पानांच्या आगळ्या- वेगळ्या रंगछटांबद्दल काय बोलावं? रंगी-बेरंगी पानांनी लगडलेली ती झाडी इथून इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते की बस्स! किती वर्णन करावं! आणि इथला सूर्योदय कुठल्याही हिल स्टेशनच्या सूर्योदयावर मात करेल, असा अप्रतीम . ढगातून बाहेर येणारी सूर्यकिरणे , समोरच्या खिडकीच्या काचेवर पडून परावर्तीत होतात, तेव्हा ही सारी इमारत सोनेरी होऊन जाते. सोन्यासारखी झळझळते.‘

बिच्चारे पाहुणे. त्यांना नक्कीच वाटत असणार, की एखाद्या गाईडप्रमाणे मी माझं म्युझियम दाखवते आहे. खरं सांगायचं, तर ते घर माझ्या जीवनातील आठवणींचं एक संग्रहालायच बनलेलं होतं. सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात आरामदायी घर. त्याने मला लेखनासाठी ऊर्जा देण्यात कसलाही कंजुषपणा केला नाही. समोर दिसणार्‍या झिळमिळत्या प्रकाशाच्या पुरात बुडून मी अनेक कथा लिहिल्या. कादंबर्‍या लिहिल्या. किती वर्गांना शिकवलं. कोवीदमध्येसुद्धा प्रकाशात नाहून निघालेलं हे शहर इथून बघताना मला कधी उदास नाही दिसलं.

बघता बघता, मी त्या घराची प्रत्येक वीट, प्रत्येक अडचण ओळखू लागले. एखादी गोष्ट तुटून खाली निखळण्यापूर्वीच माझं तिकडे लक्ष जायचं आणि मी ती दुरुस्त करून टाकी. घरही कदाचित माझा शिणवठा समजून घेत असेल. कुठेच काही अस्वच्छ नाही, असं दिसलं की मी तृप्तीचा श्वास घेऊन आराम करायची. इतके आम्ही एक दुसर्‍याला परिचित होतो. तरीही, मी त्याला सोडून या नवीन घरात आले. सकाळी उठून बाहेरची दुनिया बघायची माझी सवय, या नव्या घरात दाबून राहिली. हे घर आहे खूप मोठं, पण जमिनीवर त्या जुन्या छोट्या घराप्रमाणे छाती उंचावत उभं नाहीये. छोटे पण मोठ्या मनाचे लोक मला नेहमीच भावतात. हीच तर त्या छोट्या घराची विशेषता होती. त्याचं हृदय. त्याचं मन. 

दररोज सकाळी उगवत्या सूर्याचा लालिमा न्याहाळत, मी ते क्षण माझ्या अंतरंगात कैद केले आहेत. मी घरातील नस न नस शब्दात चित्रित करते, तेव्हा घरचे म्हणतात, ‘तू विटांवर प्रेम करतेस, ज्या निर्जीव आहेत. तू जमिनीशी बोलतेस, जी गप्प आहे.’ पण खरंच सांगते, मी त्या सगळ्यांना ऐकलं आहे. घरातील कण न कण माझ्या हातांचा स्पर्श ओळखत असे. मी झाडून-पुसून सगळं स्वच्छ करत असे, तेव्हा वाटायचं ते घर हसून बोलतय माझ्याशी.

ते घर सोडताना, सामान नीट ट्रकवर चढवण्याच्या नादात मी इतकी गुंतले होते की मी त्या घराचा निरोपही नीटपणे घेतला नाही. माझ्या त्याच घराची चावी दुसर्‍या कुणाकडे सोपवताना माझं मन जराही द्रवलं नाही. उलट अगदी हलकं हलकं वाटू लागलं होतं. जशी काही कुठल्या कैदेतूनं माझी सुटका झालीय. न बोलताच त्या घरातून मी बाहेर पडले. घर उदास होतं. मला जाताना बघत होतं. अशा उमेदीने बघत होतं होतं की बाहेर पडताना माझ्या डोळ्यात येणारे अश्रू मी थांबवू शकणार नाही. पण त्यावेळी मला कुलूप लावणे, कागदपत्र सांभाळणे, आणि अशा अनेक चिंतांनी घेरलं होतं. माझ्या नव्या घराकडे जाण्याच्या ओढीत मी सगळं काही विसरून गेले. माझ्या सगळ्या भावना या घराच्या भिंतीत सामावल्या गेल्या. मला आशा तर्‍हेने जाताना बघून ते उदास झालं. घराचा कोपरा न् कोपरा माझं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. हे कोपरे मी कधी फुलांनी, कधी वेगवेगळ्या रंगी-बेरंगी शो-पीसने सजवले होते. बाहेर पडताच माझ्या हातात सिमेंटचा एक तुकडा पडला. मी त्या घराचं ते आलिंगन समजू शकले नाही. मनात आलं, ‘बरं झालं इथून बाहेर पडतोय. या घराचं सांगाडा आता ढिला होत चाललाय. जुनं तंत्र. आऊट डेटेड… ‘ मी तो तुकडा कचर्‍याच्या डब्यात टाकला आणि घाईने ट्रकबरोबर निघाले.

