मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 130 ☆ महाराष्ट्राची यशोगाथा- भव्य राष्ट्र माझा…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 130 ? 

☆ महाराष्ट्राची यशोगाथा- भव्य राष्ट्र माझा… ☆

महाराष्ट्राची यशोगाथा

शब्दांत कैसी मांडावी

शूर विरांच्या, विरगाथा

लेखणीतून व्यक्त करावी.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

शब्द हे, अपुरे पडती

संत महंतांच्या भूमीत

देव ही, इथे अवतरती.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

संत परंपरा,  थोर लाभली

वीर शिवबा, इथेच जन्मले

मराठ्यांची, सरशी झाली.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

सत्पुरुषांची, मांदियाळी

महात्मा फुले, आंबेडकर-शाहू

अनेक थोर, भव्य मंडळी.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

कणखर ह्या, पर्वत-रांगा

राज-भाषा, मराठी बोली

जैसी पवित्र, गोदा- गंगा

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन  श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा- ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.

या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.   

त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.

मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्‍या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.

संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्‍या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.

दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्‍या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.

पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती ‘रामकृष्ण मठ’ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था ‘रामकृष्ण मिशन’ अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.     

स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते

|| ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च’ ||

आज शंभर वर्षे  आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(मागील भागात आपण पाहिले – जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.” आता इथून पुढे) 

पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू खाऊन अनुप आणि प्रकाशला बर वाटत होतं….त्यांचा श्वास आता सामान्य झाला होता…..दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच…..तो तरुण त्या दोघांना त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे ह्या विचाराने अनुप त्याच्या सॅककडे बघत बोलला….कारण कदाचित ह्यामुळे ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत.

“भाऊ….एवढी मदत केली अजून एक मदत कराल का??”

तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला.

“आव बोला की बिनधास्त”

सॅककडे बोट करत अनुप बोलला,

“तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटो आहे ना….तो घरच्या रस्त्यापर्यंत माझ्याजवळ द्याल का??”

तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला,

“हातीच्या मारी…..काय राव….लाजवताय व्हय आम्हाला….आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय….हे घ्या”

बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या…..अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही…..अनुप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता…..देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले…..ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच,

‘आर अन्या…आलो रे आलो….कमानीजवळ आलो आपण” 

प्रकाशचे अश्रूंनी डबडबले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकित झाला होता….पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं…..कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारख वाटत होतं….जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान….कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाश त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली….अनुपने मागे बघितले तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार स्पष्ट दिसत होते…..हा पाठलाग इथपर्यंतच होता…

 – समाप्त – 

लेखक : श्री शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

इयत्ता सहावीत असताना एके दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले. “आज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी शाळेच्या सभागृहात जमा. तुम्हाला आत्तापासून बचतीची सवय लागावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येणार आहेत. नीट ऐकून घ्या ते काय सांगतात ते.”

बँकेचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे आले. त्यांनी लहान मुलांसाठी अल्पबचत योजना म्हणजे काय, त्याचे फायदे वगैरे समजावून सांगितलं. वर्गातल्या माझ्यासकट बहुतेक सगळ्या मुलांनी त्या पुढच्या आठवड्यात आपली बचत खाती उघडली.

त्यानंतरच्या सहा महिन्यात खाऊचे पैसे, कुणी वाढदिवसाला दिलेली भेट या स्वरूपात जमा झालेली रक्कम त्या खात्यात मी भरत राहिलो. माझ्या हिशेबाने खात्यामध्ये 127 रुपये जमा असायला हवे होते. पण प्रत्यक्षात होते 125. लेखनिकाकडे त्या दोन रुपयाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” नोंदीमध्ये काहीतरी चूक झाली असावी. दोनच तर रुपये कमी आहेत. जाऊ दे.विसरून जा. अक्कलखाती जमा करून टाक ” मला वाटलं बचत खात्याला संलग्न अशा विशेष अक्कलखात्याची सोय पण बँक देते. मी भाबडेपणे विचारलं,” त्या अक्कलखात्यावर किती व्याज देतात” माझा प्रश्न आजूबाजूच्या अनेकांनी ऐकला असावा कारण बँकेत हास्याची एकच लाट उसळली. लेखनिकाची विनोदबुद्धी कुशाग्र होती. तो म्हणाला, “अरे गेले ते. अक्कलखाती जमा म्हणजे झाला तुझा मामा!”

