मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.

या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर  1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

? जीवनरंग ?

☆  अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆ 

काल सकाळपासून सारखं गरगरल्यासारखंच वाटत होतं. दररोज पहाटे साडेचार-पाचला उठणारी मी, आज साडेसहा वाजले तरी अंथरुणातून हलले नव्हते. नवीनला त्याच्या मोबाईलवर गजर झाल्याने जाग आली. तो उठल्यानंतर त्याला मी उठले नाही याचे प्रथम आश्चर्य वाटले. पण कदाचित रात्री लवकर झोप लागली नसेल म्हणून…

थोडावेळ ऑफिसचं काम करु असा विचार करत त्याने काम सुरू केले. त्या कामात त्याचा बराच वेळ गेला. काम थोडं राहिलं होतं पण सहज त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो उडालाच. 

सात वाजले होते. राजूची व्हॅन साडेसातपर्यंत येईल. त्याला उठवून तयार करायला तर हवेच. पण सोबत त्याचा डबा होणंही तितकच महत्वाचं. आज त्याच्याही ऑफिसमध्ये महत्वाच्या विषयावर मिटिंग असल्यामुळे तोही आठ- सव्वाआठला घरातून निघणार होता. नवीनच्या आई-बाबांचा नाष्टाही आठ- साडेआठला होई.

त्याने झटकन मला जोरजोरात हलवत उठवले आणि तो लॅपटॉपवर ऑफिसचे काम करायला बसला. मी कशीबशी धडपडत उठले आणि  राजूला उठवले. तो दररोज उठण्यापासून ते व्हॅनमध्ये बसून शाळेला जाईपर्यंत त्रास  देतच असे.

एवढयात सासूबाईंचा आवाज माझ्या कानी पडलाच.— “आज स्वयंपाकघर अजूनही थंडच कसे काय? मालकिण बाईंनी संप पुकारला की काय? 

“राजूही ” उशिर झाला शाळेला की बाई रागावतात ” म्हणून चिडचिड करू लागला. 

मला आता किती पळू आणि किती नको असं झालं होतं. पण त्यापूर्वी आपल्याला कुणीतरी मायेनं कपाळावर हात फिरवत, गरमागरम चहाचा वाफाळता कप आयता दिला तर… ‘ शरयू, काय होतंय तुला. त्रास होतोय का? ‘ असं विचारलं तर ताप कमी नाही होणार पण मानसिक बळ मिळून कामाचा उत्साह वाढेल.

गेल्या चार दिवसापासून जरा अंग दुखतच होते. कालपासून अंगावर काटे उभारत होते. मध्येच शहारल्यासारखे वाटत होते. मी घरात सांगावं असा विचार केला पण सांगून तरी उपयोग काय? शेवटी काम हे मलाच करावे लागणार होते. 

मी स्वतःच मेडिकलमधून तापावरची गोळी घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच, कारण आज सकाळी उठल्यावर पुन्हा अंगात ताप असल्यासारखे वाटत होते. कणकणही जाणवत होती. 

मी तसे नवीनला सांगितलं. पण त्याने ऐकून अगदी सहजतेने घेतलं. “अगं असं निवांत रहाण्यापेक्षा तू कालच दवाखान्यात दाखवायचं नाही का?” म्हणून तर ओरडलाच पण सोबत “आता या सगळ्यांच्या जेवणाचं काय? ” म्हणूनही नाराज झाला.     

राजूही कावळ्यासारखी आंघोळ उरकून आला. ” आज माझ्या शाळेत मेथीचे पराठे आणायला सांगितले ” म्हणून हट्ट धरून बसला. तसं तर ही गोष्ट त्याने कालच सांगायला हवी होती. मला ताप असल्याने मी त्याच्या अभ्यासाची, उपक्रमाची चौकशी केली नाही. 

तसं तर मला त्याच्या शाळेत पालक मिटिंगसाठी जायचंच होतं. पण ही मिटिंग शाळा सुटल्यानंतर अर्ध्या तासाने होती. म्हणून तर मुलांची शाळा एक-दीड तास आधीच सुटणार होती. पण डबा झाला नाही म्हणजे जेवणाच्या सुट्टीपूर्वी मलाच डबा द्यायला जावे लागणार होतं. 