आज मुलांचे तटस्थ डोळे माझ्या ओलसर झालेल्या पापण्यांना स्पर्श न करताच दृष्टिआड झाले, तेव्हा मला वाटलं, माझं शरीर सिमेंटसारखं मजबूत आणि विटांसारखं पक्कं झालय. भट्टीच्या आचेत भाजलेल्या विटा, सगळं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन हयातभर गप्प बसतात. माझं अंग-प्रत्यांग त्या स्तब्ध शांततेत जखडल्यासारखं झालय जसं. दिवसभर खिदळणारी मुले माझ्या अवती-भवती भिरभिरत असायची. गरज असेल तेव्हा ती मला आपल्या वडलांच्या रूपात बघायची. आणि आई … प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पंदनात त्यांच्या सोबतच असायची. आजचं मुलांचं हे रूप त्यांच्या लहानपणाच्या रूपापेक्षा आगदीच वेगळं. शाळेत जाताना आईला सोडून रहावं लागण्याच दु:खं ती आपल्या डोळ्यांनी दाखवत. वारंवार वळून हात हलवायचे. माझ्या मनाची अवस्था माझ्या आधी ओळखायचे. काही वाचायला बसले आणि चश्मा मिळत नसेल, तर पटकन आणून माझ्या हातात ठेवत होते. आज त्याच दोन्ही मुलांनी आपापल्या घरी जाताना आपल्या ममाकडे वळून बघितलंसुद्धा नाही.

मी मुलांच्या सोयी-सुविधेसाठी ते घर सोडलं होतं. आता मुलांनी आपल्या सोयी-सुविधेसाठी मला सोडलं. अचानक इतकं ‘मोठं’ घर ‘छोटं’ वाटू लागलं किंवा मग मीच छोटी झाले आणि मुलांचा बांधा मोठा होत चालला. घराच्या इतर किल्ल्या मला देऊन जशी काही मुक्ती मिळवली. जुनाटपणा आणि छोटेपणा यापासून मुक्तीची जाणीव. मला सोडताना त्यांनाही घाईच झालेली असणार. माझं अस्तित्व त्यांच्यासाठी घरासारखच भरभक्कम, पोलादी होतं. भावहीन. त्यांना माझा अस्थिपंजर ढिला झालेला दिसत असणार. सुकलेल्या आसवांच्या पलीकडे मला माझं शरीर पाहिल्यापेक्षा अधीक मजबूत वाटू लागलं. मला कुठल्याही प्रकारच्या भावुक वातावरणापासून दूर ठेवणारं. मजबूत भिंतींनी बांधलेलं. सीमेंट आणि कॉँक्रीट या किंवा त्या घरात नाही, माझ्या हाडा-माणसाच्या आत खोलवर सामावले गेले आहे. माझ्या मुलांसाठी मीदेखील एखाद्या घरापेक्षा जास्त नाही. या अबोल भिंती, ओरडून ओरडून माझेच शब्द मला पुन्हा ऐकवताहेत. ‘जुनं तंत्र… आउट डेटेड!’ मीदेखील हे सत्य स्वीकारलय की नवीन तंत्रात घरं बोलतात. माणूस नाही.

कान नक्कीच काही तरी ऐकताहेत. कदाचित हे नवीन घर खदाखदा हसतय किंवा मग यात जुन्या घराचा आवाजदेखील मिसळतोय. वर्षानुवर्ष ममतेच्या अस्तरांच्या आवरणाने झाकलेलं माझं काळीज निर्जीव तुकड्याप्रमाणे ढासळत चाललय.  

********

मूळ हिंदी  कथा 👉 टूक-टूक कलेजा– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 Broken Heart – Translated by – Mrs. Rajni Mishra

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

एकदा मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईने (ट्रेन तिकीट परीक्षक) सीटखाली लपलेल्या एका मुलीला पकडले.  ती सुमारे 13 किंवा 14 वर्षांची होती. टीटीईने मुलीला तिकीट काढण्यास सांगितले.  तिच्याकडे तिकीट नसल्याचे उत्तर मुलीने संकोचून दिले. टीटीईने तरुणीला ताबडतोब ट्रेनमधून उतरण्यास सांगितले.

तेवढ्यात मागून आवाज आला “मी तिच्यासाठी पैसे देईन”.  पेशाने कॉलेज लेक्चरर असलेल्या श्रीमती उषा भट्टाचार्य यांचा तो आवाज होता. श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीच्या तिकिटाचे पैसे दिले आणि तिला तिच्याजवळ बसण्याची विनंती केली. तिने तिला तिचे नाव काय विचारले.

“चित्रा”, मुलीने उत्तर दिले.

“तू कुठे जात आहेस?”

“मला कुठेही जायला नाही.”  मुलगी म्हणाली..

“मग चल माझ्यासोबत.”  श्रीमती भट्टाचार्य यांनी तिला सांगितले.  बंगळुरूला पोहोचल्यानंतर श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीला एका एनजीओकडे सोपवले.  नंतर श्रीमती भट्टाचार्य दिल्लीला स्थलांतरित झाल्या आणि दोघींचा एकमेकांशी संपर्क तुटला.

