(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “लोहे का घोड़ा (साइकिल)” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ ‘चारुचन्द्रिका’ से – कविता – “लोहे का घोड़ा (साइकिल)” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆ माध्यम संस्था द्वारा डॉ कुंदन सिंह परिहार जी का 85वां जन्मदिवस आयोजित ☆ प्रस्तुती – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
जबलपुर। विगत दिवस जय नगर में माध्यम,जबालि व्यंग्यम, गुंजन कला के संयुक्त तत्वावधान में ‘हास्यम् – व्यंग्यम संध्या’का आयोजन हुआ। रायपुर से पधारे व्यंग्यकार केपी सक्सेना ‘दूसरे’के मुख्य आतिथ्य में स्थानीय व्यंग्यकारों ने गद्य और पद्य में हास्य व्यंग्य रचनाओं का पाठ किया। कार्यक्रम के प्रारंभ में सभी संस्थाओं की ओर से मुख्य अतिथि का फूल मालाओं से स्वागत किया गया, डॉ विजय तिवारी ‘किसलय’ ने सक्सेना जी का परिचय दिया, प्रतुल श्रीवास्तव ने व्यंग्य की दो पुस्तकें भेंट कीं। इसके पश्चात व्यंग्य पाठ सत्र में डॉ कुंदन सिंह परिहार, सर्वश्री प्रतुल श्रीवास्तव ,जय प्रकाश पाण्डेय,ओ पी सैनी, रमाकांत ताम्रकार, अभिमन्यु जैन, के पी पाण्डे, विजय तिवारी, डॉ एस के सिंह,आदि ने हास्य व्यंग्य रचनाएं सुनायीं। मुख्य अतिथि की आसंदी से श्री केपी सक्सेना ने हास्य व्यंग्य की बारीकियों पर चर्चा करते हुए कहा-
“व्यंग्य का मर्म इतना जाना है,
कि कुंद चाकू से गुदगुदाना है,
आप शब्दों पर मत जाएं,
देखिए ये कहां निशाना है,”
इसके अलावा उन्होंने उलटबांसियों से उपस्थित जनों को वाह वाह करने मजबूर कर दिया। संचालन यशोवर्धन ने और आभार प्रदर्शन डॉ शिव कुमार जी ने किया।
प्रस्तुती – श्री जय प्रकाश पाण्डेय
संपर्क – 416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002 मोबाइल 9977318765
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
आपली भारतीय संस्कृती ही अतिशय वैविध्यपूर्ण असल्याने ती मनामध्ये रुजून बसते. ह्या विविधतेमध्ये सणसमारंभ, राहणीमान, नात्यांमधील गोडवा हा तर जास्त मोहवून टाकतो.
भारतीय व्यक्ती ही मुळात कुटुंबप्रिय, माणसांची आवड असणारी, मनापासून माणसं जपणारी आणि रक्ताच्या नात्याइतकच मनाच्या नात्यालाही तोलून धरणारी असते. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या नात्यांमध्ये समरस होत असते. जन्मापासून मिळतात ती रक्ताची नाती, विवाह नंतर जुळतात ती जरी रक्ताची नाती नसली तरी घट्ट धरून ठेवावी अशी नाती आणि ह्या नातेसंबंधाना जोडून ठेवणारा भक्कम पिलरचे काम करणारी मध्यस्थ व्यक्ती आणि जीवनाच्या प्रवाहात अगदीं लहानपणापासून ते वयाचे कुठलेही बंधन नसलेले मैत्रीचे आणि मनापासून मनाने जोडलेली अनमोल नाती.
पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्यामध्ये प्रामुख्याने फरक भारतीय संस्कृतीत हमखास असणाऱ्या नाते संबंध आणि त्यासाठीच्या जपणुकीसाठी असोशीने केल्या जाणाऱ्या प्रयत्ना मध्ये असतो. पाश्चिमात्य संस्कृतीत सगळी नाती ही जवळपास एकाच साच्यात असतात. आपल्या सारखी विविधता तेथे नसते, आपली मंडळी ही आपल्याशी कुणी काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या आणि त्याचप्रमाणे ह्या नात्यातून निर्माण झालेली वेगवेगळ्या प्रकारची भावंडं आयुष्यात लज्जत आणतात नाही तर पाश्चिमात्य संस्कृती मध्ये मात्र “सब घोडे बारा टके” ह्या म्हणी नुसार सगळी नाती सरसकट आण्टी, अंकल मध्ये घुसळलेली.
आपल्या पिढीला सगळी नाती माहीत झाली, अनुभवायला मिळाली मात्र आजकाल काळानुरूप घेतल्या जाणाऱ्या “हम दो हमारा एक” ह्या म्हणीनुसार काही नाती ह्या हल्लीच्या मुलांना अनुभवायला मिळतच नाही, असो पण आपण अनुभवलेल्या नात्यांमध्ये खूप जास्त वेगवेगळा आनंद देणारी निरनिराळी नाती होती, आत्या ,मामा, मावशी, काका, काकू, ह्या अनुषंगाने मैत्र जुळलेली भावंडं ह्यामुळे आपण समृध्द होतो, पश्चिमात्य संस्कृती सारखे आंटी अंकल ह्या एकाच बासनात गुंडाळलेली नाती नव्हती. शिवाय छान लेक जावई, मुलगा सून ही अत्यानंद देणारी नाती आपण कधीच ” इन लॉ” च्या चौकटीत बंदिस्त करत नाही.
खरंच प्रत्येक नात्याची जागा वेगळी, स्थान वेगळं, लज्जत, गोडी आणि खुमारीच वेगळी. परवा अनुभवलेला एक प्रसंग सांगून पोस्ट लांबण न लावता जरा आवरती घेते. परवा एका परिचित कौटुंबिक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. तेव्हा तेथील एक स्त्री एका तरुण नवविवाहित तरुणीची ही “माझी लेक” असं म्हणून ओळख करुन देत होती. माझ्या माहिती प्रमाणे त्या स्त्री ला एकुलता एक मुलगा होता, नंतर कळले ती सुनेला मुलीसारखी मानून तिची लेक म्हणून ओळख करुन देत होती. ह्याकडे मी जरा वेगळ्या नजरेने बघितल्यावर मला प्रकर्षाने जाणवले, प्रत्येक नात्याचे स्थान, ते नात, त्यातील लज्जत ही वेगवेगळी असते, शिवाय सासू सुनेचे नाते हे सुध्दा एक खूप सुंदर असं नातं असतं, आजकाल तर आपल्या परिचित लोकांकडे सासुरवास हा शब्द औषधाला सुद्धा सापडत नाही, मग हे सुंदर नविन निर्माण झालेले अलवार नाते फुलवण्यासाठी त्याला लेकीची भूमिका देऊन ती सगळ्यांना सांगत सुटणं, खरंच आवश्यक असतं काय ?