मी कसंबस माझं उरकलं आणि झटपट स्वयंपाक सुरु केला. आज कामाशी गाठ घालणं महत्वाचंच होतं. नाष्टा आणि साग्रसंगीत स्वयंपाक करायला वेळच नव्हता. 

जेवणाचे केलेले पदार्थ पाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला अवघडल्यासारखं झालं. त्यांची नजर जणू मला भेदून आरपार जाईल असं वाटत होतं. तरीही त्या बडबडल्याच, “आमच्या वेळी असे नव्हते बाई, आजकालच्या पोरींना त्रास म्हणून नको. सगळं हाताशी आहे यांच्या. तरीही कामात उरक म्हणून नाही, सगळ्या कामाला हाताशी यंत्र असून सुद्धा कशानी दुखणं येतं कुणाला माहित.”

खरंतर मला काय झालं आहे. हे कुणीही जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. कमीत कमी अंगाला हात लावून ‘ताप आलाय का?’ किंवा ‘काय होतंय’ म्हणून चौकशी तरी करावी, एवढी साधी अपेक्षा माझी. 

मी सगळ्यांसाठी जमेल आणि शक्य असेल तितकं करत रहाते. सासू-सासऱ्यांची आजारपणं, येणारे जाणारे, पै पाहुणे आणि लेकराचं आजारपण, वेगवेगळे क्लास, एवढं सारं पाहायचं म्हणजे खूपच काम. पण तसं घरातल्यांना वाटतच नव्हते. 

यांची आत्येबहीण कंपनीत नोकरीला आहे. काय तिचा थाट पहायचा. धुणं, भांडी, फरशी, चपात्या, सर्व कामासाठी बाई होती. काही म्हणलं तर… ‘ बरोबरच आहे तिचं. ती पगार मिळवते ना ! मग तिला कामाला बाई ठेवावीच लागणार. बिचारी किती धावपळ करते.’ 

घरामध्ये येणारी जाणारी माणसं ही तिच्याकडे जास्त वेळ थांबत नसत. थांबली तरी आपला तिला त्रास होवू नये याची काळजी घेत. तिच्या कामात मदत करत. तिचं भरभरुन कौतुक करत.   

आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती. ‘ काय काम असतं घरात बसून? दीड-दोन तासात सर्व काम उरकले की झालं. दिवसभर आरामच आराम.’ पण घरात बसून जी काम करते त्याचा मोल भाव केला तर?

आज मीही ठरवलंच. खूप काही नाही. पण मीही स्वतःसाठी जगणार आहे. या महिन्यापासून घरात बसून गृहोद्योग सुरू करणार, पण त्यापूर्वी कुणी जरी नाही विचारले तरी स्वतःसाठी दवाखान्यात जाऊन येणार. पुर्ण आराम करणार. ‘आज संध्याकाळ आणि उद्या सकाळपर्यंत स्वयंपाक घर बंद ‘ अशी घोषणा करणार. 

घरात बसणारी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी असो.्, शेवटी ती गृहिणीच असते. बाहेर पडणारी स्त्री काही मदत न स्वीकारता काम करतेही, पण त्यामुळे ती थकून जाते. उलट घरात असणारी स्त्री ‘ सर्व कामं मीच करणार ‘ या अट्टाहासाने ती थकून जाते.

शेवटी काय? कुठेतरी स्व अस्तित्वाची जाणीव महत्वाची. आपलं मूल्य आपणच ठेवायला हवं ना ! सर्व क्षेत्र व्यापणाऱ्या स्त्रीला पाठिंबा देणारी प्रथम स्त्रीच असते.

लेखिका :  सौ. आशा पाटील, पंढरपूर.

मो. 9422433686

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुलगी…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ मुलगी… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.

एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. 

वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान चालीसा… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान चालीसा☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या. 

कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.

गोष्ट इ.स. १६०० ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.

एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की “ हा तुलसीदास कोण आहे?”

तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, “ त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.” 

अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि “ मलाही त्यांना भेटायचे आहे,” असे सांगितले.

सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की ‘ तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.’  हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, “ मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?” त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले. आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तरी बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला. पण अकबराला ते मान्य नव्हते, आणि तुळसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.

तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की “ तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करुन घ्या .”

तुलसीदासजी म्हणाले-“ मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.”

हे ऐकून अकबर संतापला. आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.

लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले,” बिरबल काय चालले आहे?”

तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते. पण तुम्ही सहमत झाला नाहीत. आणि आता करिश्मा बघायचा असेल तर बघा.”

अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले.  आणि साखळ्या उघडल्या गेल्या.

तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की “ मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते. हे ४० –चतुर्भुज हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.”

तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, “ ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.”

अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लगेच मथुरेला पाठवले.

आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे. आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.—– म्हणूनच हनुमानजींना “संकट मोचन” असेही म्हणतात.

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. कसे ते बघा—-

१ ) चर्च मधे दिल्यास—त्याला ऑफरींग म्हणतात.

२) शाळेत दिले— तर त्याला फी म्हणतात.

३) लग्नात दिले=== तर त्याला हुंडा म्हणतात.

४) घटस्फोटात दिले— तर त्यालापोटगी म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले— तर त्याला उसने दिले म्हणतात.

६) शासनास दिले— तर त्याला कर म्हणतात.

७) न्यायालयात दिले— तर त्याला दंड म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले– तर त्याला पेन्शन म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले— तर त्याला पगार म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले— तर त्याला बोनस म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास— त्याला कर्ज म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना—त्यास हप्ता म्हणतात.

(१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास— त्याला टिप म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास— त्याला खंडणी म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास— त्याला लाच म्हणतात..

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास—त्याला भाडे म्हणतात.

१७) सामाजिक / धार्मिक कार्यास दिल्यास— त्याला देणगी म्हणतात.

(१८) देवालयास/ मंदिरास दिले—- तर नवस म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले— तर त्याला आहेर म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की —–

२०) पतीने पत्नीस पैसे दिल्यास—- त्याला काय म्हणावे ?

      अहो सोपं आहे— एवढंही माहीत नाही का ?

— त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “जो कुछ याद रहा (आत्मकथात्मक संस्मरण)” – शराफत अली खान ☆ श्री कमलेश भारतीय☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ पुस्तक चर्चा ☆ “जो कुछ याद रहा (आत्मकथात्मक संस्मरण)” – शराफत अली खान ☆ श्री कमलेश भारतीय ☆

जो कुछ याद रहा (आत्मकथात्मक संस्मरण) 

लेखक : शराफत अली खान 

प्रकाशक : शुभदा प्रकाशन, नई दिल्ली

पृष्ठ १००  मूल्य २४० रु

अमेज़न लिंक  >> जो कुछ याद रहा

शराफत अली खान की ‘जो कुछ याद रहा’ – कुछ यादें , कुछ इतिहास , कुछ साहित्य…  – कमलेश भारतीय 

शराफत अली खान और हमारा रिश्ता ऐसे दोस्त का है जो कभी मिले तो नहीं लेकिन बराबर जुड़े रहे हैं और जुड़े चले आ रहे हैं । एक रिश्ता कहानी लेखन महाविद्यालय भी है । मैं और शराफत इस महाविद्यालय से भी बहुत शुरू से जुड़े हुए हैं । हालांकि इसके भी किसी लेखन शिविर में हम इकट्ठे न हो पाये । फिर भी जब इनकी किताब आई तो बहुत प्यार से मुझे भेजी और पता नहीं किस्सागोई में कितनी महारत हासिल कर ली है शराफत ने कि एकदम से मिलते ही लगभग सौ पृष्ठ में सिमटी इस किताब को पढ़ता चला गया और पूरी पढ़कर ही दम लिया ।

इसमें अपने जीवन संघर्ष , साहित्य के क, ख, ग से लेकर एक प्रतिष्ठित लेखक बनने की गाथा बयान की है । जो जो , जब जब जिस मोड़ पर जीवन में मिला, उसकी याद समेटने की कोशिश से और उससे मिले सबक भी उजागर किये हैं । आधारशिला के दिवाकर भट्ट के साथ पत्रिका शुरू करवाने वाले और फिर दिवाकर द्वारा भुला दिये जाने का दर्द उभरकर सामने आया है । जिसके संपादन में शुरूआत की, उसे ही दिवाकर ने भुला दिया ! कभी नासिरा शर्मा तो कभी असगर वजाहत को याद किया । असगर वजाहत की किताब का तो एक छोटा सा अंश भी प्रकाशित किया है ।

चूंकि वन विभाग में रहे शराफत तो शराफत से उस विभाग की बहुत सारी बातें भी आ गयी हैं । पूरा जनपद घुमा दिया है शराफत ने ! कुछ छोटी छोटी शिकायतें और अधिकारियों की मेहरबानियों की सजा !