सुमारे 20 वर्षांनंतर श्रीमती भट्टाचार्य यांना सॅन फ्रान्सिस्को (यूएसए) येथे एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होती. ते संपल्यानंतर तिने बिल मागितले, परंतु तिला सांगण्यात आले की बिल आधीच भरले आहे. जेव्हा ती मागे वळली तेव्हा तिला एक स्त्री तिच्या पतीसह तिच्याकडे पाहून हसताना दिसली.  श्रीमती भट्टाचार्य यांनी जोडप्याला विचारले, ” तुम्ही माझे बिल का भरले? “

त्या तरुणीने उत्तर दिले, ” मॅडम, मुंबई ते बंगळुरू या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही माझ्यासाठी जे भाडे दिले होते, त्या तुलनेत मी भरलेले बिल खूपच कमी आहे…… दोन्ही महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

“अरे चित्रा… ती तूच आहेस..!! ”  सौ. भट्टाचार्य आनंदाने आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. 

एकमेकींना मिठी मारताना ती तरुणी म्हणाली, ” मॅडम माझे नाव आता चित्रा नाही. मी सुधा मूर्ती आहे. आणि हा माझा नवरा आहे… नारायण मूर्ती “.

— अचंबित होऊ नका. इन्फोसिस लिमिटेडच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती आणि लाखो कोटींची इन्फोसिस सॉफ्ट वेअर कंपनी स्थापन करणारे श्री नारायण मूर्ती यांची सत्यकथा तुम्ही वाचत आहात.

— होय, तुम्ही इतरांना दिलेली छोटीशी मदत त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते !

” कृपया संकटात असलेल्यांचे चांगले करणे थांबवू नका, विशेषत: जेव्हा ते करण्याचे सामर्थ्य  तुमच्यात  असते.” 

—अक्षता मूर्ती या जोडप्याची मुलगी आहे आणि ऋषी सुनक यांच्याशी तिने लग्न केले आहे, जे यूकेचे पंतप्रधान बनले आहेत…!!

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो,  मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा,  मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..

लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाच सहा ‘ऑथर्स’ची पुस्तके, बरेच रेफरन्स बुक्स, जर्नल्स, ट्युटोरियल्स, सबमिशन्स, सारख्या सारख्या इंटर्नल एक्झाम, त्यात Viva सारखा टॉक्सिक प्रकार.. मानसिक खच्चीकरण करणारी बोलणी अन झापाझापी… 

गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हॉस्टेल्सची दयनीय अवस्था, मेसचं जेवण, आमटीच्या नावाखाली ‘सजा-ए-कालापाणी’.. मग महिनाभर चालणाऱ्या फायनल्स.. सतत जागरणं.. ऍसिडीटी..  आणि एवढं सगळं करून पण पासिंग पुरतेच मार्क्स..!! 

पूर्वी फायनल परीक्षा पास झालं की हुश्श वाटायचं.. पण आता तसं नाहीये.. PG Entrance exam ची टांगती तलवार डोक्यावर असते.. त्यात मध्येच इंटर्नशीप, त्यातली काही महिने खेड्यात..  मग दोन वर्षांचा बॉण्ड करायचा..  त्या दरम्यानच्या काळात PG Entrance चा अभ्यास (वय 25-26 वर्षे)..  पुन्हा साडेचार वर्षांची सगळी पुस्तके एकाच वर्षात वाचायची.. आणि लक्षात पण ठेवायची..  तुम्हाला कल्पना नसेल, पण ही जी एन्ट्रन्स असते, त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क कोणाला पडू शकत नाहीत.. कारण, paper set करणाऱ्यांनी काढलेली गोल्ड स्टॅण्डर्ड answers ही कोणत्या रेफरन्स बुकमधून काढलेत, यावर बरंच अवलंबून असतं.. मेडिकलच्या विषयांमध्ये एकच टेक्स्टबुक असा प्रकार नसतो, म्हणून, एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देखील बरोबर असू शकतात, आणि एखाद्या प्रश्नाचं ‘कुठलंच उत्तर नेमकं बरोबर नाही’ असं देखील असू शकतं..  वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गोष्टी probability वर अवलंबून असतात.. म्हणून अमुक एक डॉक्टर चूकच, असं ठामपणे सांगता येत नाही.. सायन्सच्या इतर शाखांपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात ‘वैविध्य’ खूप आहे, त्यामुळे एकाच वेळी एकाच situation चे खूप Permutations – Combinations संभवत असतात..  असो..

पुन्हा PG ची तीन वर्षे.. संपूर्ण आयुष्यातला सगळ्यात भयानक काळ.. अक्षरशः सक्तमजुरी.. कामाचे तास, वेळा आणि स्वरूप या तीनही गोष्टी अजिबातच निश्चित नाहीत..  पुन्हा पेशंट्स, जागरणं, इमर्जन्सीज् , काम, काम आणि काम.. त्यातून वेळ मिळाला की झोप अन् जेवण..  अंघोळ बऱ्याचदा ऑप्शनला..! आणि अजूनच् अडचणीत पडायचं असेल तर लग्नाचा विचार.. (वय वर्षे 28-29)

PG संपली.. चला, आता ‘सरकारी बॉण्ड’ कंप्लिट करा.. का? तर सरकारने तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत..!  मग IIT , IIM किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारचं हे बंधन का नाही? असले प्रश्न पडू न देता बॉण्ड पूर्ण करायचा.. सुपर स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर अजून एक entrance exam, आणि अजून तीन वर्षे, मग पुन्हा बॉण्ड, आणि वय पस्तीस वर्षे.. पण सध्यातरी आपण ते बाजूला ठेऊ..

