मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 40 ☆ थेंब … ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 40 ☆ 

☆ थेंब … ☆

थेंबाला माहीत नव्हतं

कुठे कसं पडायचं

आभाळाने सोडल्यावर

कुणाच्या आश्रित व्हायचं…१

 

आला बिचारा खाली

वेग त्याचा मंदावला

असंख्य थेंबात मग

त्याला सहारा मिळाला…२

 

कुणी कुठे कुणी कुठे

याला गटार मिळाली

हवेच्या प्रचंड झोतात

याची दिशा बदलली…३

 

थेंब अवतरण्यापूर्वी

होता शुद्ध, निर्मळ

गटारात पडताच पहा

याच्या भोवती कश्मळ…४

 

सहवास महत्वाचा असतो

आचार तेव्हाच साधतो

जन्माने कुणीच नसतो श्रेष्ठ

कर्माचा वाटा, मोठा ठरतो…५

 

मला इतकेच, सांगायचे

राज हेच होते, खोलायचे

उच नीच श्रेष्ठ नि कनिष्ठ

यातून बाहेर सर्वांनी पडायचे…६

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्याम गझल – त्याच वाटा तीच वळणे ☆ श्री सोमनाथ साखरे

☆ कवितेचा उत्सव ☆ श्याम गझल – त्याच वाटा तीच वळणे ☆ श्री सोमनाथ साखरे ☆ 

 

उधळून रंग काही रिझवून शाम गेली

या कोरडेपणाला भिजवून शाम गेली.

 

गजगामीनी अशी की लय-ताल चालतांना

श्वासात पावलांच्या थबकून शाम गेली.

 

मौनातही सखीच्या भावुक बोल काही

मिटवून अधर ऐसें सुचवून शाम गेली.

 

गुज बोललो गुलाबी कानात मी सखीच्या

ऐकून अनुभवाचे शरमून शाम गेली.

 

आकाश चांदण्यांनी हळुवार गोंदतांना

भारावल्या दिशांना उजळून शाम गेली.

 

ती बावरी सखी की राधाच श्रीहरीची

या सावळ्या घनाला समजून श्याम गेली.

 

गजऱ्यात मोगऱ्याच्या लपवून गंध काही

दिलदार शायराला भुलवून शाम गेली

 

© श्री सोमनाथ साखरे

नाशिक..

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांजवात…भाग 1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

चप्पल पायात सरकवून.. ज्योती दार  बंद करणार… मनात शंका आली.. गीझर, गॅस,मायक्रो.. सर्व बंद केले ना? आत जाऊन खात्री केली. पर्समध्ये मोबाईल, किल्ली, सॅनिटायझर, आणि हो, चिवडा लाडुचे पुडे घेतलेत हे पण बघितले, मास्क अडकवून घाईघाईने स्कूटर काढली.

आवरायला जरा घाईच झाली होती. ८, १० दिवस स्वाती ताईकडे लग्नाला गेलेली ती.. सकाळच्या फ्लाईटने आली होती. आज एक हे कारण होते, पण हल्ली रोजच असे होते,. आई म्हणजे सासूबाई होत्या तोपर्यंत बरे होते, मागचे काही बघावे लागत नसे. पण मागच्या वर्षी त्या गेल्यापासून जरा ओढाताण च होते. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर होती, पण सत्येन.. अजिबात मदत नाही. उलट त्याचीच कामे करावी लागतात तशी तिची नोकरीसारखी नोकरी नव्हती म्हणा. आवड म्हणुनच.. समाजसेवा,. ९ मैत्रिणींच्या “नवविधा समुहा” तील संचालिका… कार्याशी कार्यकर्ती, ९ वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम… विशेषत: स्त्री समस्यांसंबंधी समूहाने हाती घेतले होते, त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनिवास.. “सांजवात”. त्याचे कार्यालयीन आणि इतरही सर्वच कामकाज ज्योती बघत असे.

रोजच्याप्रमाणे आधी निवासातुन चक्कर न टाकता ती तडक ऑफिसमध्येच गेली. अपेक्षेप्रमाणे टेबलवर कागदपत्रांचा ढीग होता. कामाला सुरवात करणार तोच माया… तिची मदतनीस आली.

लग्न, प्रवास ई, जुजबी बोलणे सुरु असतांनाच ज्योतीलाच लक्ष मायाच्या हातातील पिवळ्या फाईलकडे गेले.

पिवळी फाईल म्हणजे नविन प्रवेश.