अपनी छोटी छोटी मोहब्बतें जाहिर की हैं । सहयोगियों की छोटी छोटी चालाकियां बयान की हैं । पंजाब के लोगों में मुझे,रेणुका नैयर और गीता डोगरा को याद किया है ।

बदायूं के पुराने इतिहास को खंगाला है तो मुल्ला बदायूंनी के बारे में रोचक जानकारी दी है । अभी यह किताब और यादें बाकी हैं । जल्दी में एक प्रकार से पहला भाग दे दिया गया है लेकिन यह भाग यह बताता है कि कैसे कोई लेखक संघर्ष करके कदम अगर कदम आगे बढ़ता है और साहित्य के नक्शे में कैसे और कितना निशान छोड़ने में सफल हो पाता है ।

मित्र शराफत, बहुत बहुत बधाई ।

दूसरे भाग की इंतज़ार रहेगी ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 119 ☆ सुधारीकरण की आवश्यकता ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “सुधारीकरण की आवश्यकता। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 119 ☆

☆ सुधारीकरण की आवश्यकता ☆ 

दूसरों को सुधारने की प्रक्रिया में हम इतना खो जाते हैं कि स्वयं का मूल्यांकन नहीं कर पाते हैं। एक दूसरे से आगे बढ़ने की होड़ में गलत रास्ते पर चल देना आजकल आम बात हो गयी है। पुरानी कहावत है चौबे जी छब्बे बनने चले दुब्बे बन गए। सब कुछ अपने नियंत्रण करने की होड़ में व्यक्ति स्वयं अपने बुने जाल में फस जाता है। दो नाव की सवारी भला किसको रास आयी है। सामान्य व्यक्ति सामान्य रहता ही इसीलिए है क्योंकि वो पूरे जीवन यही तय नहीं कर पाता कि उसे क्या करना है। कभी इस गली कभी उस गली भटकते हुए बस माया मिली न राम में गुम होकर पहचान विहीन रह जाता है। हमें कोशिश करनी चाहिए कि एक ओर ध्यान केंद्रित करें। सर्वोच्च शिखर पर बैठकर हुकुम चलाने का ख्वाब देखते- देखते कब आराम कुर्सी छिन गयी पता ही नहीं चला। वो तो सारी साजिश तब समझ में आई कि ये तो खेला था मुखिया बनने की चाहत कहाँ से कहाँ तक ले जाएगी पता नहीं। अब पुनः चौबे बनना चाह रहे हैं, मजे की बात दो चौबे एक साथ कैसे रहें। किसी के नियंत्रण में रहकर आप अपना मौलिक विकास नहीं कर सकते हैं। समय- समय पर संख्या बल के दम पर मोर्चा खोल के बैठ जाने से भला पाँच साल बिताए जा सकेंगे। हर बार एक नया हंगमा। जोड़ने के लिए चल रहे हैं और  स्वयं के ही लोग टूटने को लेकर शक्तिबल दिखा रहे हैं। देखने और सुनने वालों में ही कोई बन्दरबाँट का फायदा उठा कर आगे की बागडोर सम्भाल लेगा। वैसे भी लालची व्यक्ति के पास कोई भी चीज ज्यादा देर तक नहीं टिकती तो कुर्सी कैसे बचेगी। ऐसे में चाहें जितना जोर लगा लो स्थिरता आने से रही। हिलने- डुलने वाले को कोई नहीं पूछता अब तो स्वामिभक्ति के सहारे नैया पार लगेगी। समस्या ये है कि दो लोगों की भक्ति का परीक्षण कैसे हो, जो लंबी रेस का घोड़ा होगा उसी पर दाँव लगाया जाएगा। जनता का क्या है कोई भी आए – जाए वो तो मीडिया की रिपोर्टिंग में ही अपना उज्ज्वल भविष्य देखती है। ऐसे समय में नौकरशाहों के कंधे का बोझ बढ़ जाता है व उनकी प्रतिभा, निष्ठा दोनों का मिला- जुला स्वरूप ही आगे की गाड़ी चलता है। कुल मिलाकर देश की प्रतिष्ठा बची रहे, जनमानस इसी चाहत के बलबूते सब कुछ बर्दाश्त कर रहा है।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अनुभव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना (नवरात्र साधना)

इस साधना के लिए मंत्र इस प्रकार होगा-

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

देवीमंत्र की कम से कम एक माला हर साधक करे।

अपेक्षित है कि नवरात्रि साधना में साधक हर प्रकार के व्यसन से दूर रहे, शाकाहार एवं ब्रह्मचर्य का पालन करे।

मंगल भव। 💥

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – अनुभव  ??

