मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

(आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते!  पुढे चालू…)

आता आणखी नवीन प्रकार म्हणजे, वेब सिरियल्स आणि ओटीटी यांचीही भर पडलेली आहे, करमणूक क्षेत्रात. बहुतेक तरुण पिढीतले लोक यातल्या इंग्लिश, हिंदी सिरियल्स बघत असतात. या तरुण पिढीला रहस्यमय, थरारक काहीतरी बघायला आवडते. रोजच्या रुटीनमुळे वैतागून गेलेले असताना त्यांना या मालिका बघायला आवडणं स्वाभाविक आहे. आणि टी. व्ही. वरच्यासारखा जाहिरातींचा व्यत्यय पण नसतो ओटीटी वर. आम्ही पण मध्यंतरी ओटीटी वर ‘बंदिश बॅन्डीट’ ही सिरीयल पाहिली होती. खरोखरच सुरेख होती, आणि दहाच भागात संपवल्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता टिकून होती. शास्त्रीय संगीताच्या एका घराण्याची कहाणी दाखवलेली होती यात. सध्या ‘God Freinded Me’ ही मालिका बघतोय. अर्थातच, अमेरिकेत घडणारी. त्यात एका तरुण आफ्रिकन अमेरिकन मुलाला फेसबुक वर देवाची फ्रेंड रिक्वेस्ट येते, हा मुलगा असतो नास्तिक, त्याचे वडील एका चर्चमधे रेव्हरंड असतात. तो ही रिक्वेस्ट बघून गडबडून जातो, ती स्वीकारावी की नाही, अशा गोंधळात पडतो. पण त्याचा मित्र असतो एक भारतीय मुलगा. तो त्याला ती स्विकारायला तयार करतो. आणि मग या ‘गॉड अकाउंट’ वरून त्याला एकेक फ्रेंड रिक्वेस्ट येत रहातात. आणि कर्म धर्म संयोगाने ते लोक याला भेटतात, आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यातले काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला हे दोघे मित्र त्यांना मदत करतात. याच प्रवासात त्याला एक मैत्रीण पण मिळते. प्रत्येक गोष्ट वेगळी. प्रत्येक एपिसोडमधे एकेक गोष्ट. प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम. बघताना आपण रंगून जातो अगदी! अजिबात कंटाळा येत नाही. अशा काही वेगळ्या थीमवर आपल्याकडच्या लोकांना का मालिका बनवता येऊ नयेत? आपले काही मराठी तरुण हल्ली खूप वेगळे विषय घेऊन चित्रपट काढतात. मग मालिका का नाही?

सध्या चालू असलेल्या काही मराठी मालिका, उदा. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामधे भरली’ यात थोडा वेगळा विषय जोडलेला आहे, नेहमीच्या कौटुंबिक मालिकेला, पण यातही नायक नायिकेची अती छळणूक चालूच आहे! काय होतं, एका ठराविक वेळेला ते बघायची आपल्याला सवय लागलेली असते, आणि मग, ‘धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं’ अशी गत झाल्यामुळे आपल्याला ते बघवतही नाही, आणि सोडवतही नाही! असे आपण त्या मालिकेच्या जाळ्यात अडकतो आणि त्यांना TRP मिळत राहिल्याने, तेही मालिका बंद न करता, कथानकात पाणी घालून वाढवत रहातात! असं हे एक दुष्टचक्र आहे!  अशीच एक हिंदी मालिका, ‘बॅरिस्टर बाबू’ नावाची. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली. बंगालमधे घडणारी, त्यात इंग्लंड मधे शिकून, बॅरिस्टर बनून आलेला एक तरुण एका सात आठ वर्षाच्या मुलीला, म्हाताऱ्या माणसाशी होत असलेल्या लग्नातून वाचवायला जातो आणि त्याच्यावर नाईलाजाने तिच्याशी लग्न करायची वेळ येते. आणि मग त्याच्या जमीनदार कुटुंबातून त्या लग्नाला विरोध, त्या छोट्या मुलीला येणाऱ्या अडचणींमधून तिला वाचवण्याची त्याची धडपड अशी खूप छान सुरुवात केली होती. पण ही पण मालिका भरकटत जाऊन आजही तिचं दळण चालूच आहे!