सासुसूनेचे नाते हे सुध्धा मायलेकीच्या नात्या प्रमाणेच एक सुंदर नात असतं फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो हे मी आता माझ्या आणि आमच्या आईंच्या सलग बत्तीस वर्ष एकत्र घालविण्यानंतर ठामपणें सांगू शकते आणि तेच नात माझ्या नविन आलेल्या सूनेबरोबरही तयार होईलच ह्याची खात्री पण नक्कीच देऊ शकते.
त्यामुळे हा नात्यांचा विषय मांडताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की प्रत्येक नात्याला आपल्या त्याच्या मुळ जागी ठेऊन त्याच्यातील सौंदर्य टीपाव आणि त्याचा आस्वाद ही घ्यावा. कुठल्याही नात्याला त्याचा ओरिजनल स्वाद घालवून मोल्ड करणे कितपत बरोबर, शिवाय हे मोल्डेड नाते पत शेवटपर्यंत बदललेल्या रुपात टीकेलच ह्याची पण काय निश्चिती ?,अर्थात हे माझे वैयक्तिक मत बर का.
(पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.) – इथून पुढ़े
मी – तुम्हाला शिरीष गोखले माहित असतील ना?
MR – हो, का?
मी – मी त्यांच्याकडे गेल्या महिन्यात ऑर्डर्स दिली होती, त्याने कुठल्या एजन्सी कडे दिली काही कळत नाही, अजून माल आला नाही, म्हणून..
R -मॅडम, शिरीष माझा मित्रच. तो सध्या डिस्टर्ब मूड मध्ये आहें.
मी – काय झालं? आजारी आहें का तो?
R.-आजारी नाही. त्याची बायको घर सोडून गेली आहें कायमची.
मी – का? एवढा चांगला नवरा आणि..
R-शिरीष चांगलाच आहें हो. पण त्याची बायको तऱ्हेवाईक आहें, कुणाशी तिचे पटत नाही, त्यांची रोज भांडणे व्हायची. आता मात्र ती कायमची घर सोडून गेल्याचे मला समजले आणि त्यामुळे शिरीष…
मी – त्या मूळे शिरीष सतत दारूच्या नशेत. कुणाला भेटत पण नाही, फोन केला तर हॅल्लो करतो आणि ठेऊन देतो.
आशुच्या लक्षात आले, शिरीष कडे फोन आहें.
मी – तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहें का?
MR- आहें
अस म्हणून त्याने आशूला शिरीषचा लँडलाईन नंबर दिला.
शिरीष सतत दारूच्या नशेदेत त… काय हे, एवढा हुशार देखणा पुरुष आणि याची बायको याच्याशी भांडतेच .. आणि आता सोडून गेली म्हणे…
दैव देत आणि कर्म.. असच नाही का… मला असा नवरा मिळाला असता तर.. आयुष्य म्हणजे आनंदाच झाड झालं असत..
आशूने मिळालेल्या फोन नंबर वर फोन लावला.
आशु – हॅल्लो, शिरीष बोलतात काय?
शिरीष दारूच्या नशेत होता. मोठया प्रयासाने त्याने रिसिव्हर उचलला.
शिरीष – कोण बोलताय?
आशु – मी आशा, रत्नागिरीहुन, जय मेडिकल..
शिरीश ची खाडकन दारू उतरली. तो रेसिव्हर सांभाळत उत्तरला
शिरीष – कोण मॅडम? कसा काय फोन केला? आणि माझा नंबर कुठे मिळाला?
आशू – नंबर कसा मिळाला हे महत्वाचे नाही, तुमचे काय चालले आहें?
शिरीष – कसले आणि काय?
आशु – मला कळले आहें तुम्ही व्यसनात अडकला आहात. माझी इच्छा आहें की तुम्ही आज पासून हे व्यसन बंद करा आणि पूर्वीसारखे कामाला लागा.
शिरीष – हो मॅडम, आज पासून नव्हे आता पासून व्यसन बंद.
आशु – माझा तुमच्यावर विश्वास आहें, ठेवते.
आशूने फोन ठेवला, शिरीषआश्यर्य चकित झाला,्जी आपल्याला आवडते ती जय मेडिकलची मालकीनीने स्वतः आपल्याला फोन केला.आपण तिला आवडतो की काय?मग तिच्या गळ्यातील काळे मणी आणि कुंकू.. याचा अर्थ काय?
थोडी तब्येत बरी झाल्यानंतर शिरीष रत्नागिरीत आला. आल्या आल्या तो जय मेडिकल मध्ये आला. त्याला पहाताच आशूला मस्त वाटलं. त्याची तब्येत बरी दिसताच तिला आनंद झाला.
आशू – कशी आहें तब्येत?
शिरीष – कशी दिसते? चांगली आहें.
आशू – आयुष्यात असे प्रसंग येत असतात, स्त्रियांवार सुद्धा येतात पण कोण व्यसने सुरु करत नाही, त्याला तोंड द्ययच असत.
शिरीष – तुमच्यावर असे प्रसंग आले नाहीत म्हणून..
आशू – आले होते नव्हे त्यात मी अडकले आहें पण..
शिरीष – कसला प्रसंग मॅडम..
आशू – हे दुकान आहें, सांगेन.. कुणाला तरी सांगावे असे वाटते.. पण आज आणि इथे नको.
शिरीष – मग केंव्हा?
आशू – मी फोन करेन तुम्हाला..
बर अस म्हणून आणि चहा पिऊन शिरीष गेला.
शिरीष कोल्हापूरात गेला पण रोज आशुचा फोन येईल म्हणून वाट पहात होता. पण चार दिवस झाले तरी तिचा फोन आला नाही.
इकडे आशू विचार करत होती, खरच हे संबंध वाढवावे की आत्ताच कट करावेत. आपल्याला हे झेपेल? जय चें काय,? आपली बहीण, भाऊ, विजू आते, काका? डॉ परांजपे फॅमिली? आणि आपला अजून घटस्फोट नाही झालेला? शिरीषचा पण नाही झालेला.
शिरीष आपल्याला हवासा वाटतो, सतत सोबत असावासा वाटतो. त्याच्या खांद्यावर मान ठेऊन समुद्राकडे पहात राहावंसं वाटतं.अजून आपण तरुण आहोत, तरुण स्त्री च्या सर्व इच्छा भावना आपल्यालाही आहेत.
पाच दिवस वाट पाहून मग शिरीषने तिला कॉल लावला. ती खुप आंनदीत झाली. तिने आपला सर्व भूतकाळ त्याला सांगितला.त्याला खुप वाईट वाटलं.त्यानेही आपली घरची परिस्थिती, आईवडील, नोकरीं, लग्न, मूल न होणं वगैरे सांगून आपलं मन मोकळ केल.