चुकने लगता है

गॉंठ का धन,

अर्थ का मूल्य

समझ आने लगता है,

कम होती

सॉंसों के साथ

बीते जीवन का रीतापन

समझ आने लगता है..!

© संजय भारद्वाज

( सोमवार, 13 जून 2016 सुबह-10ः07 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 4 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 4 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

जेट लेग…न्यू जर्सी

भारत से अमेरिका की यात्रा , मतलब हमारे बनाए गए समय के अनुसार जिंदगी के साढ़े दस घंटे दोबारा जीने का मौका होता है । टाइम जोन का परिवर्तन । पूर्व से पश्चिम की यात्रा । हिंदू तो सदैव पूर्व के उगते सूरज को नमन करते हैं किंतु चूंकि काबा मक्का मदीना भारत से पश्चिम की ओर है इसलिए हमारे जो मुस्लिम भाई भारत में पश्चिम दिशा को पवित्र मानते हैं , वे भी यहां आकर अपनी इबादत पूर्व की ओर ही नमन करके करते हैं, क्योंकि यहां से मक्का मदीना पूर्व दिशा में ही है।

दरअसल जेटलेग और कुछ नही प्रकृति के साथ शरीर का सामंजस्य बैठना ही है । यह एक मानसिक अवस्था है। खास तौर पर नींद के समय को प्रारंभिक कुछ दिन लोग जेट लेग की समस्या से परेशान रहते हैं । मैंने देखा है की जब अल्प समय के लिए मैंने टाइम जोन पार किया और कोई आवश्यक काम रहा तो दिमाग अलर्ट मोड पर आकर प्राथमिकता के अनुरूप नीद एडजस्ट कर लेता है । पर जब रिलेक्स मूड हो तो यह नींद रात रात रंग दिखाती है। मौसम का परिवर्तन आबोहवा में घुला होता है । नींद न आए तो विचार आ जाते हैं, यादो के पुलिंदे, समस्या और समाधान के बादल मंडराते हैं । अभी भी यहां जर्सी में नर्म बिस्तर पर उलट पलट रहा हूं, तो सोचा लिख ही डालूं जेट लेग पर । अपनी बाडी क्लाक को प्रकृति से मिलाकर रिसेट करने का श्रेष्ठ तरीका है सूरज, धूप, सुबह से दोस्ती । बस घुमने निकल पड़िए भुंसारे ।

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिंदी साहित्य – कथा कहानी ☆ पितृपक्ष ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

(श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है। भारतीय स्टेट बैंक से स्व-सेवानिवृत्ति के पश्चात गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार  के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर योगदान के लिए आपका समर्पण स्तुत्य है। आज प्रस्तुत है श्री सदानंद जी  की पितृ दिवस की समाप्ति एवं नवरात्र के प्रारम्भ में समसामयिक विषय पर आधारित एक विशेष कथा “पितृपक्ष”। इस अतिसुन्दर रचना के लिए श्री सदानंद जी की लेखनी को नमन।

☆ कथा कहानी ☆पितृपक्ष ☆ श्री सदानंद आंबेकर ☆ 

इस धरा धाम पर पिछले ही सप्ताह, वर्ष में एक बार आने वाला पितृपक्ष नाम का कालखंड समाप्त हुआ है। इसके उपरांत अब नवरात्रि का पावन पर्व चल रहा है।

