मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #167 ☆ निशा सांगते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 167 ?

☆ निशा सांगते… ☆

तेजोमय हा सूर्य नांदतो भाळावरती

ती लाली मग पसरु लागते ओठांवरती

 

श्वासासोबत तुझे नावही घेत राहते

नाव तुझे मी गोंदत नाही हातावरती

 

अंगावरती ऐन्याची ही चोळी आहे

तोच स्वतःला शोधत बसतो चोळीवरती

 

तरुण पणाला सांभाळाया दिला पदर पण

तोच पदर हा कसा भाळतो वाऱ्यावरती ?

 

निशा सांगते वेळ जाहली भेटायाची

नको उशी मज ठेविण डोके छातीवरती

 

अंधाराच्या गुहेत होतो रात्री दोघे

प्रभात काळी लाली दिसली गालावरती

 

फुले उमलली रात्रीमधुनी दरवळ सुटला

प्रसन्नतेचा भाव प्रगटला माळावरती

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनक्षेत्र हे एक अथांग सागरासारखे अफलातून क्षेत्र आहे. ह्या वाचनातून आपल्याला कितीतरी विविध क्षेत्रातील माहिती मिळते,कधी ज्ञानात भर पडते,तर कधी भावनेला वाट मिळते, कधी खळखळून हसावसं वाटत तर कधी छान गंभीर विचारांच्या डोहात डुंबायला मिळतं. कधी कधी वाचल्यावर जाणवतं की हे खरंच छान लिहीलयं किंवा अरेच्चा आपल्याच मनातील शब्द तंतोतंत कागदावर उतरलेयं जणू.

हे वाचन करतांना काही गोष्टी आधी माहीत असलेल्या परंतु वेगळ्या शब्दांत मांडलेल्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो हे जाणवतं. असेच काही शब्द वाचनात येतात, हे शब्द फक्त आपण ऐकले असतात परंतु ह्याची माहिती म्हणाल तर शुन्य. मग कुतूहल जागं होतं आणि माहिती शोध मोहीम सुरू होते.काल असाच “सार्क संघटना” हा शब्द वाचनात आला.

कुठल्याही संघटना तयार होतांना त्या काहीतरी भरीव कामगिरी, चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवितात.  अशीच एक संघटना म्हणजे सार्क संघटना ,जिच्या निर्मितीची तारीख होती 8 डिसेंबर 1985.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation  असं त्या संपूर्ण संघटनेचे नाव. त्या नावाचं संक्षिप्त रुप म्हणजे सार्क (SAARC); ही दक्षिण आशिया खंडातील  8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे हे उल्लेखनीय. 6 जानेवारी 2006 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये  मूळ धरू लागली. 1970 च्या सुमारास भारत, बांगलादेश,भूतान, मालदिव, पाकिस्तान,नेपाळ श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार करण्याच्या दृष्टीने एका संस्थेची आवश्यकता भासल्याने ह्याची संकल्पना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोर धरु लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना एकत्रित ऊभी राहिली.

लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबींचा ऊहापोह आणि उपाययोजना ह्याबद्दल ही संघटना कार्य करते.  सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच महिलांचे प्रश्न व त्यांच्या शिष्यवृत्त्या, अभ्यासवृत्त्या, आर्थिक सहकार्य, महिला आणि मुले यांच्या भवितव्याचा तसेच दहशतवाद व स्त्रियांचे लैंगिक शोषण यांच्याबद्दल ठोस तजवीज ह्यामध्ये केल्या जाते. 

खरंच अशा अनेक संघटना विविध कार्य करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारच कमी माहिती असते हे ही खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सांज…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

आठवणींच्या गाठी कधी अवचित सुटतात, कधी ती सोडत बसते.  त्या कधी सुखावतात कधी मनाला विद्ध करतात . मग आठवणींची दुखरी नस ठसठसत राहते.. बराच काळ. अलीकडे तिचे असेच होते. मग ती कधी त्यातच रमून जाते, कधी एखाद्या आठवणीच्या पोळ्यावरील मधमाशा तिच्या मनाला डसत राहतात. म्हणून मला आठवणींच्या गाठी आपोआप उकलणे आणि सोडवत बसणे नकोच वाटते.. मग मी तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी विषय बदलतो तसाच विषय बदलण्यासाठी मी तिला ते विचारले होते

मी विषय बदलण्यासाठी  ‘आणखी काय आणायचं आहे ‘ हे विचारतोय हे तिच्या लक्षात आले तशी ती हसली. मी पटकन चहा पिऊन कप खाली ठेवला.  तिने चहाचे भांडे, कप पाटीत ठेवले. मी ती पाटी उचलू लागलो तशी ती म्हणाली,

“असू दे उठून मी न्हेते बाहेर आणि धुवून टाकते.”