आणि मग रोज रात्री उशिरा जय झोपल्यावर त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले. शिरीषने तिला जीवनसाथी बनण्याची इच्छा व्यक्त केली.आशुने सर्व अडचणी सांगितल्या. अजून घटस्फोट न घेतल्याचे सांगितले. त्यावर त्याने इतकी वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल असे सांगितले आणि पुढील आठवड्यात आपण रत्नागिरीमध्ये येत असून त्यावेळी मराठे वकिलांना भेटूया, असे सांगितले. तसेच आपली पत्नी बहुतेक या महिन्यात आपणाकडून घटस्फोट मागणार अशी बातमी आपल्याला कळली असल्याने ती पण अडचण नाही, असे सांगितले.
आशू आंनदात होती. तीच मन मोरासारखे थुई थुई नाचत होते. गेली कित्येक वर्षात ती देवळात गेली नव्हती. आता ती देवळात जाऊन देवाचे दर्शन घेत होती. येताना फुलांच्या दुकानात जाऊन रोज कुठल्या न कुठल्या फुलाचा गजरा घेऊन केसात माळत होती.तिने स्वतः साठी फारसे ड्रेस किंवा साडया घेतल्या नव्हत्या, आता मात्र तिने जय साठी कपडे घेतलेच पण आपल्यासाठी शोभणारे ड्रेस तसेच साडया, सॅन्डल्स घेतले. घरात नवीन फर्निचर घेतले.
शिरीष पुढील आठवड्यात आला म्हणजे वकिलांना भेटून घटस्फोटची नोटीस दयायची,अशा आंनदात आशू होती. शिरीष पण घटस्फोट घेईल, मग आतेला, बहीण भावाला सांगायचे असे तिने ठरवले. सर्वाना आनंदच होईल हे तिला माहित होते.
रोज रात्री त्या दोघांचा फोन ठरलेला होता.शनिवारी रात्री तिने फोन लावला, दुसऱ्यादिवशी दुकान बंद म्हणून तिला बोलण्यास वेळ होता.
“हॅल्लो शिरीष… तिने लाडाने त्याला विचारले
“कोण? तू मेडिकलवाली काय, माझ्या नवऱ्याला फुस लावतेस?”पलीकडून खेकसत एका स्त्रीचा आवाज आला.
आशू घाबरली
“कोण.. कोण.. शिरीष आहें…
“शिरीष हवाय तुला? तुला लाज वाटतं नाही एका लग्न झालेल्या पुरुषाला रात्रीअपरात्री फोन करायला..आणि तिने असभ्य भाषेत शिव्या द्यायला सुरवात केली.
आशू गडबडली. तिने फोन खाली ठेवला.पाच मिनिटानंतर पुन्हा फोनची रिंग वाजली, तिला वाटले शिरीषचा फोन असेल. पलीकडून तीच बाई बोलत होती
“ए भवाने, मी शिरीष गोखलेची बायको बोलते आहें, मला कळलं हल्ली माझा नवरा रत्नागिरीत पडलेला असतो, कोणी मेडिकलवाली भुलवते आहें त्याला, पण लक्षात ठेव मी जिवंत असेपर्यत काही घडणार नाही, मी दोघांना जेलमध्ये घालेन, माझ्या नवऱ्याचा नाद सोड, दुसरा कुणी पकड…. आणि ती बरीच बडबडत राहिली,शिव्या देत राहिली.
आशू सुन्न झाली. तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली एका मिनिटात. आशू रडू लागली, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ठोकरच बसते आहें.
मग दुसऱ्या दिवशी शिरीषचा फोन आला, तो रडत तिची माफी मागत होता. हे पण संकट जाईल अस म्हणत होता, पुन्हा आपण एकत्र येऊ अस म्हणत होता, तिने त्याचे म्हणणे ऐकले आणि शांतपणे रेसिव्हर खाली ठेवला.
शिरीष नावाचा चॅप्टर तिने बंद केला. पुन्हा ती देवळात जायची बंद झाली, गजरा माळायची बंद झाली. आता घर, रोजचे जेवणं, डबा घेऊन दुकानात जाणे, जयचा डबा, त्याची शाळा, केंव्हातरी विजू आतेकडे जाणे, भावाबहिणीला फोन करणे बस्स..
तिच्या दुकानात रोजच M. R. येत असत, त्यांच्या गप्पातून तिला कळलं, शिरीषने पुण्याला बदली घेतली. मग काही दिवसांनी कळलं, शिरीषने कंपनी बदलली आता तो मराठवाड्यात असतो. त्याच्या बायकोचे आणि त्याचे रोज भांडण होते, मारामारी रोजची इत्यादी.ती निर्वीकार मानाने सर्व ऐकत होती.
एका दिवशी ती नेहेमीप्रमाणे दुकानात असताना एका कंपनीचा MR तिला म्हणाला
“तुम्हांला कळलं का मॅडम, शिरीष गोखलेने आत्महत्या केली म्हणे.
ती किंचाळली “काय?’
“म्हणजे अजून गेला नाही तो, हॉस्पिटल मध्ये आहें पण सिरीयस आहें अशी बातमी आहें ‘.
तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं.ती मनातल्या मनात रडू लागली.पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.
उदयाचल हायस्कूल, गोदरेज, येथे विज्ञान शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. सारा दिवस सासूबाई मुली सांभाळत, त्यामुळे सकाळचा चहा, नाश्ता ही माझी जबाबदारी होती.
उदयाचलची नोकरी आठ पन्नास ते ५ होती. म्हणजे रोज आठ तास दहा मिनिटे मला आठ सोळाची गाडी मुलुंडहून विक्रोळीस जाण्यासाठी पकडावी लागे. म्हणजे घर आठ पाचला सोडावे लागे.
सक्काळी मी साडेसातला धांदलीत चहा केला नि गाळणीतला चहाचा चोथा (जो फार गरम होता) डस्टबिनमध्ये रिकामा करायला धावले.
माझ्या सासूबाई बेसिनवर दात घाशीत होत्या नि डस्टबिन बेसिनच्या खाली होती. त्या बाजूस होईनात म्हणून मी पायाच्या अंगठ्याने कुंडीचे झाकण दाबून उघडले नि तो चोथा कुंडीत टाकला.
दुर्देव माझे ! तो उकळता चोथा कुंडीत न पडता त्यांच्या पायावर पडला. चुकून हो !
तुम्हाला पण वाचून पटलं की नाही हो ? पण त्या संतापल्या. ब्रश फेकला. जोरात ओरडल्या, “मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला.” मी ओशाळी उभी ! “कालचा सूड उगवला !” त्या पुढे ओरडल्या.
मधल्या खोलीत माझे सासरे पेपर वाचत होते नि यजमान दाढी करीत होते. दोघे धावत आले. “कसला सूड? काय गं? शिकलेल्या मुली अशा वागतात?” सासारे रागावले.
सासूबाईंचा गोरा गोरा पाय लाल झाला होता नि त्यावर फोड? बाप रे बाप ! “अहो तो चहाचा गरम चोथा खरोखर चुकून पडला होता हो ! कसला सूड?”
