English Literature – Poetry ☆ The Grey Lights# 45 – “Things…” ☆ Shri Ashish Mulay ☆

Shri Ashish Mulay

? The Grey Lights# 45 ?

☆ –Things ☆ Shri Ashish Mulay 

Things you haven’t got

are the strings

that make you move

and the things you have got

are the wings that lift you

 *

things will be there

like a forever glue

be detached

or become a thing too

when a thing is missed

crying is what children do

but in the next moment

find something else to do

 *

be the child of destiny

and things won’t affect you

like a child plays in a clay

play with the earth, will you?

 

© Shri Ashish Mulay

Sangli 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈




हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 359 ⇒ जल संकट… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “जल संकट।)

?अभी अभी # 359 ⇒ जल संकट? श्री प्रदीप शर्मा  ?

पानी इतना दीजिए

जा मे कुटुंब नहाय।

मैं भी प्यासा ना रहूं

पंछी न प्यासा जाय ।।

जब तक किसी वस्तु का अभाव अथवा असुविधा महसूस नहीं होती, हमारा उस पर ध्यान नहीं जाता। जलसंकट का अनुभव भी उसे ही होता है, जिसे पानी नहीं मिलता। गर्मी में पानी बिजली हमारी मूलभूत समस्या है। जहां नियमित जल प्रदाय होता रहता है, वहां इस संकट को महसूस नहीं किया जा सकता।

बढ़ते शहर की प्यास भी तो बढ़ेगी। गर्मी के शुरू होते ही, अधिकांश ट्यूब वेल सूख जाते हैं और सड़कों पर टैंकर दौड़ने लगते हैं। जब तक आप पैसा फेंकते रहेंगे, आपको पानी मिलता रहेगा। कुंए बावड़ी तो अब झांकने को भी नहीं मिलते।।

प्यास लगते ही कुंआ नहीं खोदा जाता, और खोदने के पश्चात् भी पानी की संभावना क्षीण ही रहती है। कुंआ खोदने से बेहतर है, वृक्षारोपण किया जाए, बारिश के पानी को रोका जाए, रीसाइकल किया जाए। जो पेड़ शहर के विकास में बाधा पहुंचाएंगे, उनको तो फिर भी काटा ही जाएगा।

हर आदमी पैसा फेंककर तमाशा नहीं देख सकता।

इधर आदमी को प्यास बढ़ती जा रही है और उधर पानी कम होता चला जा रहा है। याद आते हैं वे दिन, जब जगह जगह सड़कों पर प्याऊ नजर आ जाती थी। क्या एक्वागार्ड और आरो का पानी पीने वाला व्यक्ति इस पानी से अपनी प्यास बुझाएगा। वह तो अपने साथ हमेशा बिसलेरी की बॉटल लेकर चलता है। उसे अपनी सेहत का खयाल भी तो रखना है।।

आसमान की ओर देखो, तो सूरज आग उगल रहा है, और इधर पंखे भी गर्म हवा फेंक रहे हैं। कूलर पैसा और पानी दोनों मांगता है, अब सरकार मुफ्त राशन की तरह मुफ्त एसी तो सबको प्रदान नहीं कर सकती।

गर्मी में ठंड कैसे रखी जाए, इंसान ने पैसा कमाना तो सीख लिया, काश वह पानी बचाना भी सीख पाता, तो उसे गर्मी में पैसा पानी की तरह नहीं बहाना पड़ता।।

क्या समय आ गया है, हमें हवा और पानी दोनों खरीदने पड़ रहे हैं। पंखे, कूलर और ए.सी.की हवा क्या खरीदी हुई नहीं है। पानी पर तो वैसे भी डायरेक्ट जल कर के रूप में टैक्स है ही, हवा पर भी इनडायरेक्ट तौर पर टैक्स लगा हुआ है।

अंग्रेज गर्मियों में हिल स्टेशन चले जाते थे, और साथ साथ राजधानी भी वहीं ले जाते थे। वे भले ही चले गए हों, हमारे लिए गर्मियों की छुट्टियां छोड़ गए थे। इधर परीक्षा खत्म हुई और उधर गर्मी की छुट्टियां शुरू, और सभी साहबजादे चले ननिहाल।

गांव की हरियाली और प्राकृतिक हवा पानी में कैसी गर्मी और कैसी प्यास। छुट्टियां गुजर जाती, मगर प्यास नहीं बुझती थी।।

झूठ क्यूं बोलें, हमें ईश्वर ने हवा भी छप्पर उड़ाकर दी है, और पानी भी छप्पर फाड़कर। याद आते हैं वे दिन, जब नालीदार पतरों की छत से बारिश का पानी टप टप, टपकता था, कहीं बूंद बूंद, तो कहीं धाराप्रवाह। घर के सभी बर्तन, घड़ा, बाल्टी, तपेली, परात, और तो और ग्लास लोटे तक कार सेवा में सहयोग प्रदान करते थे। इतनी बारिश के बाद आंगन में लगे दो नीम और एक गूगल का पेड़, साल भर मस्ती में झूमते रहते थे। उनकी छांव में कहां कभी गर्मी महसूस हुई। माता पिता के साये के साथ इन दरख्तों की छांव भी हमसे छिन गई।

गर्मी पर फिलहाल चुनावी सरगर्मी हावी है। लोकतंत्र का उत्सव वैसे भी पांच वर्ष में एक बार ही तो आता है, जीवन के सुख दुख, और धूप छांव का हंसी खुशी से सामना करते हुए एक सुरक्षा और सुकून की आस में, अगर थोड़ा तप लेंगे तो क्या बुरा है।

अब कोई हवा पानी की भी मुफ्त की गारंटी देने से तो रहा। अगर गर्मी और जलसंकट से बचना चाहते हैं तो आप भी लेह लद्दाख घूम आइए, वर्ना बत्ती गुल होने पर, हाथ से पंखा झलिये और पसीने में नहाइए।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 185 ☆ गीत – अभिन्न ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है गीत – अभिन्न…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 184 ☆

एक गीत – अभिन्न ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

 

हो अभिन्न तुम

निकट रहो

या दूर

*

धरा-गगन में नहीं निकटता

शिखर-पवन में नहीं मित्रता

मेघ-दामिनी संग न रहते-

सूर्य-चन्द्र में नहीं विलयता

अविच्छिन्न हम

किन्तु नहीं

हैं सूर

*

देना-पाना बेहिसाब है

आत्म-प्राण-मन बेनक़ाब है

तन का द्वैत, अद्वैत हो गया

काया-छाया सत्य-ख्वाब है

नयन न हों नम

मिले नूर

या धूर

*

विरह पराया, मिलन सगा है

अपना नाता नेह पगा है

अंतर साथ श्वास के सोया

अंतर होकर आस जगा है.

हो न अधिक-कम

नेह पले

भरपूर

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

९.४.२०१६

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (6 मई से 12 मई 2024) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

विज्ञान की अन्य विधाओं में भारतीय ज्योतिष शास्त्र का अपना विशेष स्थान है। हम अक्सर शुभ कार्यों के लिए शुभ मुहूर्त, शुभ विवाह के लिए सर्वोत्तम कुंडली मिलान आदि करते हैं। साथ ही हम इसकी स्वीकार्यता सुहृदय पाठकों के विवेक पर छोड़ते हैं। हमें प्रसन्नता है कि ज्योतिषाचार्य पं अनिल पाण्डेय जी ने ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के विशेष अनुरोध पर साप्ताहिक राशिफल प्रत्येक शनिवार को साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हम सभी आपके हृदयतल से आभारी हैं। साथ ही हम अपने पाठकों से भी जानना चाहेंगे कि इस स्तम्भ के बारे में उनकी क्या राय है ? 

