हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 5 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 5 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

पवेलियन आन व्हील

महत्वपूर्ण बातें तो कई लोग करते हैं , किताबें तथा मीडिया पर बड़ी बातों पर खूब सी सामग्री सहजता से मिल जाती है, इसलिए मैं उन छोटी और इग्नोर्ड विषयों पर चर्चा कर रहा हूं जो हम देखकर भी अनदेखा कर देते हैं। ऐसे अनेक छोटे छोटे मुद्दे हैं जो सुविधाओ तथा दूरियों के चलते भारत से भिन्नता रखते हैं, और उन्हें जानने समझने में आपकी रुचि हो सकती है। ऐसा ही एक विषय है खेलों में आम आदमी की अभिरुचि ।

सुबह घूमते हुए मैने देखा की आवासीय परिसर में ही सड़क किनारे बास्केट बाल का चेन लिंक से घिरा पक्का ग्राउंड भर नहीं है , पर्याप्त दर्शको के लिए एल्यूमिनियम का पवेलियन आन व्हील भी बनाया गया है। फोल्डिंग, फटाफट फिट स्टेडियम, इस प्रकार के चके पर चलते स्टेडियम अपने भारत में मेरे देखने में नहीं आए । इससे पता चलता है की खेलने वाले भी हैं, और उन्हें बकअप कर उत्साह बढ़ाने वाले भी हैं। समाज में व्याप्त यह जज्बा ही अंतराष्ट्रीय स्तर पर मेडल टेली में देश को ऊपर लाता है ।

हमारे देश के वर्तमान हालात के महज चंद खिलाड़ियों के विभिन्न खेलों के कैंप, टीम तो बना सकते हैं पर प्रत्येक खेल में क्रिकेट की तरह का जज्बा तभी पैदा हो सकता है जब सामाजिक प्रवृत्ति खेलने , खेलो में हिस्सेदारी की बने । यह हिस्सेदारी दर्शक की भूमिका से आयोजक प्रायोजक तक गांव शहर मोहल्लों में बने । इसके लिए ऐसे सहज पेवेलियन आन व्हील्स और मैदानो के इंफ्रा स्ट्रक्चर की आवश्यकता से आप भी सहमत होंगे।

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




सूचनाएँ/Information ☆ स्व. शंकरराव कानिटकर हिंदी विभागीय ग्रंथालय हेतु 2000 पुस्तकों का संकलन – हिंदी विभाग, मॉडर्न महाविद्यालय (स्वायत्त), पुणे ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ स्व. शंकरराव कानिटकर हिंदी विभागीय ग्रंथालय हेतु 2000 पुस्तकों का संकलन – हिंदी विभाग, मॉडर्न महाविद्यालय (स्वायत्त), पुणे ☆ 

🌸 हिंदी विभाग द्वारा आयोजित कृतज्ञता ज्ञापन समारोह 🌸

दिनांक 28 सितंबर 2022 को हिंदी विभाग, मॉडर्न महाविद्यालय, पुणे 05 की ओर से कृतज्ञता ज्ञापन समारोह संपन्न हुआ ।  

हिंदी विभाग, महाविद्यालय में स्व. शंकरराव कानिटकर हिंदी विभागीय ग्रंथालय का निर्माण कर रहा है । इस हेतु हिंदी विभाग को सर्वप्रथम 300 पुस्तकें देकर प्रोफेसर जया परांजपे जी ने नींव रखी और बाद में हिंदी के अनेक लेखक, कवि, प्राध्यापकों ने पुस्तकें प्रदान की और प्रसन्नता है कि हिंदी विभाग, मॉडर्न महाविद्यालय (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे 05 ने अब 2000 पुस्तकों का संकलन पूरा किया है ।  डॉ. प्रेरणा उबाळे और हिंदी विभाग द्वारा किए गए ग्रंथालय निर्माण के उपक्रम की हिंदी जगत के विभिन्न विद्वानों से प्रशंसा हो रही है ।  

हिंदी विभागीय ग्रंथालय निर्माण हेतु इसके पूर्व डॉ. संतोष कालिया, डॉ. सुनील देवधर, डॉ. स्मिता दाते, डॉ. वासंती वैद्य, प्रा. सदानंद महाजन आदि हिंदी लेखक- कवि, प्राध्यापकों ने अपने संचय की महत्वपूर्ण पुस्तकें देकर सहयोग दिया है ।  