अक्कलखात्याची झालेली माझी ती आयुष्यातली पहिली ओळख. नंतरच्या आयुष्यात या खात्यातली जमा उत्तरोत्तर वाढतच गेली. रेल्वेचे तिकीट वेळेवर रद्द केलं नाही म्हणून झालेलं नुकसान, सहल आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे हॉटेल बुकिंगमधील बरेचसे पैसे कापून मिळालेला परतावा, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत खाल्लेली आपटी, आदल्याच दिवशी नियम बदलल्यामुळे जागेच्या नोंदणी शुल्कामधे झालेली 2 टक्क्यांची भरघोस वाढ वगैरे वगैरे अनेक. सर्व काही अक्कलखाती जमा केलं म्हणून डोकं शाबूत राहीलं.

अक्कलखातं आपल्याला खूप काही शिकवून जातं. विसरणं अथवा विस्मरण हे मानव जातीला मिळालेलं वरदान आहे ही पहिली शिकवण. झालेलं नुकसान वेळीच अक्कलखाती जमा केलं नाही तर फक्त मनस्ताप नशिबी असतो. अतिशय दयाळू असलेलं हे खातं आपल्या पोटात पैशांबरोबर वस्तूंनाही सामावून घेतं. पेनं, रुमाल आणि छत्र्या मी किती अक्कलखाती जमा केल्या असतील याची काही ददातच नाही. ह्या तीनही वस्तूंचे उद्योगधंदे केवळ मानवी स्वभावाच्या विसरणे आणि हरवणे ह्या दोन गुणधर्मांवर जिवंत आहेत.

अक्कलखात्याची व्यापकता विस्तृत असते. आपल्या देशाचं अक्कलखातं तर इतकं मोठं आहे की त्यात इंग्रजांनी केलेली लूट आणि स्वातंत्र्यानंतर जमा झालेली पुंजी एकत्र केली तर आपल्या इतक्याच मोठ्या दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था आरामात चालवता येईल. पडलेले पूल, खणलेले रस्ते, आधी बांधून मग पाडून पुन्हा बांधलेले उड्डाणपूल, कागदावर उमटलेल्या आणि खर्च होऊनही प्रत्यक्षात उभ्या न राहिलेल्या असंख्य सरकारी आणि खाजगी योजना …. सर्व काही वर्षानुवर्ष अक्कलखाती जमा. देशाच्या अर्थसंकल्पात त्याची कुठेही नोंद नाही.आपल्या देशबांधवांच्या उदार आणि सहनशील मनाचं सर्वात मोठं प्रतिक.

लहानपणी खेळात पहिला डाव हरला की आम्ही म्हणत असू,” हा डाव देवाला”. गेली दीड-दोन वर्ष जागतिक महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट लक्षात घेता अख्ख्या जगालाच” ही दोन वर्ष देवाला” असं म्हणून अक्कलखाती जमा करावी लागणार.