या मालिकांशिवाय वेगवेगळ्या चॅनल्सवर ‘रिअॅलिटी शो’ पण चालू असतात अधून मधून. हे शो पण जेंव्हा चालू झाले, तेंव्हा खरे वाटायचे. गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यालाच महत्व असायचं. परीक्षक नामवंत गायक, संगीतकार आणि स्पर्धकही चांगले गाणारे असायचे. खूप चांगली जुनी, क्लासिकल गाणी ऐकायला मिळायची. हे कार्यक्रम खूप आनंद द्यायचे. नृत्याचे असे स्पर्धात्मक कार्यक्रमही चांगले असायचे. पण आताशा गायनाच्या परिक्षकात सिनेमात कोरिओग्राफी करणारे, काव्य लिहिणारे, आणि नृत्याचे परीक्षक म्हणून लेखक असा सगळा विचित्र मामला सुरु झालेला आहे! आणि स्पर्धकांच्या गाण्यापेक्षा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त फोकस, स्पर्धकांच्या किंवा परीक्षकांच्या खोट्या नाट्या प्रेमकहाण्या रंगवणं यातच अधिक वेळ घालवणं, एखाद्या स्पर्धकाच्या गरिबीचा तमाशा मांडणं हेच सुरु झालेलं आहे. या मागे त्यांची काय कारणं असतात, ते त्याचं त्यांना माहीत! पण गाण्याची आवड असलेल्यांचा मात्र रसभंग होतो आणि त्या कार्यक्रमातला इंटरेस्ट कमी होतो, हे कळत नाही का या लोकांना? पूर्वी या कार्यक्रमात परीक्षकांकडून स्पर्धकांना त्यांच्या काय चुका होताहेत, काय सुधारणा करता येतील, हे सांगितलं जायचं. आणि काही परीक्षक तर त्या स्पर्धकांचा आत्मविश्वासच खच्ची होईल, इतकी नावं ठेवत असत त्यांच्या गाण्याला. हे अर्थात चुकीचंच होतं, पण हल्ली त्याच्या उलट, प्रत्येक स्पर्धकाची वारेमाप स्तुती करत असतात परीक्षक! आणि त्या स्पर्धकांपुढे काही आव्हानं ठेवण्याची पद्धतही बंदच केलेली आहे. प्रत्येक जण आपला जो ठराविक प्रकार किंवा शैली हातखंडा आहे, त्यातलीच गाणी प्रत्येक वेळी सदर करून वाहवा मिळवत असतो. सगळ्यांनी सगळे प्रकार सादर करावेत म्हणजे त्यांची खरी गुणवत्ता पारखली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींमुळे एखादा सवंग मनोरंजनाचा प्रकार असं स्वरुप आलेलं आहे या कार्यक्रमांना! 

त्याचमुळे हल्ली टी. व्ही. पेक्षा OTT वरचे कार्यक्रमच अधिक पहावेसे वाटतात. अजून तरी ते दर्जेदार असतात आणि भरकटण्याआधीच संपवले जातात. टी. व्ही. वाल्यांनी याची दखल घेतली नाही, तर त्यांची अधोगती आणि विनाश अटळ आहे!

– समाप्त –

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मात… भाग – 4 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 4 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वसूत्र: अक्षय शालिनीला शाळेची नोकरी सोडून पांड्याजींची सेक्रेटरी व्हायला सांगतो. गरजेच्या वेळी ते मदत करतील, असंही सांगतो…. आता पुढे….)

आणि मग पुन्हा मासा गळाला लागला. ती सेक्रेटरी झाली.

हेही सांगितलं पाहिजे की माझ्या आग्रहावरून तिने आधीच तिचे लांब केस कापले होते. खूप प्रयत्नांनंतर ती स्लीव्हलेस ब्लाऊझ आणि हाय हिल सॅन्डल्स घालायला लागली होती. शेवटी तिचं रूपयौवन कोणाच्या खुशीसाठी होतं? माझ्याच ना? आता सगळेच खूश राहतील. मीही आणि पांड्याजीही.

दोन-चार दिवस सगळं व्यवस्थित चाललं. मी श्वास रोखून ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, तो आला एकदाचा.

माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शालिनी ओक्साबोक्सी रडू लागली. पांड्याच्या गलिच्छ वागण्याने ती एवढी वैतागली होती, की मरण्यामारण्याच्या गोष्टी करू लागली. कितीतरी वेळ ती बोलत होती आणि मी ऐकत होतो.

किती मागासलेले संस्कार! आजकालच्या मुली एवढ्या बोल्ड आणि बिनधास्त असतात आणि माझ्या नशिबात साली ही काकूबाई लिहिलीय. कोणी नुसता स्पर्श केला, तरी कलंकित होणारी. माय फूट!

किती वेळ मी तिचं पावित्र्यावरचं लेक्चर ऐकत बसणार? शेवटी बोललोच, ” जराशी तडजोड करून जर आपलं आयुष्य सुधारणार असेल, तर काय हरकत आहे? जरा थंड डोक्याने विचार कर, शीलू. आपल्याला पांड्याची गरज आहे. त्याला आपली गरज नाहीय. या बारीकसारीक गोष्टींनी असा काय फरक पडतोय? “

ती विदीर्ण नजरेने बराच वेळ माझ्याकडे बघत राहिली. मग दाटलेल्या कंठाने बोलली, ” हो. काय फरक पडतोय!”