स्पेशालिस्ट डॉक्टर झालात..! वा.. वा.. वा.. वय वर्षे 30-31 च्या आसपास, तेही तुम्ही पूर्ण curriculum सलग पास झालात आणि पहिल्याच attempt मध्ये तुमचा entrance ला नंबर लागत गेला तरच! असो..

मग आता कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? की स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं? की लग्न करायचं? की सगळंच करायचं? ..काही कळत नाही.. आधीच लग्न केलं असेल अन बायको डॉक्टरच असेल तर ती अजून दुसरीकडेच PG करत असते, अन मुलाला तिसरीकडेच (बहुधा तिच्या आईवडिलांकडे) ठेवलेलं असतं.. काहीही सेव्हिंग नसते, आणि मोठा डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांना तर वाटत असतं,  बघा आता हा भाराभर पैसे कमावणार बरं का..

मग लक्षात येतं की, हॉस्पिटलसाठीच्या जागेच्या किमती आपल्या आवाक्यातल्या नाहीत.. मोक्याच्या जागेवरच्या हॉस्पिटलसाठी भाडं देखील झेपेल की नाही शंका आहे..   हॉस्पिटल चालू करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या.. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या किमती.. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर सोयींच्या किमती.. हॉस्पिटल चालू झाल्यावर त्याची मॅनेजमेंट..  हाऊसमन, नर्सिंग स्टाफ, त्यांचे पगार, त्यांची भांडणं, त्यांच्या सुट्ट्या.. अटेंडन्ट, वार्डबॉय, गेटकीपर, सेक्युरिटी, फायर कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट.. इ इ.. तुम्ही हॉस्पिटल नावाची एक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ चालवत असता, तेही मॅनेजमेंटचा कसलाही अनुभव नसताना..

पूर्वी दीड-दोन गुंठे जागेत देखील टुमदार दवाखाना चालू करता यायचा. दोनतीन हुशार सिस्टर्स आणि दोन सफाई कर्मचारी ठेवले तरी काम भागायचं.. पण आता मात्र तसं नाहीये.. असलं काही केलं तर बॉम्बे नर्सिंगची परमिशनच मिळत नाही.. NABH च्या नियमाप्रमाणे जर बांधायला गेलं तर दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी पाच गुंठ्याच्या आसपास जागा लागते,  GNM आणि ANM धरून चोवीस तासाच्या अकरा सिस्टर्स लागतात, एकतरी फुल टाइम OT असिस्टंट लागतो, सफाई/ कचरा विल्हेवाट यासाठी चोवीस तासाचे कमीतकमी सहा कर्मचारी लागतात. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि अकाऊंटंट लागतात आणि तुमच्याकडे MPJAY (योजना) असेल तर ते सांभाळणारा वेगळा व्यक्ती लागतो. ह्या सगळ्यांचे पगार सरकारी नियमांनुसार द्यावे लागतात, त्यांचा PF काढावा लागतो. स्टाफचे कामाचे तास, आठवड्याच्या सुट्टया, आजारपणाच्या सुट्टया, बाळंतपणाच्या सुट्टया याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचं ऑडिट करायला येणाऱ्यांना ‘व्यवस्थित’ सांभाळावं लागतं!  पालिकेतून विविध परवानग्या मिळविण्यासाठी हात सैल सोडावे लागतात.. (बरेच सैल सोडावे लागतात).. दरवर्षी किंवा ठराविक काळाने त्याचं नूतनीकरण करावं लागतं.. डाॅक्टरांसाठी सरकारी करात कोणतीही सवलत नाही, उपकरणं महाग, मशिनरींच्या किंमती लाखोंच्या घरात, सगळ्या mandatory मशीनरी घ्याव्याच् हे सरकारी नियमांचं बंधन..  तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन असेल तर ‘तुम्ही गुन्हेगार नाहीये’ हे आधी सिद्ध करण्यासाठी अनेक फॉर्म आणि रजिस्टरे भरायची, तेही खाडाखोड न करता एकदम बिनचूक भरावी लागतात.. रजिस्टर मधली एक चूक तुम्हाला डायरेक्ट अटक करू शकते.. असो..

मग दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो.. टिनपाट सरपंच/नगरसेवक खुश करावे लागतात, उपद्रवी गावगुंड ‘फ्री’ तपासावे लागतात.. ‘डॉक्टर पैसे पुढच्यावेळी देतो’ म्हणणाऱ्यांना शक्य तितक्या मधाळ आवाजात ‘चालेल चालेल’ म्हणावं लागतं.  उत्सवांच्या, जयंती-पुण्यतिथीच्या वर्गण्या गपगुमान द्याव्या लागतात.. वर बत्तीस दात दाखवत तुपाळ हसावंही लागतं..  निवडणुकीसाठी खंडणी (त्याला ‘मदत’ म्हणतात) द्यावी लागते.. दादा, भाऊ, भैया यांच्या एका फोनवर पेशंट्सची बिलं कमी करावी लागतात.. बिलं सेटलमेंट करणारा कोणीही सोम्यागोम्या आला तर त्याला शक्य तितक्या नम्र भाषेत आपण बिल अवाजवी लावलेलं नाहीये, यापेक्षाही जास्त बिल होऊ शकतं आणि याची कल्पना नातेवाईकांना आधीच दिली होती, वगैरे पोटतिडकीने सांगावं लागतं, आणि तरीसुद्धा ‘मी म्हणतोय म्हणून कमी करा की डॉक्टर’ असल्या धमकीवजा विनंतीला मान द्यावा लागतो.. 