अक्कलखातं जसं आर्थिक आणि वस्तुरूपदृष्ट्या मोठं असावं लागतं, तसंच भावनांचं अक्कलखातं सहिष्णू असल्याशिवाय आयुष्यात तग धरणं अवघड. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून झालेली कानउघडणी आणि कधी कधी अपमानसुद्धा, भरवशाच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारांमध्ये उडालेले खटके, ओढवलेले दुर्दैवी प्रसंग या सर्वांमधून वेळोवेळी होणारा मानसिक कल्लोळ पचवण्यासाठी भावनिक अक्कलखातं बक्कळ मोठं असावं लागतं. “जाऊ दे, विसरून जा” हे अक्कलखात्याच्या बँकेचं ब्रीदवाक्य आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट. शेअर बाजारात पूर्वी जबरदस्त घाटा सहन केल्यामुळे मी डिमॅट अकाउंट बंद करून टाकलं होतं. एक शेअरमहर्षी सद्हेतूने मला भेटायला आला. डिमॅट अकाउंट पुन्हा उघडून देतो म्हणाला. त्याची थोडी गंमत करावी असा खट्याळ विचार मनात आला. ह्या मार्गाने पुन्हा जायचं नाही असा मी कानाला खडा लावला असल्याने त्याला म्हणालो,” जा, तुझ्या बँकेला विचारून ये. डिमॅट खात्याला जोडून एक अक्कलखातं पण देता का?  देत असतील आणि त्यावर चांगलं व्याज मिळत असेल तर लगेच उघडू.” इंग्रजी भाषेत शिकलेल्या त्या भिडूला “अक्कलखातं” ही संज्ञा माहित असण्याची अजिबात शक्यता नव्हती. निष्पापपणे तो म्हणाला,” चौकशी करतो सर”. नंतर परत त्याचा फोन आला नाही

वर्षातून एकदा मी अक्कलखात्याचं पासबुक मनातच भरतो. स्वतः वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अक्कलशून्यतेवर हसून विलक्षण मनोरंजन करून घेण्याचा तो खात्रीशीर मार्ग आहे. स्वतःवर हसलं की खूप मोकळं वाटतं मला. बचत खातं बंद करावं एक वेळ पण अक्कलखातं कधीच नको.

लेखक : डॉ शिरीष भावे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-6… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-6…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

दर्पण असो वा नसो जगी

मुख असते मुखा जागी

जैसे असते तैसे दिसते

ते का कधी वेगळे भासते॥२६॥

 

आपले मुख आपणची पाही

म्हणून का त्यांसि द्रष्टत्व येई

दर्पणी असे अविद्येने भासे

ते खरे मानता विज्ञान फसे॥२७॥

 

म्हणोनि दृश्य पाहता धरी ध्यानी

फसवे हे, परमात्म वस्तु हो मनी॥२८॥

 

वाद्यध्वनी वाचूनही ध्वनी असे

काष्ठाग्नी वाचूनही अग्नी असे

तैसे दृश्यादि भाव जरी नष्टत

मूलभूत ब्रम्हवस्तु असे सदोदित॥२९॥

 

जी न ये शब्दात वर्णता

असतेच परि, जरी न जाणता

तैशी वर्णातीत ब्रम्हवस्तु असे

शब्द, जाणिवांच्या परे असे॥३०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

।। देवधर्म पूजाअर्चा

।। सारं असतं स्वतःसाठी

।। देवाला यातलं काही

।। नको असतं स्वतःसाठी

 

।। फुलं अर्पण करतो देवाला

।। ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?

।। सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा

।। त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

 

।। नैवेद्य जो आपण दाखवतो

।। तो काय देव खातो ?

।। तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

।। भरणपोषण करीत असतो !

 

।। निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

।। ओवाळतो आपण प्रभूला

।। चंद्रसूर्य जातीने

।। हजर ज्याच्या दिमतीला

 

।। स्तोत्रं त्याची गातो ती काय

।। हपापलाय म्हणून स्तुतीला ?

।। निर्गुण निराकार जो

।। त्याला अवडंबर हवंय कशाला ?

 

।। सारं काही जे करायचं

।। ते स्वतःसाठीच असतं करायचं,

।। प्रार्थनेनं देव बदलत नसतो

।। स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !

 

|। आवडलेल्या आमटीचा

।। आवाज करीत मारता भुरका

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकरणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। जबरदस्त डुलकी येते

।। धर्मग्रंथ वाचता वाचता !

।। लहान बाळासारखे तुम्ही

।। खुर्चीतच पेंगू लागता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। देवळापुढील रांग टाळून

।। तुम्ही वेगळी वाट धरता !

।। गरम कांदाभजी खाऊन

।। पोटोबाची पूजा करता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। प्रेमाची हाक येते

।। तुम्ही धुंद साद देता !