☆ ज्योतिष साहित्य ☆ साप्ताहिक राशिफल (6 मई से 12 मई 2024) ☆ ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय ☆

साप्ताहिक राशिफल की श्रृंखला में मैं पंडित अनिल पाण्डेय आज आपको 6 मई से 12 मई 2024 अर्थात विक्रम संवत 2021 शक संवत 1946 के वैशाख कृष्ण पक्ष की त्रयोदशी से वैशाख शुक्ल पक्ष की पंचमी तक के सप्ताह के साप्ताहिक राशिफल को बताने के लिए जा रहा हूं।

इस सप्ताह चंद्रमा प्रारंभ में मीन राशि का रहेगा। 6 तारीख को 4:31 शाम से मेष राशि में प्रवेश करेगा। 8 तारीख को चंद्रमा 7:42 रात से वृष राशि का हो जाएगा। 10 तारीख को 12:32 रात से चंद्रमा मिथुन राशि में गोचर करेगा।

इस सप्ताह सूर्य और शुक्र मेष राशि में रहेंगे। मंगल ग्रह मीन राशि में रहेगा। गुरु ग्रह वृष राशि में और शनि ग्रह कुंभ राशि में गोचर करेगा। बुध प्रारंभ में मीन राशि में रहेगा तथा 10 तारीख को 10:44 रात से मेष राशि में प्रवेश करेगा। वक्री राहु पूरे सप्ताह मीन राशि में रहेगा।

इस सप्ताह विवाह का कोई मुहूर्त नहीं है। 6 और 9 तारीख को नामकरण का मुहूर्त है। 9 और 10 तारीख को अन्नप्राशन का मुहूर्त है। 10 तारीख को व्यापार का मुहूर्त है।

इस सप्ताह 8 तारीख को विश्व रेड क्रॉस दिवस है 10 तारीख को परशुराम जयंती और अक्षय तृतीया है। आप सभी को परशुराम जयंती की हार्दिक बधाई।

 सर्वार्थ सिद्ध योग 7 मई को सूर्योदय से 3:06 दिन तक है। 8 मई को यह योग 1:55 दिन से रात अंत तक है।

अमृत सिद्ध योग 7 तारीख को सूर्योदय से 3:06 दिन तक है।

आइये अब हम राशिवार राशिफल की चर्चा करते हैं।

मेष राशि

इस सप्ताह अभी आपका स्वास्थ्य ठीक रहना चाहिए। जिन मेष राशि के जातकों का अभी तक विवाह नहीं हुआ है उनके विवाह के अच्छे प्रस्ताव आएंगे। धन प्राप्त होने में कुछ कमी आ सकती है। कचहरी के कार्यों में आपको सफलता प्राप्त होगी। भाई बहनों के साथ संबंध मैं थोड़ा तनाव आ सकता है परंतु संबंध सामान्य रहेंगे। जीवनसाथी का स्वास्थ्य थोड़ा गड़बड़ हो सकता है। माता जी और पिताजी का स्वास्थ्य ठीक रहेगा। दुर्घटनाओं से बचने का प्रयास करें। इस सप्ताह आपके लिए 7 और 8 तारीख बहुत अच्छी है। 7 और 8 तारीख को आपके अधिकांश कार्य सफल हो सकते हैं। 9 और 10 तारीख को अगर आप प्रयास करेंगे तो धन की प्राप्ति हो सकती है। 6 तारीख को आपको सावधान रहकर कोई भी कार्य करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप शुक्रवार के दिन मंदिर जाकर गरीबों के बीच में चावल का दान दें। चावल का यह दान आप गरीबों को पूरे सप्ताह भी दे सकते हैं। आपका शुभ दिन मंगलवार है।

वृष राशि

इस सप्ताह आपका स्वास्थ्य ठीक रहेगा। कचहरी के कार्यों में सफलता मिल सकती है। आपका पुराना कर्ज समाप्त हो सकता है। धन आने की उम्मीद की जा सकती है। कार्यालय में आपकी स्थिति मजबूत रहेगी। आपको संतान से सहयोग प्राप्त हो सकता है। परंतु यह सहयोग बहुत ज्यादा नहीं होगा। भाई बहनों के साथ संबंधों में तनाव हो सकता है। इस सप्ताह आपके लिए 9 और 10 तारीख लाभकारी है। 9 और 10 तारीख को किए गए आपके सभी कार्य सफल होंगे। सात और 8 तारीख को आपको कोई भी कार्य बड़ी सावधानी पूर्वक करना चाहिए। आपको चाहिए कि आप इस सप्ताह प्रतिदिन राम रक्षा स्त्रोत का जाप करें और रामचंद्र जी या भगवान कृष्ण के मंदिर में जाकर दर्शन भी करें। सप्ताह का शुभ दिन शुक्रवार है।

मिथुन राशि

आपका स्वास्थ्य ठीक रहेगा। धन आने की कई संयोग बनेंगे। अच्छी मात्रा में धन आएगा। कार्यालय में आपकी स्थिति मजबूत होगी। भाग्य आपका साथ दे सकता है। भाई बहनों के साथ संबंध ठीक-ठाक रहेंगे। कचहरी के कार्यों में रिस्क ना लें। इस सप्ताह आपके लिए 6, 11 और 12 तारीख किसी भी कार्य को करने के लिए अनुकूल है। इन तारीखों में किए गए अधिकांश कार्य सफल होंगे। 9 और 10 तारीख को कोई भी कार्य करने के पहले पूरी सावधानी बरतें। इस सप्ताह आपको चाहिए कि आप काले कुत्ते को रोटी खिलाएं। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

कर्क राशि

इस सप्ताह आपका और आपके जीवन साथी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। पिताजी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। माता जी के स्वास्थ्य में थोड़ी सी परेशानी हो सकती है। कार्यालय में आपकी स्थिति अच्छी रहेगी। मगर कुछ लोग आपको परेशान करने के लिए प्रयास करेंगे। इस सप्ताह आपके पास धन आने के अच्छे संयोग बनेंगे। भाई बहनों के साथ संबंध थोड़ा खराब हो सकता है। इस सप्ताह आपके लिए 7 और 8 तारीख लाभकारी है। 7 और 8 तारीख को आपके द्वारा किए गए अधिकांश कार्य सफल रहेंगे। 12 तारीख को आपको बड़ी सावधानी से कोई भी कार्य करना चाहिए। अगर आप सावधानी नहीं बरतेंगे तो आप असफल हो सकते हैं। इस सप्ताह आपको चाहिए कि आप गाय को हरा चारा खिलाएं। इस सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

सिंह राशि

इस सप्ताह आपका और आपके जीवनसाथी का स्वास्थ्य ठीक रहेगा। आपको गर्दन या कमर में दर्द की थोड़ी परेशानी हो सकती है। ‌आपके पिताजी के स्वास्थ्य में थोड़ी गड़बड़ी हो सकती है। माता जी का स्वास्थ्य अच्छा रहेगा। भाग्य आपका इस सप्ताह अच्छी तरह से साथ देगा। परंतु आप लॉटरी खरीदने का प्रयास न करें। दुर्घटनाओं से आप बच जाएंगे। इस सप्ताह आपके लाभ में कमी आएगी अर्थात खर्च आमदनी से ज्यादा रहेगा। इस सप्ताह आपके लिए 9 और 10 तारीख उत्तम है। 9 और 10 तारीख को आप जो भी कार्य करेंगे उसमें आप सफल रहेंगे। 6 तारीख को आपको सावधान रहकर कोई भी कार्य करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप शनि देवता की पूजा करें। सप्ताह का शुभ दिन बृहस्पतिवार है।