“काय ग माया.. नविन प्रवेशाचा अर्ज?” ज्योती

“ताई,नुसता अर्ज नाही, रहायला सुध्दा आल्यात, दुसर्या मजल्यावरची ती  स्पेशल रुम दिली रेखाताईंनी. तसे अजुन सायरन केले नाही, तुम्ही आल्यावर तुमचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचा म्हणत होत्या”

“माझा सल्ला? वेडी झालो के काय रेखा? अग, काही कागदपत्र अपुरी असतील,नाहीतर पैशाचा प्रॉब्लेम ?”

“”नाही हो, तसे काहीच नाही, बघाना फाईल. पण ही केस जरा वेगळीच आहे असे त्या अन् सुरेशदादा म्हणत होते”.

“अं? वेगळी केस? आहे तरी कोण?” ज्योती

“अनुराधा जोशी आहेत ७०, ७२ वर्षांच्या, पण एकदम छान आहेत हं आजी. अगदी शांत, डिसेंट,. बोलावू का त्यांना? का आपणच जाऊया खोलीत?

“माया अनुराधा जोशी… नाव ऐकुन ज्योती जरा चपापली, नावासारखी नावे खुप असतात. असतील दुसर्या कोणीतरी, तेवढ्यात मायाने फाईल समोर ठेवली, नावासारखे नाव अस शकते असे जरी ज्योतीला वाटले तरी फाईल ऊघडल्यानंतर अर्जावर.. नांव ::अनुराधा गोविंद जोशी दाखल करणार्यांना नाव:: नंदन गोविंद जोशी दोघांचे फोटो, आधार कार्ड पाहिल्यावर ज्योतीला धक्काच बसला.

डॉक्टर सर्टिफिकेट, शिफारसपत्र, हमीपत्र, सर्व व्यवस्थित,अन् चेक तोही २५ लाख रुपयांचा तिची खात्रीच पटली.

तेवढ्यात फोन, रेखाचाच, नेहमीचा ऊत्साही आवाज “हाय ज्यो! कशी आहेस? स्वातीताईनी बुंदीचे लाडू, चिवडा दिलाय ना माझ्यासाठी? पण sorry हं, मला यायला, जरा उशीर होईल, आल्यावर सापडते”

ज्योतीकडुन काहीच प्रतिसाद नाही म्हणुन पुढे तीच, “ज्यो…फाईल बघितली? पण Please don’t get upset तुला त्रास होईल असा कोणताच निर्णय आपण घेणार नाही.

आल्यावर बोलुया detail”.

रेखा आणि ती.. नुसत्याच सहकारी नव्हत्या, तर जीवाभावाच्या मैत्रिणी. म्हणुन ज्योतीचे पुर्वायुष्य बारीकसारीक तपशिलासह तिला माहित होते,. अजुनही धक्क्यातून न सावरल्यामुळे ज्योतीचे…. अर्जाकडे अन् फोटोकडे परतपरत पहाणे सुरुच होते.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




मराठी साहित्य – विविधा ☆ सावळी….सावळी ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ सावळी….सावळी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

परवाच सुधीर मोघे यांचे ‘गाणारी वाट’ हे पुस्तक वाचनात आले. त्यांच्या चित्रपट- मालिका लेखनातील गीतांचा प्रवास यामध्ये आहे. त्यातील एका गाण्याचा प्रवास वाचताना मी पुन्हा नकळत त्या गाण्यात गुंतून गेले-“सांज ये गोकुळी सावळी सावळी….” !

वास्तविक हे गाणे श्रीधर फडक्यांनी आपल्या एका कार्यक्रमासाठी सुधीर मोघ्यांकडून लिहून घेतले. बाकी बरीचशी गाणी गदिमा नी सुधीर फडक्यांसाठी लिहिली होती, पण ती स्वरबद्ध झाली नव्हती. ती चालीत बांधून त्याचा एक कार्यक्रम श्रीधरजीनी तयार केला होता. त्यातील एक गाणे प्रभातीचे रंग दाखवणारे होये. त्याच्या जोडीला म्हणून हे एक गाणे शामरंगावर तयार झाले. संगीत श्रीधर फडके आणि गायिका आशा भोसले! या त्रयींनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.

नंतर अनेक वर्षांनी हे गाणे ‘वजीर ‘ या चित्रपटात घेतले व अश्विनी भावे या गुणी अभिनेत्रीवर चित्रित झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गाणे येते. पुढच्या संकटाची कसलीच चाहूल नसलेली ही युवती या शामरंगात आकंठ बुडालेली दिसते.