तिला उठायचाही त्रास होतो. गुडघे तर दुखतातच पण अलीकडे सायटीकाचा त्रास ही होतो म्हणते.. पण तरीही खाली बसून काम करणे सोडत नाही. किती वेळा म्हणले उंच ओटा बांधून घेऊया.. सिंक बसवून घेऊया.. तुलाच बरे होईल… तिचा स्पष्ट नकार. तिला स्वयंपाकगृहाच्याजवळ बाहेरच असणाऱ्या  कर्दळी आणि आळु जवळ असणाऱ्या दगडावर भांडी घासायला- धुवायला आवडतं. तरी बरे त्या दारातून बाहेर पडायला एकच छोटीशी पायरी आहे.

परसदारातून परसात उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत..पण तिला त्या उतरून परसात जाणे नकोसे वाटते.  ती सांगत नसली तरी तिला त्याचा त्रास होतो, पायऱ्या चढता-उतरताना असह्य वेदना होतात हे मी जाणून असतो..

“आता आराम खुर्चीतून उठायला जमत नाही पटकन.. जरा त्रासाचेच वाटायला लागलंय मला. “

मी तिला एकदा म्हणालो, ती काहीही न बोलता नुसतीच हसली, सारे काही समजल्यासारखी.  आणि तेंव्हापासून संध्याकाळचा चहा मी परसदारातच पायरीवर बसून घेतो. ती दाराजवळ खुर्ची घेऊन चहा पिता पिता, माझ्याशी बोलता बोलता परस न्याहाळत बसते.. डोळ्यांत साठवून ठेवत असल्यासारखी. अलीकडे बऱ्याचदा सांजेचा चहा ही घरातच होतो. परसातली गुलाबी खुर्ची आताशा रिकामीच असते.

ती चहाचे पातेले, कप धुवून आत आली. ते जास्थानी ठेवेपर्यंत मी ते दार लावून सोप्यात आलो. ती ही पाठोपाठ सोप्यात आली. सोप्यात बसले तरी खिडकीतून दूरवरचे दिसतेच. ती कुंपणभिंतीबाहेरचा रस्ता न्याहाळत बसते. पूर्वी  त्या रस्त्यावरून कधीतरी एखादी सायकल, एखादे वाहन जात- येत असायची पण आता सायकल क्वचित एखादीच दिसते पण दुचाकी, चार चाकीं, माल वाहतूकीची विविध वाहने आणि आणि अधून-मधून जाणाऱ्या-येणाऱ्या बसनी रस्ता तुडुंब भरून वाहत होता..प्रवास हेच जीवन झालंय की काय असे वाटू लागलंय.. वाहनांचे आवाज, हॉर्न चे आवाज.. यामुळे सारा परिसर अगदी पहाटेपासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत फक्त ‘आवाज की दुनिया ‘ होऊन जातो. चिमण्या-पाखरांची मनभावक किलबिल ऐकूही येत नाही.

दिवस मावळू लागला तसे घरट्याकडे परतणारे तुरळक पक्षी आकाशात दिसू लागले. पूर्वीसारखे थवे  आता फारसे दिसत नाहीत…. पूर्वी असे थवे पाहिले की तिला तिचे गाणे आठवायचे आणि ती गुणगुणत राहायची..  ‘ बागळ्यांची माळफुले अजुनी अंबरात…’

आताशा तिला परदेशी झालेल्या, अनेक वर्षे घरी न आलेल्या मुलांची आठवण येते.. तिने ते कधी बोलून दाखवले नसले तरी तिच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा बोलून जातात. मग मी तिला,  ‘ गार वारा सुटलाय नाही ? चल आत जाऊ. ‘ असे म्हणून आत  तिला घेऊन आत जातो..

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले…

त्यावेळी पूर्व आणि पश्चिम (आजचा बांग्लादेश) पाकिस्तानच्या समुद्री वाटा संपूर्ण तोडण्याची (complete naval blockade) महत्वाची जबाबदारी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली.  

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख सडेतोड उत्तर देण्यासाठी नौदलाच्या इतिहासातील घातक आणि धाडसी हल्ला करण्यास भारतीय नौदल सज्ज झाले. 