कन्या राशि

इस सप्ताह आपका व्यवसाय ठीक चलेगा। व्यवसाय में वृद्धि भी हो सकती है। भाग्य इस सप्ताह आपका कम साथ देगा। परंतु 9 और 10 तारीख को आपको भाग्य से कई फायदे हो सकते हैं। आपके शत्रु इस सप्ताह चुपचाप बैठे रहेंगे। आपको खून संबंधी कोई बीमारी हो सकती है। कार्यालय में आपकी प्रतिष्ठा में कमी आएगी। इस सप्ताह आपके लिए 11 और 12 तारीख उत्तम है। 6, 11 और 12 तारीख को किए गए अधिकांश कार्य सफल होंगे। साथ और आठ को आपको सावधान रहकर के ही कोई कार्य करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन रुद्राष्टक का पाठ करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

तुला राशि

अगर आप अविवाहित हैं तो इस सप्ताह आपके लिए विवाह के अच्छे प्रस्ताव आएंगे। अगर आप विवाहित हैं तो इस सप्ताह आपके जीवनसाथी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। आपके स्वास्थ्य में थोड़ी सी समस्या आ सकती है। मानसिक रूप से आप अपने आप को कमजोर महसूस कर सकते हैं। आपको अपने संतान से उत्तम सहयोग प्राप्त होगा। अगर आप थोड़ा प्रयास करेंगे तो आप अपने शत्रुओं को इस सप्ताह परास्त कर सकेंगे। इस सप्ताह आपके लिए 7 और 8 तारीख फलदायक है। 7 और 8 को आप द्वारा किए गए अधिकांश कार्य सफल हो सकते हैं। 6, 9 और 10 तारीख को आप कोई भी कार्य संभल कर करें। इस सप्ताह आपको चाहिए कि आप शनिवार को दक्षिण मुखी हनुमान जी के मंदिर में जाकर कम से कम पांच बार हनुमान चालीसा का जाप करें। इसके अलावा प्रतिदिन भी आप हनुमान चालीसा का जाप करें। सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

वृश्चिक राशि

आपका और आपके माता जी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। पिताजी और आपके जीवनसाथी के स्वास्थ्य में थोड़ी बहुत परेशानी आ सकती है। अगर आप प्रयास करेंगे तो आप अपने सभी शत्रुओं को परास्त कर सकते हैं। अगर आप चाहेंगे तो कर्ज से आपको मुक्ति मिलना प्रारंभ हो जाएगा। आपको अपने संतान से अच्छा सहयोग प्राप्त होगा। संतान की उन्नति भी हो सकती है। इस सप्ताह 9 और 10 तारीख आपके लिए उत्तम है। 9 और 10 तारीख को आप जो भी कार्य करेंगे उसमें आपको सफलता प्राप्त होगी। इसके अलावा सप्ताह के सभी दिनों में आपको सतर्क रहकर कार्य करने की आवश्यकता है। अन्यथा आप कार्य में असफल हो जाएंगे। इस सप्ताह आपको चाहिए कि आप सोमवार का व्रत करें और चंद्र के मंत्र ओम सों सोमाय नमः का जाप करें। सप्ताह का शुभ दिन बृहस्पतिवार है।

धनु राशि

आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा। आपके सुख में वृद्धि होगी। जनता में आपकी प्रतिष्ठा बढ़ेगी। भाई बहनों के साथ संबंध ठीक रहेंगे। माता जी का स्वास्थ्य उत्तम रहेगा। पिताजी के स्वास्थ्य में थोड़ी सी तकलीफ हो सकती है। आपके जीवनसाथी का स्वास्थ्य भी ठीक रहेगा। आपकी संतान का आपको अच्छा सहयोग प्राप्त होगा। छात्रों की पढ़ाई अच्छी चलेगी। संतान की उन्नति भी हो सकती है। इस वर्ष आप पेट रोग से सावधान रहें। इस सप्ताह आपके लिए 6 तथा 11 और 12 तारीख लाभदायक है। 6 तथा 11 और 12 तारीख में आप द्वारा किए गए अधिकांश कार्य सफल होंगे। 9 और 10 तारीख को आपको सावधान रहने की आवश्यकता है। 9 और 10 को आप कोई भी कार्य पूर्ण सावधानी से करें। इस सप्ताह आपको चाहिए कि आप गणेश अथर्वशीर्ष का प्रतिदिन पाठ करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

मकर राशि

आपका अपने भाई बहनों के साथ उत्तम संबंध बनेगा। आपके सुख में वृद्धि होगी। जनता में आपकी प्रतिष्ठा बढ़ेगी। धन आने के अच्छे सहयोग बनेंगे। दूर यात्रा का योग बन सकता है। कार्यालय में आपको सतर्क रहकर कार्य करने की आवश्यकता है। आपको अपने संतान से बहुत कम सहयोग प्राप्त होगा। इस सप्ताह आपके लिए सात और आठ तारीख परिणाम दायक है। 7 और 8 को आप द्वारा जो कार्य किए जाएंगे उनमें से अधिकांश सफल होंगे। 11 और 12 तारीख को आपको कोई भी कार्य बड़े सावधानीपूर्वक करना चाहिए अन्यथा उन कार्यों में आप असफल हो जाएंगे। आपको चाहिए कि आप इस सप्ताह भगवान शिव का प्रतिदिन दूध और जल से अभिषेक करें। सप्ताह का शुभ दिन बुधवार है।

कुंभ राशि

आपका स्वास्थ्य उत्तम रहेगा। आपके जीवनसाथी के कमर या गर्दन में दर्द हो सकता है। भाई और बहनों के साथ संबंध सामान्य रहेंगे। धन आने की उम्मीद है। व्यापार में वृद्धि होगी। आपके सुख में थोड़ी कमी आएगी। कार्यालय में आपकी प्रतिष्ठा बढ़ सकती है। भाग्य से आपको कुछ प्राप्त नहीं हो पाएगा। माता जी का स्वास्थ्य खराब हो सकता है। पिताजी का स्वास्थ्य ठीक रहेगा। इस सप्ताह आपके लिए 9 और 10 तारीख उत्तम है। 9 और 10 तारीख को आप जो भी कार्य करेंगे सभी कार्यों में आप सफल रहेंगे। सप्ताह के बाकी दिन भी ठीक-ठाक हैं। इस सप्ताह आपको चाहिए कि आप रुद्राष्टक का प्रतिदिन पाठ करें। सप्ताह का शुभ दिन शुक्रवार है।

मीन राशि

इस सप्ताह आपका स्वास्थ्य ठीक रहेगा। अगर आप अविवाहित हैं तो विवाह के अच्छे प्रस्ताव आ सकते हैं। कचहरी के कार्यों में आप पूरी तरह से सफल रहेंगे। व्यापार में उन्नति होगी। धन आने का कम योग है। आपको अपनी संतान से कोई सहयोग प्राप्त नहीं हो पाएगा। भाग्य से आपको कुछ नहीं मिल पाएगा। आपको अपने परिश्रम पर विश्वास करना पड़ेगा। इस सप्ताह आपके लिए 6 तथा 11 और 12 तारीख लाभदायक है। 7 और 8 तारीख को आपको कोई भी कार्य बड़े सावधानी पूर्वक करना चाहिए। इस सप्ताह आपको चाहिए कि आप प्रतिदिन शिव पंचाक्षर मंत्र का जाप करें। सप्ताह का शुभ दिन रविवार है।

मां शारदा से प्रार्थना है या आप सदैव स्वस्थ सुखी और संपन्न रहें। जय मां शारदा।

 राशि चिन्ह साभार – List Of Zodiac Signs In Marathi | बारा राशी नावे व चिन्हे (lovequotesking.com)

निवेदक:-

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

(प्रश्न कुंडली विशेषज्ञ और वास्तु शास्त्री)

सेवानिवृत्त मुख्य अभियंता, मध्यप्रदेश विद्युत् मंडल 

संपर्क – साकेत धाम कॉलोनी, मकरोनिया, सागर- 470004 मध्यप्रदेश 

मो – 8959594400

ईमेल – 

यूट्यूब चैनल >> आसरा ज्योतिष 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सु डो कू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🕺 सु डो कू ! 🙏 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

सु टले वाटता वाटता

कधी येई अंगाशी घाई,

चुकता आकडा चौकोनी

बिघडून गणित जाई !