सूर्य अस्ताला टेकला आहे आणि अंधार दाटून आला आहे. कवीने अशी कल्पना केली आहे की ही गोकुळातील संध्याकाळ आहे. त्यामुळे त्या सावळ्या कान्ह्याच्या रंगासारखीच ती सावळी आहे, जणू काही त्याचीच सावली वाटावी. दिवसभर रानात चरत असणाऱ्या गाई आता घरच्या आणि वासराच्या ओढीने खुराने धूळ उडवत अंधाऱ्या होत चाललेल्या वाटेवरुन धावत आहेत. त्यांच्याबरोबर पाखरांचे थवे सुद्धा घरट्यात परतत आहेत. आणि त्याचवेळी दूरवर कोण्या एका देवळात सांजवात लावून घंटानाद होत आहे. दूरवर दिसणारी पर्वतरांग सूर्याचा अस्त होताना काळ्या रंगात बुडून जाते आहे. जणू काही या सर्व संध्येला दृष्ट लागू नये म्हणून निसर्गाने रेखलेली ही काजळाची दाट रेघ आहे.

पुढे कवी या सावळ्या- शामवर्णाच्या रंगात इतका बुडून गेला आहे की त्याला डोहातले चांदणे पण सावळेच दिसू लागते, कारण आजूबाजूला त्या नटखट सावळ्याची चाहूल आहे.

पुढच्या ओळी म्हणजे कवीच्या प्रतिभेचा आणि त्या कवितेतील संकल्पनेचा चरम बिंदू आहे असे मला वाटते-

“माऊली सांज अंधार पान्हा”- ही सावळी संध्याकाळ म्हणजे एक माता आहे आणि ती अंधार पान्हवते आहे. त्यामुळे त्या कृष्णवर्णाने  हे संपूर्ण विश्वच व्यापून राहिले आहे, जणू काही ते त्या सावळ्या कान्ह्याचे दुसरे रुपच आहे.

असा तो कान्हा वाऱ्याच्या मदतीने अलवार बासरी वाजवत आसमंतात स्वरांची बरसात करत आहे. त्यामुळे जणू काही आम्हा रसिकांच्या समोर स्वररुपी अमृताच्या ओंजळी रित्या होत आहेत.

या गाण्याची आणखी एक गंमत अशी आहे की “पर्वतांची दिसे दूर रांग” हे कडवे यात रेकॉर्डिंगच्या वेळी जोडले गेले.त्यापूर्वी फक्त दोनच कडवी गायली जायची. पण नंतर घातलेले मधले कडवे त्या ठिकाणी इतके चपखल बसले आहे की ते जोडीव काम आहे हे कधी लक्षातसुद्धा येत नाही. हेच ते प्रतिभावंत कवीचे कवित्व असे म्हणावे लागेल. म्हणूनच अवघ्या दहा ते बारा ओळीत ‘सुधीर मोघे’ यांनी एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या कुंचल्याने संध्याकाळ कागदावर साकारावी तशी आपल्या शब्दरूपी कुंचल्याच्या अदाकारीतून काळ्या रंगांच्या विविध छटातून ही गोकुळात उतरणारी सावळी संध्याकाळ साकारली आहे. आमच्या मनावर त्या दृश्याचे स्थिरचित्र त्यांनी लीलया साकारले आहे. कविता म्हणून ही रचना जशी अप्रतिम आहे तसेच त्या शब्दांना श्रीधर फडके यांनी दिलेली सूरांची संजीवनी त्यातील कृष्णवर्ण अधिक गहिरा करते. आशा भोसले यांचा अद्वितीय असा स्वर या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन देतो. म्हणूनच या संपूर्ण अविष्कारात  सांजावलेले आपल्यासारख्या रसिकांचे मन पुन्हा पुन्हा त्या शामरंगी सावळ्या रंगात रंगून जाते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार ☆ परिचय – श्री विनय माधव गोखले

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार ☆ परिचय – श्री विनय माधव गोखले ☆ 

पुस्तकाचे नाव : शोध 

लेखक : श्री मुरलीधर खैरनार  

पृष्ठ संख्या : 515

मूल्य : रु 510

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

अमेज़न लिंक >>  ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार

शोध – एक ऐतिहासिक रहस्यकथा

“१६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली तेव्हा त्या खजिन्याचा एक मोठा भाग गोंदाजी नारो ह्या त्यांच्या सरदाराने परतीच्या वाटेत असताना मोंगलाच्या हाती सापडू नये म्हणून बागलाण प्रांतातील डोंगराळ भागात लपवून ठेवला होता. त्याचा एक नकाशा त्याने बनवला पण तो स्वत: मोगलांच्या हाती सापडून मारला गेला व तो नकाशा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचूच शकला नाही. गेली ३५०+ वर्षे अनेक पिढ्या ह्या अब्जावधींच्या खजिन्याचा शोध घेत आहेत पण तो अजूनपर्यंत कुणाला सापडलेला नव्हता.

