मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆  असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

यमुनेचे नितळ पाणी शांत होतं. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक येऊन पाण्याची लय हलकेच बदलून जात होती. राधा आणि तिचा मोहन, दुसरं कुणीच नव्हतं यमुनेवर! आज काय झालं होतं कुणास ठाऊक, नेहमी इतका बोलणारा कान्हा आज जरा गप्पच होता. शेवटी राधाच म्हणाली, “बासरी वाजव नां!” त्याने  बासरी ओठांना लावली पण आज भैरवीचे  सूर लागले होते. राधेला विचारावं वाटलं पण ती त्या सुरात इतकी हरवून गेली होती की शब्द सपडलेच नाहीत. बासरी थांबली अन् ती भानावर आली.

लगेच उठून म्हणाली, “उशीर झाला, जायला हवं.”

आर्जवी स्वरात तो राधेला म्हणाला, “इतक्या लवकर?”

“पाहिलसनं रात्र पश्चिमेला सरायला लागली.”

“तरी अजून थोडा वेळ?”

“तो थोडा वेळ संपतो का कधी? चल, निघू या.”

ती चालायला लागली, तो तिच्या मागे.

आज तिला अर्थ कळतोय, ती भैरवी, तो आर्जवी स्वर यांचा!

जेंव्हा अक्रुराचा रथ माधवाला

नेण्यासाठी आला आणि सारं गोकुळ आक्रंदत होतं, नेऊ नको माधवा, अक्रुरा! राधाही पळत होती, पण तिला काय होतंय काही कळतच नव्हतं. ना माधवानं  रथ थांबवला ना मागे वळून पाहिलं. तिचा कृष्ण गेला होता, तिचा निरोपही न घेता! परतताना यमुनेच्या काठावरच्या वाळूतून मंद पाऊले टाकत राधा निघाली. वेड्यासारखी कालची त्याची पाऊलं शोधत होती. तिच्या लक्षात आलं, कोणतीही खूण मागे न ठेवता तो गेला. तिच्या मनात आलं, “कालच त्यानं मला का नाही सांगितलं? मी काय अडवलं असतं कां? नाही! एवढं सहज त्याच्यापासून दूर जाणं जमलं असतं मला? मी ही  कदाचित असाच आकांत केला असता, पायाला घट्ट मिठी मारून बसले असते, जाऊच दिलं नसतं त्याला! हे आयुष्य तर तुलाच समर्पित आहे. तू कुठेही असलास तरी!”

कृष्ण आणि राधा यांची गोष्ट इथेच संपली. ना तो नंद-यशोदेत गुंतला होता, ना गोप-गोपिकेत आणि ना राधेत! पुन्हा तो कधीच गोकुळात परत आला नाही. त्याची बासरी पुन्हा कधीच गोकुळात घुमली नाही.

कृष्ण वेगळाच होता, सगळ्यांच्यात असूनही, कुणाचाच नव्हता. तो देव होता, कितीही खोल बुडाला तरी निर्लेप वर येणारा! त्याने जन्म घेतला तोच मुळी काही उद्दिष्ट ठेवून. त्याचे विहित कर्म करण्यासाठी त्याला जावेच लागणार होते. अर्थात त्यालाही हे देवत्व निभावणे अवघड गेलं असेल. देवाला कुठे मन मोकळं करायचं स्वातंत्र्य आहे! त्यामुळेच त्यानं ती बासरी पुन्हा कधीही वाजवली नाही.पण त्याला काही ध्येय होतं, त्यामुळं गोकुळ विसरणं  शक्य झालं असेल. राधेला मात्र त्याला विसरून जाणं शक्यच नव्हतं. ती तिच्या कृष्णात इतकी एकरूप झाली होती की तिचा कान्हा तिच्या जवळच होता. नीळं आभाळ डोळ्यात पांघरून, बासरीचे सूर कानात साठवून, सहवासाचा क्षण अन् क्षण मनात रुजवून ठेवण्याची तिला गरजच नव्हती, तिला वेगळं अस्तित्व होतंच  कुठे? यमुनेवर पाणी भरायला गेली की बासरीचे सूर अलगद कानावर यायचे, घागर तशीच पाण्यावर तरंगत असायची. पाणी भरायला आलेल्या गोपी तिला जागं करायच्या. जाताना थोडा पाचोळा वाजला की तिला कृष्णाची चाहूल लागायची. पान हललं की तिला मोरपीस दिसायचं. पक्ष्याच्या तोंडातून बी खाली पडली की माठ फुटला असं वाटून थरथरायची. ओलेत्यानं घरी कशी जाऊ? रागानं त्याच्याकडे पाहायची. अखंड त्याचीच स्वप्नं, त्याचाच ध्यास! बाकीचं विश्व तिच्यासाठी नव्हतंच. तो आणि त्याचे विचार, त्याचं अस्तित्व नाकरण्या इतके बाजूला व्हायचेच नाहीत.ती तृप्त होती अन् ही तृप्तीच तिला अतृप्ती कडे नेत होती.