तिची नजर, तिचा स्वर यामुळे मी अस्वस्थ झालो. तरीही हसून बोलणार, तेवढ्यात तीच म्हणाली, “तू चांगले दिवस यायची किती वाट बघितलीस! आता येतील ते. असंच ना?”

माझ्या मनातलं तिच्या तोंडून ऐकल्यावर मी झेलपाटलोच. तरी स्वतःला सावरत म्हटलं, ” मला असं नव्हतं म्हणायचं, शीलू. तुझं सुख….. “

मला अर्ध्यावरच तोडत ती म्हणाली, “काही गोष्टी न बोलताही समजतात, अक्षय. तर पैशासाठी मी एखाद्या म्हाताऱ्याला गटवायचं, हेच ना?”

आता तुम्हीच सांगा, इतक्या दिवसांच्या प्रेमाची हिने अशी परतफेड करावी? प्रेम असं निभावतात? स्वार्थी!विश्वासघातकी बाई! जीवनाच्या वाटेवर चालताचालता मध्येच माझा हात सोडून दिला. शेवटी मीही तिचाच होतो ना? काय म्हणालात? मीच हात दाखवून अवलक्षण…..

आता काय सांगू? तिने माझ्या बापाशी लग्न केलं. आज ती माझी आई आहे. आणि माझ्या बापाला बोटांवर नाचवतेय. आत्ताच्या माझ्या या दशेला तीच कारणीभूत आहे. विश्वास नाही बसत?

क्रमशः ...

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा  .. माध्यम कोणतेही असो doesn’t matter..संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो, आपल्याही नकळत.

आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यंत तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे. देवातल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते नाही माहीत, पण तो आपल्या फांद्या हलवून, कधी पाने नाचवून, तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही ? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची, त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. …. 

काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तोही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फुले बरसवली..ना पानांची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फुलं ओंजळीत घेतली. त्यांचा हलका वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले.. 

काही दिवसांनी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकीजवळची फांदी मात्र सुकून गेली.. 

आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..

काय ? पटतयं का ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ (अग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२  (अग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ ( अग्नि सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

अ॒ग्निं दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् । अ॒स्य य॒ज्ञस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ १ ॥

समस्त देवांचा अग्नी तर विश्वासू दूत

अर्पित हवि देवांना देण्या अग्नीचे हात 

अग्नी ठायी वसले ज्ञान वेदांचे सामर्थ्य

आवाहन हे अग्निदेवा होउनिया आर्त ||१||

अ॒ग्निम॑ग्निं॒ हवी॑मभिः॒ सदा॑ हवन्त वि॒श्पति॑म् । ह॒व्य॒वाहं॑ पुरुप्रि॒यम् ॥ २ ॥

मनुष्य जातीचा प्रिय राजा पवित्र  अनलाग्नी

सकल देवतांप्रती नेतसे हविला पंचाग्नी

पुनःपुन्हा आवाहन करितो अग्नीदेवतेला

सत्वर यावे सुखी करावे शाश्वत आम्हाला ||२||

अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह जज्ञा॒नो वृ॒क्तब॑र्हिषे । असि॒ होता॑ न॒ ईड्यः॑ ॥ ३ ॥

दर्भाग्रांना सोमरसातून काढूनिया सिद्ध

अर्पण करण्याला देवांना केले पूर्ण शुद्ध

हविर्भाग देवांना देशी पूज्य आम्हासी 

सवे घेउनी समस्त देवा येथ साक्ष होशी ||३|| 

ताँ उ॑श॒तो वि बो॑धय॒ यद॑ग्ने॒ यासि॑ दू॒त्यम् । दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ४ ॥