।। कवितेच्या ओळी ऐकून

।। मनापासून दाद देता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

कवी :  मंगेश पाडगावकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #191 ☆ व्यंग्य – मुहल्ले का सूरमा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य  ‘मुहल्ले का सूरमा ’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 191 ☆

☆ व्यंग्य ☆ मुहल्ले का सूरमा

बल्लू को हमारे मुहल्ले का दादा कह सकते हैं। काम-धंधा कुछ नहीं। दो चार उसी जैसे दोस्त मिल गए हैं, उन्हीं के साथ सारे दिन इधर- उधर डोलता रहता है। अक्सर चौराहे पर हा हा हू हू करता नज़र आता है। कभी सड़क के किनारे दोस्तों के साथ बैठा ताश खेलता है। शाम के बाद आप देखें तो बल्लू और उसके साथी आपको नशे में सड़क के किनारे किसी गिट्टी के ढेर पर पड़े भी मिल सकते हैं।

पता नहीं क्यों मेरे प्रति बल्लू की बड़ी भक्ति है। वह अक्सर मुझे अपने आचरण की सफाई देता रहता है— ‘बड़े भैया, पुरखों ने खूब कमा कर रखा है। दो तीन मकान हैं, जमीन जायदाद है। बाप कमा रहा है, भाई कमा रहे हैं। तो कोई इस कमाई को बराबर करने वाला भी चाहिए। यह काम हम कर रहे हैं। सभी कमाने लगें तो कैसे काम चलेगा?’

और वह खी खी कर हँसने लगता है।

वह इधर-उधर छीन-झपट भी करता है। मुहल्ले के दुकानदारों को आंँखें दिखा कर नशा-पानी के लिए पच्चीस पचास रुपये झटक लेता है। दुकान वाले उसके और उसके साथियों के रंग-ढंग देखकर ज़्यादा झंझट नहीं करते। मुहल्ले में आने वाले सब्जी वालों से भी वह जब तब दस बीस रुपये ऐंठ लेता है।

बल्लू मुझे हँसकर बताता है, ‘क्या करें बड़े भैया, घरवालों पर ज्यादा बोझ डालना ठीक नहीं। थोड़ा बहुत अपने बूते से भी पैदा करना चाहिए। यह दुकानदार सब को लूटते हैं। अगर हम इन्हें थोड़ा सा लूट लेते हैं तो क्या बुरा है?’

बल्लू अक्सर चौराहे पर किसी से उलझता रहता है। दो-चार दिन में उसके साथियों की किसी न किसी से झंझट या थोड़ी बहुत मारपीट होती रहती है। अक्सर चौराहे पर मजमा लग जाता है। बल्लू ऐसे मौकों पर अपनी पूरी शूरवीरता दिखाता है। लाठियाँ, साइकिल की चेनें और चाकू हवा में लहराते हैं, लेकिन अक्सर वे चलते नहीं।

बल्लू में एक और खराब आदत है, आते जाते लोगों को परेशान करने की। चौराहे पर वह किसी को भी रोक कर उसे तंग करता है। कोई धोती वाला देहाती हुआ तो उसकी धोती की लाँग खींच देता है। कभी किसी की बुश्शर्ट उतरवा कर अपने पास रख लेता है। किसी को रोककर उससे घंटों ऊलजलूल सवाल करना और फिर ताली पीट-पीटकर ठहाका लगाना उसका प्रिय खेल है। आसपास रहने वाले उसकी इस हरकत पर भौंहें चढ़ाते हैं, लेकिन उनकी सफेदपोशी उन्हें बल्लू और उसके साथियों से उलझने नहीं देती।

मैं समझाता हूँ तो बल्लू कहता है, ‘अरे बड़े भैया, थोड़ा सा मनोरंजन ही तो करते हैं, वह भी आप लोगों को बुरा लगता है। कौन किसी की जान लेते हैं। आप लोगों से हमारा थोड़ा सा भी सुख देखा नहीं जाता।’