यासाठी गरज होती योग्य वेळ साधून अचानक हल्ला करण्याची, कारण हल्ला होणार होता तो थेट पाकिस्तानच्या कराची बंदरावर ! कराची बंदर हे पाकच्या नौदलाचे व संपूर्ण व्यापाराचे प्रमुख बंदर. येथूनच पाकिस्तानला अमेरिका व ब्रिटन या देशांकडून युद्धासाठी मदत मिळत असे व पूर्व पाकिस्तानला पाठवली जात असे. असे हे कराची बंदरच नष्ट करून पाकचा कणाच मोडण्याचं ठरलं. 

ह्या मोहिमेला नाव देण्यात आले “Operation Trident“. 

यासाठी भारतीय नौदलाने निवड केली ती आकाराने छोट्या, तेज व चपळ अशा क्षेपणास्त्रवाहू Osa-class missile boat जहाजांची –                                          

१) INS Nipat, २) INS Veer, ३) INS Nirghat, ४) INS Vinash, ५) INS Nashak, ६) INS Vidyut, ७) INS Vijeta, ८) INS Nirbhik

ह्या जहाजांची मर्यादा बघता ही जहाजे कराची बंदराच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या जहाजांनी ओढून (TOE) नेण्याचे ठरले. तिथून पुढे हल्ला करून ती सर्व जहाजे तीन दिशांना जाणार होती. नुकतेच रशियाहून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या, उत्तम अस्खलित रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्यात आली. मोहिमेदरम्यान आपल्या सर्व जहाजांना रेडिओ वापरण्यास मनाई होती. गरज भासल्यास संभाषण हे रशियन भाषेतूनच करावे, जेणेकरून पाकला ह्या मोहिमेचा पत्ता लागणार नाही आणि रशियन नौदल समजून तो कोणतीही हालचाल करणार नाही, ह्या साठीचा हा डाव होता. 

पहिला हल्ला :–  ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ही सर्व जहाजं सौराष्ट्रच्या किनाऱ्याजवळून कराचीच्या दिशेने निघाली. कराचीजवळ येताच रडार पिंग करू लागले. त्यांना काही पाकिस्तानी जहाजं तिथे गस्त घालताना आढळली.

सुमारे १०.४५ ला INS Nirghat ला हल्ला करण्याचे आदेश मिळाले. तात्काळ पहिलं क्षेपणास्त्र सुटलं आणि जाऊन पाकिस्तानी जहाजावर धडकलं. ते जहाज होतं Battle-class Destroyer PNS Khaibar.– PNS Khaibar ने बुडता बुडता पाकिस्तानी नौदलाला रेडिओ संदेश पाठवला, “enemy aircraft attack-number one boiler hit – ship sunk…” (PNS Khaibar ला त्यांच्यावर हल्ला कुठून कसा झाला हेही समजलं नव्हतं.)

सुमारे ११.२० वाजता कराचीपासून अवघ्या ३२ मैलांवर असलेल्या INS Veer ला अजून एक जहाज दिसलं, ते होतं  PNS Muhafiz (Adjutant-class mine-sweeper) — INS Veerने क्षणाचाही विलंब न करता २ क्षेपणास्त्रे PNS Muhafiz च्या दिशेने सोडली. पुढची ७० मिनिटं Muhafiz जळत होतं. 

दरम्यान INS Nipat च्या अवघ्या २६ मैलावर एक जहाज टप्प्यात आलं, ते होतं venus challenger – पाकिस्तानसाठी दारुगोळा आणि हत्यारं आणतानाच नेमकं सापडलं. INS Nipat ने त्या जहाजाला तळ दाखवला. 

त्याच पाठोपाठ पाकिस्तानी PNS ShahJahan (British C class destroyer) यावर हल्ला केला. 

PNS ShahJahan बुडालं नाही, पण अगदीच निकामी झालं आणि INS Nipat तडक कराचीच्या दिशेने वेगात निघालं आणि अवघ्या १४ मैलांवरून कराची बंदराच्या मुख्य मार्गाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं. —

(जगातील युद्धाच्या इतिहासात कोणत्याही नौदलाने जहाजावरून जहाजावर मारा करण्यासाठी असलेल्या क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरील लक्ष्य भेदण्यासाठी आजपर्यंत केलेला नाही. भारतीय नौदलाने ते यशस्वीरित्या करून दाखवलं.) सुमारे ११.५९ वा.कराची बंदरातील भल्या मोठ्या तेलाच्या टाक्यांना त्यांनी लक्ष्य बनवलं. एक टाकी फुटताच इतर टाक्या फुटू लागल्या. संपूर्ण कराची हादरलं. मध्यरात्री भरदिवसासारखा उजेड पसरला. कराची बंदर धडधडून पेटत होतं.)