जावे अग्निदेवा होउनिया अमुचे दूत

कथन करी देवांना अमुच्या हवीचे महत्व

झणी येथ या देवांना हो तुम्ही सवे घेउनी

यज्ञवेदिवर विराज व्हावे तुम्ही दर्भासनी ||४||

घृता॑हवन दीदिवः॒ प्रति॑ ष्म॒ रिष॑तो दह । अग्ने॒ त्वं र॑क्ष॒स्विनः॑ ॥ ५ ॥

सख्य करूनीया दैत्यांशी रिपू प्रबळ जाहला

प्राशुनिया घृत हवनाने तव प्रज्ज्वलीत ज्वाला 

अरी जाळी तू ज्वालाशस्त्रे अम्हा करी निर्धोक 

सुखी सुरक्षित अम्हास करी रे तुला आणभाक ||५||

अ॒ग्निना॒ग्निः समि॑ध्यते क॒विर्गृ॒हप॑ति॒र्युवा॑ । ह॒व्य॒वाड् जु॒ह्वास्यः ॥ ६ ॥

स्वसामर्थ्ये प्रदीप्त अग्नी वृद्धिंगत होई 

प्रज्ञा श्रेष्ठ बुद्धी अलौकिक गृहाधिपती होई

चिरयौवन हा सर्वभक्षक याचे मुख ज्वाळांत 

मुखि घेउनी सकल हवींना देवतांप्रती नेत ||६|| 

क॒विम॒ग्निमुप॑ स्तुहि स॒त्यध॑र्माणमध्व॒रे । दे॑वम॑मीव॒चात॑नम् ॥ ७ ॥

अग्नी ज्ञानी श्रेष्ठ देतसे जीवन निरामय

ब्रीद आपुले राखुनि आहे विश्वामध्ये सत्य

यज्ञामध्ये स्तवन करावे अग्नीदेवाचे

तया कृपेने यज्ञकार्य हे सिद्धीला जायचे ||७||

यस्त्वाम॑ग्ने ह॒विष्प॑तिर्दू॒तं दे॑व सप॒र्यति॑ । तस्य॑ स्म प्रावि॒ता भ॑व ॥ ८ ॥

अग्निदेवा तुला जाणुनी  देवांचा दूत

पूजन करितो हवी अर्पितो तुझिया ज्वाळात

यजमानावर कृपा असावी तुझीच रे शाश्वत

रक्षण त्याचे तुझेच कर्म प्रसन्न होइ मनात ||८||

यो अ॒ग्निं दे॒ववी॑तये ह॒विष्माँ॑ आ॒विवा॑सति । तस्मै॑ पावक मृळय ॥ ९ ॥

प्रसन्न करण्या समस्त देवा तुम्हालाच पुजितो

यागामाजी यज्ञकर्ता तुमची सेवा करितो

सकल जनांना पावन करिता गार्हपत्य देवा 

प्रसन्न होऊनी यजमानाला शाश्वत सुखात ठेवा ||९||

स नः॑ पावक दीदि॒वोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒हा व॑ह । उप॑ य॒ज्ञं ह॒विश्च॑ नः ॥ १० ॥

विश्वाचे हो पावनकर्ते आवहनीय देवा

यज्ञामध्ये हवी अर्पिल्या आवसस्थ्य देवा

यज्ञ आमुचा फलदायी हो दक्षिणाग्नी देवा

सवे घेउनिया यावे यज्ञाला या समस्त देवा ||१०||

स नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र गाय॒त्रेण॒ नवी॑यसा । र॑यिं वी॒रव॑ती॒मिष॑म् ॥ ११ ॥

अग्निदेवा तुमची कीर्ति दाही दिशा पसरली

गुंफुन स्तोत्रांमाजी मुक्तकंठाने गाइली

आशीर्वच द्या आम्हा आता धनसंपत्ती मिळो

तुझ्या प्रसादे आम्हापोटी वीर संतती मिळो ||११||

अग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ विश्वा॑भिर्दे॒वहू॑तिभिः । इ॒मं स्तोमं॑ जुषस्व नः ॥ १२ ॥

प्रज्ज्वलित तुमची आभा ही विश्वाला व्यापिते

हवी अर्पितो समस्त देवांना तुमच्या ज्वालाते

प्रसन्न होउन अर्पियलेले हविर्भाग स्वीकारा

देऊनिया आशीर्वच आम्हा यज्ञा सिद्ध करा ||१२||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/2_RrKUNjD7s

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष….. यांनाच षडरिपु म्हणतात. 

—-फार्सी भाषेत यांना ऐब म्हणतात.

 

हे सहा ऐब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात, त्याला साहेब म्हणतात…..  

या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात….  

या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात…..  

या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात….  

या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात…..  

या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात…..  

आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात….  