एक दिन दुर्भाग्य से बल्लू ने मनोहर को पकड़ लिया। मनोहर दिमाग से कुछ कमज़ोर है। बगल की डेरी में वह दूध लेने जाता  है। एक शाम बल्लू ने उसे रोक लिया और घंटे भर तक उसे बहुत परेशान किया। मनोहर चीखता- चिल्लाता रहा, लेकिन बल्लू ने उसे घंटे भर तक नहीं छोड़ा। उसके थोड़ी देर बाद ही चौराहे पर मजमा लग गया। पता चला कि मनोहर का बड़ा भाई झगड़ा करने आया था। काफी देर तक गरम बातचीत होती रही, लेकिन बल्लू के साथियों की उपस्थिति के कारण उसी का पलड़ा भारी रहा। मनोहर का भाई स्थिति को अपने पक्ष में न देख कर लौट गया।

इस घटना के दो दिन बाद ही रात को बल्लू के घर पर आक्रमण हुआ। पन्द्रह बीस लोग थे, लाठियों और दूसरे हथियारों से लैस। बड़ी देर तक लाठियाँ पटकने की और गन्दी गालियों की आवाज़ें आती रहीं। सौभाग्य से बल्लू बाबू उस वक्त अपने दोस्तों के साथ कहीं मटरगश्ती कर रहे थे, इसलिए उस वक्त वे हमलावरों के हाथ नहीं पड़े। लगभग आधे घंटे तक लाठियाँ पटक कर वे लौट गये।

दूसरे दिन सबेरे मैंने देखा कि बल्लू पागलों की तरह अपने घर के सामने घूम रहा था। उसके साथी भी व्यस्तता से उसके आसपास चल- फिर रहे थे। थोड़ी देर बाद वह मेरे घर आ गया। सोफे पर बैठ कर वह उसके हत्थे पर बार-बार मुट्ठियाँ पटकने लगा। दाँत पीसकर बोला, ‘बड़े भैया, हमारी बड़ी इंसल्ट हो गई। अरे, हमारे घर कोई हमें मारने आये और बिना हाथ-पाँव तुड़ाये वापस चला जाए? अरे, हम उस वक्त घर में क्यों न हुए! हमारी बड़ी किरकिरी हो गयी, बड़े भैया।’

वह मिसमिसा मिसमिसा कर अपने बाल नोचता था और सोफे के हत्थे पर बार-बार मुट्ठियाँ पटकता था। फिर बोला, ‘अब आप हमारा भी जोर देखना, बड़े भैया। मैंने भी उनके हाथ पाँव न तोड़ दिये तो मेरा नाम बल्लू उस्ताद नहीं।’ कहते हुए उसने अपनी छोटी सी मूँछ पर हाथ फेरा।

बल्लू तो अपनी योजना ही बनाते रह गये और दो-तीन दिन बाद रात को फिर उनके घर पर जोरदार हमला हुआ। उस रात बल्लू बाबू अपने तीन चार साथियों के साथ घर पर ही थे। उनके पास भी कुछ अस्त्र-शस्त्र थे, लेकिन जब उन्होंने हमलावरों की संख्या और उनके तेवर देखे तब वे जान बचाने के लिए पीछे की दीवार फाँद कर भागे। बल्लू बाबू भी भागे, लेकिन भागते भागते भी हमलावरों ने उनके पृष्ठ भाग पर एक लाठी समर्पित कर दी ताकि सनद रहे और सावन- भादों कसकती रहे। भागते हुए बल्लू बाबू को सुनाई पड़ा— ‘बेटा, भाग कर कहाँ जाओगे? हम तुम्हें छोड़ेंगे नहीं।’

अगले सबेरे बल्लू के घर के सामने सन्नाटा था। दो दिन तक बल्लू मुझे कहीं नहीं दिखा। तीसरे सबेरे देखा वह बगल में एक दरी लपेटे आ रहा था, जैसे कहीं से सो कर आ रहा हो। उसके बाद वह मुहल्ले में घूमता दिखा, लेकिन वह एक अलवान सिर पर ओढ़े, बिलकुल चुपचाप चलता था। उसकी दाढ़ी बढ़ी हुई थी। सिर पर चादर का घूँघट सा डाले वह सिर झुकाए सड़क के किनारे-किनारे एक शान्तिप्रिय नागरिक की तरह चलता था। उसके सारे दोस्त गायब हो गये थे।