त्याचं असं झालं होतं. मी नि माझे यजमान सासू-सासऱ्यांजवळ राहात होतो. राहाते घर त्यांचे होते. मुली चिमुकल्या होत्या. आई आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतेच ना? सांगा पाहू !
प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी कुल्यावर चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी मजसमोर धरली, ” ही घे, नि मार माझ्या टाळक्यात ! मुलींवर हात उचलते !” त्या कडाडल्या.
मी सौम्यपणे म्हटलं, “माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका.” चुकलं का हो माझं काही प्रिय वाचकांनो?
पण त्या ठाशीवपणे म्हणाल्या, “ते ‘आपल्या’घरात ! माझ्या घरात हे चालणार नाही !” मी गप्प ! अपमान गिळला. ते तेवढ्यावरच थांबलेले वर्तुळ… ! त्याचा सूड ?
मी आश्चर्य करीत उभी ! माझे यजमान दाढी करीत होते. अर्ध्या गालावर साबण ! तसेच उठले, मला म्हणाले, “का गं आईच्या पायावर तू उकळत्या चहाचा चोथा टाकला? किती भाजला तिचा पाय ! फोड आले !”
सासरे बोलले… मी गप्प बसले. पण नवरा ? त्यालाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? आपण कुणाच्या जिवावर सासरी येतो हो ? नवरा अगदी ‘आपला’ असायला हवा ना ! सांगा! त्याला तरी वाटायला हवं नां…. की बायकोनं हे मुद्दाम नाही केलं !
बरं ! जी ‘सूडकथा’ सासूबाईंनी रंगविली ती ना ह्यांना ठाऊक होती ना माझ्या सासऱ्यांना !राईचा पर्वत कसा होतो कळलं ना?
आठ सोळा केव्हाच चुकली होती. नवऱ्यास मी सासूच्या धाकाने अहो जाहो करीत असे. पण त्या क्षणी फ्यूज उडाला होता. रागाचा पारा उसळी मारुन डोक्यापार गेला होता. मी एकेरीवर आले. पर्वा न करता कुणाची !
“तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? तुझाही माझ्यावर विश्वास नाही? मग कशाला राहू मी या घरात? चालले मी !” रागाच्या अत्युच्च क्षणी ही अठ्ठावीस वर्षांची विजू घर सोडायला निघाली.
मी एक बॅग काढली. माझे दिसतील ते कपडे त्या भरले. मग मुलींचे फ्रॉक भरू लागले. नवरा म्हणाला, “त्यांचे फ्रॉक का भरतेयस?”
आता तर माझ्या रागाने परिसीमा गाठली. मी रागाने त्याला दम भरला “मुलं ‘माझ्या ‘ आहेत. तू पोटातून काढल्यायस का? मग गप्प बस !” यावर तो निरुत्तर ! पुरुष होता ना ! मुली पोटातून कशा काढणार ? माझे सासू-सासरे अवाक्… निशब्द ! काय चाललेय काय हे ?
माझा दादा आर्थररोड जेलचा सुपरिटेंडेंट होता. माझ्या घरात नवरा डॉक्टर असल्याने फोन होता. १९७३ मध्ये तेव्हा घरात एमटीएनएलचा फोन असणे हेही अप्रूप होते.
मी दादाला फोन लावला. बापविना लेकरु होते मी ! दादाच वयाच्या अकराव्या वर्षापासून माझा बाप होता. “दादा, असं झालं….” मी रडत रेकॉर्ड लावली. ” ज्या घरात विश्वासच नाही उरला, तिथे का राहू मी?”
दादाने शांतपणे सारे ऐकून घेतले उत्तम श्रोता बनून. “मी येतो तो पर्यंत शांत बस. मी नक्की घेऊन जाईन हं विजू.”
बस. मला आणखी काय हवे होते. मी लगेच डिक्लेअर केले. “दादा माझा येतोय मला न्यायला. मी नि मुली तासाभरात निघू.”
घर चित्रस्तब्ध झाले. मुली तोंड शिवून कोपऱ्यात उभ्या. रोज मी शाळेत असे तेव्हा त्या आजीजवळ असत. पण या क्षणी कोण ‘आपलं’ ते त्या चिमण्या जीवांना कळत नव्हतं. आईवर लेकरांचा जीव असतोच नं !
आम्ही तेव्हा मुलुंड पश्चिम येथे रणजित सोसायटीत राहायचो. दादा तासाभरात आला. पूर्ण वेश ! जेलरचा ! एकदम कॅडॅक !… सोसायटीभर गॅलऱ्या भरल्या.
वाडांकडे जेलर आला ! बूट काढून चक्क खाली बसला. सासूबाईंच्या पायाशी. त्यांच्या फोड आलेल्या पायावर मायेने हात फिरविला अलवार. “विजू, बर्नाल लावले का?”
या भांडणात कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. मी धावत बर्नाल आणले मधल्या खोलीतून. त्याने ते पायाला लावले. मग म्हणाला, “ती मिळवती आहे आणि नसती तरी मला जड नाही. बाप आहे मी तिचा. पण अभिमानाची टोक इतकी ताणावी? मुलींना बाप कुठला मग?”
माझ्या सासूबाईंनी एकदम हात पसरले. नातींना जोरात म्हणाल्या, “कुठेही जायचं नाही मला सोडून. निघाल्या आईच्या मागे मागे… या गं या… माझ्या कुशीत या दोघी.”
मुली धावल्या. आजीला घट्ट बिलगल्या मग आजी रडायला लागली. तशा त्याही रडू लागल्या. त्यांना किती सवय होती हो एकमेकींची.
आता धीर एकवटून माझा नवरा पुढे झाला. माझं मनगट धरलं “कुठे चाललीस गं मला एकट्याला सोडून? काही वाटतं का? कुठेही नाही जायचं ! काय समजलीस?”
मी म्हटलं “बरं !” मला तरी कुठे जायचं होतं हो ? पण हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते की नाही?
दादा चहा पिऊन आनंदाने ड्यूटीवर परतला. मुली मला बिलगल्या. माझे मुके घेतले. गळ्यात हात टाकले. मुलांनाही किती समजतं ना !
त्या रात्री आम्ही चौघं मुली झोपल्यावर एकत्र बसलो. कौटुंबिक सभा. माझे सासरे-बापू म्हणाले, मला. “हे पहा, विजय हा आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे आम्ही नि तो, इनसेपरेबल आहोत. वेगळं राहायचा विचार मनातही आणू नकोस तू. तो मातृ-पितृ भक्त आहे.
आता एकत्र राहायचं तर वाद कधी तरी होणारच. ती ‘सूड सूड’ काय म्हणत होती ते मला ठाऊक नाही. जाणून घ्यायचीही इच्छा नाही. एकच सांगतो आपण सर्वांनी वाद झाले तर भांडू पण दुसऱ्या दिवशी ते भांडण उकरुन काढायचे नाही. नवा दिवस नवा उजाडला पाहिजे. आलं लक्षात? रात गयी… बात गयी !”