हा धागा पकडून सुरू झालेली कथा वेग पकडते ते क्लारा ग्रेंजर ह्या ब्रिटिश इतिहास संशोधिकेचा मुंबईतील आलिशान हाॅटेलात खून होतो त्यानंतर… आणि तिथून सुरू झालेली ही  रहस्यमालिका आपल्याला कसारा, नाशिक, दिंडोरी, कळवण, बांद्रा, सातमाळ्याच्या पर्वतरांगांतील, अहिवंत, अचला, कोळदेहर, सप्तश्रुंग आदि गडदुर्ग, तिथले आदिवासी व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा अशा विविध   प्रांतांतून फिरवत राहते.

कूटनीती, राजकारण, पैसाकारण, पाठलाग, खून ह्यांचे एकापाठोपाठ एक सत्र  सुरू होते आणि ही वेगवान कथा वाचकांस अक्षरश: खिळवून ठेवते.

खजिन्याच्या गुप्त रहस्याचा भेद करताकरता लेखकाने जवळजवळ ५०० पानी पुस्तक लिहीले आहे.

त्याआधी पुस्तकामधूनच आपल्याला थोडे सुरतेच्या इतिहासात डोकवावे लागते. त्याकाळी हिंदुस्तानातील ८० टक्के निर्यात त्याकाळी एकट्या सुरतेच्या बंदरातून होत असे. म्हणूनच इंग्रज, पोर्तुगीजांनी, गुजराती व्यापार्‍यांनी सुरतेमध्ये स्वत:च्या मोठाल्या वखारी उभ्या केल्या होत्या. त्यांची सुरक्षेची जबाबदारी होती मोगलांकडे आणि त्याबदल्यात मोगलांना घसघशीत धनप्राप्ती होत असे. ही सर्व माहिती हेरांमार्फत शिवाजी महाराजांना समजली होती.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांनी पुढील जवळपास दीड वर्षे मोहिमेची आखणी हेरांमार्फत सुरू ठेवली होती. सर्व मोठमोठे व्यापारी खजिना कुठे दडवीत होते ही बित्तंबातमी हेरांनी मिळवली होती. सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेच्या आजुबाजूच्या खेड्यांमधील वाड्यांत काहींनी संपत्ती दडवली होती, तीही माहिती काढली होती. सुरतेची दुसरी लूट अवघ्या तीन दिवसांत उत्तम नियोजन पद्धतीने पार पाडली गेली आणि सुरत जवळपास रिकामी झाली होती. खजिन्यामध्ये मुख्यत्वे शुध्द सोन्याच्या लडी, ठोकळे, विटा, सोन्याचांदीची बहामनी, अरबी, फारसी, युरोपियन नाणी, दागिने, हिरे-माणके, पाचू आदींचा समावेश होता.

शिवाजी महाराजांनी परतीचा मार्ग वेगळा आखला होता आणि सैन्याचे व लुटीचे दोन-दोन भाग केले होते… एक भाग मोरोपंत पिंगळे आणि स्वत: बरोबर तर  दुसरा गोंदाजीच्या तुकडीकडे दिला.

मोगलांशी लढत देत महाराज स्वत: राजगडावर सुरक्षित पोहोचले.

परंतु सुमारे ७००० घोड्यांच्या पाठीवर खजिना लादून आणताना गोंदाजीचा परतीचा मार्ग बराचसा मोगलांच्या ताब्यातील प्रदेशातून जात होता. त्यामुळे तो सुरक्षित आणणे गोंदाजीला जिकिरीचे आणि धोक्याचे होते. त्यातच सुरतेमधील मोगली सरदाराने साल्हेर किल्याच्या मोगली किल्लेदारास पुढे येणार्‍या खजिन्याची वर्दी धाडली होती आणि स्वत: खजिन्याचा पाठलाग सुरू केला. एवढी लूट हातातून सहजासहजी जाऊन कोण देईल? पिछाडीकडून आणि दोन्ही बाजूंनी हल्ले करून गोंदाजीचे सर्वच्या सर्व सैन्य कापून काढले. पण त्याआधीच गोंदाजीने सर्व खजिना लपविण्यात यश मिळवले होते. मोगलांना सर्व ७००० घोडे माळरानावर रिकामे साडून दिलेले मिळाले पण पाठीवरील सर्व लूट गायब होती.

