मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते. 

तृतीयेपासून चैत्र गौर बसविली जाते. या दिवसाला गौरी तीज असेही म्हणतात .देवातल्या अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) पर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. हा चैत्र महिन्यातील मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्या सुंदर पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात. या दिवशी आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे,बत्तासे,भिजवलेले हरभरे,टरबूज,कलिंगड यासारखी फळे असा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे. महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.काही ठिकाणी घरी आलेल्या स्त्रिया आणि कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजवलेले हरभरे,फळे यांनी त्यांची ओटी भरतात आणि कैरीचे पन्हे,आंब्याची डाळ देऊन त्यांचे स्वागत करतात. काही ठिकाणी चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते . आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात रांगोळीने चैत्रांगण काढले जाते. या चैत्रांगणाच्या रांगोळीत देवीची शस्त्रे, तिची वाहने , तिची सौभाग्याची लेणी,स्वस्तिक , कमळ , सूर्य , चंद्र , गोपद्म यासारखी शुभ चिन्ह काढली जातात. रांगोळीत मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र,राधाकृष्ण , तुळशी वृंदावन अशी चित्रे काढली जातात . हीच ती चैत्रांगणाची रांगोळी.

मत्स्य जयंती, चैत्र शुद्ध तृतीया.

हिंदू वर्षाचा तिसरा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया . हा दिवस मत्स्य जयंती म्हणून ओळखला जातो. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. हा मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणकथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला अशी कथा आहे.

राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाच्या विनंतीवरून राजा त्याला घरी घेऊन गेला. हा मासा दररोज असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रुपात दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी राजाला दिली पुढे त्यांनी राजाला प्राणी आणि सप्तर्षी यांना घेऊन माझ्या नावेतून चल असे सांगितले. या नावेतून जाताना मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती मत्स्य पुराण म्हणून प्रचलित आहे. सत्यवत राजाने वाचविलेल्या काही प्रमुख लोकांपैकी राजा चाक्षुष हा राजा पुढे मनू म्हणून प्रसिद्धीस आला. याच मनूचे वंशज म्हणजे मानव किंवा मनुष्य, म्हणजेच आपण मानव.

या मत्स्य जयंतीच्या दिवशी “ओम मत्स्याय मनुपालकाय नम:” या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.

मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची पण कथा आहे. या राक्षसाने ब्राम्हदेवांचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले.  त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार पसरला. अशा वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीवचा वध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्रम्हदेवांकडे पोहोचवले असे सांगतात.

संग्रहिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती पद्धत म्हणजे दुकानातून घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातून आणतांना त्यावर नावे घालून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे. समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की गृहिणी भांडे नंतर पहायची. आधी त्यावर नांव काय घातले आहे की नाही ते पहात असे. त्या भांड्यावर तिला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नांव घालून आणा असे सांगत असे किंवा स्वत: जाऊन नांव घालून आणून मगच ते वापरायला सुरवात करीत असे.  आजही तुमच्या घरात नांव घातलेली खूप भांडी असतील पहा.

लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्या घेण्यासाठी वापरली जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत रहायची, उपयोग काहीच नाही.

असो हे सारे आले कशावरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा व विचार करा.  आपला देह हे एक पंचमहाभूतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हते. ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरेपर्यंत रहाते.  पण देह संपला- नांव संपले – व बिना नावाचा आत्मा पुन्हा योनी योनीतून फ़िरायला जातो.

आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे..? आपल्या संत, सत्पुरुष, गुरु, सद्गुरु, समर्थांनी सांगितले आहे की, ‘ जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घे. म्हणजे काय होईल ? देह पडला तरी देवाचे नाव तुझ्यासोबत येईल. ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात –  म्हणजे या योनीतून त्या योनीत फ़िरायला.’ 

आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे.  झाले– आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो– हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी, या योनीतून त्या योनीत….. 

नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.

बघा –  वाचा –  व विचार करा. 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाते असे… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  नाते असे…  ?  श्री प्रमोद जोशी ☆

एका आकाशाच्या खाली,

एक दुसरे आकाश !

रविबिंब वर तरी,

खाली चंद्राचा प्रकाश !

माया सांडते वरून,

दीन वाटे गंगास्नान !

अंगावरून ओघळे,

ईश्वराचे वरदान !

तीन पिढ्यांना जोडतो,

असा स्निग्ध भावसेतू !

एका काठावर आजी,

आणि दुजा काठ नातू !

साय सांगा केव्हा येते?

दूध तापल्यावरती !