ते तत्त्व आम्ही चौघांनी आयुष्यभर सांभाळलं. माझं ‘पुस्तक’ लाज न बाळगता तुमच्यासमोर एवढ्यासाठी उघडलं प्रिय वाचकांनो, की तुमचे संसार टिकावेत. छोटी छोटी बातोंमे इतना दम नही होता की घर टूट जाए ! खरं ना ?
लेखिका : डॉ. विजया वाड.
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘तुमचं गाणं ऐकत-ऐकत प्राण सोडायचाय …‘ लेखक : श्री हृदयनाथ मंगेशकर – संकलन : श्री विनय बडवे ☆ श्री आशिष बिवलकर ☆
बांगलादेशाच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी लता मंगेशकर यांनी अत्यंत तळमळीनं कार्यक्रम सादर केले होते. या कार्यक्रमांत त्यांना साथ दिली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. तो रोमांचकारी, तसंच हृदयद्रावक अनुभव पंडितजींनी शब्दबद्ध केला…
‘‘सन्माननीय! आपल्याला सूचना देण्याचं काम माझ्याकडं देण्यात आलं आहे…या विमानात आसनं नाहीत, फक्त लोखंडी पट्ट्या आहेत…त्यांवर आपल्याला बसावं लागेल…आधारासाठी एक लोखंडी साखळी आहे…तिला धरून बसावं…खिडक्या उघड्या आहेत…बाहेर डोकावू नये…प्रवास फक्त अर्ध्या तासाचा आहे…आत कोकाकोला मिळेल…’’
एवढं बोलून तो जवान बाजूला झाला. कलाकार विमानात बसू लागले. सुनील दत्त, नर्गिस, माला सिन्हा, दीपक शोधन, दीदी, मी, नारायण नायडू असे एकेक कलाकार त्या लोखंडी बारवर बसले. समोर लटकलेली साखळी घट्ट धरून मी एका जवानाला विचारलं ‘‘या खिडक्या उघड्या का?’’
‘‘गोळ्या झाडण्यासाठी.’’
‘‘थंडी वाजत नाही?’’
‘‘जीव वाचवण्यात थंडी लागत नाही,’’ निर्विकार उत्तर. मी गप्प.
विमान एका मैदानात उतरलं. छोटासा रंगमंच…पडदा नाही. समोर पाच ते सात हजार जवान. एक कर्कश माईक. बस्स. ‘कार्यक्रम सुरू करा’
कार्यक्रम सुरू झाला. सुनील दत्त यांनी निवेदन केलं. नर्गिस यांनी जवानांचे आभार मानले. माला सिन्हा यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या. पुढं काय? मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नायक-नायिकांनी रंगमंचावर येणं, जवानांना नमस्कार करणं, शुभेच्छा देणं…बस्स. असा मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. जवानांमध्ये चुळबुळ सुरू होण्याआधीच सुनील दत्त यांनी दीदीचं नाव घोषित केलं. दीदी रंगमंचावर आली. पाहिलं आणि जिंकलं. जवानांमध्ये नवा जोश आला.
‘भारतमाता की जय…’ ‘लतादीदी झिंदाबाद…’
आणि टाळ्यांचा कडकडाट…
कोई सिख, कोई जाट-मराठा
कोई गुरखा, कोई मदरासी
असे वेगवेगळ्या जातींचे-प्रांतांचे-भाषांचे ते जवान आपापल्या भाषेत दीदीचा जयजयकार करू लागले. कुणी दीदीच्या पाया पडतंय…कुणी रडतंय…कुणी शुभेच्छा देतंय…कुणी फर्माईश करतंय…संगीताच्या अमोघ शक्तीचा साक्षात्कार घडत होता. दीदीवर रसिक किती निरपेक्ष प्रेम करतात याचा प्रत्यय येत होता. कुठलाही देश, कुठलेही रसिक, कुठलीही परिस्थिती असो; पण संगीताशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. कारण, संगीत ही प्रत्यक्ष संवेदना आहे. दीदीनं गायला सुरुवात केली.
एकदा माझ्याकडं बघून मिष्किलपणे हसली. नायडूला खूण केली आणि तिनं गायला सुरवात केली. युद्धभूमीवर अत्याचार, किंचाळ्या, विव्हळणं, गोळीबाराचे आवाज यापेक्षा एक ईश्वरी सूर त्या हिंसाचारी भूमीवर घुमू लागला.
तृषार्त भूमीवर ‘बरखा ऋतू’ रिमझिम बरसू लागली. ते जवान, ती रणभूमी पावन झाली. दीदी जीव लावून प्रत्येक रसाची गाणी गात होती. न थकता, न दमता. आणि, शेवटच्या गाण्याची तिनं सुरुवात केली…
ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी
जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने थी धन्य वो उन की जवानी
जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी…
कार्यक्रम संपला. आम्ही मेसमध्ये आलो. दुसऱ्या दिवशीही कार्यक्रम होता. सर्वजण थकले होते. आराम करत होते. तोच एक अधिकारी दीदीला भेटायला आले. त्यांनी दीदीचे खूप आभार मानले आणि शेवटी म्हणाले : ‘‘इथं खूप मराठी जवान आहेत. त्यांच्यासाठी एक तरी मराठी गाणं गा…’’
दीदी म्हणाली : ‘‘अगदी आनंदानं…उद्याच्या कार्यक्रमाची सांगता मी मराठी गाण्यानं करणार.’’
अधिकारी आनंदानं दीदीचे आभार मानून गेले.
दुसऱ्या दिवशी एका शेतात रंगमंच लावून कार्यक्रम सुरू झाला. जे काल घडलं होतं तसंच आजही घडत होतं.
मध्येच मी दीदीला म्हणालो : ‘‘काल तू ‘मराठी गाण्यानं कार्यक्रमाची सांगता करणार’ असं म्हणालीस; पण पसायदानसारख्या प्रार्थनेनं सांगता करू नकोस. ही समरभूमी आहे.’’
‘‘मला हे शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठं काय गावं हे मला बाबांनी शिकवलं आहे. ऐक, मी काय गाते ते!’’ दीदी म्हणाली.
कार्यक्रमाच्या शेवटाला दीदीनं जवानांना मनोगत सांगितलं ‘ ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या गाण्यानं मी आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार नाही. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ हे फार लोकप्रिय आहे. फार हृद्य आहे…पण ते पराभवानंतर केलेलं सांत्वनगीत आहे.