तुम्ही म्हणाल, ‘व्यवसाय करायचा म्हटलं की एवढी मगजमारी तर करावीच लागणार की!, समाजात प्रत्येक व्यवसायात असं असतंच की!’  ..  ते खरंय, पण लहानपणापासून खाली मान घालून अभ्यास एके अभ्यास केलेल्या ह्या नवख्या डॉक्टर मुलांना जड जातं हे..  आणि ‘समाजसेवा करायचीये’ वगैरे दिव्य स्वप्नं उराशी घेऊन आलेल्यांना तर पहिला शॉक इथंच बसतो.. अन कितीही संवेदनशील राहायचं ठरवलं तरी ‘पैसा’ हीच या जगाची भाषा आहे, हे लवकरच कळून येतं..

माझ्या दहावी बारावीच्या काळात, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी रेडिओवर ऐकायचो. बहुतांश मुलामुलींचं “डॉक्टर व्हायचंय” हे ठरलेलं असायचं..  कारण आजूबाजूला दिसायचं की एकतर  डॉक्टरला समाजात इज्जत असते.. पैसाही चांगला मिळतो.. आणि job satisfaction असते आणि वरून व्यवसायातूनच समाजसेवा करण्याचे पुण्य देखील मिळते वगैरे वगैरे..

पण आता मात्र हे चित्र बदललंय..आणि, ते दिवसेंदिवस खूपच बदलतही चाललंय.. डॉक्टरचं आत्ता ना समाजातील स्थान अबाधित आहे, ना लोकांच्या मनातली इज्जत खात्रीशीर आहे, ना खोऱ्यानं मिळणारा पैसा आहे.. ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रफू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

एक मित्र भेटला परवा… खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… 

म्हणाला, ” मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय.”_

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजूला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला…… विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव ‘आलासच ना अखेरीस ‘_ हा माज ठेऊन. 

तो मला म्हणाला, ” दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली….. काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…… ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं….. आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता….. वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…… त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच…..  

मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून…… तू त्यावेळी मला म्हणाला होतास, “ देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो “…….  ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपुर्वी……  नाही शिवू शकलो मी ते भोक… 

नाही करु शकलो रफू…..  नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…… . 

माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं…! _ गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दूषणं देत…..  ‘ कसला बाप तू? ‘ अशी खिल्ली उडवत..  बहुदा मनातल्या मनात……   म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे… आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला… यावेळी तू आपलं नातं ‘ रफू ‘ केलेलं पहायला… 

त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो…. “

सुन्न होऊन ऐकत होतो मी……. 

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला… 

_’ देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो ‘,चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता…. 

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे….. 

‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘ पापातून ‘ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘ शापातून ‘ उतराई होऊ बघत होतो… 

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो……  

दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘ रफू ‘ करू पहात होतो ! ….. 

तात्पर्य:….

सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो.  मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी,आपले नोकर चाकर, हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही. आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधानाने कुणी दुखावलेच, तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….

पहा विचार करुन…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

Deha Jhala Chandanacha (देह झाला चंदनाचा : स्वाध्यायाप्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित काद

लेखक -राजेंद्र खेर

प्रकाशक- विहंग प्रकाशन, पुणे  

पृष्ठ संख्या – 501

स्वाध्याय प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील ही सत्याधिष्ठीत कादंबरी…

पांडुरंग शास्त्री आठवले यांची ओळख “ स्वाध्याय “ या त्यांच्या कामामुळे माहीत होती. परंतू त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. ही कादंबरी जेव्हा वाचली तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला.

कादंबरीची सुरुवात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या, ते जपान भेटीला गेले असताना टोकियो विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या झालेल्या प्रतिक्रियेने होते.

जपानी लोकांची जलद हालचाल, आदर्श वागणं, आणि सतत कामात असणं, त्यांना भावलं होतं ! पुढे पांडुरंगशास्त्रींच्या जीवनाचा आलेख उलगडत जातो.