एक दिन वह उसी तरह चादर ओढ़े  धीरे-धीरे चलता हुआ मेरे कमरे में आकर बैठ गया। बढ़ी हुई दाढ़ी और चादर में वह पहचान में नहीं आता था।

बैठकर वह थोड़ी देर सिर झुकाये सोचता रहा, फिर धीरे-धीरे बोला, ‘बड़े भैया, सुना है वे लोग फिर कुछ गड़बड़ करने की योजना बना रहे हैं। लेकिन अपन ने सोच लिया है कि अपन को कुछ नहीं करना। अपन हमेशा शान्ति से रहते आये हैं, अपन शान्ति से ही रहेंगे।’

फिर थोड़ा रुक कर बोला, ‘बड़े भैया, आप तो जानते ही हैं मैं शुरू से बहुत सीधा-सादा लड़का रहा हूँ। वह तो संगत खराब मिल गयी, इसलिए थोड़ा बहक गया था। लेकिन अब अपन ने सोच लिया, खराब लड़कों को पास भी नहीं फटकने देना। बस आप लोगों की संगत करूँगा और आराम से रहूँगा।’

वह रुक कर फिर बोला, ‘बड़े भैया, अपन को झंझट बिल्कुल पसन्द नहीं, इसलिए हमने रात को घर में सोना ही छोड़ दिया। कहीं भी इधर उधर सो जाते हैं। अरे, जब हमीं नहीं मिलेंगे तब किस से मारपीट होगी? झगड़े की जड़ ही खतम कर दो।’

फिर वह मेरे मुँह की तरफ देख कर बोला, ‘बड़े भैया, हम आपके पास इसलिए आये हैं कि आप मनोहर के भाई से मिलकर मेरी सुलह- सफाई करा दो। वह आपकी बात मान लेगा। अब जो हो गया सो हो गया। थोड़ी बहुत गलती तो इंसान से हो ही जाती है। आप अभी जाकर बात कर लो तो बड़ी कृपा हो। उस दिन से अपना मन किसी काम में नहीं लगता। मैं यहीं आपका इन्तजार करूँगा।’

मैं मध्यस्थता करने के लिए राजी हो गया। कपड़े बदल कर जब मैं सीढ़ियाँ उतरा तब वह ऊपर से लगातार मुझसे बोले जा रहा था—‘बड़े भैया, यह काम जरूर होना चाहिए। वह माफी माँगने को कहेंगे तो अपन माफी भी माँग लेंगे। मुहल्ले वालों से माफी माँगने में अपनी कोई इज्जत नहीं जाती। लेकिन यह काम जरूर होना चाहिए। आपका ही आसरा है।’

वह ऊपर से टकटकी लगाये मुझे देखता रहा और मैं हाथ हिला कर आगे बढ़ गया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 138 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media# 138 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 138) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 138 ?

☆☆☆☆☆

सुना है बहुत बारिश है

तुम्हारे शहर में,

ज्यादा भीगना मत…

धुल गयी अगर

सारी ग़लतफ़हमियाँ,

तो बहुत याद आएँगे हम..!

☆ ☆

Just heard it’s pouring

a lot in your city

Don’t get wet too much…

else misunderstandings

will get washed away

and you’ll miss me a lot..!

☆☆☆☆☆

 तुमसे कहा था कि हर शाम

हमारा हाल पूछ लिया करो

तुम ही बदल गए हो तो अब

शहर में शाम ही नहीं होती..!

☆ ☆

Told you that every evening

inquire about my well-being

Since you’ve changed now

there’s no evening in my city!

☆☆☆☆☆

I’m Wrong, You’re Right

☆☆☆

किसी से अब उलझने

का मन ही नहीं करता,

तुम सही, मैं गलत में

ही बस बात ख़त्म…!

☆ ☆

I just don’t feel like getting into

argument with anyone anymore…

You are right, I am wrong, that’s it,

and the matter ends there only…!

 ☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 189 ☆ परिदृश्य ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 189 परिदृश्य ?