दिनांक 28 सितंबर के कृतज्ञता ज्ञापन कार्यक्रम में प्रोफेसर कांतिदेवी लोधी, पूर्व हिंदी विभागाध्यक्ष, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे, डॉ. शहाबुद्दीन शेख, प्राचार्य, लोकसेवा महाविद्यालय, औरंगाबाद, प्राचार्य न्यू आर्टस्, कॉमर्स कॉलेज, अहमदनगर, डॉ. गोरख थोरात, हिंदी विभागाध्यक्ष, स. प. महाविद्यालय, पुणे, डॉ. रमेश गुप्ता ‘मिलन’, वरिष्ठ हिंदी लेखक, कवि, कहानीकार, पुणे और श्री. शरददेंदु शुक्ला, वरिष्ठ हिंदी हास्य व्यंग्यकार, कवि , पुणे जी ने मिलकर 300 से अधिक हिंदी पुस्तकें और पत्रिकाएँ भेंट कीं , ये सभी महानुभाव उपस्थित रहें ।  

कार्यक्रम की प्रस्तावना डॉ. प्रेरणा उबाळे ने प्रस्तुत कर सभी अतिथियों का स्वागत किया ।  सभी विद्वानों का सम्मान मॉडर्न महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव सर के करकमलों से किया गया ।  सभी मान्यवर हिंदी के सुप्रतिष्ठित लेखक, कवि, अनुवादक, समीक्षक हैं और मॉडर्न महाविद्यालय के प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव सर की भी कविता का पाठ हुआ ।  प्राचार्य डॉ. झुंजारराव जी ने हिंदी विभागाध्यक्ष डॉ . प्रेरणा उबाळे के ग्रंथालय निर्माण हेतु अथक परिश्रम की सराहना की । साथ ही हिंदी विभाग द्वारा आयोजित कार्यक्रमों की प्रशंसा की और अपनी ओर से शुभकामनाएं प्रदान की ।  

हिंदी विभाग में ग्रंथालय की स्थापना में सहायता करनेवाले प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव सर तथा मॉडर्न महाविद्यालय और प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी के प्रति कृतज्ञता का भाव अभिव्यक्त करते हुए प्राचार्य महोदय का सम्मान हिंदी विभागाध्यक्ष डॉ. प्रेरणा उबाळे ने किया ।  

हिंदी विभाग द्वारा आयोजित इस कृतज्ञता ज्ञापन समारोह का आयोजन हिंदी विभागाध्यक्ष डॉ. प्रेरणा उबाळे ने किया और प्रस्तुत कार्यक्रम के आयोजन में हिंदी विभाग के प्रा. असीर मुलाणी एवं  प्रा. संतोष तांबे जी ने सहायता की ।

  –  साभार – डॉ. प्रेरणा उबाळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय 




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

गंगाधर देवराव खानोलकर

गंगाधर देवराव खानोलकर  (19 ऑगस्ट 1903 – 30 सप्टेंबर 1992) हे लेखक, चरित्रकार व पत्रकार होते.

त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खानोली गावात झाला.

खानोलकरांचे वडील ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारे आणि आई स्वाभिमानी, स्वावलंबी व त्यागी होती. त्यांचे दृढ संस्कार खानोलकरांवर झाले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम घरीच, नंतर सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसले नाहीत.

यानंतर खानोलकर रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतमध्ये  वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाले.तेथे त्यांना थोर विद्वानांचे व रवींद्रनाथांचेही मार्गदर्शन लाभले. भरपूर वाचन, चिंतन, मनन वगैरे शैक्षणिक संस्कार त्यांना आयुष्यभर साहित्यसेवेची प्रेरणा देत राहिले.

त्यानंतर अंमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी दोन वर्षे तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.

काही काळ त्यांनी तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात अध्यापन केले.

पुढे ते मुंबईत ‘लोकहित’, ‘विविधवृत्त’, ‘प्रगती’, ‘रणगर्जना साप्ताहिक’, ‘वैनतेय साप्ताहिक’ इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले.

खानोलकरांनी एकूण 22ग्रंथ लिहिले. अर्वाचीन वाङ्मय (खंड 1 ते 9), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र,के. बी.ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथांचा त्यात समावेश होतो.