आजी केव्हा होता येते,

माया मुरल्यावरती !

नदी आटते वाहून,

आजी नेहमी दुथडी !

दोन्ही फाटती शेवटी,

आजी आणखी गोधडी !

दोघांच्याही सुरकुत्या,

त्यांना फक्त उब ठावी !

स्पर्श जणू चंदनच,

चंदनाला उटी लावी !

नातू नाती होती तेव्हा,

येई आजीला मोहर !

आणि सासरीच येई,

तिचे नव्याने माहेर !

आजी नाही अशा घरी,

झाडे उभी पानाविणा !

आजी नाही अशा घरी,

माळ खिन्न रानाविणा !

नातू,नात असे नाते,

शेंडा भेटे जसा मुळा !

आंघोळीच्या बादलीला,

झरा सुचे झुळझुळा !!!!!

 चित्र साभार – श्री प्रमोद जोशी.

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #184 – 70 – “कई सुखनवर कहते हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “कई सुखनवर कहते हैं…”)

? ग़ज़ल # 70 – “कई सुखनवर कहते हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

ग़ज़ल बनती नहीं है महबूबा तेरे बिना,

जमता नहीं रदीफ़्र क़ाफ़िया तेरे बिना।

ग़र तू नज़दीक हो कुछ न चाहिए मुझे,

दुश्वार है मुझे ए सनम जीना तेरे बिना।

दिखता मुझे तेरा ही अक्स भरे प्यालों में,

मय भी अब ज़हर लगे है जाना तेरे बिना।

हर काम करने का आता है सलीक़ा तुम्हें,-

मुमकिन नहीं है घर का सँवरना तेरे बिना

कई सुखनवर कहते हैं बहुत अच्छी ग़ज़ल,

फीकी लगे है महफिल ऐ दिलारा तेरे बिना।

तेरा सुर मिले तो दिलसाज़ हो मेरी ग़ज़ल,

आतिश मोशिकी लगे है ग़मज़दा तेरे बिना।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – कविता ☆ भेड़िये ने भेड़ों को बताया- ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण एवं विचारणीय कविता– भेड़िये ने भेड़ों को बताया-)

☆ कविता ☆ भेड़िये ने भेड़ों को बताया- ☆ श्री हरभगवान चावला ☆

भेड़िये ने भेड़ों को बताया-

वो, उधर है कुआँ, पानी से भरा हुआ

भेड़िये के पीछे-पीछे चला जा रहा है

प्यासी भेड़ों का झुण्ड

मैं भेड़ नहीं हूँ

बेशक मेरी हैसियत

किसी भेड़ से ज़्यादा नहीं

इतना तो मैं जानता हूँ

कि किसी भी सूरत

भेड़ों के लिए संभव नहीं है

कुएँ से पानी पी पाना

मैं अपनी प्यास के लिए

किसी तालाब की खोज में हूँ

न भी मिल पाया कोई तालाब

तो भी कुएँ में डूब कर

मरने से बेहतर है

पानी के सपने के साथ

प्यास से मर जाना।

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – दशरथ मांझी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – दशरथ मांझी ??

वे खड़े करते रहे

मेरे इर्द-गिर्द

समस्याओं के पहाड़

धीरे-धीरे….,

मेरे भीतर

पनपता गया

एक ‘दशरथ मांझी’

धीरे-धीरे…!

(*दशरथ मांझी’- 25 फुट ऊँचे पहाड़ को अकेले दम काटकर 360 फुट लम्बी सड़क बनाने वाले पर्वत-पुरुष।)

© संजय भारद्वाज 

रात्रि 8:17 बजे, 7 अप्रैल 2023

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ वसुधैव कुटुंबकम् एक कदम… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “वसुधैव कुटुंबकम् एक कदम”।)  

? अभी अभी ⇒ वसुधैव कुटुंबकम् एक कदम? श्री प्रदीप शर्मा  ? 

साईं इतना दीजिए, जा में कुटुंब समाय ।

मैं भी भूखा ना रहूं, साधु ना भूखा जाय ।।

कबीर भी शायद हम दो, हमारे दो ,वाले ही होंगे, इसलिए आप कह सकते हैं, कमाल की सोच !