या गोष्टीला तिसराही कोन आहे हे अरुणा ढेरे यांची ‘अनय ‘ ही कविता वाचल्यावर लक्षात आलं. लक्षात आलं की अनय होऊन जगणं सर्वात अवघड आहे. अनय हा राधेवर मनापासून प्रेम करणारा, तिला समजावून सांगण्यात अपयशी ठरलेला, तिची अवस्था बघून कावरा बावरा झालेला, तिच्या सुखासाठी झटणारा, तिच्याकडून कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता! अनय होऊन जगणं अवघड आहे कारण राधेच्या डोळ्यात तिची स्वप्नं पहायची, जी कधीच आपली होणार नाहीत, त्यांना आपल्या काळजात उतरवायचं, आपल्या स्वप्नांना तिच्या डोळ्यात जागा नसली तरी! राधेला कृष्णा सोबतचे कित्येक क्षण होते ज्यावर ती उर्वरित आयुष्य काढू शकत होती,  पण अनय कडे एकही असा भाबडा क्षण नव्हता, ज्यावर उरलेलं आयुष्य ओवाळून टाकावं.

अनय शेवटपर्यंत तिचा होऊन तिच्या अस्तित्वाभोवती घुटमळत, जिंकण्याची आशा मनात फुलवत राहिला.त्यानं कधी त्याबद्दल उपकाराची भाषा केली नाही की आपल्या आयुष्यातून तिला वजा केले नाही.

राधा कृष्ण एकमेकावर प्रेम करणारे पण सारं अधुरंच राहिलेले, राधा अनय लौकिकार्थानं पती पत्नी पण सारं अधुरंच राहिलेले! कृष्णाला मुक्त ठेवण्यासाठी राधेनं आपल्या प्रेमाचा त्याग केला. कृष्णानं कर्तव्य पूर्तीसाठी राधेच्या प्रेमाचा त्याग केला. अनयनं राधेच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला. सांगू शकता कोणाचा त्याग मोठा आहे?राधा – अनय असंही नातं असू शकतं?

हे लिहिताना ही मी डोळ्यांना आवरू शकले नाही. तर हे सारं सोसताना अनय चं काय झालं असेल?

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थ्रिल —– भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल —– भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी

काँलेजमधून घरी येतांना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरुन मी वळलो तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला.फकाफका सिगारेट पित होता.मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो.त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं

“काय सुऱ्या कसं काय चाललंय?”

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं तसा सुरेश उर्फ सुऱ्या एकदम गडबडला.हातातली सिगारेट त्याने पाठीमागे लपवली.मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली.टाईट जिन्सची फाटलेली पँट,इन केलेला लालभडक शर्ट,डोळ्यावर काळा सडकछाप गाँगल.टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.

“नको लपवू सिगारेट.मी पाहिलंय तुला पितांना” 

त्याने हातातली सिगारेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला.

“साँरी प्रशांतदादा.प्लिज घरी सांगू नका ना”

” नाही सांगणार” 

मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला.पण मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पुर्ण रिकामी केली.

“अरे काय हे सुऱ्या?सिगरेट झाली, आता गुटखा?कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना!”

” थ्रिल!थ्रिल असतं त्यात दादा.तुम्हांला नाही कळणार त्यातलं!”

“हे असलं थ्रिल काय कामाचं?शरीराची नासाडी करणारं.तुला असली थ्रिल अनुभवायचंय?”

” असली थ्रिल??ते काय असतं?दारु पिणं तर नाही ना?ते असेल तर आपल्याला माहितेय!सगळ्या प्रकारची दारु प्यायलोय दादा आपण.गांजा,अफू सगळं झालंय आपलं “

तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला.मधूकाका खरंच म्हणत होते पोरगं वाया गेलंय.

“नाही त्यापेक्षा वेगळं आहे.तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला”

” बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो”

मी निघालो पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते.सुऱ्याचे वडिल ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो,माझ्या वडिलांच्या आँफिसमध्ये शिपाई होते.वडिलांची आणि त्यांची चांगली घसट.सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा.इनमीन अठरा वर्षाचा.अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला.काँप्या करुन  दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली.आँक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं.दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगारेट पित,गुटखे खात,येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा.त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते.कुणी व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत त्याला समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा.या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं.

दोनतीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतांनाच एकदिवस मधूकाका घरी आले.सुऱ्याने एका पोरीवरुन कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या.पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं.”तुमच्या पोलिसखात्यात खुप ओळखी आहेत साहेब.प्लिज सुऱ्याला सोडवा ना ” अशी ते वडिलांना विनवणी करत होते.सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडिल नाही म्हणत होते.मग मीही वडिलांना आग्रह धरला.सुऱ्याची चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली.शेवटी वडिलांनी सुऱ्याला सोडवून आणलं.

शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.

“काय दादा कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?”

” तुझ्याकडे सायकल आहे ना?तिच्यात हवा भर,आँईलिंग कर.उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने”

तो एकदम चमकला

” काय?सायकलने?आणि अजिंठ्याला?काय चेष्टा करता दादा?आजकाल कुणी सायकल चालवतं का?आणि तेही इतक्या दूर?त्यापेक्षा बाईकने जाऊ ना”

” काय सुऱ्या कसा रे तू इतका लेचापेचा?बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल?तसं तर कुणीही जाऊ शकतं.आणि तुझ्यापेक्षा आमच्या काँलेजच्या मुली चांगल्या! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत” 

ही मात्रा बरोबर लागू पडली.मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं.

“बरं येतो मी.पण मला जमेल का दादा?”

तो जरा अनिच्छेनेच म्हणाला.

“मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?”

तो तोंड वाकडं करुनच गेला.

रविवारी पहाटेच आम्ही निघालो.सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगारेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले खिसे माझ्या लक्षात आले. मी त्या मुलामुलींना सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती.प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करुन दिली.सुऱ्या खुष झाला.खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती.त्यांच्या सायकलीही वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या.त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं.तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो “बघ तू सिगरेट पितोस ना त्याचे परिणाम आहेत हे “त्याला ते पटायचं.त्याचबरोबर ” मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या तुझा तिरस्कार करतील.पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत “असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.

रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता.आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी “साधी सायकल असूनही तू खुप चांगली सायकल चालवली.काय स्टँमिना आहे यार  तुझा!” असं म्हंटल्यावर सुऱ्या चांगलाच खुष झाला.सगळे गेल्यावर मला म्हणाला

“मजा आली दादा.काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात.पुन्हा काही असं असेल तर जरुर सांगा”

” अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने.जायचं का तुला?”

” दादा जायची तर खुप इच्छा आहे पण खुप खर्च येईल ना!”

” काही नाही फक्त ४-५ हजार रुपये.तू जमव काही.उरलेले मी देईन तुला”

“धन्यवाद दादा”

” ते सोड.एक

गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु,सिगरेट पिता येणार नाही.गुटखा खाता येणार नाही.मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा.मी हातही लावणार नाही”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देवआनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात.

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॉ रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२४ रोजी ते ८२ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. अकरावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॉक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्‌, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठीअसलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॉलिमर रिऍक्षन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार, म्हणजे फक्त भारतरत्न बाकी!

असा क्रषितुल्य भारतीय ८३ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल

या महान वैज्ञानिकाला शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

वंदे मातरम !!

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

नऊ-दहा वर्षाचं वय..  शाळेतली तिसरी चौथी असेल..

दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.

आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..

मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.

कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं  अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..

” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..

शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..

आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..

सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..

त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून  नाकाच्या आत गाठ मारलेली..

याचं  नाव सुंकलं..

परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या  नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…

मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..

दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला  न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…

” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ” 

आईची सूचना..

” अरे व्वा ..नाक टोचलं वाटतं ” भेटणा-या प्रत्येकाकडून कौतुक..

आनंदाच्या डोहात तरंगत असताना दुस-या दिवशी मात्रं  नाक ठणकत असल्याची जाणीव व्हायची.नाकपुडी लालेलाल झालेली असायची. 

तिसरे चौथे दिवशी लाल फोडाने त्या सुंकल्यावर आक्रमण केलेलं असायचं..

प्रचंड दुखणं ..पण  आईला सांगायला  कमीपणा वाटायचा..

दोन दिवस सहन करायची ती वेदना..

कदाचित स्त्री म्हणून वाट्याला येणा-या वेदनेची नि सहनशक्तीची इथूनच सुरूवात होत असावी!

आता त्या फोडात पू भरलेला असायचा..सुंकल्यातल्या मोत्याशी साधर्म्य जोडू पहाणारा तो फोड आता मात्रं आईच्या नजरेतून सुटायचा नाही..

रात्री गरम फुलवातीनं त्याला शेकण्याच्या नावानं नाकाला दिलेले चटके पार काळजापर्यंत पोहोचायचे..