मी ज्या गाण्यानं सांगता करणार आहे ते गाणं तुम्ही ऐकलेलं नसेलही. तुम्हाला ते कळणारही नाही; पण तुम्हाला त्या गाण्यातून जयध्वनी ऐकू येईल. पराजयाचा डाग पुसून तुम्हाला त्यात जयाची छबी दिसेल. विजयाचा जयजयकार ऐकू येईल…’’
सारे जवान, कलाकार अधिकारी शांत झाले. प्रत्येकाच्या मनात एक पाल चुकचुकत होती…‘ऐ मेरे वतन के लोगो… ’सारखं हुकमी गाणं सोडून लतादीदी हे अनामगीत का गात आहेत…सगळे कुतूहलानं ऐकत होते. दीदीनं गायला सुरुवात केली
हे हिंदुशक्तिसंभूत दिप्तितम तेजा
हे हिंदुतपस्यापूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्रीसौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदुनृसिहा प्रभो शिवाजी राजा
प्रभो शिवाजी राजा…
काव्याचा एक शब्दही कुणालाच कळला नाही. कळलं एकच की, ही शिवस्तुती आहे. ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शब्द आला आणि श्रोत्यांमध्ये ‘छत्रपती’ अशी आरोळी उठली. सारं वातावरण शिवमय झालं. हिंदुपदपादशाही…शिवाजीमहाराज छत्रपती…सारं वातावरण भगवं झालं. गर्जा जयजयकार क्रांतीचा…गर्जा जयजयकार…
छत्रपती शिवाजीमहाराज, राणा प्रताप, भगतसिंग, मदनलल धिंग्रा, सुखदेव, सावरकर या साऱ्या क्रांतिवीरांच्या जयघोषानं सारं वातावरण भरलं-भारलं. ‘‘दीदी! काय गाणं शोधून काढलंस तू! सारं वातावरणच बदलून गेलं.’’ ‘‘काय आहे बाळ…माझं सारं बालपण क्रांतिकारकांबरोबर गेलं. का कुणास ठाऊक; पण नेमस्तांपेक्षा मला क्रांतिकारक जवळचे वाटतात…’’
दीदी! आम्ही तुमचं मुंबईमध्ये स्वागत करतो. बांगलादेशात जवानांसाठी तुम्ही वीस दिवसांत बावीस कार्यक्रम केले. आम्ही जवानांतर्फे आपले आभार मानतो. एक विनंती आहे, ‘सारे जखमी जवान इथं ‘अश्विनी हॅास्पिटल’मध्ये आहेत. त्यात एक जाधव नावाचा जवान खूप गंभीर अवस्थेत आहे. तो सारखी तुमची आठवण काढतो. तुम्हाला भेटण्यासाठी त्याचे प्राण अडकले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की, आपण ‘अश्विनी हॅास्पिटल’ला भेट द्यावी.’
दुसऱ्या दिवशी दीदी हॅास्पिटलमध्ये गेली. अतिशय उदास होती. घाबरली होती.
‘‘बाळ, तो जवान माझ्यासमोर मृत्यू पावला तर? माझ्या मनाला फार लागेल ते…’’
प्रत्येक जखमी जवानाशी बोलत, सांत्वन करत, कधी धीर देत दीदी त्या जाधव नावाच्या जवानापाशी पोहोचली. जवान अगदी खरोखरच जवान होता. पांढऱ्या कापडानं त्याचं शरीर झाकलेलं होतं. दीदीला बघून तो मनमोकळं हसला.
‘‘दीदी, माझं काही खरं नाही, माझी एकच इच्छा आहे, ‘आपलं गाणं ऐकत ऐकत प्राण सोडावा… आपण माझ्यासाठी गाणं गाल ना?’’
मला वाटलं, दीदी आता तणावानं कोसळणार; पण दीदी स्तिथप्रज्ञासारखं म्हणाली : ‘‘कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे…?’’
तो हसला ‘‘आ जा रे परदेसी…’’
दीदीनं गायला सुरुवात केली. ती इतकी सहज गात होती की, जणू तालीमच चालली आहे.
मैं तो कब से खडी उस पार
के अखियाँ थक गई पंथ निहार
आ जा रे ऽऽ परदेसीऽऽ
आणि आश्चर्य…दीदी आणि ऐकणारे सगळे जण प्रसंग काय हे विसरून गाण्याशी एकाकार होऊ लागले. तेवढ्यात डॅाक्टरांनी दीदीला थांबवलं.
सारं संपलं होतं. जखमी जवान साऱ्या यातनांमधून मुक्त होऊन ‘उस पार’ गेला होता. दीदी शांत होती; पण हात धरून चालत होती…
लेखक : श्री हृदयनाथ मंगेशकर.
माहिती संकलन : श्री विनय बडवे
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ लक्ष ’खेचक‘ मथळे — सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार श्री अनिकेत कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर☆
☆
काही बातम्यांचे मथळेच लक्षखेचक असतात…
उदाहरणार्थ…..
खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते…_
‘तिच्या भाळी , जन्म आभाळी.’
***
वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्कच असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं…
‘मापात पाप’ करणार्यांना चाप!
***
एके वर्षी मुंबई पावसात तुंबली.
बातमीचं हेडिंग होतं…
‘तुंबई’!
***
एका बातमीचं हेडिंग भारी वास्तव वाटलं…
“अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”
***
आता त्याला बरीच वर्षें झाली. छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने महापौर असताना त्यांना सनसनाटी गोष्टी करायला फार आवडत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी हेलिकाॅप्टरमधून मिरवणूकीतून वाजतगाजत जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे हेडिंग होते:
मानवाची आकाशातून देवांवर पुष्पवृष्टी
***
बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं…
‘जीव वाचवण्यासाठी पळताना
खड्ड्यात पडून मृत्यू!’
***
सौरभ गांगुली (डावखुरा) आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी भागीदारी केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली…
लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग…
‘डाव्यांचा तडाखा!’
***
मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा. त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती…
‘नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!’
***
राहुल द्रविडच्या निवृत्ती वेळी
एका इंग्रजी पेपरचा अप्रतिम मथळा होता…
‘Indian team is now bread n butter
but without Jammy’
***
भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा…
‘चारले खडे, आता वानखेडे’
***
मटा ऑनलाइन मथळा…
‘पतंजली कोलगेटचे दात पाडणार!’
***
हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…
गोव्यात ‘पाळी’ नावाचं गाव आहे. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुसऱ्या दिवशी हेडिंग दिले…
“डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार!”
(बोंबला!)
***
वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे माझा मित्र पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे…
‘खैरनार देवनारचे पवनार करणार !’
***
या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती…
‘मुंबापुरीवर जलात्कार!!!’
***
२००४ साली अटल सरकारचा पराभव करुन काँग्रेस बहुमताने जिंकली. त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं…
‘King Cong… Queen Sonia’ !
(अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.)
***
बुटासिंग २००५ मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते (बहुधा “सामना”चे)… –
सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला
‘बुटा’ ने हाणले!’
***
मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत की कुठल्याशा वर्तमानपत्राने बातमी दिली होती; त्याचे हेडिंग होते…
‘तांबेचं पितळ उघडं !’
***
मे, २०१४ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते…
‘हाताची घडी, कमळावर बोट!’
***
नवाकाळचे एक हेडिंग…
तेव्हा जयसूर्या जबरदस्त फाॕर्माॕत होता आणि आपण मॕच जिंकलो होतो.