संतोषी सदा सुखी । अपने परिवार का पेट पल गया,और अतिथि देवो भव भी हो गया ।

लेकिन कबीर इतने सीधे सादे और भोले भाले भी नहीं थे । उन्होंने अपना कुटुंब बढ़ाना शुरू कर दिया । साधु संतों को ही अपना कुटुंब मान लिया ।
बेचारे घर वाले तो ताने बाने में उलझे रहते, और साधु भरपेट भोजन करते ।

एक जुलाहा बिना इंटरनेट और वाई फाई के ग्लोबल होता चला गया । कबीर की साखी और बीजक ने उसे विश्वगुरु बना दिया ।।

कल तक जो कबीर कुटुंब की बात करता था, वह अचानक कहने लगा ;

कबीरा चला बाजार में लिए लकुटी हाथ ।
जो फूंके घर आपना, चले हमारे साथ ।।

ताजी ताजी, उलटबासी लेकर आते थे कबीर !

लेकिन हम लोग इसे सीधा करना भी जानते हैं । हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले के डूबेंगे इसलिए ऐ कबीरा, तू चल अकेला, चल अकेला । भूख लगे, तो खा लेना एक दो केला ।

हम कोई संत नहीं, कबीर नहीं, बाल बच्चे वाले सद्गृहस्थ ! हमेशा कुटुंब की ही बात की, वसुधैव कुटुंबकम् की नहीं । अगर नौकरी धंधा अथवा कोई कामकाज नहीं होता, तो कोई दो कौड़ी के लिए भी नहीं पूछता । हैप्पिली रिटायर हो गए, अपन भले अपनी पेंशन भली ।

अचानक सैम अंकल संचार क्रांति कर गए और ओल्ड एज होम की जगह हमारे हाथ में मुखपोथी पकड़ा गए । व्हाट्सएप यूनिवर्सिटी में हमने भी दाखला ले लिया । और अचानक, लो जी, हम भी ग्लोबल हो गए । हमने भी धर्मवीर भारती का दामन छोड़ विश्व भारती का हाथ थाम लिया । कल जन्मदिन के अवसर पर हमने भी व्हाट्सएप पर विदेशों में बैठे लोगों से बात की ।।

हुआ न यह एक कदम towards वसुधैव कुटुंबकम् ! बचपन से हमें स्वदेशी में विदेशी का तड़का पसंद था । पहले सादी खिचड़ी बनाओ और बाद में उसमें मस्त घी वाले नमकीन मसाले का तड़का लगाओ । पहले मोटी रोटी में माल भरते थे, अब चीज़ वाला, चार मंजिला बर्गर और पिज्जा खाते हैं।

Be Indian, buy Indian Chinese Food. Know Your Customer KFC.

खेल खेल में हम कहां से कहां पहुंच गए ! आज दुनिया के हर कोने में भारतीय ही छाए हुए हैं।

हर क्षेत्र में भारतीय ही तो अपना परचम लहरा रहे हैं ! 1983 के वर्ल्ड कप से आरंभ, T-20 से G-20 तक का यह सुहाना सफर हम सबने मिल जुलकर ही तो तय किया है ।

जोक्स अपार्ट, हमारा फेसबुक परिवार भी बुद्धू बक्से के किसी स्टार परिवार से कम नहीं । हम यहां लोगों से मिलते हैं, जुड़ते हैं, लेकिन बिछड़ने के लिए नहीं । हमारा यह अपना स्वदेशी तरीका है वसुधैव कुटुंबकम् का । इस कदम में आप भी हमारे साथ कदम से कदम मिलाकर चल ही रहे हैं ।

कभी हमारे कदम बहक जाएं, तो ब्लॉक अथवा अनफ्रेंड मत कर देना । संभाल लेना । आपको विश्व भारती की सौगंध ;

आपके साथ अभी अभी का एक कदम …

वसुधैव कुटुंबकम् ..!!

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 62 ☆ ।।अगर चमकना है तो सूरज सा जलना सीख लो।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।अगर चमकना है तो सूरज सा जलना सीख लो।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 62 ☆

☆ मुक्तक  ☆ ।।अगर चमकना है तो सूरज सा जलना सीख लो।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

जियो तो खुशियों की मीठी सौगात है जिन्दगी।

भूलना सीखोअच्छी यादों की बारात है जिन्दगी।।

ढूंढो हर पल में खुशियों के छिपे लम्हों को तुम।

प्रेमनज़र से देखो मुस्काती हरबात है जिन्दगी।।

[2]

जिन्दगीऔर कुछ नहीं बस जज्बात है जिन्दगी।

तुम्हारे अपनी मेहनत की करामात है जिन्दगी।।

भाईचारा मीठी जुबान हमेशा रखना जीवन में।

जानलो बस एकदूजे की खिदमात है जिन्दगी।।

[3]