सुंकल्याच्या तारेच्या गाठीचं नाकाच्या आतल्या बाजुला सतत टोचणं , ते सुंकलं पांघरुणात अडकून नाक दुखणं, कपडा काढताना सुंकल्यात अडकणं, खेळताना मैत्रीणीकडून सुंकलं ओढलं जाणं नि नाकातून जीवघेणी कळ उमटणं , चेहरा धुताना त्या सुंकल्यात हमाम साबणं अडकून  मैत्रिणींचा शेंबूड अडकल्याचा गैरसमज होऊन चेष्टा होणं…

यांमुळे ” घी देखा लेकीन बडगा नही देखा ”  …अशी त्या सुंकल्याची अवस्था व्हायची  नि चार -सहा  महिन्यांत त्या सुंकल्याशी  काडीमोड  व्हायचा!!

” नाक बुजू देऊ  नको गं..नाहीतर लग्नात नथ घालायला अडचण यायची ” ..असे सल्ले मिळायचे नि अधूनमधून खराट्याच्या छोट्याश्या काडीनं  नाकाच्या छिद्राचं अस्तित्त्व टिकवलं जायचं!

शाळेच्या स्नेहसंमेलनात   छोट्याशा खोट्या कोळीछाप  नथणींनं नाक सजायचं

नि ” टिमक्याची चोली बाई  ” गाण्यावर  मनमुराद नाचायचं..

” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ”  अशा गुजराती मारवाडी  नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची  नि  सुरेखशा साखळीनं  ही  नथनी  केसाशी नाहीतर कानातल्याशी  संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!

या नथन्या  त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत  निपचित पडून रहायच्या!

आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं  नि  महाविद्यालयाचं शहर लागलं..

या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…

कधी  रेखाची  नाहीतर राखीची नाकातली रिंग  तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी   मनातल्या मोरपिसाला साद घालायची..

अशी  चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..

भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की  जीव शांत शांत व्हायचा..

त्या चमकीचा  प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि  अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..

एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..

चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..

नंतरचे अनेक दिवस औषधाचे  नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू  डोस गपगुमान गिळावे लागले..

चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…

आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत  गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …

कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली  ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..

त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..

घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू  नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की  तिचं  अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य  स्वर्गीय भासायचं…!!

आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …

नि  आपण कधीही  नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..

लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी  एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..

उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..

” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा  मान  आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “

आता ही नथ दागिना राहिली नव्हती..

ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …

आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी  गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!

मी  अचानक मोठी झाले..

लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!

आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!

सुंदर दिसावं ही  प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…

फक्त महाराष्ट्रातच  नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…

केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..

मंगळसुत्राखालोखाल  सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा  मोठा मान…

तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..

या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..

नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..

महिलांच्या शरीराची डावी बाजू ही  प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..

म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..

यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..

खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…

मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…

पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..

इतरवेळी  जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.

नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी 

अगदी  उंची साडीवरही  दिसू  लागलीय…!!

असतो  एकेकाचा  काळ …

कालाय  तस्मै  नम: !!

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले

सोलापूर

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक सुंदर खिडकी वजा दरवाजा••• त्यातून कुतुहलाने बाहेर डोकावणारी स्त्री••• मागे स्वयंपाक घरातील दिसणारी मांडणी•••

बस एवढेच चित्र. पण त्याच्या मोहक सौंदर्याने लक्ष वेधून घेते आणि काही क्षण तरी निरिक्षण करायला भाग पाडते.

नंतर दिसते ते चित्राच्या खाली असलेले पुस्तकाचे शिर्षक••• ‘चाकोरीतल्या जगण्यामधून ‘.

मग लगेच विचारचक्र फिरू लागते आणि चित्राचा वेगळा अर्थ उमगतो की स्त्री••• जी संसाराच्या चाकोरीत अडकली आहे, तिलाही संसाराच्या पलिकडच्या जगाचे कुतूहल आहेच की! त्याच कुतुहलाने ती बाहेर डोकावून बाहेरच्या जगाचा अंदाज घेत आहे•••

नीट पाहिले तर तिचा संसार  म्हणजे तिचे स्वयंपाकघर हे मुख्य असले तरी सध्याची परिस्थिती पहाता ती चूल आणि मूल यामधेच गुरफटून न रहाता संसाराला मदत म्हणून या चौकटीतून बाहेर पडून काही करण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठी तिचे एक पाउल बाहेर पडले पण आहे .