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… सन 1957चं राजकमल स्टुडिओत गुरूदत्तचं प्यासा चित्रपटातलं… ‘सर तेरा जो चकराये, या दिल डूबा जाये… आजा प्यारे पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए… गाण्याचं शुटींगची तयारी होत असताना त्या गाण्यासाठी एक डोक्याला टक्कल असलेल्या  माणसाची गरज भासली… शुटींगचं सगळं  युनीट त्याचा शोध घेण्यास सरसावलं… अख्खा स्टुडिओ पिंजून काढला पण हवा तसा नैसर्गिक टक्कलाचा माणूस मिळेना… त्या वेळेस एक्स्ट्रा सप्लायर्स टूम नसल्याने शुटींगचं बराच वेळ खोळंबून राहिलं… गुरुदत्त नां तो माणूस त्या गाण्यात हवाच होता… तो मिळे पर्यंत त्यांच्या जिवाला चैन नव्हती… जाॅनी वाॅकर आणि गुरूदत्त  फ्लोवर बसून एक कटिंग चहाचे प्याले  घोट घोटाने घेतं…  पहिला दुसरा, तिसरा रिचवत राहिले.. स्पाॅट बाॅय, चायवाला, गाडीचे ड्रायव्हर यांना सुध्दा  राजकमल स्टुडिओच्या बाहेर पिटाळणयात आलं… ‘और जो ऐसे शख्स से धुंड के लायेगा उसे बडा इनाम मिलेगा’ असही सांगण्यात आलं… सगळेच झटून कामाला लागले… आणि आणि तासाभरातच आत्माराम गावकर नावाचा टक्कल असलेला माणूस कुणा सोबत तिथे आणला गेला… लगेचच एक चाय का प्याला त्यांच्या आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांना स्वता गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर यांनी दिला… चहा पान झालं.. . कायं करायचं याची कल्पना गावकरांना दिली… एकदा दोनदा रिहर्सल्स झाली… शुटींग सुरू झाले, लाईट , कॅमेरा, साऊंड ऑन आता अक्शन म्हटले… एव्हढ्या त्या प्रचंड गोंधळात आत्माराम घाबरून गेले… काय करायचं कसं करायचं हे त्यांना सुचेना… आपलं हे काम नव्हे आपण आताच येथून बाहेर गेलेलं बरं म्हणून पळ काढावा.. असं त्यांच्यात मनात आलं आणि तिथून ते बाहेर पडले.. पुन्हा शुटींग थांबवलं… गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर नी त्यांना धीर दिला..एक कटिंग चहा दिला… घाबरून जाऊ नका काहीही होणार नाही… फक्त मी तुम्हांला बसवून मालिश करणार आहे ते तुम्ही करून घायचं ईतकचं… गाणं संपले कि झालं… फिरून गावकरा़ंची मानसिक तयारी झाली…लाईट कॅमेरा.. ॲक्शन पुन्हा तेच घडलं… मग परत परत तसचं घडत गेलं… दरवेळेला कटिंग चहा दिला जायचा.. तरतरी यायची भीती कमी झाली असं वाटायचं … असे बरेच टेक झाले शेवटी निदान एका कडव्या पुरता का होईना  पण शाॅट घेण्याचा ठरला आणि तोही त्यांच्या नकळत… थोडे लाईट अंधूक लावले गेले… आता गावकरांनी पण मनाचा हिय्या केला… आता हिथं न थांबता ताबडतोब बाहेर निघून जायचं… जाॅनी वाॅकरनीं गाण्यात त्यांच्या हाताला धरलं होतं तो हात सोडून तिथून धावतच ते निघाले… ते आपल्या घराकडे येईपर्यंत मागेसुद्धा जरा वळून न बघता… घरात येताच त्यांची बायकोने विचारले, “खयं गेला व्हतास? चाय कधीची करून वाट बघत रव्हली मी…”

“आनं तो चाय हडे नि ओत तो माज्या टकलावर.. ” गावकर चिडले… आज त्यांना एक कटिंग चाय आपली पाठ सोडत नाही हेच समजले…

… प्यासा थेटरला लागला गावकरांनी बायको सोबत पाहिला… विषेश ते गाणं बघून दोघांना आनंद वाटला…

सिनेमा संपला नि सौ. गावकर  म्हणाल्या “गाणं संपे पर्यंत तरी फुकटची  तेल मालिश तरी करुन घ्यायची व्हती… निदान शेवटाक बिदागी तरी मिळाली असती… हया कामाचे तुमका काय मिळाला?”

“एक कटिंग चाय…” गावकर  कसनुसं तोंड करत म्हणाले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 108 ☆ लघुकथा – मान जाओ ना माँ ! ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  स्त्री विमर्श पर आधारित एक संवेदनशील, हृदयस्पर्शी एवं विचारणीय लघुकथा ‘मान जाओ ना माँ !’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा  रचने   के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 108 ☆

☆ लघुकथा – मान जाओ ना माँ !  ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

मम्माँ किसी से मिलवाना है तुम्हें।

अच्छा, तो घर बुला ले उसे, पर कौन है? 