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः।

न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्।।

अर्थात ‘न ऐसा ही है कि मैं किसी काल में नहीं था या तू नहीं था अथवा ये सारे राजा नहीं थे और न ऐसा ही है कि इससे आगे हम सब नहीं रहेंगे।’

श्रीमद्भगवद्गीता के दूसरे अध्याय के द्वादशवें श्लोक के माध्यम से आया यह योगेश्वर उवाच मनुष्य जीवन के शोध और सरल बोध का पाथेय है। 

मनुष्य जीवन यद्यपि सहजता और सरलता का चित्र है पर मनुष्य विचित्र है। वह सरल को जटिल बनाने पर तुला है। इस सत्य के अवलोकन के लिए किसी प्रकार के प्रज्ञाचक्षु की आवश्यकता नहीं है। जीवन का अपना अनुभव पर्याप्त है। केवल अपने अनुभव  को पढ़ा जाय, अपने अनुभव को गुना जाय तो प्रकृति की सरलता में विद्यमान गूढ़ रहस्य सहज ही सुलझने होने लगते हैं।

एक उदाहरण मृत्यु का लें। मृत्यु अर्थात देह से चेतन तत्व का विलुप्त होना। कभी ग़ौर किया कि किसी एक पार्थिव के विलुप्त होने पर एक अथवा एकाधिक निकटवर्ती मानो उसका ही प्रतिबिम्ब बन जाता है। कई बार अलग-अलग परिजनों में दिवंगत के स्वभाव, शैली, व्यक्तित्व का अंश दिखने लगता है।

“इसका चेहरा दिवंगत जैसा दिखता है। वह दिवंगत की तरह बातें करता है, हँसता है, नाराज़ होता है। उसकी लिखाई दिवंगत जैसी है, वह उठता-बैठता स्वर्गीय जैसा है।”  ऐसा नहीं है कि ये बातें केवल मनुष्य तक सीमित हैं। देखें तो पक्षियों और प्राणियों पर, चर और अचर पर भी लागू है यह सूत्र। 

विज्ञान इसे डीएनए का प्रभाव जानता है, अध्यात्म इसे अमरता का सिद्धांत मानता है।

सत्य यही है कि जानेवाला कहीं नहीं जाता पर किसी एक या अनेक में बँटकर यहीं विद्यमान रहता है। विचार करने पर पाओगे कि विधाता ने तुम्हें सूक्ष्म की अमरता दी है पर तुम स्थूल की नश्वरता तक सीमित रह जाते हो। अपनी रचना ‘सुदर्शन’ में इस अमरता को अभिव्यक्त करने का प्रयास किया था,

जब नहीं रहूँगा मैं

और बची रहेगी सिर्फ़ देह,

उसने सोचा….,

सदा बचा रहूँगा मैं

और कभी-कभार नहीं रहेगी देह,

उसने दोबारा सोचा…,

पहले से दूसरे विचार तक

पड़ाव पहुँचा,

उसका जीवन बदल गया…,

दर्शन क्या बदला,

जो नश्वर था कल तक,

आज ईश्वर हो गया..!

स्मरण रहे, जब कोई एक होता अदृश्य है तो दूसरा हो जाता उसके सदृश्य है। हर ओर यही दृश्य है, जगत का यही परिदृश्य है।…इति।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

💥 अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक 💥

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ एक चतुर नार… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “एक चतुर नार”।)  

? अभी अभी ⇒ एक चतुर नार? श्री प्रदीप शर्मा  ? 

पुरुष के कई प्रकार हो सकते हैं लेकिन नारी के मेरी दृष्टि में केवल दो प्रकार ही होते हैं। एक सीधी सादी महिला और एक समझदार महिला। जो समझदार होता है, उसे चतुर कहते हैं। चतुर होना और सीधा होना, दोनों मानवीय गुण हैं।

सन् 1968 में एक हास्य प्रधान फिल्म आई थी, पड़ोसन जिसकी नायिका एक चतुर नार थी और नायक एक भोला भाला इंसान।

वो लड़की बिंदु थी, और वो लड़का भोला था और एक संगीत मास्टर बिंदु को संगीत सिखाने आते थे, लेकिन सिखाते कुछ और ही थे। ।