रोशन चमकती हुई इकआफताब है जिन्दगी।

नफरत की रमकआ जाये तो बर्बाद है जिन्दगी।।

सफ़ल जीवन तुम्हारेअच्छी सोचविचार का ही है।

गर  सकारात्मक तो  फिर आबाद है जिन्दगी।।

[4]

चमकना है तो फिर सूरज सा जलना सीख लो।

सोने सा तपना   और फिर गलना भी सीख लो।।

बनो वह चिरागआंधियों में भी रोशन करे दुनिया।

धारा विपरीत भी काँटों पर चलना   सीख   लो।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈



हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 126 ☆ “हनुमान स्तुति…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित   – “हनुमान स्तुति…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण   प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #126 ☆ “हनुमान स्तुति…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

संकट मोचन दुख भंजन हनुमान तुम्हारी जय होवे

बल बुद्धि शक्ति साहस श्रम के अभिमान तुम्हारी जय होवे

 

दुनिया के माया मोह जाल में फंसे सिसकते प्राणों को

मिलती तुमसे नई  चेतनता और गति निश्छल पाषाण को

दुख में डूबे जग से ऊबे हम शरण तुम्हारी हैं भगवन

संकट में तुमसे संरक्षण पाने को आतुर है यह मन

तुम दुखहर्ता नित सुखकर्ता अभिराम तुम्हारी जय होवे

हे करुणा के आगार सतत निष्काम तुम्हारी जय होवे

सर्वत्र गम्यसर्वज्ञ , सर्वसाधक प्रभु अंतर्यामी तुम

जिस ने जब मन से याद किया आए उसके बन स्वामी तुम

देता सबको आनंद नवल निज  नाथ तुम्हारा संकीर्तन

होता इससे ही ग्राम नगर हर घर में तव वंदन अर्चन

संकट कट जाते लेते ही तव नाम तुम्हारी जय होवे

तव चरणों में मिलता मन को विश्राम तुम्हारी जय होवे

संतप्त वेदनाओ से मन उलझन में सुलझी आस लिए

गीले नैनों में स्वप्न लिएअंतर में गहरी प्यास लिए

आतुर है दृढ़ विश्वास लिएहे नाथ कृपा हम पर कीजे

इस जग की भूल भुलैया में पथ खोज सकें यह वर दीजे

हम संसारी तुम दुख हारी भगवान तुम्हारी जय होवे

राम भक्त शिव अवतारी हनुमान तुम्हारी जय होवे

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वामी कार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वामी कार… ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(आज ८ एप्रिल. ज्येष्ठ प्रसिद्ध मराठी कादंबरी कार,साहित्यिक,‌स्वामीकार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. रणजित देसाई यांचा आज जन्मदिवस.त्या निमित्ताने केलेली ही स्वरचित अष्टाक्षरी काव्य रचना)

कथा, कादंबरी नाट्य

स्वामीकार मानांकित

ग्रंथ श्रीमान योगीने 

झाले ज्ञान शब्दांकित…! १

 

कोल्हापूरी कोवाडात

जन्मा आले रणजित

माध्यमिक शाळेतून

झाले सर्वां परिचित…! २

 

रणजित देसाई हे

असामान्य व्यक्तिमत्व

मान पद्मश्री लाभला

आकारीले शब्दसत्व…! ३

 

शेती मातीचा लेखक

सर्जनाचा केंद्र बिंदू

कथा, ललित साहित्य

प्रतिभेचा शब्दसिंधू….! ४

 

महाद्वार प्रसादने

लेखनास दिलें रूप

शारदीय सारस्वती

तेजाळला शब्द धूप…! ५

 

कमोदिनी मधुमती

मोरपंखी सावल्यात

साकारला शब्द स्वामी

कला साहित्य विश्वात…! ६

 

राजा रवी वर्मा,बारी

लक्ष्यवेध कादंबरी

कर्णकीर्ती राधेयने

मात केली काळावरी..! ७

 

खिंड पावन जाहली

रणजित शैलीतून

रामशास्त्री तानसेन

शब्द चित्र बोलीतून…! ,८

 

सत्य ग्रामीण जीवन

किंवा असो इतिहास

पौराणिक ढंगातून

कथा पात्र रंगे खास..! ९

 

पत्नी माधवी देसाई

आत्म चरीत्र गाजले

पत्नी पत्नी नात्यातले

शब्द अंतरी नाचले…! १०

 

नाट्य साहित्य क्षेत्रात

अध्यक्षीय बहुमान

अकादमी पुरस्कार

दिले शारदीय वाण..! ११

 

महाराष्ट्र गौरवात

चिरंतन आहे स्मृती

रणजित देसाई ही

स्वामी कार फलश्रृती..! १२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