मेरा एक बहुत अच्छा दोस्त है।

मुझसे भी अच्छा? सरोज ने हँसते हुए पूछा।

इस दुनिया में सबसे पहले तुम ही तो मेरी दोस्त  बनी। तुम्हारे जैसा तो कोई हो ही नहीं सकता मम्माँ, यह कहते हुए विनी माँ के गले लिपट गई।

अरे ! दोस्त है  तो फिर पूछने की क्या बात है इसमें, आज शाम को ही बुला ले।  हम  सब  साथ में ही चाय पियेंगे।

सरोज ने शाम को चाय – नाश्ता  तैयार कर लिया था और बड़ी बेसब्री से विनी और उसके दोस्त का इंतजार कर रही थी। हजारों प्रश्न मन में उमड़ रहे थे। पता नहीं किससे मिलवाना चाहती है? इससे पहले तो कभी ऐसे नहीं बोली। लगता है इसे कोई पसंद आ गया है। खैर, ख्याली पुलाव बनाने से क्या फायदा, थोड़ी देर में सब सामने आ ही जाएगा, उसने खुद को समझाया। 

तभी दरवाजे की आहट सुनाई दी। सामने देखा विनी किसी अधेड़ उम्र के व्यक्ति के साथ चली आ रही थी।

मम्माँ ! आप  हमारे कॉलेज में अंग्रेजी के प्रोफेसर  हैं – विनी ने कहा।

नमस्कार, बैठिए – सरोज ने विनम्रता से हाथ जोड़ दिए। विनी बड़े उत्साह से प्रोफेसर  साहब  को अपनी पुरानी फोटो  दिखा रही थी। काफी देर तक तीनों बैठे बातें  करते रहे। आप लोगों के साथ बात करते हुए समय का पता ही नहीं चला, प्रोफेसर  साहब ने घड़ी देखते हुए कहा – अब मुझे चलना चाहिए।

सर ! फिर आइएगा विनी बोली।

हाँ जरूर आऊँगा,  कहकर वह चले गए।

सरोज के मन में उथल -पुथल मची हुई  थी। उनके जाते ही विनी से बोली – तूने प्रोफेसर  साहब की उम्र देखी है? अपना दोस्त कह रही है उन्हें? कहीं कोई गलती न कर बैठना विनी – सरोज ने चिंतित स्वर में कहा।

विनी मुस्कुराते हुए बोली – पहले बताओ तुम्हें कैसे लगे प्रोफेसर  साहब? 

बातों से तो भले आदमी लग रहे थे पर – 

तुम्हारे लिए रिश्ता लेकर आई हूँ प्रोफेसर साहब का, बहुत अच्छे इंसान हैं। मैंने उनसे बात कर ली है। सारा  जीवन तुमने मेरी देखरेख में गुजार दिया। अब अपनी दोस्त को  इस घर में अकेला छोड़कर मैं  तो शादी नहीं  कर सकती।  मान जाओ ना माँ !

©डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 127 – “अर्घ, कविता संग्रह” – सुश्री दामिनी खरे ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है सुश्री दामिनी खरे जी द्वारा लिखित काव्य संग्रह “अर्घ…” पर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 127 ☆

☆ “अर्घ, कविता संग्रह” – सुश्री दामिनी खरे ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’’ ☆

पुस्तक चर्चा

अर्घ, कविता संग्रह

दामिनी खरे

आवरण.. यामिनी खरे

प्रकाशक … कृषक जगत, भोपाल

काव्य रचनाओ  को गहराई से समझने के लिये वांछित होता है कि रचनाकार के व्यक्तित्व, उसके परिवेश, व कृतित्व का किंचित ज्ञान पाठक को भी हो, जिससे परिवेश के अनुकूल लिखित कविताओं को  पाठक उसी पृष्ठभूमि से  हृदयंगम कर आनन्द की वही अनुभूति कर सके,  जिससे प्रेरित होकर लेखक के मन में रचना का प्रादुर्भाव हुआ होता है. शायद इसीलिये किताब के  पिछले आवरण पर  रचनाकार का परिचय प्रकाशित किया जाता है. प्रस्तुत कृति अर्घ का  आवरण चित्र प्रसिद्ध अव्यवसायिक महिला चित्रकार यामिनी खरे ने बनाया है, छोटे छोटे चित्रों से बना कोलाज ठीक वैसे ही हमारी संस्कृति के विभिन्न आयाम मुखरित करता है जैसे शब्द चित्र किताब की कविताओं से अभिव्यक्त होते हैं ।  आत्मकथ्य में कवियत्री ने लिखा है की उनके रचनात्मक व्यक्तित्व पर उनके पिता की छाप है, मैंने स्व  वासुदेव प्रसाद खरे जी की देवयानी सहित कुछ रचनाएँ सूक्ष्म दृष्टि से पढ़ी हैं, मैं कह सकता हूँ की दामिनी जी की लेखनी में पिता की  प्रति छाया शैली, छंद विधान, शब्द सागर में स्पष्ट रूप से परिलक्षित होती है। भारतीय सामाजिक परिवेश में अनेक महिलाएं विलक्षण व्यक्तित्व रखती हैं किन्तु विवाह के उपरांत परिवार, बच्चो तथा पति के साथ कदमताल करते हुए उनका निजी व्यक्तित्व शनैः शनैः कहीं खो जाता है, दामिनी जी जैसी बिरली महिलाये ही अपने भीतर उस क्षमता को दीर्घ काल तक सुशुप्त रहते हुए भी प्राणवान बनाये रख पाती हैं।