रोह्यासारख्या लहान गावात त्यांचे बालपणीचे दिवस गेले. आजोबांच्या सहवासात हिंदू धर्माचे प्रेम वाढीस लागले. परदेशात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. प्रभू-कार्यालाच वाहून घेण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. श्रीकृष्ण हा त्यांचा आदर्श होता. दीनदुबळ्यांना मदत करण्याची इच्छा होती. आजोळचे लक्ष्मणशास्त्री आठवले हे त्यांचे आजोबा. त्यांचा प्रभाव पांडुरंगशास्त्रींवर होता.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्यगण वसई, गुजरात बॉर्डर, या भागात अधिक होते. त्यांच्या सकाळच्या फेरीमध्ये त्यांचे शिष्यगण लोकांना ईश्वराचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत. कोळी समाजातील लोकांत त्यांचा वावर अधिक होता. खालच्या समाजातील बरेच लोक दारूच्या आहारी जातात. त्या दारूच्या आकर्षणापासून त्यांना मुक्त करण्याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी या समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांचे लोक भक्ती-फेरी काढत असत. श्रीकृष्ण हा सर्वांसाठी आदर्श देव आहे असे ते मानत. आपल्या आश्रमाच्या जागेवर त्यांनी कृष्ण मंदिर उभारले होते. तिथे लोक एकत्र येत असत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. जेव्हा लोक एकत्र येत असत तेव्हा ते त्यांना देवपूजेबरोबरच कामाचे महत्त्व पटवून देत असत. पांडुरंगशास्त्री यांच्या अनुयायांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता. विशेष करून आगरी, कोळी लोकांच्या समाजात त्यांनी कार्य केले.

या कादंबरीतून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनाचा चांगला परिचय होतो. एक सच्चा हिंदू धर्माचा प्रेमी, सर्व जगात आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देणारी व्यक्ती, म्हणून त्यांचा गौरव होतो. समाजातील सर्व स्तरात त्यांचा वावर होता. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत….. परंतू त्यांनी स्वतःच्या आश्रमासाठी श्रीमंतांकडून अजिबात पैसा घेतला नाही. अतिशय निरपेक्षपणे काम केले आणि लोकांमध्ये जागृती केली. त्यांच्या या सर्व कामात त्यांच्या पत्नीची तसेच त्यांच्या मुलीची त्यांना चांगली साथ मिळाली. आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांच्यामुळे हिंदू धर्माची व्याप्ती आणि महत्त्व सर्वांना समजले.

ही कादंबरी मला आवडली कारण साधी, सोपी ओघवती भाषा, आणि आवडीचा विषय ‘ हिंदू धर्म! ’. आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक, तसेच सनातन असा आहे. हिंदू धर्मात सर्वांचा आदर केला जातो.  हिंदू धर्माची शिकवण या कादंबरीत चांगल्या प्रकारे विशद केली आहे. तसेच पांडुरंगशास्त्री यांचे व्यक्तिमत्त्वही  या कादंबरीतून चांगले कळून येते..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #159 ☆ परखिए नहीं – समझिए ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख परखिए नहीं–समझिए । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 159 ☆

☆ परखिए नहीं–समझिए ☆

जीवन में हमेशा एक-दूसरे को समझने का प्रयत्न करें; परखने का नहीं। संबंध चाहे पति-पत्नी का हो; भाई-भाई का हो; मां-बेटे का हो या दोस्ती का… सब विश्वास पर आधारित हैं, जो आजकल नदारद है। परंंतु हर व्यक्ति को उसी की तलाश है। इसलिए ‘ऐसे संबंध जिनमें शब्द कम और समझ ज्यादा हो; तक़रार कम, प्यार ज़्यादा हो; आशा कम, विश्वास ज़्यादा हो–की दरक़ार हर इंसान को है। वास्तव में जहां प्यार और विश्वास है, वही संबंध सार्थक है, शाश्वत है। समस्त प्राणी जगत् का आधार प्रेम है, जो करुणा का जनक है और एक-दूसरे के प्रति स्नेह, सौहार्द, सहानुभूति व त्याग का भाव ‘सर्वे भवंतु सुखीनाम्’ का प्रेरक है। वास्तव में जहां भावनाओं का सम्मान है, वहां मौन भी शक्तिशाली होता है। इसलिए कहा जाता है कि ‘खामोशियां भी बोलती हैं और अधिक प्रभावशाली होती हैं।’

यदि भरोसा हो, तो चुप्पी भी समझ में आती है, वरना एक-एक शब्द के अनेक अर्थ निकलने लगते हैं। इस स्थिति में मानव अपना आपा खो बैठता है। वह सब सीमाओं को लाँघ जाता है और मर्यादा के अतिक्रमण करने से अक्सर अर्थ का अनर्थ हो जाता है, जो हमारी नकारात्मक सोच को परिलक्षित करता है, क्योंकि ‘जैसी सोच, वैसा कार्य व्यवहार।’ शायद! इसलिए कहा जाता है कि कई बार हाथी निकल जाता है, पूँछ रह जाती है।