— आणि भारतीय नौदल मुख्यालयाला पहिला रेडिओ संदेश पाठवण्यात आला —-A N G A A R..

हा कोड होता दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा ! 

दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेने उरलंसुरलं कराची ठोकून काढलं.

८ डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या फक्त तीन जहाजांनी Operation Pythonच्या अंतर्गत कराचीवर हल्ला चढवला. ह्या सततच्या हल्ल्यांमुळे अर्धं पाकिस्तानी नौदल रसातळाला गेलं आणि बरंचसं निकामी झालं. उरलेलं पूर्णपणे हादरून गेलं होतं. 

अश्या ह्या भारतीय नौदलाच्या कामगिरीसाठी आणि ह्या विजयासाठी ‘ ४ डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस ‘ म्हणून साजरा होतो आणि ज्या जहाजांच्या ताफ्याने हा हल्ला केला, त्यांना तेव्हापासून नौदलात killer squadron संबोधलं जाऊ लागलं.  

पुढे १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि —-

आणि एक नवीन ‘बांग्ला देश’ निर्माण झाला… 

भारतीय नौदलाच्या  या अतुलनीय कामगिरीला विनम्र अभिवादन…!  जय हिंद !!!  

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

(Innovative Communication Skills of Gadgebaba.)

आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  …….

☆  वंदन दीपस्तंभाला … ☆

बाबांचा संवाद होता ,

संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;

भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,

संविधाननिर्मात्या बाबांशी |

पोटतिडीक होती,

वंचितांच्या शिक्षणाची;

विषमतेच्या चिखलात रुतलेल्या  –

माणसाच्या उत्थानाची |

घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा 

आणि माणसांच्या मनांच्या 

आंतरबाह्य स्वच्छतेचा; 

 बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!

— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —

गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६  हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात  जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.

गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—

कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.

पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.

समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.

गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.

नियतकालिकातून  केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन  ठायी ठायी दिसते. 

 अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत  आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.

संदर्भ — 

१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील. 

२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे. 

३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर. 

४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.

५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर. 

६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत. 

७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.

श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.🙏🏻

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत… श्री कौस्तुभ आजगावकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत… श्री कौस्तुभ आजगावकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

पावलांच्या सुलुसानुच आंगार शिर्शिरी

सळसळटा पदर मना देग भर्जरी

 

काकणांचे किणकिणीन् स्पंद कानसुलां

वाऱ्यान् तुज्या झट्टिं म्हजेर पार्दिका फुलां

 

स्वास तुजें वास जावन् सांसपितात आंग

मनां म्हज्यां लागतां तुज्यां गुमानितां थांग

 

सकाळफुडें आयलें जाल्यार आंगणिं फुलतां पात

सांजचें पावलें जाल्यार येतां चान्नें फाटोफाट

 

असवडींय फळटा म्हाका मोनी तुजी प्रीत

उतरां आदीं छंदातच बळटा म्हजें गीत

 

– बा. भ. बोरकर 

— तिच्या नुसत्या चाहुलीनेही मनात काव्य किती वेगवेगळ्या प्रकारे उमलत जातं त्याची ही कविता. 

 

— आणि हा भरड मराठी तर्जुमा आहे. काव्यानुभव नव्हे, तर फक्त अर्थानुभव. 

 

तुझ्या पावलांच्या चाहुलीनेच अंगावर गोड शिरशिरी येते

आणि पदराची सळसळ माझं मन भर्जरी करून जाते. 

 

(तुझ्या) काकणांची किणकिण ऐकूनच कानशिलं थरथरून उठतात 

आणि तुझ्या हलक्या वाऱ्यानेही प्राजक्ताची फुलं माझ्यावर बरसतात

 

तुझा श्वास सुगंध होऊन अंगाला लपेटून जातो  (सांसपितात = चाचपतात)

आणि तेव्हाच मनात तुझी ओळख पटते (?) 

 

सकाळी आलीस की अंगणात पात (सुगंधी हिरवं फूल) फुलते

संध्याकाळी आलीस की पाठोपाठ चांदणं अवतरतं …… 

 

… अशा तुझ्या या शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या प्रेमामुळे 

शब्दांत उतरायच्या आधीच कविता गाणं होऊन मनात अवतरते. 