उन्होंने लिखा ही है

“करके अपना ही पिंड दान, बन दीप शिखा जलती जाती “, बेटियां  शीर्षक से लिखी गई यह कविता उनका भोगा हुआ यथार्थ है।  उनके सुपुत्र ने लैंडमार्क के बहाने उनकी लेखन प्रतिभा को पुनः जागृत करने में  भूमिका निभाई, और लेखिका संघ के व्हाट्स अप ग्रुप ने वह  धरातल दिया जहां बचपन से अब तक के उनके संवेदनशील मन ने जो मानस चित्र बना रखे थे वे शब्दों का रूप लेकर कागज पर उभर सके। पिता के काव्य संस्कारो को पति  का साथ मिला और यह किताब हिंदी जगत को मिल सकी ।  छोटी छोटी सधी हुई, गंभीर, उद्देश्यपूर्ण,समय समय पर लिखी गईं और डायरी में संग्रहित रचनाओं के पुस्तकाकार  प्रकाशन से साहित्य के प्रति अपनी एक जिम्मेदारी पूरी कर लेखिका ने उस प्रसव पीड़ा से मुक्ति पाने की कोशिश की  है जिसकी छटपटाहट उनमें कविताओं के लेखन काल से रही होगी.कविताओ  में शाश्वत तथ्य मुखरित हुए हैं। यथा..

“ सुख दुःख में गोते लगाना है जीवन, हर पल ख़ुशी से बिताना है जीवन “

संग्रह में कुल ६१ कविताये हैं, प्रकृति, नारी, राष्ट्र, लोकचेतना, समाज जैसे विषयों पर कलम उठाई गई है।   मैं लेखिका की  कलम की उसी यात्रा में अपने आप को सहगामी पाता हूं, जिसमें कथित पाठक हीनता की विडम्बना के बाद भी प्रायः रचनाकार समर्पण भाव से लिख रहे हैं,स्व प्रकाशित कर, एक दूसरे को पढ़ रहे हैं. नीलाम्बर पर इंद्रधनुषी रंगो से एक सुखद स्वप्न रच रहे हैं. लेखिका चिर आशान्वित हैं, वे मां को इंगित करते हुए लिखती हैं ” धैर्य धरा सा तुमसे सीखा, सीखा कर्म किये जाओ, फल देना ईश्वर के हाथो, तुम केवल चलते जाओ “

बादलों को लक्ष्य कर वे लिखती हैं “कनक कलश से छलक रहे ये वन उपवन को महकाते, नहीं जानते लेना ये बस देना ही देना जाने “

“ जीवन है इक भूल भुलैया, रह ढूँढना रे मन, नई  राह पर चलते चलते धैर्य न खोना रे मन “  इन कसी हुई पंक्तियों की विवेचना प्रत्येक पाठक के स्वयं के अनुभव संसार के अनुरूप व्यापक होंगी ही.

धूप का टुकड़ा शीर्षक से एक रचना का अंश है.. ” सुनो संगीत जीवन का, नहीं मालूम क्या हो कल, मुझे भाता है संग इनका, तुम्हें भी रास आएगा”  जीवन विमर्श के ये शब्द चित्र बनाते हुये  दामिनी जी किसी परिपक्व वरिष्ठ कवि की तरह  उनकी लेखनी पर शासन कर रही दिखाई देती है.

अर्घ, पुस्तक की शीर्षक रचना में वे लिखती हैं…

भावना के अर्घ देकर चल मना

लौ प्रकम्पित कर रहा मन अर्चना

पंछियों सी अब गगन में उड़ चली

फलक पर नित नवल करती सर्जना

भारत माता शीर्षक से वे लिख रही हैं ” लेते हैं हम शपथ विश्व मे उन्नत मां  का भाल करे, सेवा का प्रण लेकर हम सब सदा स्वार्थ का त्याग करें  ” काश कि यही भाव हर भारतीय के मन में बसें तो दामिनी जी  की लेखनी सफल हो जावे.

उनका  ज्ञान व चिंतन परिपक्व है.  एक रचना अंश  उधृत है ” नैन कह जाते अकथ कहानी, मुखर ह्रदय की वाणी, शीतल सरिता के स्वर, नैन झरे झर झर “

छंद, शब्द सामर्थ्य, बिम्ब योजना हर दृष्टि से कवितायेँ  पठनीय तथा मनन, चिंतन योग्य सन्देश समाहित किये हुए है।  अपनी ” मौन स्वर “कविता में वे लिखती हैं ” जिंदगी के इस सफर में त्याग ही अनुगामिनी है,मौन स्वर तू रागिनी है “

प्रत्येक  रचना के भाव पक्ष की प्रबलता के चलते  आप को इस कृति  पढ़ने की सलाह देते हुये मैं आश्वस्त हूं.