तात्पर्य म्हणजे, मोरोपंत पिंगळे ह्यांच्या कडील १/३ लूट लोहगड-राजगडावर पोहोचली पण गोंदाजीकडील २/३ भागाचा अजिबात शोध लागला नाही; ना सुरतेतील व्यापार्‍यांना, ना मोरोपंत पिंगळ्यांना, ना पुढच्या पिढीतील मराठ्यांना, ना मोगलांना, ना पेशव्यांना, ना इंग्रजांना. पुढेपुढे मग लोकांनी हा शोध घेणेच सोडून दिले. काहींचे असेही म्हणणे पडले की असा काही खजिना नव्हताच, गोंदाजीची केवळ दंतकथा आहे वगैरेवगैरे.

तीन वर्षांच्या अभ्यासानंतर जुलै २०१५ साली प्रकाशित झालेली ही भन्नाट खजिनाशोध कथा आहे. गडदुर्ग आणि इतिहासाची आवड असलेल्यांनी वेळ काढून जरूरजरूर वाचावी.”

सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासवृत्ती देण्यात आली होती. ही अभ्यासवृत्ती प्रतिष्ठानने जाहीर केल्यानंतर ती मिळविणारे मुरलीधर खैरनार हे पहिले मानकरी होते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 93 ☆ व्यंग्य – देश के काले सपूतों की कथा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य  ‘देश के काले सपूतों की कथा‘। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 93 ☆

☆ व्यंग्य – देश के काले सपूतों की कथा

जब देश के समझदार लोगों के हिसाब से देश की अर्थव्यवस्था नाजुक हालात में पहुँच गयी, भुगतान संतुलन एकदम बरखिलाफ हो गया और हमारे विदेशी महाजन कर्ज़ देने के नाम पर मुँह बनाने लगे, तब हमारी गौरमेंट ने देश के उन सपूतों को याद किया जिनकी कमाई अभी तक काली कमाई कहलाती थी और जिसे बाहर निकलवाने के लिए सरकार कई ‘स्वैच्छिक घोषणा’ योजनाएं लागू कर चुकी थी। इन काले सपूतों से सरकार ने कहा कि अब वक्त आ गया है कि वे मातृभूमि की सेवा को आगे आएँ और अपने तथाकथित काले धन का सफेद निवेश कर देश की तरक्की में अपना अमूल्य योगदान दें। बड़े बड़े उद्योग स्थापित कर देश की गरीबी को दूर करें और बेरोज़गारों को रोज़गार मुहैया कराएं। उनके काले धन को पूरी तरह सफेद समझा जाएगा और उनसे कोई नहीं पूछेगा कि उन्होंने उसे कब, कैसे और कहाँ से कमाया। अगर गौरमेंट ने उनकी शान के खिलाफ कभी कुछ कह दिया हो तो उसे दिल में न रखें।

यह घोषणा होते ही देश के सभी शहरों से तथाकथित काले धन के स्वामियों की टोलियों की टोलियाँ निकल कर सड़कों पर आने लगीं। इनमें मामूली क्लर्कों से लेकर भारी भरकम अधिकारी तक कंधे से कंधा मिलाकर चल रहे थे। पुराने खुर्राट भी थे और नये नये रंगरूट भी। सभी का चेहरा मातृभूमि की सेवा के भाव से दपदपा रहा था। देर आयद दुरुस्त आयद। देर से ही सही, गौरमेंट ने उनकी अहमियत को समझा तो। आखिरकार सरकार की समझ में आ गया कि उनके बिना देश आगे नहीं बढ़ सकता।

सभी खास शहरों में ऐसे सपूतों की सभाएं हुईं। जलसे का आलम था। लाउडस्पीकर पर गीत बज रहा था—‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है।’

शुरू में सभाओं में कुछ दिक्कत हुई। आला अफसरों ने कहा कि अलग अलग वर्गों की सभाएं अलग अलग होनी चाहिए। भला आला अफसर और मामूली क्लर्क एक ही मंच पर कैसे बैठ सकते हैं?इस पर कुछ क्लर्कों ने छाती ठोक कर कहा कि हैसियत नाप कर देख लो,माल कमाने के मामले में हम अफसरों से कम नहीं हैं। अन्ततः यह झगड़ा अगली सभा के लिए टाल दिया गया और सब जाति-धर्म वाले सारे भेद भुलाकर एक ही मंच पर विराजमान हुए।