स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय (खंड 1-21), पुणे शहराचे वर्णन, कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह, धनंजय कीर :व्यक्ती आणि चरित्रकार, सोन्याचे दिवस :बा. ग. ढवळे स्मृतिग्रंथ इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, आपलं महानगर, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई धावत ये … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आई धावत ये … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

!!  श्री  !!

तूची माता तूची त्राता | देवी अंबाबाई |

तुझ्या दर्शना आलो आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

तुझी ओढ मना अनिवार | दर्शनासी झालो अधीर |

ऐकुनी माझी ही साद | आई सत्वरी दे प्रतिसाद |

सर्व समर्पित तुझ्या ठायी | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

हाके सरसी धावत येसी | भक्तवत्सले अंबाबाई |

लेकरांसी दुखवीत नाही |अगाध माया तुझी ग आई|

किती तुला मी विनवू आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

संकटांचा पडला घाला | जीव किती हा घाबरला |

दुःखविमोचिनी तू गे आई | तुझ्याविना जगी त्राता नाही |

एकची आस उरली | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही || 

☆ 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #144 ☆ नवविधा भक्ती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 144 – विजय साहित्य ?

☆ नवविधा भक्ती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चराचरी सर्वव्यापी, आदिमाया आदिशक्ती

नवदुर्गा नऊरुपे, करूं नवविधा भक्ती. ॥धृ॥

गुण संकीर्तन करू, नाम तुझे आई घेऊ

करू लिलया श्रवण, अंतरात भक्ती ठेऊ.

करूं श्रवण कीर्तन, दूर ठेवोनी आसक्ती…..॥१॥

करूं स्मरण अंबेचे, माय भवानी वंदन

दोन कर ,एक शिर,भाळी भक्तीचे चंदन

आदिशक्ती चरणांत, मिळे भवताप मुक्ती….॥२॥

सत्य, प्रेम ,आनंदाने,करू पाद संवाहन

आई माझी मी आईचा, प्रेममयी आचरण

परापूजा, मूर्तीपूजा, पूजार्चर्नी वाहू भक्ती….॥३॥

शब्द कवड्यांची माळ, दास्य भक्ती स्विकारली

आदिमाया आदिशक्ती, मनोमनी सामावली

नवरात्री उपासना, मनी धरोनी विरक्ती….॥४॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.

या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर  1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

? जीवनरंग ?

☆  अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆ 

काल सकाळपासून सारखं गरगरल्यासारखंच वाटत होतं. दररोज पहाटे साडेचार-पाचला उठणारी मी, आज साडेसहा वाजले तरी अंथरुणातून हलले नव्हते. नवीनला त्याच्या मोबाईलवर गजर झाल्याने जाग आली. तो उठल्यानंतर त्याला मी उठले नाही याचे प्रथम आश्चर्य वाटले. पण कदाचित रात्री लवकर झोप लागली नसेल म्हणून…

थोडावेळ ऑफिसचं काम करु असा विचार करत त्याने काम सुरू केले. त्या कामात त्याचा बराच वेळ गेला. काम थोडं राहिलं होतं पण सहज त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो उडालाच. 

सात वाजले होते. राजूची व्हॅन साडेसातपर्यंत येईल. त्याला उठवून तयार करायला तर हवेच. पण सोबत त्याचा डबा होणंही तितकच महत्वाचं. आज त्याच्याही ऑफिसमध्ये महत्वाच्या विषयावर मिटिंग असल्यामुळे तोही आठ- सव्वाआठला घरातून निघणार होता. नवीनच्या आई-बाबांचा नाष्टाही आठ- साडेआठला होई.

त्याने झटकन मला जोरजोरात हलवत उठवले आणि तो लॅपटॉपवर ऑफिसचे काम करायला बसला. मी कशीबशी धडपडत उठले आणि  राजूला उठवले. तो दररोज उठण्यापासून ते व्हॅनमध्ये बसून शाळेला जाईपर्यंत त्रास  देतच असे.

एवढयात सासूबाईंचा आवाज माझ्या कानी पडलाच.— “आज स्वयंपाकघर अजूनही थंडच कसे काय? मालकिण बाईंनी संप पुकारला की काय? 