*

डो के शिणते सोडवतां

करी पार मेंदूचा भुगा,

सवय होता हळू हळू

सुटतो एक एक धागा !

*

कु शाग्र बुद्धीचे हे खाद्य

चव चविष्ट याची भारी,

रोज रोज चाखल्या विना

शांती लाभे ना मज उरी !

शांती लाभे ना मज उरी !

© प्रमोद वामन वर्तक

१६-०४-२०२४

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

“घेई छंद…. “

नागपुरातील धंतोली्वर त्या रात्री एक सुरांची अविस्मरणीय मैफिल जमली होती. तसं म्हटलं तर ती सगळी तरुण मुलंच होती. समोर श्रोत्यांमध्ये मात्र नागपुरातील जाणकार, बुजुर्ग संगीतप्रेमी होते. सुरांची ती अचाट मैफिल संपल्यानंतर समोर बसलेल्या, मैफीलीत रत असलेल्या श्रोत्यांना दाद देण्याचेही भान राहिले नव्हते. काहीतरी अलौकिक घडल्यानंतर, अनुभवल्यानंतर वातावरणात भिनलेली ती धुंद शांतता… ती अनुभवणारा तो गायक… त्याचे साथीदार…

आणि अचानक श्रोत्यांमधील एक बुजुर्ग, म्हातारा विचारता झाला…

“काहो देशपांडे… आपले घराणे कुठले ?

“आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं…. ” त्या गायकाने ताडकन उत्तर दिले… आणि

दिवाणखान्यात बसलेल्या रसिक नागपुरकरांनी आता मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.

तिशीच्या आसपास असलेला तो गायक होता… वसंतराव देशपांडे.. तबल्यावर मधु ठाणेदार… आणि पेटीच्या साथीला साक्षात पु. ल. देशपांडे.

कोणत्याही एकच घराण्याची शागिर्दी न पत्करता वसंतरावांनी अनेकांकडे सुरांची माधुकरी मागितली. आणि ती त्यांना मिळालीही. नागपुरात असलेल्या शंकरराव सप्रे गुरुजींकडे वसंतरावांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सप्रे गुरुजींच्या त्या गायनशाळेत त्यावेळी वसंतरावांबरोबर अजून एक शिष्य गायनाचे धडे गिरवत होता. दोघेही पुढे जाऊन आपल्यागुरुचे नाव त्रिखंडात गाजवतील याची सप्रे गुरुजींना कल्पनाही नसेल. त्यावेळी वसंतरावांबरोबर शिकणारा त्यांचा जोडीदार होता… राम चितळकर…. म्हणजेच सी. रामचंद्र.

नागपुरातील सप्रे गुरुजींनी गायकीचे प्राथमिक धडे तर दिले… पण आता पुढे काय?

नेमके त्याच वेळेला वसंतरावांचे मामा नागपुरात आले होते. ते रेल्वेत नोकरीला होते. लाहोरला. मामाने त्यांना आपल्याबरोबर लाहोरला नेले. त्याकाळी लाहोरला मोठमोठ्या गवयांचे वास्तव होते. अनेक मुसलमान गवयांची मामाची ओळख होती.

कुठूनतरी वसंतरावांना समजले. रावी नदीच्या पलिकडे एक कबर आहे. तेथील विहिरी जवळ काही फकीर बसतात. ते उत्तम गवयी आहेत. वसंतराव तेथे जाऊ लागले. गाणे ऐकू लागले. मामाने पण सांगितले… त्यातील मुख्य फकीर जो आहे… असद अली खां, त्याची क्रुपा झाली तर ती तुला आयुष्यभर कामाला येईल.

खांसाहेबांकडुन गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांना राजी करणे महत्त्वाचे. मामाने सांगितले… टोपलीभर गुलाबाची फुले आणि मिठाई घेऊन खांसाहेबांकडे जा. सोबतीला थोडा चरस असेल तर उत्तम. त्यांचे पाय धर. विनंती कर. हट्ट कर. मग तुला ते गायन शिकवतील.

मामाने सांगितल्याप्रमाणे वसंतरावांनी फुले, मिठाई, आणि हो…. कुठुनतरी चरसही आणला. सर्व वस्तू खांसाहेबाना अर्पण केल्या. विनंती केली. खांसाहेबाना राजी केले.

खासाहेबांनी जवळ असलेल्या विहिरीकडे त्यांना नेले. दोघेही काठावर बसले. संध्याकाळची वेळ होती. वसंतरावांच्या हातात त्यांनी गंडा बांधला. गंडा बांधणे म्हणजे शिष्य या नात्याने गुरुशी नाते जोडणे. गंडा बांधून झाला. मग त्यांनी वसंतरावांना अर्धेकच्चे चणे खायला दिले. हाही एक त्या विधीचा भाग. असले चणे खाताना, चावताना त्रास होतो. कडकडा चावून खावे लागतात. विद्या मिळवण्याचा मार्ग कसा खडतर आहे हे कदाचित त्यातून सुचवायचे असेल. चणे खाऊन झाल्यावर एक लहानसा गुळाचा खडा तोंडात घातला. कानात कुठल्यातरी रागाचे सुर सांगितले.

तालमीला सुरुवात झाली. खांसाहेबांनी जवळच्या एका फकिराला इशारा करताच त्याने ‘मारवा’ आळवायला सुरुवात केली.

वसंतराव सांगतात, “विहीरीवर बसून गाण्यातली गोम अशी होती की काठावर गायलेला सुर विहिरीत घुमुन वर येत असे आणि तंबोर्याचा सुर मिळावा तसा सुर विहीरीतुन मिळत असे “.

सतत तीन महिने खांसाहेबांनी मारवा हा एकच राग शिकवला. वसंतराव म्हणतात की तो त्यांनी असा काही शिकवला की त्या एका रागातून सगळ्या रागांचे मला दर्शन झाले.

मारवा गळ्यात पक्का बसला. आता बाकी रागांचे काय? तशी त्यांनी विचारणाही केली. त्यावर खांसाहेब म्हणाले,

” जा. तु आता गवयी झालास. एक राग तुला आला… तुला सगळे संगीत आले”.

आणि शेवटी म्हणाले….

“एक साधे तो सब साधे…

सब साधे तो कुछ नही साधे “

वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट गायक आहेत पण ते उत्तम अभिनेते पण आहेत हे सर्वांना समजले केंव्हा? तर  ‘कट्यार काळजात घुसली ‘हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा. यातील ‘खांसाहेब’त्यांनी अजरामर केला. वास्तविक त्यापुर्वी त्यांनी पु. लं. च्या ‘तुका म्हणे आता’, ‘दूधभात’ या चित्रपटांतून कामे केली होती. पण ‘कट्यार… ‘मधील खांसाहेब ने त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेले.