मेरे शहर की सभा में सबसे पहले तीरथ प्रसाद जी का अभिनन्दन हुआ जिनके सारे केश काली कमाई बटोरते बटोरते सफेद हो गये थे। तीरथ प्रसाद जी रेत से तेल निकालने के विशेषज्ञ माने जाते थे। उन्होंने कई नौसिखियों को ट्रेनिंग देकर अपने पैरों पर खड़े होने योग्य बनाया था। वे अपने भाषण में बोले, ‘मुझे खुशी है कि सरकार ने हमारी योग्यता और क्षमता को समझा। जब जागे तभी सबेरा। समाज को भी समझना चाहिए कि पैसा उसी के पास आता है जिसमें सामर्थ्य होती है। जब तुलसीदास ने कहा है ‘समरथ को नहिं दोस गुसाईं’ तो हम पर दोष कैसे लगाया जा सकता है?अब वक्त आ गया है कि समाज हमारी कदर करे और हमें वह इज़्ज़त दे जिसके हम हकदार हैं।’

एक वक्ता बोले, ‘समाज आलोचना तो  करता है,लेकिन यह नहीं समझता कि काली कमाई क्या चीज़ है। काली कमाई सब धर्मों और जातियों से ऊपर है और सब धर्मों जातियों को एक दूसरे से बाँधती है। हम काली कमाई वाले सब मतभेदों को भुलाकर एक दूसरे को सहयोग देते हैं और मैत्रीभाव रखते हैं। आपने कभी नहीं सुना होगा कि एक काली कमाई वाले ने दूसरे की पोल खोल दी। धर्म और जाति से परे ऐसी एकता का नमूना आपको कहीं नहीं मिलेगा। इसीलिए हमें समाज की नासमझी पर तरस आता है।’

एक और वक्ता बोले, ‘सरकार बैंक खोलकर लोगों की कमाई इकट्ठी करती है ताकि वह देश और समाज के काम आ सके। हम भी अपने स्तर पर वही काम करते हैं। हमारे पास बहुत से लोगों की कमाई इकट्ठी है। सरकार दो नंबर का लेबिल हमारे ऊपर से हटाये तो उसे देश के उत्थान के लिए सामने लायें ‘

एक वक्ता बड़े गुस्से में थे। फुफकार कर बोले, ‘इस काली कमाई के ठप्पे की वजह से हमें कितना पाखंड करना पड़ा। हम हवाई जहाज पर चलने की ताकत रखते हैं लेकिन मजबूरन ट्रेन के सेकंड क्लास स्लीपर में चलना पड़ता है। मर्सिडीज कार खरीदने की क्षमता रखते हुए भी स्कूटर से काम चलाना पड़ता है। महलों में रहने की सामर्थ्य होते हुए भी छोटे से घर में गुज़र करनी पड़ती है।  काली कमाई का हौवा दिखाकर हमें चोरों की तरह रहने के लिए मजबूर किया गया। हमें अपना जीवन जिस तरह झूठे अभावों और ओढ़े हुए दुखों में गुज़ारना पड़ा है उसके लिए क्या सरकार भारापाई करेगी? क्या सरकार हमारे उस वक्त को लौटा सकती है?’

कई श्रोता रूमाल से अपनी आँखें पोंछने लगे।

एक वक्ता मंच पर खड़े होते ही माइक पकड़कर रोने लगे। कुछ संयत हुए तो सुबकते हुए बोले, ‘इस सरकारी नीति ने हमारा लाखों का नुकसान किया है। मैंने पकड़े जाने के डर से अपनी तीन बसें अपने एक साले के नाम कर दी थीं। वह साला उन तीनों को हजम कर गया। आजकल बात भी नहीं करता। अब मेरी समझ में आया कि लोग ‘साला’ को गाली की तरह क्यों इस्तेमाल करते हैं। एक और साले ने सात लाख रुपये उधार लिये थे। अब वह भी नट रहा है। कहता है समझो हराम की कमाई हराम में चली गयी। एक साढ़ू के नाम से होटल खोला है, लेकिन हमेशा डर लगा रहता है कि कहीं वह भी बेईमान न हो जाए। मैं इतना परेशान रहता हूँ कि मेरा ब्लडप्रेशर बढ़ गया है। ईमानदारी तो कहीं रही नहीं। हम अपनी गाढ़ी कमाई कहाँ रखें? अब सरकार हमारी कमाई को मान्यता दे रही है। अब एक एक को समझ लूँगा।’

वातावरण बिगड़ते देख तीरथ प्रसाद जी ने लपक कर फिर से माइक थाम लिया। बोले, ‘भाइयो, आज का दिन गिलों शिकवों का नहीं है। आज का दिन तो खुशी और आभार प्रदर्शन का है। आज से हम समाज में गर्व से सिर उठाकर चल सकते हैं। आज हम यहाँ शपथ लें कि हम तन, मन और धन से देश के उत्थान में समर्पित हो जाएंगे। आज इस मंच से हम देश और प्रदेश की सरकारों से अनुरोध करते हैं कि विकास और वित्त के सभी महत्वपूर्ण मामलों में हमारी राय ली जाए। हमारे पास इन विषयों के विशेषज्ञ मौजूद हैं। बस मौका मिलने की देर है।’