“राजूही ” उशिर झाला शाळेला की बाई रागावतात ” म्हणून चिडचिड करू लागला. 

मला आता किती पळू आणि किती नको असं झालं होतं. पण त्यापूर्वी आपल्याला कुणीतरी मायेनं कपाळावर हात फिरवत, गरमागरम चहाचा वाफाळता कप आयता दिला तर… ‘ शरयू, काय होतंय तुला. त्रास होतोय का? ‘ असं विचारलं तर ताप कमी नाही होणार पण मानसिक बळ मिळून कामाचा उत्साह वाढेल.

गेल्या चार दिवसापासून जरा अंग दुखतच होते. कालपासून अंगावर काटे उभारत होते. मध्येच शहारल्यासारखे वाटत होते. मी घरात सांगावं असा विचार केला पण सांगून तरी उपयोग काय? शेवटी काम हे मलाच करावे लागणार होते. 

मी स्वतःच मेडिकलमधून तापावरची गोळी घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच, कारण आज सकाळी उठल्यावर पुन्हा अंगात ताप असल्यासारखे वाटत होते. कणकणही जाणवत होती. 

मी तसे नवीनला सांगितलं. पण त्याने ऐकून अगदी सहजतेने घेतलं. “अगं असं निवांत रहाण्यापेक्षा तू कालच दवाखान्यात दाखवायचं नाही का?” म्हणून तर ओरडलाच पण सोबत “आता या सगळ्यांच्या जेवणाचं काय? ” म्हणूनही नाराज झाला.     

राजूही कावळ्यासारखी आंघोळ उरकून आला. ” आज माझ्या शाळेत मेथीचे पराठे आणायला सांगितले ” म्हणून हट्ट धरून बसला. तसं तर ही गोष्ट त्याने कालच सांगायला हवी होती. मला ताप असल्याने मी त्याच्या अभ्यासाची, उपक्रमाची चौकशी केली नाही. 

तसं तर मला त्याच्या शाळेत पालक मिटिंगसाठी जायचंच होतं. पण ही मिटिंग शाळा सुटल्यानंतर अर्ध्या तासाने होती. म्हणून तर मुलांची शाळा एक-दीड तास आधीच सुटणार होती. पण डबा झाला नाही म्हणजे जेवणाच्या सुट्टीपूर्वी मलाच डबा द्यायला जावे लागणार होतं. 

मी कसंबस माझं उरकलं आणि झटपट स्वयंपाक सुरु केला. आज कामाशी गाठ घालणं महत्वाचंच होतं. नाष्टा आणि साग्रसंगीत स्वयंपाक करायला वेळच नव्हता. 

जेवणाचे केलेले पदार्थ पाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला अवघडल्यासारखं झालं. त्यांची नजर जणू मला भेदून आरपार जाईल असं वाटत होतं. तरीही त्या बडबडल्याच, “आमच्या वेळी असे नव्हते बाई, आजकालच्या पोरींना त्रास म्हणून नको. सगळं हाताशी आहे यांच्या. तरीही कामात उरक म्हणून नाही, सगळ्या कामाला हाताशी यंत्र असून सुद्धा कशानी दुखणं येतं कुणाला माहित.”

खरंतर मला काय झालं आहे. हे कुणीही जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. कमीत कमी अंगाला हात लावून ‘ताप आलाय का?’ किंवा ‘काय होतंय’ म्हणून चौकशी तरी करावी, एवढी साधी अपेक्षा माझी. 

मी सगळ्यांसाठी जमेल आणि शक्य असेल तितकं करत रहाते. सासू-सासऱ्यांची आजारपणं, येणारे जाणारे, पै पाहुणे आणि लेकराचं आजारपण, वेगवेगळे क्लास, एवढं सारं पाहायचं म्हणजे खूपच काम. पण तसं घरातल्यांना वाटतच नव्हते. 

यांची आत्येबहीण कंपनीत नोकरीला आहे. काय तिचा थाट पहायचा. धुणं, भांडी, फरशी, चपात्या, सर्व कामासाठी बाई होती. काही म्हणलं तर… ‘ बरोबरच आहे तिचं. ती पगार मिळवते ना ! मग तिला कामाला बाई ठेवावीच लागणार. बिचारी किती धावपळ करते.’ 