जरी तिचे एक पाऊल बाहेर पडले असले तरी अवस्था मात्र नरसिंहासारखी द्विधा झाली आहे. ना धड घरात ना धड बाहेर••• ना मुक्त ना बांधलेले तरीही या उंबरठ्याशी जगडलेले••• 

स्त्रीने कितीही बाहेर पडून स्वर्ग हाती घेतले तरी तिला आजही घरचे सगळे बघावेच लागते. ती कोणत्याही कारणाने घराच्या चौकटीच्या बाहेर आली तरी सरड्याची धाव कुंपणार्यंत तसे काहीतरी तिच्या बाबतीत होते आणि घर , घराचा उंबरठा हे तिचे मर्मस्थानच बनते.

हे प्राधान्य असले तरी आजकालची स्त्री ही घराच्या चौकटीतून बाहेर पडू लागली आहे हे वास्तव स्पष्टपणे दिसते.

नीट पाहिले तर या चौकटीवर धावदोर्‍याची टीप दिसते आणि यातूनही बरेच अर्थ प्रेरित होतात. स्त्रीचे आयुष्य हे घरचे बाहेरचे ऑफिसचे सणवार पाहुणेरावळे यामधे धावतेच झालेले आहे .तीच तिची चाकोरी बनली आहे.

अजून विचार केला तर वाटते स्त्रीचे आयुष्य बाहेर वेगळे असले तरी तिच्या भावना या  धावदोरा घालून घराच्या चौकटीतच शिवल्या गेल्या आहेत.

अशा अनेक स्त्री समस्यांना वाचा फोडणारे हे चित्र. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरील हावभावामुळे स्त्री व्यथेतून मोकळी होऊन आपले विश्व मी निर्माण करीन. चौकटी बाहेर जाऊनही चौकटीची मर्यादा मान हे जपून संसार फुलवेन या आत्मविश्वासाचे द्योतक वाटते . 

अर्थातच या नावामुळे आणि त्यातील गर्भितार्थामुळे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायची ईच्छा होतेच.

ईतके साधे चित्र पण कल्पकतेतून त्याला विविध आयाम द्यायच्या कसबतेमुळे मनाचा ठाव घेते .त्याबद्दल मुखपृष्ठकार नयन बारहाते, संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नीता,नितीन हिरवे आणि लेखिका सविता इंगळे यांचे मन:पूर्वक आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 222 ☆ कहानी – शुभचिन्तक ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है एक विचारणीय कथा – शुभचिन्तक। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 222 ☆

☆ कहानी – शुभचिन्तक

कॉलोनी में चौधरी साहब का आतंक है। वे कॉलोनी की अघोषित नैतिक पुलिस हैं। कॉलोनी में कोई भी गड़बड़ करे, चौधरी साहब उसकी पेशी ले लेते हैं। कॉलोनी के छोटे से पार्क में सुबह-शाम अपने तीन चार हमउम्रों के साथ उनकी बैठक जमती है। उस वक्त कॉलोनी के लड़के-लड़कियाँ पार्क से दूरी बना कर चलते हैं।

चौधरी साहब को सबसे ज़्यादा चिढ़ कान पर मोबाइल चिपकाये घूमते लड़कों- लड़कियों से होती है। देखते हैं तो इशारों से बुला लेते हैं, फिर शुरू हो जाते हैं— ‘आप कोई बड़े बिज़नेसमैन हैं? किसी कंपनी के डायरेक्टर या मैनेजर हैं? यह आपको घंटों बात करने की ज़रूरत क्यों होती है? पैसे खर्च नहीं होते? स्टूडेंट के लिए इतनी ज़्यादा बात करना क्यों ज़रूरी है?’

लड़के-लड़कियाँ चौधरी साहब से तो कुछ नहीं कहते, लेकिन घर आकर माँ-बाप के सामने उखड़ जाते हैं— ‘हम बात करते हैं तो चौधरी अंकल को क्यों तकलीफ होती है? उनके ज़माने में मोबाइल नहीं होता था, हमारे ज़माने में है तो इस्तेमाल भी होगा। और फिर जब हमारे पेरेंट्स को एतराज़ नहीं है तो वे क्यों चार आदमी के सामने टोका-टाकी करते हैं?’

उनके माता-पिता समझाते हैं, ‘चौधरी साहब बुज़ुर्ग हैं। वे सब का भला चाहते हैं। उन्हें लगता है कि तुम लोग अपने पैसे और टाइम की फिजूलखर्ची करते हो, इसीलिए वे बोलते हैं। ही मीन्स वैल। उनकी बात का बुरा नहीं मानना चाहिए।’

लेकिन लड़के-लड़कियाँ कसमसाते रहते हैं। अपनी स्वतंत्रता में यह दखलन्दाजी उन्हें बर्दाश्त नहीं होती। चौधरी साहब को देखते ही उनका माथा चढ़ता है, लेकिन उनकी उम्र का लिहाज है।