‘श्रीकांतने जयसूर्याला गिळले.
भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली ..
“श्रीलंकेत हनुमान जयंती !”
☆
सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज” – मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर – परिचयकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक: द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
(झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन)
मूळ लेखक: पीटर ओहृललेबेन
मराठी अनुवाद:गुरुदास नूलकर
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन
पृष्ठ:२०८
मूल्य:३२०/
अतिशय लोकप्रिय ठरलेले पुस्तक:”द हिडन लाईफ ऑफ ट्रीज” मराठी अनुवाद ,पुन्हा उपलब्ध झाले आहे..कृपया आपल्या वृक्ष मित्रांना कळवावे!
सगळेच कसे अचंबित करणारे!
झाडं आपसात बोलतात, ते आपल्याकडील माहिती इतरांना पोहोचवतात!ते रडतात आणि आपल्या लेकरांची काळजी ही घेतात…जखमी झाडाची काळजी घेऊन त्याला दुरुस्त करतात….
अद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक “लाइफ ऑफ ट्रीज” या पुस्तकातून दाखवतात.
जंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात!
सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते…
तुम्हाला हे वाचताना खरचं वाटणार नाही….वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन!
झाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती आपल्याला आणि आपल्या पाल्यांना वाचताना नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्त्वाची माहिती वाचली याचा आनंदही!
हे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉ जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण होईल….कारण यांचा झाडांशी स्नेह होता.होय जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ही झाडांना बोलायचे….आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की, झाडांना संवेदना असतात…पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती वाचताना तो अद्भुत ग्रंथ निलावंती वाचतोय की काय असे वाटायला लागेल…सांगण्याचा हेतू हाच की वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक वाटतात….
तुम्हाला एकटं राहायला नको वाटतं अगदी तसचं तुमच्या झाडांनाही!एकट्या झाडाचे आयुर्मान ही कमी असतं!होय झाडं ही सामाजिक जीवन जगतात.ते एकमेकांची काळजी घेतात..इतकेच नव्हे तर तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला इतर झाडं अन्न पुरवठा होईल यासाठी मदत करतात….एक दोन दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे…इतकंच नव्हे तर झाडे ही परस्परांना माहिती पुरवतात.त्यांचे विस्तीर्ण असे www सारखे जाळे असते.ज्यात अमर्याद अशी माहिती असते. त्यांचे ही एक www आहे…त्याला आपल्याला wood wide web म्हणावे लागेल इतकेच!
चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा चंदनाच्या शेतीत कडुलिंब का लावतात? तर तो हेच सांगेल की हे सहजीवन त्यांना मानवते.अर्थात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. मित्रांमध्ये ते खुश राहतात….
आपल्याला नवल वाटेल की झाडांनाही स्मरणशक्ती असते. त्यांना ऐकू येत आणि त्यांची एक भाषा ही असते. ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात,त्यांना रंग दिसतात…. तुम्ही म्हणाल बस झालं ना राव…निघतो आता.पण थांबा हे वाचून घ्या आधी…
एखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठी ही माहिती देतो. सगळी झाडं या मुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात.आवश्यक ते जैवरासायनिक बदल स्वतःमध्ये घडवून आणतात…
१९८० मध्ये डेहराडून जवळ चंद्रबनी मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमारत “साल” (समूहात वाढणारे झाडं)जंगलाला साफ करून उभी केली गेली. या संस्थेच्या आवारात एकटी राहिलेली “सालची” झाडं एक एक करून मरू लागली. आपल्या सजातीयांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांचा अंत झाला, पण हे त्यांना कसं कळलं? त्यांची संभाषण यंत्रणा कशी आहे ?
या पुस्तकाविषयी फार जास्त लिहिणं आवश्यक वाटत नाही….कारण याच्या प्रत्येक पानावर अतिशय अद्भुत अशी माहिती आहे. झाडांच्या नवलाईची दुनिया आपण आणि आपली मित्र नक्की वाचणार याची खात्री आहे.
पोस्ट आपल्या प्रत्येक वृक्षमित्राला पाठवू !
मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन
मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर
परिचयकर्ता : अज्ञात
प्रस्तुती –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 e-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख अनुभव और निर्णय… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 230 ☆
☆ अनुभव और निर्णय… ☆
अगर आप सही अनुभव नहीं करते, तो निश्चित् है कि आप ग़लत निर्णय लेंगे–हेज़लिट की यह उक्ति अपने भीतर गहन अर्थ समेटे है। अनुभव व निर्णय का अन्योन्याश्रित संबंध है। यदि विषम परिस्थितियों में हमारा अनुभव अच्छा नहीं है, तो हम उसे शाश्वत् सत्य स्वीकार उसी के अनुकूल निर्णय लेते रहेंगे। उस स्थिति में हमारे हृदय में एक ही भाव होता है कि हम आँखिन देखी पर विश्वास रखते हैं और यह हमारा व्यक्तिगत अनुभव है–सो! यह ग़लत कैसे हो सकता है? निर्णय लेते हुए न हम चिन्तन-मनन करना चाहते हैं; ना ही पुनरावलोकन, क्योंकि हम आत्मानुभव को नहीं नकार सकते हैं?