या महान गायकाने उदरनिर्वाहासाठी, प्रपंच चालवण्यासाठी आयुष्यातील भर उमेदीची २४ वर्षे चक्क कारकुनी केली. रात्र रात्र मैफिली गाजवणारे वसंतराव सकाळ झाली की सायकलवर टांग टाकून मिलीटरी ऑफिसमध्ये खर्डेघाशी करायला जात. सदाशिव पेठेत असलेल्या एका खोलीत संसार. एक दोन नाही…. पंचवीस तीस वर्षं. त्यावेळी एका ज्योतीषाला त्यांनी कुंडली दाखवली होती. तो ज्योतिषी वसंतरावांना म्हणाला….

“वसंतराव.. मोठी खट्याळ कुंडली आहे तुमची. तुम्हाला आयुष्यात धन, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही लाभणार आहे. खडिसाखरेचे ढीग तुमच्या पुढे पडणार आहे. पण अश्यावेळी की त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या मुखात दात नसतील”.

त्या ज्योतीष्याकडे पहात मिस्कील स्वरात वसंतराव म्हणाले…

“ठिक आहे. दात नसले तरी हरकत नाही. आम्ही ती खडीसाखर चघळून चघळून खाऊ”.

आयुष्यभर स्वरांचे वैभव मोत्यांसारखे उधळले वसंतरावांनी. सुबत्ता, मानसन्मान, पुरस्कार आयुष्याच्या उत्तरार्धात मिळु लागले. पण फार काळ नाही. निव्रुत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिले असतानाच संरक्षण खात्याने त्यांची बदली ईशान्येकडील नेफाच्या जंगलात केली. जंगलातील तंबूत त्यांचे वास्तव्य. पाऊस पाणी, रोग राई, जीवजंतू याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रक्रुतिवर झाला. तेथून ते परतले. निव्रुत्त झाले. पण तेथे जडलेली पोटाची व्यथा त्यांना त्रास देऊ लागली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा एकसष्ठीचा सत्कार झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी वयाच्या… बासष्ठाव्या वर्षी अकोला येथे झालेल्या बासष्ठाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. आणि वर्षभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आज २ मे. वसंतरावांचा  जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं. ती मनातल्या मनात रडू लागली. पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.) – इथून पुढे 

म्हणता म्हणता ती साठ वर्षाची झाली. जय बारावी झाला, मग तो B. Farm ला गेला. त्याला व्यवसायाची आवड म्हणून तिने त्याला “जय एजन्सी ‘सुरु करून दिली. एवढी वर्षे ती मेडिकल चालवत होती, त्यामुळे तिच्या ओळखी होत्याच. एका वर्षात त्याला वीस कंपन्याच्या agencies मिळाल्या. दहा माणसे कामाला ठेवली. जोरात धंदा होऊ लागला. मग माल सप्लाय करण्यासाठी टेम्पो घेतला. त्याला मुली सांगून येऊ लागल्या, मग परंजपे डॉक्टर यांच्या ओळखीच्या कुटुंबातील वर्षा चें स्थळ आले आणि जयचे लग्न होऊन वर्षा सून म्हणून घरात आली.

गॅलरीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या आशुच्या डोळ्यसमोर तिच्या आयुष्याचा चलदचित्रपट सरकत होता. साठ वर्षे आपण पुरी केली, कळलेच नाही. या आयुष्यात आईवडिलांसारखे विजुआते आणि काका तसेच डॉ पराजपे यांचे उपकार न विसरण्याजोगे. याच आयुष्यात शिरीष भेटला आणि मनात वसला तसेच बाहेर पण पडला.

हे आपले साठ वर्षाचे आयुष्य. जय आणि वर्षा यांनी आपली एकस ष्ठी ठेवली आहें आणि तो विचारतो, जन्मदात्याला आणि काकाकाकूला बोलवणार का, म्हणून?

काय केल बाबा तूझ्या पित्याने?

काकाकाकूने? हाकलून दिल घरातून, पुन्हा चौकशी पण केली नाही कधी. जिवंत आहोत का मेलो याची..

आशुची एकसष्ठी पार पडली. बहीण भावोजी, भाचरे, भाऊ वहिनी तसेच मावंशी आणि तीच कुटुंब, विजुआते, डॉ काका, डॉ पराजपे फॅमिली हॉस्पिटलस्टाफ, जिल्ह्यातील केमिस्ट परिवार तसेच अनेक ओळखीची मंडळी हजर होती. कार्यक्रमला मंगळसूत्र घातलेल्या बाईचा नवरा उपस्थित नाही म्हणून काही मंडळींनी कुजबुज केली पण ज्यांना आशुची परिस्थिती माहित होती, त्यांना आश्यर्य वाटले नाही.

सर्व मंडळी आपापल्या घरी गेली, पुन्हा आशू मेडिकल मध्ये आणि जय वर्षा एजन्सी मध्ये मग्न झाले. एक दिवस वर्षाने आपल्या नवऱ्याला म्हणजे जयला विचारले 

“जय, तूझ्या आईचा जवळजवळ पस्तीस वर्षे नवऱ्याशी संबंध नाही मग तिला दुसरे लग्न करावे असे वाटले नाही कधी?

“विजआजी मला एकदा म्हणाली होती, शिरीष गोखले नावाचा एक कोल्हापूरमधील MR तिला आवडायचा, असे आईने आजीला सांगितले होते. त्याची बायको घटस्फोट घेणार होती आणि मग आई घटस्फोट घेऊन त्यांच्याशी लग्न करणार होती, पण काही कारणाने ते लग्न झाले नाही. शिरीष गोखले आता कुठे असतांत कोण जाणे?

एक दिवस आशू दुकानात असताना जयचा फोन आला “आई, गावाकडून काकूने निरोप दिला आहें, तुझे बाबा जास्त आजारी आहेत, त्यांना घेऊन जा ‘

“आत्ता आठवण झाली का आमची, पण तुझा पत्ता त्यांना कळला कसा?

“अग त्या गावातील एक मुलगा माझ्या एजन्सी मध्ये कामाला आहें, त्याने त्यांना सांगितले असणार. ‘

“काय आजारी आहेत?”हार्ट अटॅक आलाय बहुतेक ‘.

“ठीक आहे, मुलगा आहेस म्हणून कर्तव्य कर, गाडी घेऊन जा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर ‘.

जय गाडी घेऊन गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला आणि डॉ परकार हॉस्पिटल मध्ये त्याना ऍडमिट केले.

हॉस्पिटल मध्ये सर्व तपासण्या झाल्या आणि बायपास करायला हवे असे डॉ नी सांगितले. जयने सर्व पैश्याची व्यवस्था केली. जय रोज हॉस्पिटल मध्ये जात होता पण आशू एकदाही गेली नव्हती. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आधल्या दिवशी जय आईला म्हणाला “आई, ते म्हणत आहेत, माझे गावाकडे खुप हाल होत आहेत, जेवणं पण मिळत नाही, खिशात पैसे नाहीत, मी तुमच्याघरी येऊ काय?’

आशू कडाडली -“जय, त्यांना त्यांच्या घरी पोहोचून ये. त्या घाणीतून मी पस्तीस वर्षांपूर्वी मी तुला घेऊन बाहेर पडले, ती घाण परत माझ्या घरात नको. आणि परत असले निरोप मला देऊ नकोस. यांनतर तूझ्या माणसाला सांगून ठेव, त्या घरातले बरे किंवा वाईट निरोप दयायचे नाहीत. मी इथे मानाने रहाते आहें, मानिनी सारखी. त्यांची दृष्ट लागायला नको ‘.