 

लेखक : श्री कौस्तुभ आजगांवकर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – रिटर्न गिफ्ट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 🎁 रिटर्न गिफ्ट ! 🎁 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“हां, सुप्रभात.”

“हे काय, आज तुमचा मूड नेहमी सारखा दिसत नाही.”

“हो, आहे खरा आज थोडा त्रासलेला.”

“मला कारण सांगितलं पंत, तर तुम्हाला पण थोडं हलक हलक वाटेल आणि त्यावर काहीतरी… “

“तुला कधी, सरकारी किंवा कुठल्या ऑफिस मध्ये ‘लाल फितीचा’ त्रास झालाय ?”

“लाल फित म्हणजे…. “

“अरे, म्हणजे कुठचेही सरकारी काम, तू त्या ऑफिसला गेला आहेस आणि लगेच…. “

“काहीतरीच काय पंत, साध्या रेशन कार्डावरचा पत्ता…. “

“बदलायला पण दहा दहा खेपा माराव्या लागतात, बरोबर ना ?”

“आता कसं बोललात पंत !”

“अरे त्यालाच तर… “

“कळलं, कळलं, पण तुम्हाला कुठे आला हा लाल फितीचा अनुभव?”

“अरे त्याच काय झालं, मोनो रेल सध्या तोट्यात चालली आहे, म्हणून आता कमी गर्दीच्या वेळात त्याचा एखादा रेक…. “

“बारस, वाढदिवस, लग्न, कोणाची साठी, पंच्यातरी, असे समारंभ साजरा करायला भाड्याने देणार आहेत, ही बातमी कालच वाचली, पण त्याच काय ? तुम्हाला पण एखादा रेक भाड्याने…. “

“हवा होता म्हणून गेलो होतो चौकशी करायला तर… “

“पंत तुम्हाला कशाला…… “

“अरे माझ्यासाठी नाही, नातवाच बारस करणार होतो, मोनोच्या रेक मध्ये. कुणी विमानातून उड्या मारून हवेत हार घालून लग्न करतात, कुणी क्रूझवर मुंज ! म्हटलं आपण पण जरा वेगळ्या पद्धतीने नातवाचे बारसे करूया, म्हणून चौकशी करायला गेलो तर… “

“तर काय, उपलब्ध नाही म्हणाले का रेक ?”

“हो ना, म्हटलं कालच तर  तुम्ही रेक भाड्याने देणार असं जाहीर केलेत आणि आज लगेच बुकिंग फुल्ल कसं काय ?”

“मग काय म्हणाला तिथला माणूस ?”

“तो म्हणाला, चारीच्या चारी रेक राजकीय पक्षांनी बुक केले आहेत म्हणून.”

“ते कशा साठी ?”

“अरे ज्या दिवशी मला बारशाला रेक पाहिजे होता त्याच दिवशी त्या सर्व पक्षांची कसली तरी मिटिंग आहे.”

“पंत, पण त्यांना चारही रेक कशाला पाहिजेत, एकात पण मिटिंग….. “

“होऊ शकते, पण सध्या तीन पक्षाच सरकार आहे ना म्हणून…. “

“मग तीन रेक पुरे की, चौथा तुम्ही बुक …. “

“करू शकत नाही, कारण ज्या अपक्षांनी बाहेरून सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांची वेगळी मिटिंग चौथ्या…. “

“कळलं, म्हणजे तुम्हाला आता एखादा छोटा हॉल घेण्या शिवाय….. “

“पर्याय नाही खरा.”

“तुम्ही काळजी करू नका पंत, आपल्या अहमद सेलर चाळींचे सभागृह द्यायची जबाबदारी माझी !”

“मला ठाऊकच होत, तू मला या बाबतीत मदत…. “

“झालंच तुमचं काम समजा पंत, तुम्ही निश्चिन्त असा.  पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय… “

“आता कसला प्रश्न?”

“ती तुम्ही आपल्या चाळीच्या गच्ची मधे कसली पोती….. “

“ती होय, अरे ती ‘बीटाची’ पोती आहेत, म्हणजे असं बघ…. “

“पंत आपण ज्या ‘बीटाची’ कोशिंबीर वगैरे करतो किंवा सॅलेड मध्ये….. “

“वापरतो तीच ही, अगदी  बरोबर ओळखलस.”