इसी पृथ्वी पर भारतवर्ष नामक एक देश के एक नगर के बाग में कुछ पशु एकत्र हुये थे। श्यामबरन कौए ने तेजू श्वान की ओर देखकर कहा पिछले पखवाड़े तो हमारी मौज रही। यूं वर्ष भर लोग हमें अशुभ समझ दुरदुराते रहते हैं पर उन दिनों खोज-खोज कर बुलाते और खूब खाना खिला रहे थे। श्वान ने आलस से उनींदी अपनी आंखें आधी खोलकर बात के समर्थन में हूं जैसा कुछ स्वर निकाला। पास ही शहर से चरने आई श्यामा गाय ने भी पेट को पूंछ से सहलाते हुये कहा- पूरे बरस भर तो कूडा करकट और सड़ा हुआ, बासी खाना मिलता है पर पिछले पंद्रह दिनों में तो पूडी खीर, हलुआ और न जाने क्या क्या खाकर अघा गये। पेट भरा होता तो भी मनुष्य पुचकार कर मुंह के आगे खाना रख देता था। नीचे जमीन पर चींटियों का झुंड जा रहा था, उनमें से कुछ ने पूरा जोर लगाकर अपनी आवाज को यथासंभव तेज बना कर खूब खाना मिलने की बात का समर्थन किया साथ ही यह बताना नहीं भूली कि आगे ठंड के मौसम तक के लिये खूब सामान बिलों में एकत्र कर रख लिया है।

”सबने एक स्वर में कहा पितृपक्ष बड़ा अच्छा होता है।”

नगर के राधाकृष्ण देवालय में आस-पास के सभी पंडित बैठकर बतिया रहे हैं। पंडित रामसहाय चौबे  जी ने अपनी चोटी को गांठ लगाते हुये कहा- कुछ भी कहें, इस पितृपक्ष में सबकी खूब कमाई भई। नगद रुपया, बरतन, छाता, चप्पलें, धोती, चादरें तो खूब आईं , भोजन परसाद भी पंदरह दिन खूब मिला। पंडताइन भी खूब आराम में रही। साल भर अब कुछ सामान खरीदने की आवश्यकता नहीं।

”सबने एक स्वर में कहा पितृपक्ष बड़ा अच्छा होता है।”

मंदिर के सामने के बाजार में नवरात्रि पर खूब भीड चल रही थी, उसमें कुछ दुकानदार पिछले दिनों हुई फूल, अगरबत्ती, परसाद, आदि की बिक्री से खुश होकर आपस में कह रहे थे कि पखवाडे़ भर के धंधे के बाद अब नवरात्रि में भी खूब गाहकी चल रही है।

”सबने एक स्वर में कहा पितृपक्ष बड़ा अच्छा होता है।”

इन सबसे अनंत अंतर पर दूर स्वर्ग में बैठे हुये भारत देश के दिवंगत पितर आराम से बैठ कर विगत पितृपक्ष को स्मरण कर खुश हो रहे थे। 

समय पर इलाज न मिलने से मृत हुये बाल मंदिर के शिक्षक होरीलाल जी ने कहा- वाह, इस बार मेरी तिथि पर मेरे डाॅक्टर बेटे ने मेरी स्मृति में निःशुल्क चिकित्सा जांच शिविर लगाया था।

जीवन भर अंधेरी टुटही सी कोठरी में रहे श्री दीनानाथ जी ने चहक कर बताया कि इस पितृ सप्तमी को उनके पुत्र ने अपनी नई सुविधायुक्त विलासगृह परियोजना का आरंभ किया और उस कालोनी का नाम अपनी माता के नाम पर रखा है। वाह मुझे बड़ी प्रसन्नता हुई है।

अपनी सेवानिवृत्ति के उपरांत अंतिम श्वास तक वृद्धाश्रम में रहे भूतपूर्व सरकारी अधिकारी रविराज जी ने बडे़ संतोष से सबको सूचना दी कि मैंने यहां से देखा कि इस बार मेरी श्राद्ध तिथि पर मेरे बेटे ने विदेश से आकर हमारे नगर के अनाथ आश्रम को ढेर सा धन दान में दिया है। भगवान उसे खूब खुश रखें।

इस सभा में सबसे अंत में विराजे दुबले पतले वृद्ध ने बड़े संतोष से अपनी बात चलाई कि मेरी द्वादशी की तिथि है और उस दिन मेरे दोनों पुत्रों ने बारह बामनों को बुला कर अनेक पकवान बना कर भोजन करा कर संतुष्ट किया। उनमें मैेने कई पकवान तो जीवन भर देखे तक नहीं थे। वाह वाह कितने उदार हैं मेरे बेटे।

”सबने एक स्वर में कहा पितृपक्ष बड़ा अच्छा होता है।”

ऊपर आकाश में बैठा ईश्वर यह सब देख सुनकर बस मुस्कुरा रहा था।

©  सदानंद आंबेकर

भोपाल, मध्यप्रदेश 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