संवाद जीवन-रेखा है और विवाद रिश्तों में अवरोध उत्पन्न करता है, जो वर्षों पुराने संबंधों को पल-भर में मगर की भांति लील जाता है। इतना ही नहीं, वह दीमक की भांति संबंधों की मज़बूत चूलों को हिला कर रख देता है और वे लोग, जिनकी दोस्ती के चर्चे जहान में होते हैं; वे भी एक-दूसरे के दुश्मन बन जाते हैं। उनके अंतर्मन में वह विष-बेल पनप जाती है, जो सुरसा के मुख की मानिंद बढ़ती चली जाती है। इसलिए छोटी-छोटी बातों को बड़ा न किया करें, उससे ज़िंदगी छोटी हो जाती है…बहुत सार्थक संदेश है। परंंतु यह तभी संभव है, जब मानव क्रोध के वक्त रुक जाए और ग़लती के वक्त झुक जाए। ऐसा करने पर ही मानव जीवन में सरलता व असीम आनंद को प्राप्त कर सकता है। सो! मानव को ‘पहले तोलो, फिर बोलो’  अर्थात् सोच-समझ कर बोलने का संदेश दिया गया है। दूसरे शब्दों में तुरंत प्रतिक्रिया देने से मानव मन में दूरियां इस क़दर बढ़ जाती हैं, जिन्हें पाटना असंभव हो जाता है और जीवन-साथी– जो दो जिस्म, एक जान होते हैं; नदी के दो किनारों की भांति हो जाते हैं, जिनका मिलन जीवन-भर संभव नहीं होता। इसलिए बेहतर है कि आप परखिए नहीं, समझिए अर्थात् एक-दूसरे की परीक्षा मत लीजिए और न ही संदेह की दृष्टि से देखिए, क्योंकि संशय, संदेह व शक़ मानव के अजात-शत्रु हैं। वे विश्वास को अपने आसपास भी मंडराने नहीं देते। सो! जहां विश्वास नहीं; सुख, शांति व आनंद कैसे रह सकते हैं? परमात्मा भाग्य नहीं लिखता; जीवन के हर कदम पर हमारी सोच, विचार व कर्म हमारा भाग्य लिखते हैं। इसलिए अपनी सोच सदैव सकारात्मक रखिए। संसार में जो भी अच्छा लगे, उसे ग्रहण कर लीजिए और शेष को नकार दीजिए। परंतु किसी की आलोचना मत कीजिए, आपका जीवन सार्थक हो जाएगा। वे सब आपको मित्र सामान लगेंगे और चहुंओर ‘सबका मंगल होय’ की ध्वनि सुनाई पड़ेगी। जब मानव में यह भावना घर कर लेती है, तो उसके हृदय में व्याप्त स्व-पर व राग-द्वेष की भावनाएं मुंह छुपा लेती हैं अर्थात् सदैव के लिए लुप्त हो जाती हैं और दसों दिशाओं में दिव्य आनंद का साम्राज्य हो जाता है।

अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है। वह हमें किसी के सम्मुख झुकने अर्थात् घुटने नहीं टेकने देता, क्योंकि वह स्वयं को सर्वश्रेष्ठ समझता है और दूसरों को नीचा दिखा कर ही सुक़ून पाता है। सुख व्यक्ति के अहं की परीक्षा लेता है और दु:ख धैर्य की। इसलिए दोनों परीक्षाओं में उत्तीर्ण व्यक्ति का जीवन ही सार्थक व सफल होता है। इसलिए मानव को सुख में अहं को निकट नहीं आने देना चाहिए और दु:ख में धैर्य नहीं खोना चाहिए। दोनों परिस्थितियों में सम रहने वाला मानव ही जीवन में अलौकिक आनंद प्राप्त कर सकता है। सो! जीवन में सामंजस्य तभी पदार्पण कर सकेगा; जब कर्म करने से पहले हमें उसका ज्ञान होगा; तभी हमारी इच्छाएं पूर्ण हो सकेंगी। परंतु जब तक ज्ञान व कर्म का समन्वय नहीं होगा, हमारे जीवन की भटकन समाप्त नहीं होगी और हमें अपने लक्ष्य की प्राप्ति नहीं होगी। इच्छाएं अनंत है और साधन सीमित। इसलिए हमारे लिए यह निर्णय लेना आवश्यक है कि पहले किस इच्छा की पूर्ति, किस ढंग से की जानी कारग़र है? जब हम सोच-समझकर कार्य करते हैं, तो हमें निराशा का सामना नहीं करना पड़ता; जीवन में संतुलन व समन्वय बना रहता है।

संतोष सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम धन है। इसलिए हमें जो भी मिला है, उसमें संतोष करना आवश्यक है। दूसरों की थाली में तो सदा घी अधिक दिखाई देता है। उसे देखकर हमें अपने भाग्य को कोसना नहीं चाहिए, क्योंकि मानव को समय से पहले और भाग्य से अधिक कभी, कुछ भी प्राप्त नहीं हो सकता। संतोष अनमोल पूंजी है और मानव की धरोहर है। ‘जे आवहिं संतोष धन, सब धन धूरि समान,’ रहीम जी की यह पंक्ति इस तथ्य की ओर इंगित करती है कि संतोष के जीवन में पदार्पण करते ही सभी इच्छाओं का शमन स्वतः हो जाता है। उसे सब धन धूलि के समान लगते हैं और मानव आत्मकेंद्रित हो जाता है। उस स्थिति में वह आत्मावलोकन करता है तथा दैवीय व अलौकिक आनंद में डूबा रहता है; उसके हृदय की भटकन व उद्वेलन शांत हो जाता है। वह माया-मोह के बंधनों में लिप्त नहीं होता तथा निंदा-स्तुति से बहुत ऊपर उठ जाता है। यह आत्मा-परमात्मा के तादात्म्य की स्थिति है, जिसमें मानव को सम्पूर्ण विश्व तथा प्रकृति के कण-कण में परमात्म-सत्ता का आभास होता है। वैसे आत्मा-परमात्मा का संबंध शाश्वत है। संसार में सब कुछ मिथ्या है, परंतु वह माया के कारण सत्य भासता है। इसलिए हमें तुच्छ स्वार्थों का त्याग कर सुक़ून व अलौकिक आनन्द प्राप्त करने का अनवरत प्रयास करना चाहिए। इसके लिए आवश्यकता है उदार व विशाल दृष्टिकोण की, क्योंकि संकीर्णता हमारे अंतर्मन में व्याप्त दुष्प्रवृत्तियों को पोषित करती है। संसार में जो अच्छा है, उसे सहेजना बेहतर है और जो बुरा है, उसका त्याग करना बेहतर है। इस प्रकार आप बुराइयों से ऊपर उठ सकते हैं। उस स्थिति में संसार आपको सुखों का सागर प्रतीत होगा; प्रकृति आपको ऊर्जस्वित करेगी और चहुंओर अनहद नाद का स्वर सुनाई पड़ेगा।