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

वर्तमान मे – न्यूजर्सी अमेरिका

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – आपबीती ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

श्री भास्कर साधना आरम्भ हो गई है। इसमें जाग्रत देवता सूर्यनारायण के मंत्र का पाठ होगा। मंत्र इस प्रकार है-

💥 ।। ॐ भास्कराय नमः।। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –  आपबीती ??

मैं डुबकी लगाना

चाहता था गहरी,

सो गहरे लोगों की

संगत करने की सूझी,

फिर समय ने बताया,

अनुभव ने दोहराया,

आपबीती से पता चला था,

मैं उथला ही भला था..!

© संजय भारद्वाज 

प्रात: 7:20, 23 दिसम्बर 2022

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – आलेख ☆ गुरु ही सर्वोपरि है… ☆ डॉ निशा अग्रवाल ☆

डॉ निशा अग्रवाल

☆ आलेख ☆ गुरु ही सर्वोपरि है… ☆ डॉ निशा अग्रवाल ☆

महान कोई नही बनना चाहता? लेकिन महान बनने के लिए हर इंसान को ज्ञान की आवश्यकता होती है, जो हमें मिलता है गुरु से। हर सफल इंसान के जीवन में गुरु का अति विशिष्ट स्थान  होता है। भगवान से भी ऊंचा दर्ज़ा होता है गुरु का। ज्ञान प्राप्ति का कोई भी मार्ग हो, कोई भी क्षेत्र हो,हर जगह से ज्ञान बटोर लेने में कोई हर्ज नही है। ज्ञान देने वाला उम्र में छोटा हो या बड़ा, वह हमारा गुरु ही होता है। गुरु किसी भी रूप में हमको ज्ञान अर्जित करने के रास्ते दिखाता है, जैसे माता- पिता, भाई- बहन, दोस्त, छोटा बच्चा,  अजनबी, राहगीर आदि।

गुरु ही सर्वोपरि, होता है। भविष्य का निर्माता होता है। समाज की नींव होता है।

 जिसके प्रति भी मन में सम्मान होता है,

जिसकी डांट में भी एक अद्धभुत ज्ञान होता है,

जिसके पास हर मुश्किल का समाधान होता है,

जन्म देता है कई महान शख्सियतों को, वो गुरु तो सचमुच बहुत महान होता है।

शुरू होती है माँ के गर्भ से, सीखने की अभिलाषा।

प्रथम गुरु है मेरी माता,

जिसने मुझे चलना सिखलाया

अँगुली पकड़ कर ,मुश्किल राह पर ,

आगे बढ़ना है सिखलाया।

कैसे करूँ बखान गुरु का,

गुरु तो असीमित भंडार होता है ज्ञान का।

ऐसा कोई कागज़ नही,जिसमे वो शब्द समाए,

ऐसी कोई  स्याही नहीं,

जिससे सारे गुरु गुण लिखे जाएं।

मेरी बाणी क्या बोलेगी,

कितनी कलम चलाऊँ मैं।

दूर -दूर तक सोचूँ जितना भी,

गुरु गुण लिख ना पाऊं मैं।

गुरु ने ही अन्धेरी राहों में,

रोशनी की किरण दिखलाई है।

जीवन के सारे दुख हर कर,

खुशियों की फसल उगाई है।

निस्वार्थ भाव की सेवा देकर,

अच्छे गुण सिखलाये है।

कठिन राह में हिम्मत देकर,

आगे वही बढ़ाये हैं।

मैं थी अज्ञानी -अनजानी,

ज्ञान राग सिखलाई है।

दुनियां के अनजान सफर में ,

मेरी पहचान बनाई है।

अक्षर – अक्षर मुझे सिखाकर,

शब्द – शब्द का अर्थ बताकर,

सही -गलत का ज्ञान कराकर,

मुश्किल सवाल का हल बताकर,

जीवन के हर मूल्य बताकर,

 कभी प्यार कर, कभी डाँटकर,

बेड़ा पार लगाई है।

 गुरु को मेरा प्रथम अभिनंदनं,

जीवन बना दिया मेरा चंदन।

©  डॉ निशा अग्रवाल

(ब्यूरो चीफ ऑफ जयपुर ‘सच की दस्तक’ मासिक पत्रिका)

एजुकेशनिस्ट, स्क्रिप्ट राइटर, लेखिका, गायिका, कवियत्री

जयपुर ,राजस्थान

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