चौधरी साहब का खयाल है कि मोबाइल ने देश के लोगों को बरबाद कर दिया है। लड़के-लड़कियांँ दिन भर मोबाइल से ऐसे चिपके रहते हैं जैसे यही उनकी रोज़ी-रोटी हो। एक बार कान से चिपका सो चिपका, पता नहीं कब अलग होगा। किसी से रूबरू बात करना मुश्किल है। चौधरी साहब का सोच है कि जो कमाते नहीं उन्हें सोच समझकर खर्चा करना चाहिए।

चौधरी साहब के घर के सदस्य, ख़ासकर बच्चे, उनसे ख़ौफ़ खाते हैं। अपने मोबाइल छिपा कर रखते हैं और बात करते वक्त दरवाजा बन्द करना नहीं भूलते।

चौधरी साहब को शिकायत कॉलोनी में काम करने वाली बाइयों से भी है। अब बाइयों को भी मोबाइल का रोग लग गया है। ज़्यादातर बाइयों के हाथ में मोबाइल चमकता रहता है। चौधरी साहब को और भी तकलीफ तब होती है जब कॉलोनी में काम करने वाले मज़दूरों और मज़दूरिनों के हाथ में भी उन्हें मोबाइल दिखायी पड़ता है। उन्हें समझ में नहीं आता कि दिन भर मेहनत करके तीन चार सौ रुपये कमाने वाले लोग मोबाइल की विलासिता कैसे बर्दाश्त कर सकते हैं।

चौधरी साहब के घर में विमला बाई काम करती है। स्वभाव से अच्छी है। काम के प्रति गंभीर है। चोरी- चकारी की आदत नहीं। आप घर उसके हवाले छोड़ कर आराम से घूमने-घामने जा सकते हैं। घरवाला पहले रिक्शा चलाता था, लेकिन कुछ दिन बाद शरीर जवाब देने लगा। अब सड़क के किनारे सब्ज़ी का ठेला लगाता है। दो लड़के और एक लड़की है। एक लड़का एक मोटर गैरेज में काम करता है, दूसरा साइकिल पर सब्ज़ी की टोकरी रखकर घूमता है।लड़की की शादी हो गयी है।

विमला बाई के साथ भी वही रोग है। झाड़ू लगाते लगाते कहीं से रिंग आ जाती है और वह झाड़ू बीच रास्ते में छोड़ कर दीवार से टिक कर बैठ जाती है। चौधरी साहब देखकर माथा  ठोकते हैं। ज़्यादा देर बात करने की गुंजाइश दिखी तो वह कान से मोबाइल चिपकाये बाहर निकल जाती है और चौधरी साहब का ब्लड-प्रेशर बढ़ने लगता है। ज़्यादा कुछ बोलने के लिए बहू बरजती है। कॉलोनी में अच्छी बाई को पा लेना किस्मत की बात है। दूसरी बात यह है कि नयी बाई को लगाने की बात उठते ही पुरानी लड़ने पर आमादा हो जाती है।

विमला बाई का अपने गाँव से रिश्ता अभी छूटा और टूटा नहीं। तीन बहनें हैं जो आस-पास के गाँवों में ब्याही हैं। दो भाई गाँव में ही हैं। चाचाओं, बुआओं, मौसियों से रिश्ते जीवित हैं। मन ऊबता है तो कहीं भी फोन लगा कर बैठ जाती है। फिर सुध नहीं रहती। कहाँ-कहाँ की खोज खबर लेती रहती है। कान से सुनी बातें दृश्यों में परिवर्तित होकर आँखों के सामने तैरती जाती हैं। मोबाइल छोड़ने का मन नहीं होता। जब बात बन्द होती है तब मन में कसक होती है कि बहुत पैसा खर्च हो गया। लेकिन यह मलाल अल्पजीवी ही होता है। काम से फुरसत मिलते ही मन फिर कहीं उड़ने को अकुलाने लगता है।

विमला बाई काम भले ही दो तीन घरों में करती हो, लेकिन उसकी पैठ कॉलोनी के कई घरों में है। कई घरों में वह कभी न कभी काम कर चुकी है। लेकिन उसे पता है कि घरों की मालकिनों  से उसके संबंध एक सीमा तक ही हैं। उसके बाद उनके रास्ते अलग-अलग हैं। मालकिनें जिस आत्मीयता से एक दूसरे से बात और व्यवहार करती हैं वैसी उसके लिए नहीं है। कई बार वह काम करते-करते चौधरी साहब की बहू के सामने अपने दुखड़े लेकर बैठ जाती है, लेकिन पाँच दस मिनट बाद ही वह महसूस करती है कि उसकी दुनिया में उनकी दिलचस्पी नहीं है। उनके सुख- दुख उसके सुखों-दुखों से भिन्न हैं।