घरामध्ये येणारी जाणारी माणसं ही तिच्याकडे जास्त वेळ थांबत नसत. थांबली तरी आपला तिला त्रास होवू नये याची काळजी घेत. तिच्या कामात मदत करत. तिचं भरभरुन कौतुक करत.   

आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती. ‘ काय काम असतं घरात बसून? दीड-दोन तासात सर्व काम उरकले की झालं. दिवसभर आरामच आराम.’ पण घरात बसून जी काम करते त्याचा मोल भाव केला तर?

आज मीही ठरवलंच. खूप काही नाही. पण मीही स्वतःसाठी जगणार आहे. या महिन्यापासून घरात बसून गृहोद्योग सुरू करणार, पण त्यापूर्वी कुणी जरी नाही विचारले तरी स्वतःसाठी दवाखान्यात जाऊन येणार. पुर्ण आराम करणार. ‘आज संध्याकाळ आणि उद्या सकाळपर्यंत स्वयंपाक घर बंद ‘ अशी घोषणा करणार. 

घरात बसणारी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी असो.्, शेवटी ती गृहिणीच असते. बाहेर पडणारी स्त्री काही मदत न स्वीकारता काम करतेही, पण त्यामुळे ती थकून जाते. उलट घरात असणारी स्त्री ‘ सर्व कामं मीच करणार ‘ या अट्टाहासाने ती थकून जाते.

शेवटी काय? कुठेतरी स्व अस्तित्वाची जाणीव महत्वाची. आपलं मूल्य आपणच ठेवायला हवं ना ! सर्व क्षेत्र व्यापणाऱ्या स्त्रीला पाठिंबा देणारी प्रथम स्त्रीच असते.

लेखिका :  सौ. आशा पाटील, पंढरपूर.

मो. 9422433686

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुलगी…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ मुलगी… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.

एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. 

वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान चालीसा… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान चालीसा☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या. 

कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.

गोष्ट इ.स. १६०० ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.

एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की “ हा तुलसीदास कोण आहे?”

तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, “ त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.” 

अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि “ मलाही त्यांना भेटायचे आहे,” असे सांगितले.

सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की ‘ तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.’  हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, “ मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?” त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले. आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तरी बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला. पण अकबराला ते मान्य नव्हते, आणि तुळसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.

तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की “ तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करुन घ्या .”

तुलसीदासजी म्हणाले-“ मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.”

हे ऐकून अकबर संतापला. आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.

लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले,” बिरबल काय चालले आहे?”

तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते. पण तुम्ही सहमत झाला नाहीत. आणि आता करिश्मा बघायचा असेल तर बघा.”

अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले.  आणि साखळ्या उघडल्या गेल्या.

तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की “ मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते. हे ४० –चतुर्भुज हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.”

तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, “ ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.”

अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लगेच मथुरेला पाठवले.

आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे. आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.—– म्हणूनच हनुमानजींना “संकट मोचन” असेही म्हणतात.

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. कसे ते बघा—-

१ ) चर्च मधे दिल्यास—त्याला ऑफरींग म्हणतात.

२) शाळेत दिले— तर त्याला फी म्हणतात.

३) लग्नात दिले=== तर त्याला हुंडा म्हणतात.

४) घटस्फोटात दिले— तर त्यालापोटगी म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले— तर त्याला उसने दिले म्हणतात.

६) शासनास दिले— तर त्याला कर म्हणतात.

७) न्यायालयात दिले— तर त्याला दंड म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले– तर त्याला पेन्शन म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले— तर त्याला पगार म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले— तर त्याला बोनस म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास— त्याला कर्ज म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना—त्यास हप्ता म्हणतात.

(१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास— त्याला टिप म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास— त्याला खंडणी म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास— त्याला लाच म्हणतात..

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास—त्याला भाडे म्हणतात.

१७) सामाजिक / धार्मिक कार्यास दिल्यास— त्याला देणगी म्हणतात.

(१८) देवालयास/ मंदिरास दिले—- तर नवस म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले— तर त्याला आहेर म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की —–

२०) पतीने पत्नीस पैसे दिल्यास—- त्याला काय म्हणावे ?

      अहो सोपं आहे— एवढंही माहीत नाही का ?

— त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