अंत में मैं कहना चाहूंगी कि जीवन में दूसरों की परीक्षा मत लीजिए, क्योंकि परखने से आपको दोष अधिक दिखाई पड़ेंगे। इसलिए केवल अच्छाई को देखिए ;आपके चारों ओर आनंद की वर्षा होने लगेगी। सो! दूसरों की भावनाओं को समझने और उनकी बेरुखी का कारण जानने का प्रयास कीजिए। जितना आप उन्हें समझेंगे, आपकी दोष-दर्शन की प्रवृत्ति का अंत हो जाएगा। इंसान ग़लतियों का पुतला है और कोई भी इंसान पूर्ण नहीं है। फूल व कांटे सदैव साथ-साथ रहते हैं, उनके अस्तित्व को नकारा नहीं जा सकता। सृष्टि में जो भी घटित होता है–मात्र किसी व्यक्ति विशेष के लिए नहीं; सबके मंगल के लिए कारग़र व उपयोगी सिद्ध होता है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

29.8.22

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – कमाई ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक  विचारणीय लहूकथा – कमाई ।)

☆ लघुकथा – कमाई  ☆ श्री हरभगवान चावला ☆

स्कूल से लौटने के बाद से तीसरी कक्षा में पढ़ने वाली बेटी तीन घंटे से पढ़ रही थी। उसे न खाने की सुध थी, न सोने की। इतनी देर तक तो बेटी कभी भी नहीं पढ़ी। शारदा ने पुकार कर पूछा, “आज स्कूल से बहुत काम मिला है क्या बेटी?”

“हाँ माँ।” श्रेया ने जवाब दिया।

“इतने छोटे बच्चों को इतना काम?” माँ ने भीतर आते-आते कहा। बेटी अब भी एक मोटी सी किताब पर झुकी हुई थी। माँ ने उस किताब को उठाकर उलट-पलट कर देखा,

“यह तुम्हारे सिलेबस की किताब तो नहीं है।”

“हाँ माँ, यह जी.के. की किताब है, स्कूल की लाइब्रेरी से इश्यू करवाई है। एक क्विज़ कंपिटीशन है, उसी की तैयारी करनी है।”

“क्विज़…?”

“डिस्ट्रिक्ट लेवल का कंपिटीशन है। कोई एंट्री फ़ीस नहीं है और जीतने पर नक़द ईनाम भी मिलेगा। मुझे यह कंपिटीशन जीतना ही है।”

“पर इतनी मेहनत…?”

“तुम पैसा कमाने के लिए कितनी मेहनत करती हो, मैं भी तुम्हारे लिए पैसा कमाना चाहती हूँ। पापा ने तो हमें छोड़ ही दिया है।” शारदा की आँखों में नमी उतर आई। श्रेया ने अपनी उँगलियाँ माँ की आँखों पर रख दीं,

“उस आदमी के लिए रोने की ज़रूरत नहीं। तुम चिंता मत करो, मैं कमाऊँगी मेरी प्यारी माँ के लिए।”

शारदा ने श्रेया को ख़ुद से चिपका लिया और धीरे से बड़बड़ाई, “तुम्हारे पास तो सिर्फ़ पैसा है राकेश, जीवन की असली कमाई तो मेरे पास है।”

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चादर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना🌻

आज का साधना मंत्र  – ॐ नमो भगवते वासुदेवाय

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –  चादर ??

लिखनेवाले की चादर

अनुभूति समझ लेती है,

कम-से कम शब्दों में

अभिव्यक्त हो लेती है..!

© संजय भारद्वाज 

(कवितासंग्रह- मैं नहीं लिखता कविता)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #159 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से \प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है “भावना के दोहे।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 159 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

गघरी ली है हाथ में,थककर बैठी छाँव।

गहरी सोच में डूबती,पिया नहीं है गाँव।।

🌴

राह प्रिय की देख रही,गुमसुम बैठी सोच।

कब आओगे सजन तुम,दिल में आई मोच।।

🤔

मिलने प्रिय को आ गई,घर में नहीं है ठाँव।

कब आओगे प्रिये तुम,थमते नहीं है पाँव।।

🌹

पानी भरकर बैठती,चेहरा है उदास।

दिल में उसके हो रही,बस प्रिय की है आस।।

💐

चिंता मन में हो रही,आ जाओ प्रिय पास।

दिल से दिल की दूरियां,जगती मन में खास।।

🌹

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