घर में उसकी बातें सुनने वाला कोई नहीं होता। पति रात को थका हुआ आता है और खाना खा कर सो जाता है। लड़के कभी जल्दी तो कभी आधी रात को आते हैं। उन्हें भी माँ से बात करने की फुरसत नहीं होती। बस कॉलोनी की बाइयाँ ही हैं जो इत्मीनान से उसकी बात सुनती हैं। उनके साथ खूब मन के पन्ने खुलते हैं। एक दूसरे को अपनी व्यथा सुना कर हल्की हो जाती हैं। चौधरी साहब के घर पहुँचते-पहुँचते विमला बाई किसी दूसरी बाई के साथ सामने पुलिया पर बैठक जमा लेती है और खिड़की से झाँकते  चौधरी साहब कुढ़ कर बहू से कहते हैं, ‘लो देख लो, जम गयी बैठक। हो गया तुम्हारा काम।’

दिवाली-होली को विमला बाई को गाँव जाना ही है। गयी तो फिर हफ्ते भर तक वापस आने का नाम नहीं लेती। ऐसा ही गाँव से जुड़ी सभी बाइयों के साथ होता है। बाइयों के ग़ायब होते ही उनकी मालकिनों का मूड बिगड़ जाता है। सब को अपना जोड़ों का दर्द, स्पोंडिलाइटिस और डायबिटीज़ याद आने लगता है। जब तक बाइयाँ पुनः प्रकट नहीं होतीं, घर में खासा तनाव रहता है। बाइयों की खीझ घर के बच्चों पर उतरती है।

विमला बाई के गाँव के घर में अभी माँ है। सयानी होने के बावजूद हाथ-पाँव दुरुस्त हैं। अभी भी संपन्न लोगों के घरों में टानकटउआ करके थोड़ा बहुत कमा लेती है। फालतू बैठे उसे चैन नहीं पड़ता।

विमला गाँव जाती है तो निहाल हो जाती है। रिश्तेदारों और बचपन की सहेलियों से मिलकर शहर की फजीहत और तनाव भूल जाती है। दुनिया भर की बातें होती हैं। सहेलियों से मिलकर बचपन फिर लौट आता है। एक हफ्ता कब गुज़र जाता है पता नहीं चलता। लौटते मन खिन्न होता है। सामने दिखती है वही थोड़े से पैसों के लिए बड़े लोगों की सेवा और घर की नीरस दिनचर्या। लेकिन ज़िन्दगी का शिकंजा ऐसा है कि निकल भागने का कोई रास्ता नहीं है।

विमला बाई गाँव से लौटती है तो कॉलोनी के कई घरों से राहत की ठंडी साँस निकलती है। मनहूस लगते दृश्य फिर सुहाने हो जाते हैं। फूलों में खुशबू लौट आती है। प्राणिमात्र के लिए फिर प्रेम का अनुभव होने लगता है।

विमला बाई के लौटने पर एक-दो दिन तक चौधरी साहब का मुँह फूला रहता है। अमूमन विमला बाई से गप लगाने वाले चौधरी साहब एक-दो दिन तक उससे बात नहीं करते। उनकी नज़र में गाँव का यह मोह फालतू है। उनकी समझ में नहीं आता कि गाँव में ऐसा क्या है जो विमला बाई जैसी स्त्रियों को बाँधे रखता है। जो शहर में है वह गाँव में कहाँ? विमला बाई को जाना ही है तो एक-दो दिन में सब से मिल-मिला कर वापस आ जाए। हफ्ते भर तक वहाँ क्या करना है? चौधरी साहब को रिश्ते के शादी-ब्याह में किसी गाँव जाना पड़ता है तो एक दिन में ही बोर हो जाते हैं। पूरा वक्त उबासियाँ लेते और ऊँघते बीतता है। गाँव की ज़िन्दगी की धीमी रफ्तार से एडजस्ट करना मुश्किल होता है।

एक-दो दिन की नाराज़ी के बाद चौधरी साहब कुर्सी खींचकर उपदेशक की मुद्रा में विमला बाई के सामने बैठ जाते हैं। कहते हैं, ‘विमला बाई, सँभल जाओ। न तुम मोबाइल पर टाइम और पैसा बर्बाद करना बन्द करती हो, न बार-बार गाँव जाना। मेरा सारा समझाना फालतू जाता है। इतने सारे नाते रिश्ते पालने से क्या मिलता है? पैसा बचाओ और जिन्दगी बेहतर बनाने की कोशिश करो। ये नाते रिश्ते किसी काम नहीं आते, पैसा ही काम आता है।’