जय वडिलांना गावी पोहोचून आला.

    आशुचे आयुष्य नेहेमीसारखे सुरु होते, सून वर्षा हल्ली सतत म्हणायची “आई, तुम्ही कुठेच फिरला नाहीत. अजून धड कोकण पाहिले नाहीत. केंव्हा तरी लग्नकार्याच्या निमित्ताने मुंबई किंवा पुणे, ते पण घाईत. लोक आता युरोप ट्रिप करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तुम्ही पण जा ना… ,

आशू मनात म्हणायची, मला पण जावेसे वाटते पण जाऊ कुणाबरोबर…

रोज सारखा कंटाळवाणा दिवस सुरु होता, निमा आणि मीना काऊंटर सांभाळत होत्या, आशू स्टोकिस्ट कडून आलेली बिले चेक करत होती, एव्हड्यात दुकानासमोर रिक्षा थांबली आणि गृहस्थ हातातील बॅग सांभाळत सरळ आत येत म्हणाला “मॅडम, चहा मागवा ‘.

आशू चमकली, तोच आवाज, बोलण्याची तीच पद्धत वीस वर्षा पूर्वीची. तिने झटकन मान वर करून पाहिले, डोळे विसफ़ारले, चेहरा आश्रयचकित झाला, ती किंचाळली “शिरीष ‘.

काही कळायच्या आत ती त्याला बिलगली. शिरीषने तिला थोपटत म्हणाला, “होय आशू, मी शिरीष ‘.

ती रडत रडत म्हणाली “अरे तू आहेस?

“होय आशू, मी आहें. तुला कुणीतरी सांगितले असेल मी आत्महत्या केल्याचे. करायचा होता मला नाश स्वतःचा, पण शेजाऱ्यांनी धावपळ करून मला वाचवलं, आता गेल्या महिन्यात ती पण गेली कॅन्सरने. माझा शत्रू संपला पण मी आहें ‘.

आशुच्या लक्षात आलं, आज आपण जे वागलो ते पाहून दुकानातल्या मुलींना आश्यर्य वाटलं असणार. ती परत शिरीष पासून अलग झाली आणि त्याला म्हणाली “चल, आपण घरी जाऊ, मला तुझ्याशी खुप खुप बोलायचं आहें ‘. निमाला दुकानाकडे लक्ष दयायला सांगून तिने रिक्षा बोलावली आणि त्याला घेऊन ती घरी आली.

मग शिरीषने आपली सर्व हकीकत सांगितली. मग बायको आपल्यावर कसा लक्ष ठेऊन असायची. कुणाला फोन करतो, कुणाचा येतो हे पहायची. रोज पैशावरून, जेवणावरून भांडणे. आपण या काळात तीन नोकऱ्या सोडल्या. कंटाळून खुप झोपेच्या गोळया घेतल्या, पण शेजारी बरा होता त्याच्या लक्षात आले, त्यानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि वाचवले. कंटाळवणे आयुष्य चालले होते. दोन वर्षांपूर्वी बायकोला कॅन्सर झाला. मी हयगय न करता सगळे उपचार केले पण उपयोग झाला नाही, आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर तिला माझ्या बरोबर दुष्ठपणाने वागल्याचा पक्षचताप झाला, तिने क्षमा मागितली आणि पंधरा दिवसात ती गेली ‘.

आशू शिरीषला म्हणाली “शिरीष, तू पुन्हा भेटशील ही आशा मी सोडली होती, माझ्या मनातला पुरुष तूच होतास, आता मी समाजाचा विचार करणार नाही, माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या नाहीत. जय चें लग्न झाले आहें, दुकान, एजन्सी जोरात सुरु आहें, पण मी एकटी आहें रे, तुझ्यावाचून मी अपुरी आहें, मला या वयात साथी हवा आहें आणि तो तूच आहेस. आपण लग्न करू आणि आयुष्याचा शेवटचा काळ एकमेकासामावेत घालवू, नाही म्हणू नकोस शिरीष..

“नाही कशाला म्हणू आशू, मी मनापासून तुझ्यावरच प्रेम केलाय. ‘

“तर मी आज जय आणि वर्षाला सांगते, आम्ही लग्न करतोय म्हणून ‘

    त्याच दिवशी जय आणि वर्षा घरी आली आणि अनोळखी माणूस पाहून चक्रवली.

आशू ने जयला ओळख करून दिली 

“जय, हा शिरीष, शिरीष गोखले.

जयला एकदम आश्यर्य वाटले, त्याने त्यांचे नाव विजूयाआजी कडून ऐकले होते. त्याला माहित होत, आईला यांच्याशी लग्न करायची इच्छा होती.

“अरे हो, छान छान.. मी ऐकलं होत तुमच्याबद्दल.. विजू आजी म्हणाली होती ‘

“हो ना, जय तेंव्हा आम्ही लग्न करू शकलो नव्हतो, पण समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही लग्न करत आहोत ‘.

 जयच्या डोळयांतून पाणी आलं, आपल्या आईने कसे संन्यासी सारखे आयुष्य काढले, हे त्याने पाहिले होते. आईला सुख मिळालेच पाहिजे निदान या वयात.

जयने शिरीषला मिठी मारली, वर्षाने आशूला मिठी मारली.

चार दिवसांनी आशू आणि शिरीष यांचे मोजक्या लोकात लग्न झाले.

जयने दुसऱ्या दिवशी दोन युरोप ट्रिपची तिकिटे शिरीषच्या हातात ठेवली.

आयुष्यात पहिल्यांदा आशू विमानात बसणार होती. ती घाबरत नव्हती कारण तिचा प्रिय शिरीष तिच्यासमवेत होता. त्याचा हात हातात घेऊन ती लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी फिरणार होती.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

कॉलेजच्या रियुनियनला सहकुटुंब गेलेलो. अनेक मित्र-मैत्रीणींची भेट झाली. जुन्या आठवणी, भरपूर खाणं अन पोटभर गप्पांमुळे संध्याकाळ संस्मरणीय झाली. मस्त मूड होता. कधी नव्हे ते गाणं गुणगुणायला लागलो. बायको आणि मुलीला आश्चर्य वाटलं. घरी पोचलो तर दार सताड उघड आणि हॉलमध्ये खुर्चीत मांडी घालून आई बसलेली.

“काय गं, दार उघड ठेवून अशी का बसलीयेस”

“बरं झाला आलास. किती वेळची वाट बघतेय. ”आई.

“काय झालं. अर्जंट होतं तर फोन करायचा ना”

“म्हटलं तर अर्जंट म्हटलं तर नाही. ”

“आई, मूड चांगलाय. नीट सांग. काय झालं”

“घरात पाहुणा आलाय. ”

“मग त्यात टेंशन कसलं”

“विशेष पाहुणा आहे”

“कोण?कुठयं?

“आत्ताच कपाटामागे गेलाय”

“पाहुणा कपाटामागे??आई, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतयं का?” 

“अरे, उंदीर मामा घरात शिरलेत. तास झाला खुर्चीतून हलली नाहीये. ”आईचं ऐकून बायको आणि मुलगी “ईssईss”करत किंचाळत घराबाहेर गेल्या. पाठोपाठ आईसुद्धा. खरं सांगायचं तर मीसुद्धा जाम घाबरलो. उंदीर पाहिला की कसंतरीच होतं. शिसारी येते. खूप भीती वाटते.