इसके बाद सभी ने छाती पर हाथ रखकर शपथ ली कि वे पूरी ईमानदारी से देश की बहबूदी और समृद्धि में लग जाएंगे और तब तक चैन से नहीं बैठेंगे जब तक हमारा देश विकास के शिखर पर स्थापित न हो जाए।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 92 ☆ जागरण ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 92 ☆ जागरण ☆

माँ, सुबह के कामकाज करते हुए अपने मीठे सुर में एक भजन गाती थीं, “उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो जागत है सो पावत है, जो सोवत है सो खोवत है।”

बरसों से माँ का यह स्वर कानों में बसा है। माँ अब भी गाती हैं। अब कुछ शरीर साथ नहीं देता, कुछ भूल गईं तो समय के साथ कुछ भजन भी बदल गये।

यह बदलाव केवल भजन में नहीं हम सबकी जीवनशैली में भी हुआ है। अब 24×7 का ज़माना है। तीन शिफ्टों में काम करती अधिकतम दोहन की व्यवस्था है। रैन और नींद का समीकरण चरमरा गया है। ‘किचन’ में ज़बरिया तब्दील किया जा चुका चौका है, चौके के नियम-कानूनों की धज्जियाँ उड़ी पड़ी हैं। आधी रात को माइक्रोवेव के ऑन-ऑफ होने और फ्रिज के खुलते-बंद होते दरवाज़े की आवाज़े हैं। टीवी की स्क्रिन में धँसी आँखें प्लेट में रखा फास्ट फूड अनुमान से तलाश कर मुँह में ठूँस रही हैं।

हमने सब ध्वस्त कर दिया है। प्रकृति के साथ, प्राकृतिक शैली के साथ भारी उलट-पुलट कर दिया है। भोजन की पौष्टिकता और उसके पाचन में सूर्यप्रकाश व उष्मा की भूमिका हम बिसर चुके। मुँह अँधेरे दिशा-मैदान की आवश्यकता अनुभव करना अब किवदंती हो चुका। अब ऑफिस निकलने से पहले समकालीन महारोग कब्ज़ियत से किंचित छुटकारा पाने की तिकड़में हैं।

देर तक सोना अब रिवाज़ है। बुजुर्ग माँ-बाप जल्दी उठकर दैनिक काम निपटा रहे हैं। बेटे-बहू के कमरे का दरवाज़ा खुलने में पहला पहर लगभग निपट ही जाता है। ‘हाई प्रोफाइल’ के मारों  के लिए तो शनिवार और रविवार ‘रिज़र्व्ड टू स्लिप’ ही है। बिना लांघा रोज होता सूर्योदय देखने से वंचित शहरी वयस्क नागरिकों की संख्या नए कीर्तिमान बना रही है।

कबीरदास जी ने लिखा है-

कबीर सुता क्या करे, जागिन जपे मुरारि

इक दिन तू भी सोवेगा, लम्बे पाँव पसारि।

लम्बे पाँव पसार कर सोने की बेला से पहले हम उठ जाएँ तो बहुत है।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 48 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

☆ Anonymous Litterateur of Social Media # 48 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 48) ☆ 

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

☆ English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 48☆

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

हुजूर, दोस्ती में कहाँ

कोई उसूल होता  है

जो  जैसा  है  वैसे

ही  कुबूल  होता  है..!

 

When does friendship

 follow any principle

Friends  are  always

accepted as they are!

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

कब धूप चली, कब शाम ढली

किस  को  ख़बर  है…

इक उम्र से मैं अपने ही

साये  में  खड़ा  हूँ…

 

Who knows if it was sunshine

or when would Sun set in,

I’ve just been standing in my

own  shadow  since  ages..!

  ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

खाक उड़ती है रात भर मुझ में

कौन फिरता है दर-ब-दर मुझ में,

मुझको खुद में जगह नहीं मिलती,

तू  है मौजूद इस  कदर  मुझ में…!

 

Dust blows into me 

through out the night

Who is that always

wanders around in me…

 

I do not find a place

for myself in me…

You are filled in me

to  such  an  extent…!