विमला बाई उनकी बात सुनकर कुछ देर सिर झुका कर ज़मीन कुरेदती है, फिर चौधरी साहब की आँखों में झाँक कर जवाब देती है, ‘बाबूजी, आप ठीक कहते हैं, लेकिन मैं पागल नहीं हूँ। आपकी बात पर खूब सोचती हूँ। मैं यह सोचती हूँ कि पैसा आराम दे सकता है, परेशानियाँ कम कर सकता है, लेकिन खुशी नहीं दे सकता। खुशी तो रिश्तों-नातों से ही मिलती है। बगल में आदमी न हो तो लोग पैसा लूट कर चले जाते हैं। यहाँ कितने ही लखपती करोड़पती लोग हैं जो अकेले पड़े सड़ रहे हैं। उनके बेटे बाप की संपत्ति के लिए एक दूसरे की जान ले रहे हैं। आखिर में रिश्ते ही काम आते हैं, पैसा बेकार हो जाता है। रिश्ते में जो खुशी है वह पैसे में कहाँ?’
चौधरी साहब निरुत्तर होकर उसका मुँह देखते रह गये।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 221 – आलेख – भोर भई ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 221 ☆ आलेख – भोर भई ?

मैं फुटपाथ पर चल रहा हूँ। बाईं ओर फुटपाथ के साथ-साथ महाविद्यालय की दीवार चल रही है तो दाहिनी ओर सड़क सरपट दौड़ रही है।  महाविद्यालय की सीमा में लम्बे-बड़े वृक्ष हैं। कुछ वृक्षों का एक हिस्सा दीवार फांदकर फुटपाथ के ऊपर भी आ रहा है। परहित का विचार करनेवाले यों भी सीमाओं में बंधकर कब अपना काम करते हैं!

अपने विचारों में खोया चला जा रहा हूँ। अकस्मात देखता हूँ कि आँख से लगभग दस फीट आगे, सिर पर छाया करते किसी वृक्ष का एक पत्ता झर रहा है। सड़क पर धूप है जबकि फुटपाथ पर छाया। झरता हुआ पत्ता किसी दक्ष नृत्यांगना के पदलालित्य-सा थिरकता हुआ  नीचे आ रहा है। आश्चर्य! वह अकेला नहीं है। उसकी छाया भी उसके साथ निरंतर नृत्य करती उतर रही है। एक लय, एक  ताल, एक यति के साथ दो की गति। जीवन में पहली बार प्रत्यक्ष और परोक्ष दोनों सामने हैं। गंतव्य तो निश्चित है पर पल-पल बदलता मार्ग अनिश्चितता उत्पन्न रहा है। संत कबीर ने लिखा है, ‘जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला। न जानूँ किधर गिरेगा,लग्या पवन का रेला।’ 

इहलोक के रेले में आत्मा और देह का संबंध भी प्रत्यक्ष और परोक्ष जैसा ही है। विज्ञान कहता है, जो दिख रहा है, वही घट रहा है। ज्ञान कहता है, दृष्टि सम्यक हो तो जो घटता है, वही दिखता है। देखता हूँ कि पत्ते से पहले उसकी छाया ओझल हो गई है। पत्ता अब धूल में पड़ा, धूल हो रहा है।

अगले 365 दिन यदि इहलोक में निवास बना रहा एवं देह और आत्मा के परस्पर संबंध पर मंथन हो सका तो ग्रेगोरियन कैलेंडर का कल से आरम्भ होनेवाला यह वर्ष शायद कुछ उपयोगी सिद्ध हो सके।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 169 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 169 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 169) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 169 ?

☆☆☆☆☆

☆ Resolute Action… ☆ 

बहुत कोशिश की मैंने

उसको समझाने की,

फिर एक रोज़ मैंने खुद

को ही समझा लिया…!

☆☆

I tried desperately to

make him understand,

Then one fine day I

simply convinced myself…!

☆☆☆☆☆

☆ Optimism… ☆ 

यूं ही नहीं रहते हैं,

अंधेरे साथ-साथ मेरे,

जानते हैं, इक रोज़ करुंगा

सारा जहाँ रौशन मैं …!

☆☆

Darknesses don’t stay with

me  for  no  reasons,

They  know,  one  day I will

illumine the entire world..!

☆☆☆☆☆

☆ Revengeful Change… ☆ 

ये   तुमने  ख़ुद 

को  जो  बदला  है…

वो  एक  बदलाव  है

या फिर एक “बदला”..?

☆☆

The change that  

you’ve undergone…

Is  it  a  change

or  the  revenge …?

☆☆☆☆☆

☆ Breezy Invite…

हवा को दावतनामा भेज पाएं

ये तो हरगिज़ मुमकिन नहीं

पर खिड़कियों को खुला रखना

तो हमारे अख्तियार में है..!

☆☆

Sending invitation to the wind

may  not  be  possible, but…

Keeping the windows open is

certainly within our purview..!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