बिंदु नायिका का नाम था। बिंदु की मां को बिंदु की शादी की बड़ी चिंता रहती थी, जब कि बिंदु के पिताजी का कहना था, जब जब जो जो होना होता है, तब तब सो सो होता है, बिंदु की मां।

इसी फिल्म का एक लोकप्रिय गीत था, एक चतुर नार बड़ी होशियार ! क्या नारी ही चतुर होती है, पुरुष नहीं होता ? शास्त्रों में चतुर शब्द का अर्थ बुद्धिमान और प्रज्ञा वान भी बताया गया है। गीतकार प्रदीप फिर भी कह गए हैं, कोई लाख करे चतुराई, करम का लेख मिटे ना रे मेरे भाई। ।

आप मानें या ना मानें, पुरुषों की तुलना में महिलाएं अधिक चतुर और समझदार होती हैं। वे घर की मालकिन भी हैं और अन्नपूर्णा भी। उनसे ही घर घर कहलाया। बहुत कम घर ऐसे होंगे जहां चूड़ियों की खनक ना हो, फिर भी रौनक हो। घर के बर्तनों की आवाज़ में जब किसी किसी समझदार महिला की आवाज़ शामिल होती है, तब ही मेहमान समझ जाता है, बस अब चाय और नाश्ते की ट्रे आई ही आई।

अगर औरत चतुर ना हो, तो पुरुष घर का तो कबाड़ा ही कर डाले। पाई पाई कैसे बचाई जाती है, काम वाली बाई से कैसे काम लिया जाता है, सब्जी वाले से कितना मोल भाव किया जाता है, यह सब पुरुषों का विभाग है ही नहीं। सुनो, पेपर वाला आया है, उसका हिसाब कर दो। और पेपर वाला भी समझ जाता है, घर के कैलेंडर में दूध वाले के साथ उसका भी हिसाब होना है। मजाल है एक भी नागा छूट जाए। ।

हमारे बोलचाल की भाषा में ऐसे गुणी लोगों को चतरा और चतरी कहते हैं। जिस घर में पुरुष सीधा है वहां महिला का तेज तर्रार होना बहुत ज़रूरी है। क्या बात है, आज बाई साब नहीं हैं, मायके गई हैं, अच्छा इसीलिए शांति है। और पुरुष घर में हो, ना हो, क्या फर्क पड़ता है। होगा कहीं किताबों, अथवा टीवी न्यूज के बीच।

जो पुरुष चतरे होते हैं उन्हें सयाना नहीं श्याणा कहते हैं। अधिक शंकालु एवं कंजूस किस्म के लोग होते हैं ये। फिर भी समय हमें सावधान तो करता ही रहता है। आज जब कोरोना का प्रकोप जारी है, सावधानी और चतुराई में ही समझदारी है। व्यवहार में और अधिक संयत और सतर्क रहना जरूरी है। ।

आज मानवीय रिश्ते दांव पर लगे हुए हैं। भलमनसाहत और सीधा पन अभिशाप बन चुका है। केवल अपना हित साधना ही समय की मांग है। किसी को गले लगाना, पास बिठाना, सुख दुख की बात करना, मानो एक सपना था। अब टूट गया है। टूट गई है माला, मोती बिखर गए। दो दिन रहकर साथ, जाने किधर गए।

इतनी भयानक त्रासदी के बीच भी लोगों का राग द्वेष कम नहीं हो रहा। स्वार्थ और लालच बढ़ता ही जा रहा है। क्या इंसान वाकई ज़्यादा चतुर हो गया है। इसे केवल समय की दोहरी मार ही कहा जा सकता है। ।

 हम चतरे भले ही नहीं, लेकिन आज मजबूर हैं, असहाय हैं, दिल टूटा है फिर भी, मत कहिए किसी को ;

पास बैठो, तबियत बहल जाएगी

मौत भी आ गई हो, तो टल जाएगी।

कुछ इस तरह की चतुराई ईश्वर ना करे, शायद हमें भी दिखानी पड़े ;

दूर रहकर ही करो बात

करीब ना आओ।

हो सके तो अब फोन पर ही बतियाओ। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