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

फिर मेरे हिस्से में आएगा

समझौता  कोई…

आज फिर कोई कह रहा था

समझदार  हो  तुम…

 

Yet again a compromise

will be coming in  my share…

Today again someone was

saying you are intelligent…

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 49 ☆ सरस्वती वंदना अलंकार युक्त ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताeह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी  द्वारा रचित  एक रचना   ‘सरस्वती वंदना अलंकार युक्त। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 49 ☆ 

☆ सरस्वती वंदना अलंकार युक्त ☆

*

वाग्देवि वागीश्वरी, वरदा वर दे विज्ञ

– वृत्यानुप्रास  (आवृत्ति व्)

कोकिल कंठी स्वर सजे, गीत गा सके अज्ञ

-छेकानुप्रास (आवृत्ति क, स, ग)

*

नित सूरज  दैदीप्य हो, करता तव वंदन

– श्रुत्यनुप्रास (आवृत्ति दंतव्य न स द त)

ऊषा गाती-लुभाती, करती अभिनंदन

– अन्त्यानुप्रास (गाती-भाती) 

*

शुभदा सुखदा शांतिदा, कर मैया उपकार

– वैणसगाई (श, क) 

हंसवाहिनी हो सदा, हँसकर हंससवार

– लाटानुप्रास (हंस)

*

बार-बार हम सर नवा, करते जय-जयकार

– पुनरुक्तिप्रकाश (बार, जय)

जल से कर अभिषेक नत, नयन बहे जलधार

– यमक (जल = पानी, आँसू)

*

मैया! नृप बनिया नहीं, खुश होते बिन भाव

– श्लेष (भाव = भक्ति, खुशामद, कीमत)

रमा-उमा विधि पूछतीं, हरि-शिव से न निभाव? 

– वक्रोक्ति (विधि = तरीका, ब्रह्मा)  

*

कनक सुवर्ण सुसज्ज माँ, नतशिर करूँ प्रणाम 

– पुनरुक्तवदाभास (कनक = सोना, सुवर्ण = अच्छे वर्णवाली)

मीनाक्षी! कमलांगिनी, शारद शारद नाम

– उपमा (मीनाक्षी! कमलांगिनी), – अनन्वय (शारद)

*

सुमन सुमन मुख-चंद्र तव, मानो ‘सलिल’ चकोर 

– रूपक (मुख-चंद्र), उत्प्रेक्षा (मान लेना)

शारद रमा-उमा सदृश, रहें दयालु विभोर 

– व्यतिरेक (उपमेय को उपमान से अधिक बताया जाए)

*

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 81 ☆ लोकगीत – मरल बेचारा गांव …. ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”


(आज  “साप्ताहिक स्तम्भ -आत्मानंद  साहित्य “ में प्रस्तुत है  श्री सूबेदार पाण्डेय जी की  एक भावपूर्ण रचना  “मरल बेचारा गांव….। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 81 ☆ लोकगीत – लोकगीत – मरल बेचारा गांव…. ☆

घरे के उजरल ओर बड़ेर,

सगरो उजरल गाॅव।

दुअरा के कुलि पेड़ कटि गयल,

ना बचल दुआरें छांव।

खतम हो गइल  पोखर ताल ,

सूखि गइल कुअंना गांवे कै‌।

खतम भयल पनघट राधा के,

बांसुरी मौन भईल मोहन के।।१।।

 

कउआ गांवै छोडि परइलै ,

गोरिया के सगुन बिचारी के।

सुन्न हो गयल पितर पक्ख,

आवा काग पुकारी के।

झुरा गइल तुलसी कै बिरवा,

अंगना दुअरा के बुहारी के।

लोक परंपरा लुप्त भईल ,

एकर दुख धनिया बनवारी के।।२।।

 

बाग बगइचा कुलि कटि गइलै,

आल्हा कजरी बिला गयल।

चिरई चहकब खतम भयल,

झुरमुट बंसवारी कै उजरि गयल।

नाहीं बा घिसुआ कै मड़ई,

नाहीं रहल अलाव।

अब नांहीं गांवन में गलियां,

नाहीं रहल ऊ गांव।।३।।

 

अब नांही बा हुक्का-पानी,

ना गांवन में लोग।

जब से छोरियां गइल सहर में,

ली आइल बा प्रेम का रोग।

जब से गगरी बनल सुराही,

शहर चलल गांवों की ओर।

लोक धुनें सब खतम भइल,

खाली डी जे कै रहि गयल शोर।

अब गावें से खतम भयल बा,

गुड़ शर्बत औ पानी।

अब ठेला पर बिकात हौ,

थम्स अप कोका बोतल में पानी।।४।।

 

जब-जब सूरू भइल गांवे में,

आधुनिक दिखै के अंधी रेस।

गांव में गोधना मजनूं बनि के,

धइले बा जोकर कै भेष ।

जवने दिन शहर गांव में आइल,

उजरि गइल ममता कै छांव।

सब कुछ खतम भयल गांवें से,

मरल बेचारा प्यारा गांव।।५।।

 

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