मानव मस्तिष्क ठीक एक पैराशूट की भांति है, जब तक खुला रहता है, कार्यशील रहता है–लार्ड डेवन का यह कथन मस्तिष्क की क्रियाशीलता पर प्रकाश डालता है और उसके अधिकाधिक प्रयोग करने का संदेश देता है। कबीरदास जी भी ‘दान देत धन न घटै, कह गये भक्त कबीर’ संदेश प्रेषित करते हैं कि दान देते ने से धन घटता नहीं और विद्या रूपी धन बाँटने से सदैव बढ़ता है। महात्मा बुद्ध भी जो हम देते हैं; उसका कई गुणा लौटकर हमारे पास आता है–संदेश प्रेषित करते हैं। भगवान महाबीर भी त्याग करने का संदेश देते हैं और प्रकृति का भी यही चिरंतन व शाश्वत् सत्य है।
मनुष्य तभी तक सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वगुण-सम्पन्न व सर्वपूज्य बना रहता है, जब तक वह दूसरों से याचना नहीं करता–ब्रह्मपुराण का भाव, कबीर की वाणी में इस प्रकार अभिव्यक्त हुआ है ‘मांगन मरण एक समान।’ मानव को उसके सम्मुख हाथ पसारने चाहिए, जो सृष्टि-नियंता व जगपालक है और दान देते हुए उसकी नज़रें सदैव झुकी रहनी चाहिए, क्योंकि देने वाला तो कोई और…वह तो केवल मात्र माध्यम है। संसार में अपना कुछ भी नहीं है। यह नश्वर मानव देह भी पंचतत्वों से निर्मित है और अंतकाल उसे उनमें विलीन हो जाना है। मेरी स्वरचित पंक्तियाँ उक्त भाव को व्यक्त करती हैं…’यह किराये का मकान है/ जाने कौन कब तक ठहरेगा/ खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ तू जाएगा’ और ‘प्रभु नाम तू जप ले रे बंदे!/ वही तेरे साथ जाएगा’ यही है जीवन का शाश्वत् सत्य।
मानव अहंनिष्ठता के कारण निर्णय लेने से पूर्व औचित्य- अनौचित्य व लाभ-हानि पर सोच-विचार नहीं करता और उसके पश्चात् उसे पत्थर की लकीर मान बैठता है, जबकि उसके विभिन्न पहलुओं पर दृष्टिपात करना आवश्यक होता है। अंततः यह उसके जीवन की त्रासदी बन जाती है। अक्सर निर्णय हमारी मन:स्थिति से प्रभावित होते है, क्योंकि प्रसन्नता में हमें ओस की बूंदें मोतियों सम भासती हैं और अवसाद में आँसुओं सम प्रतिभासित होती हैं। सौंदर्य वस्तु में नहीं, दृष्टा के नेत्रों में होता है। इसलिए कहा जाता है ‘जैसी दृष्टि, वैसी सृष्टि।’ सो! चेहरे पर हमारे मनोभाव प्रकट होते हैं। इसलिए ‘तोरा मन दर्पण कहलाए’ गीत की पंक्तियाँ आज भी सार्थक हैं।
दोषारोपण करना मानव का स्वभाव है, क्योंकि हम स्वयं को बुद्धिमान व दूसरों को मूर्ख समझते हैं। परिणामत: हम सत्यान्वेषण नहीं कर पाते। ‘बहुत कमियाँ निकालते हैं/ हम दूसरों में अक्सर/ आओ! एक मुलाकात/ ज़रा आईने से भी कर लें।’ परंतु मानव अपने अंतर्मन में झाँकना ही नहीं चाहता, क्योंकि वह आश्वस्त होता है कि वह गुणों की खान है और कोई ग़लती कर ही नहीं सकता। परंतु अपने ही अपने बनकर अपनों को प्रताड़ित करते हैं। इतना ही नहीं, ‘ज़िन्दगी कहाँ रुलाती है/ रुलाते तो वे लोग हैं/ जिन्हें हम अपनी ज़िन्दगी समझ बैठते हैं’ और हमारे सबसे प्रिय लोग ही सर्वाधिक कष्ट देते हैं। ढूंढो तो सुक़ून ख़ुद में है/ दूसरों में तो बस उलझनें मिलेंगी। आनंद तो हमारे मन में है। यदि वह मन में नहीं है, तो दुनिया में कहीं नहीं है, क्योंकि दूसरों से अपेक्षा करने से तो उलझनें प्राप्त होती हैं। सो! ‘उलझनें बहुत हैं, सुलझा लीजिए/ बेवजह ही न किसी से ग़िला कीजिए’ स्वरचित गीत की पंक्तियाँ उलझनों को शीघ्र सुलझाने व शिक़ायत न करने की सीख देती हैं।
उत्तम काम के दो सूत्र हैं…जो मुझे आता है कर लूंगा/ जो मुझे नहीं आता सीख लूंगा। यह है स्वीकार्यता भाव, जो सत्य है और यथार्थ है उसे स्वीकार लेना। जो व्यक्ति अपनी ग़लती को स्वीकार लेता है, उसके जीवन पथ में कोई अवरोध नहीं आता और वह निरंतर सफलता की सीढ़ियों पर चढ़ता जाता है। ‘दो पल की है ज़िन्दगी/ इसे जीने के दो उसूल बनाओ/ महको तो फूलों की तरह/ बिखरो तो सुगंध की तरह ‘ मानव को सिद्धांतवादी होने के साथ-साथ हर स्थिति में खुशी से जीना बेहतर विकल्प व सर्वोत्तम उपाय है।
बहुत क़रीब से अंजान बनके निकला है/ जो कभी दूर से पहचान लिया करता था–गुलज़ार का यह कथन जीवन की त्रासदी को इंगित करता है। इस संसार म़े हर व्यक्ति स्वार्थी है और उसकी फ़ितरत को समझना अत्यंत कठिन है। ज़िन्दगी समझ में आ गयी तो अकेले में मेला/ न समझ में आयी तो भीड़ में अकेला…यही जीवन का शाश्वत् सत्य व सार है। हम अपनी मनस्थिति के अनुकूल ही व्यथित होते हैं और यथासमय भरपूर सुक़ून पाते हैं।
तराशिए ख़ुद को इस क़दर जहान में/ पाने वालों को नाज़ व खोने वाले को अफ़सोस रहे। वजूद ऐसा बनाएं कि कोई तुम्हें छोड़ तो सके, पर भुला न सके। परंतु यह तभी संभव है, जब आप इस तथ्य से अवगत हों कि रिश्ते एक-दूसरे का ख्याल रखने के लिए होते हैं, इस्तेमाल करने के लिए नहीं। हमें त्याग व समर्पण भाव से इनका निर्वहन करना चाहिए। सो! श्रेष्ठ वही है, जिसमें दृढ़ता हो; ज़िद्द नहीं, दया हो; कमज़ोरी नहीं, ज्ञान हो; अहंकार नहीं। जिसमें इन गुणों का समुच्चय होता है, सर्वश्रेष्ठ कहलाता है। समय और समझ दोनों एक साथ किस्मत वालों को मिलती है, क्योंकि अक्सर समय पर समझ नहीं आती और समझ आने पर समय निकल जाता है। प्राय: जिनमें समझ होती है, वे अहंनिष्ठता के कारण दूसरों को हेय समझते हैं और उनके अस्तित्व को नकार देते हैं। उन्हें किसी का साथ ग़वारा नहीं होता और एक अंतराल के पश्चात् वे स्वयं को कटघरे में खड़ा पाते हैं। न कोई उनके साथ रहना पसंद करता है और न ही किसी को उनकी दरक़ार होती है।
वैसे दो तरह से चीज़ें नज़र आती हैं, एक दूर से; दूसरा ग़ुरूर से। ग़ुरूर से दूरियां बढ़ती जाती हैं, जिन्हें पाटना असंभव हो जाता है। दुनिया में तीन प्रकार के लोग होते हैं–प्रथम दूसरों के अनुभव से सीखते हैं, द्वितीय अपने अनुभव से और तृतीय अपने ग़ुरूर के कारण सीखते ही नहीं और यह सिलसिला अनवरत चलता रहता है। बुद्धिमान लोगो में जन्मजात प्रतिभा होती है, कुछ लोग शास्त्राध्ययन से तथा अन्य अभ्यास अर्थात् अपने अनुभव से सीखते हैं। ‘करत- करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ कबीरदास जी भी इस तथ्य को स्वीकारते हैं कि हमारा अनुभव ही हमारा निर्णय होता है। इनका चोली-दामन का साथ है और ये अन्योन्याश्रित है।