“हो पण एव्हढी पोती भरून बिटाचं तुम्ही…… “

“सांगतो, सांगतो. अरे मोनो रेल मध्ये बारसे केले असते तर जवळच्याच लोकांना बोलवावे लागले असते, मग बाकीचे चाळकरी नाराज होणार…. “

“म्हणून त्यांना शांत करायला तुम्ही काय बिट…… “

“काहीतरी बोलू नकोस, अरे तेव्हढी….. “

“पंत, पण तुम्ही एव्हढी पोती भर भरून ‘बिट’ आणल्येत ना,  की ती सगळी आपल्या आठ चाळींना…..

“पुरावित याच हिशोबानेच आणली आहेत बरं !”

“काय सांगता काय पंत, तुम्ही खरच आठी चाळींना….. “

“अरे नीट ऐकून तर घे, तू मगाशी मोनो भाड्याने देणार, ही बातमी वाचलीस म्हणालास ना, मग तशीच दुसरी एक बातमी तुझ्या नजरेतून सुटलेली दिसत्ये.”

“ती कुठची ?”

“अरे RBI चे ‘बिटकॉइन’ बद्दलचे अपील दिल्ली हायकोर्टाने फेटाळले, ती बातमी.”

“असं, म्हणजे आता ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाला भारतात पण मान्यता….. “

“मिळाली आहे आणि बारशाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये मला खरे ‘बिटकॉइन’ देण या जन्मीच काय पण पुढचे सात जन्म पण शक्य नाही, म्हणून मी बारशाचे रिटर्न गिफ्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या सगळ्या बीटांची कॉइन पाडून ती वाटायचा माझा विचार पक्का झाला आहे.”

“खरच धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य, मग तुझ्यासाठी बारशाच्या दिवशी एक एक्सट्रा कॉइन आठवणीने घेऊन जा, मला बारशाला हॉल मिळवून देणार आहेस ना, त्या बद्दल !”

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 117 – गीत – कहूँ योजना… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – कहूँ योजना।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 117 – गीत – कहूँ योजना…  ✍

नाम तुम्हारा क्या जानूँ मैं

मन कहता मैं कहूँ योजना।

 

गौरवर्ण छविछाया सुन्दर

अधरों पर मुस्कान मनोहर

हँसी कि जैसे निर्झरणी हो

मत प्रवाह को कभी थामना।

 

अंत: है इच्छा की गागर

आँखों में सपनों का सागर

मचल रहीं हैं लोल लहरियाँ

प्रकटित होती मनो कामना ।

 

राधा रस का है आकर्षण

मनमोहन का पूर्ण समर्पण

सम्मोहन के गंधपाश में

कोई कैसे करे याचना ।

 

अपलक देखा करें नयन, मन

मन रहता है उन्मन उन्मन

शब्दों के संवाद अधूरे 

मन ही मन मैं करूँ चिन्तना।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 119 – “सिर्फ भौंह की ओट…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत –सिर्फ भौंह की ओट।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 119 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “सिर्फ भौंह की ओट…” || ☆

अब उलाहना देती है

मेरे घर की छानी

जिसे बनाकर थकी,

हार कर विवश मरी नानी

 

रही चौंकती फुरसत,

जिन के दरवाजे आकर

और लौटता रहा पसीना

समझा समझा कर

 

सिर्फ भौंह की ओट

सम्हलता आया अनुशासन

कामचोर ना कर पाये

थे अपनी मनमानी

 

उन्हे बाद में मिल ना पाया

मान कभी इस घर

वह नानी हर समय रही

जो सेवा को तत्पर

 

उनकी बेटी, मेरी माँ,

जोर शून्य बनी ठहरी

उसको  यह पीड़ा आयी

थी सच में अनजानी

 

इस कुटुम्ब की उठा

पटक का कारण था मामा

उसकी पत्नी चमत्कार सँग

थी अन्तर्यामा

 

यह सम्मिलत व्यवस्था

लगती तो थी सम्मानित 

जिसका साज सम्हाल

मर गई थी करती नानी

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

14-12-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈



हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अलख ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना सम्पन्न हो गई है। 🌻

अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी  

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –  अलख ??

जीवन क्षणभंगुर है;

सिक्का बताता रहा,

समय का चलन बदल दिया;

उसने सिक्का उलट दिया…,

क्षणभंगुरता में ही जीवन है;

अब सिक्के ने कहा,

शब्द और अर्थ के बीच

अलख दृष्टि होती है,

लघु से विराट की यात्रा

ऐसे ही होती है..।

© संजय भारद्वाज 

प्रात: 9:46 बजे, 15 दिसम्बर 2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