“अहो, आधी त्याला बाहेर काढा”

“बाबा, लवकर”

“ही काठी घे आणि त्याच्या डोक्यात घाल. ईकडून तिकडं फिरून मेल्यानं वात आणलंय. ”

“ए, बायांनो!!जरा थांबता का?”.

“आता कशाला थांबायचं”आई.

“अगं हो, जरा बघू तर दे. ”

“ईss उंदराला काय पहायचं. ”मुलगी 

“मी बाहेर जातो. काय करायचं ते तुम्हीच ठरवा. ”  

“आधी त्याला घालवा मग कुठंही जा”बायको.

“मग एकदम गप्प बसायचं आणि आधी घरात या. उगीच आख्ख्या सोसायटीला कळायला नको”. आई खुर्चीवर तर मुलगी आणि बायको सोफ्यावर बसल्या. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ न्यायानं मीच तो काय सोकॉल्ड धीट, शूर??भीती वाटत होती तरीही उसनं अवसान आणून भिरभिरत्या नजरेनं काठी कपाटाजवळ आपटायला सुरुवात केली.

“जास्त जवळ जाऊ नको रे”

“अहो, बेतानं नाहीतर एकदम अंगावर येईल. ”

“उंदीर चावतो का” आई, बायको, मुलगी पाठोपाठ बोलल्या.

“शांत बसा नाहीतर काठी घ्या त्याला हाकला. ”मी चिडलो.

“आमच्यावर रागवण्यापेक्षा उंदराला बाहेर काढा. बघू या जमतयं का?”बायकोचं बोलणं सहन न झाल्यानं रागाच्या भरात जोरात काठी जमिनीवर फेकली तेव्हा कपाटामागचा उंदीर भसकन बाहेर आला. अचानक समोर आल्यानं घाबरून मागे सरकलो तर उंदराला पाहून आई, बायको, मुलगी एकदम ओरडल्या त्या आवजानं उंदीर जागेवरच एक इंच उडाला आणि किचनमध्ये पळाला. पाठोपाठ अस्मादिक किचनमध्ये. नक्की कुठं लपलाय कळत नव्हतं त्यातच परडीला धक्का लागून एक कांदा पायावर पडला. घाबरून जोरात ओरडलो.

“अहो, आधी दोन्ही बेडरूमची दारं लावून घ्या. ”

“दारं बंदच आहे”आई.

“आता काय करायचं”मुलगी.

“फक्त वाट बघायची. ” भिंतीला टेकून उभा राहिलो. नजर शोधत होतीच. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल जाणवली नाही. पुन्हा ओटा, ट्रॉली, शेल्फवर काठी आपटायला लागलो.

“उंदराच्या नादात किचनमध्ये तोडफोड करू नका. सावकाश!!”बायकोचा अनाहूत सल्ला.

“मला कळतं. ऐकून घेतो म्हणून प्रत्येकवेळी नवऱ्याला सुनवायची गरज नाही. ”

“ते माहितीये पण स्वभाव धसमुसळायं ना म्हणून आधीच सांगितलं नंतर सॉरी म्हणून उपयोग होणार नाही. ” गरज नसताना बायकोनं टोमणा मारल्यानं संताप अनावर होऊन रॅकवर जोरात काठी मारली तर उंदीर एकदम अंगावर आला, हेलपाटलो कसंबसं सावरत काठी मारली पण नेम चुकला. घाबरलेला उंदीर आईच्या दिशेने गेला तर ती ओरडायला लागली. हातातली काठी फेकली तेव्हा तो कपाटामागे लपला. पुन्हा काहीवेळ शांतता आणि एकदम तो तुरुतुरु पळत सोफ्याच्या दिशेनं गेल्यावर बायको आणि मुलगी घाबरून सोफ्यावरच उभ्या राहिल्या. बायको जोरजोरात “हाड हाड” करायला लागली.

“ममा, तो कुत्रा नाहीये, ” 

“तू गप गं. आधी त्याला हाकल मग मला अक्कल शिकव” मायलेकी वाद घालायला लागल्या अन यागडबडीत उंदीर पुन्हा बेपत्ता. झालं पुन्हा शोधाशोध!!सगळेच बेचैन, अस्वस्थ. जरा कुठं खट्ट वाजलं तरी दचकत होते. उंदीर घरात असेपर्यंत कोणालाच शांत झोप लागली नसती त्यामुळे काहीही करून त्याला बाहेर घालवणं किवा मारणं गरजेचं होतं परंतु तो हाती लागत नव्हता. इकडून तिकडं नाचवत होता. खूप दमलो. भीतीची जागा संतापानं घेतली. रात्रीचे अकरा वाजून गेलेले अन आम्ही एवढ्याशा जीवाच्या दहशतीखाली होतो आणि कदाचित तो आमच्या………

“आता रे???, शेजारच्यांना बोलावू का?” आई म्हणाल्यावर मी भडकलो.

“जरा दम धरतेस. आल्यापासून तेच करतोय ना. कशाला उगीच गाव गोळा करायचाय”

“तुम्ही चिडू नका. मदतीसाठी म्हणून त्या म्हणाल्या. ”बायकोनं समजावलं.

“आता त्याला सोडायचा नाही. तू एक काम कर, किचनची वाट आडव. आई, तू खुर्चीवरून हलू नकोस. कार्टे, तो फोन बाजूला ठेव आणि शोकेसजवळ थांब. हातात काहीतरी ठेवा जर अंगावर आलाच तर उपयोगी पडेल. ” बोलत असतानाच तो दिसला जोरात काठी मारली पण परंतु परत नेम चुकला.

“बाबा, त्याला बाहेर घालवू. मारायला नको. छोटसं पिल्लूयं”

“बरं, रेडी. घाबरू नका. फक्त पाच मिनिटं लागतील”स्वतःसकट सर्वांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न केला. हातात झाडू घेऊन आई खुर्चीत, फरशी पुसायचा मॉप घेऊन बायको किचनच्या दारात, प्लॅस्टिकचा ट्रे घेऊन मुलगी शोकेसच्या बाजूला उभी राहिली.

“सगळे तयार आहात. तुमच्या बाजूला येऊन द्यायचं नाही. दाराच्या दिशेने ढकलायचं. ओके”काठी आपटायला लागल्यावर काही वेळानं तो बाहेर आला अन किचनकडे गेला पण टिपॉय आडवा टाकून वाट बंद केल्यामुळे शोकेसच्या बाजूला गेला पण मुलीनं ट्रेनं ढकललं. लपायला जागा सापडत नसल्यानं त्याची पळपळी सुरु झाली अन गोंधळ वाढला. पळापळ करून थकलेला अन घाबरलेला उंदीर हॉलच्या कोपऱ्यात थांबला. दरवाजाच्या दिशेनं वळवण्यासाठी प्रयत्न केले तर एकदम तो किचन नंतर सोफ्याकडं मग शोकेसच्या दिशेनं गेला पण आवाजामुळं मागे फिरला. काही क्षण एका जागी थांबून अंदाज घेतल्यावर अचानक तो एकदम घराबाहेर गेला. अवघ्या काही सेकंदात हे सगळं घडलं. पटकन दार लावून घेतलं. आई जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली तर मुलगी बायकोला बिलगली. मी मात्र  “हुssssश” करत मटकन खाली बसलो. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तितक्यात बायकोनं विचारलं “सासूबाई, नक्की पाहुणा एकच आला होता की… ” ते ऐकून मी कोपरापासून हात जोडले. तिघीही जोरजोरात हसायला लागल्या. —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॲडॉल्फ हिटलर — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲडॉल्फ हिटलर ☆ श्री प्रसाद जोग

ॲडॉल्फ हिटलर —

आत्महत्या :  ३० एप्रिल, १९४५

हा जर्मनी देशाचा हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.

ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा हिटलर  (चौथा) मुलगा होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ व्हिएन्नामधे हस्तचित्रे विकून रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन करुन उपजिविका चालवली. त्याने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. फलस्वरूप त्याला शिक्षा देखील झाली तुरुंगामध्ये असताना १९२३ साली माईन काम्फ (माझा लढा) या आत्मकथेच्या लिखाणाला त्याने सुरवात केली आणि त्याचा लेखनिक होता त्याचा सहकारी रुडाल्फ हेस.

जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेली आत्मकथा ‘माईन काम्फ’ (माझा लढा) ची विक्री झाली. अमेरिकेत ८. ३२  लाखांना लिलावात ही प्रत विकली गेली आहे.

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली ‘ युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिवंत राहतील. ’ 

१८ ऑगस्ट, १९३० 

“अडाॅल्फ हिटलर”  —- असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.

हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोषवाक्य होते. आर्यन संस्कृतीमधील शुभ चिन्ह मानले गेलेल्या स्वस्तिकचा समावेश त्याने ध्वजामध्ये केला.

राईश साम्राज्य एक हजार वर्षे टिकेल असे त्याचे म्हणणे होते, प्रत्यक्षात १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरु झालेले महायुद्ध हिरोशिमा, नागासाकी वरील अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर १९४५ सालीया  सहा वर्षातच संपुष्टात आले.

सुरवातीला त्याच्या सैन्याने प्रचंड मुसंडी मारून मोठमोठे विजय मिळवले होते, एक वेळ अशी आली होती की रशियाचा पाडाव होत होता, आणि हिटलर हे संपूर्ण युद्ध जिंकत होता, परंतु निसर्ग देखील त्याच्या विरोधात गेला आणि प्रचंड बर्फ वृष्टी झाली आणि जर्मन सैन्य जागीच अडकून पडले, इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरवात झाली आणि शेवटी त्याचा पराभव झाला.

दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक बनलेल्या इंग्लंडच्या पंतप्रधानांचे “विन्स्टन चर्चिल” यांचे वक्तृत्व लंडनवर होत असलेल्या बॉम्बफेकीच्या वेळी जनतेला धीर देत होते. त्यांचे म्हणणे होते “आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू, आकाशात लढू आणि अंतिम विजयी होऊ. वेगवेगळ्या आघाड्यांवरील छोट्या मोठ्या लढाया दोस्त राष्ट्रे हरत होती, त्या वेळी सैन्याला धीर देताना ते म्हणाले होते,

“Though we loose the battle we will conquer the war”

त्यांच्या जादुभऱ्या शब्दांनी सैनिक प्राणपणाने लढत राहिले. जपान्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अल्बर्ट आईन्स्टाईन च्या अणुबॉम्बच्या शोधाने या युद्धाला कलाटणी मिळाली, आणि शेवटी नाझी जर्मनी आणि हिटलरचा शेवट झाला.

२० एप्रिल, त्याच्या ५६ वाढदिवसाच्या दिवशी हिटलर भूमिगत बंकर मधून बाहेर आला, हे त्याचे लोकांना झालेले शेवटचे दर्शन.

२३ एप्रिल, १९४५ लाल सैन्याने बर्लिन, वेढले होते. होते. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर, हिटलरच्या बंकर मध्ये एक लहान समारंभात त्याने इव्हा ब्राऊन या त्याच्या सखीबरोबर विवाह केला. त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटवर जोसेफ गोबेल्स आणि मार्टिन बोरमान यांनी सह्या केल्या. हे सर्टिफिकेट इंटरनेट वर डिजिटली बघायला उपलब्ध आहे. इव्हा ब्राऊन या त्याच्या प्रेयसीने त्याला शेवटपर्यंत साथ दिली. हिटलर नसलेल्या जगात तिलाही जिवंत राहायचे नव्हते म्हणून तिनेही हिटलर सोबत जीवनाचा अंत करून घेतला.

“युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील !” असे लिहिणारा हिटलर जिवंत राहू शकला नाही. ही त्याची शोकांतिका. ३० एप्रिल, १९४५ रोजी त्याने डोक्यात गोळी मारून घेतली आणि जीवन संपवले.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या वाचण्यात अगदी वेगळे पुस्तक आले होते. लेखक आहेत पराग वैद्य आणि पुस्तकाचे नाव आहे ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास. या पुस्तकात त्यांनी इतिहास जेते लिहितात आणि जितांची बाजू कधी समोर येत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या लिखाणाचा अर्थ हिटलर तसा नव्हता. त्याला जगाने निष्कारण वाईट क्रूरकर्मा ठरवले असा आहे.

वाईटात वाईट व्यक्तींमध्ये सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. हिटलरची काही वचने वाचली की याची प्रचिती येते. यात मला हिटलरचे उदात्तीकरण अजिबात करायचे नाही.

  1. “If you win, you need not have to explain… If you lose, you should not be there to explain!”
  2. “Do not compare yourself to others. If you do so, you are insulting yourself. ”
  3. “if you want to shine like a sun, first you have to burn like it. ”
  4. “Think Thousand times before taking a decision, But – After taking a decision never turn back even if you get thousand difficulties!!”
  5. “When diplomacy ends, War begins. ”
  6. “Words build bridges into unexplored regions. ”
  7. “To conquer a nation, first disarm its citizens. ”
  8. “I use emotion for the many and reserve the reason for few. ”
  9. “The man who has no sense of history, is like a man who has no ears or eyes”

शेवटचे जे फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीला लागू पडते

  1. “If you tell a big enough lie and tell it frequently enough, it will be believed. ”

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मदारी… एक बोधकथा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मदारी… एक बोधकथा…☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक मदारी असतो. तो आपल्या माकडाला घेऊन गावोगावी फिरायचा, माकडाचे खेळ करून दाखवायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा.

ते माकड सुद्धा अगदी छान काम करायचे. कोलंट्या उड्या मारायचे, पाणी आणून द्यायचे आणि मालक सांगेल तसे सगळे काम करायचा. त्याने त्या माकडाचे नाव रघुवीर ठेवले होते.

सगळे त्याला म्हणतात अरे याचे नाव रघुवीर का ठेवलेस? हे तर श्री रामांचे नाव आहे ना? याचे नाव हनुमान, मारुती असे काही तरी ठेव.

यावर त्या मदाऱ्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला कामात राम असतो. मग माझे माकडाचे खेळ करून दाखवणे हे काम म्हणजे रामाचे झाले ना? दुसरे असे की त्या निमित्ताने माझ्या तोंडून श्रीरामाचे नाव दिवसातून 1000 वेळा तरी घेतले जाते. तेवढाच रामाचा जपही होतो आणि श्रीरामाचे स्मरणही होते.

मग श्रीरामाचे स्मरण करणारा मीच हनुमान होतो. मग मला आठवतात हनुमंताच्या लीला आणि त्या लीला मी माझ्याशी पडताळून पहातो.

मग हनुमानाने सीता माईने घातलेल्या मोत्याच्या माळेत श्री राम आहेत का ते बघितले होते तसे मी या रघुवीरला सांगितलेल्या कामात राम शोधतो आणि मला तो गवसतो. जर गवसला नाही तर मग माझे काही चुकले आहे असे मला समजते आणि मी ते सुधारतो आणि मग मला माझा राम सापडतो.

हनुमानाने आपली छाती फाडून तेथे श्री राम वास करत असल्याचे दाखवले होते. मला खात्री आहे मी माझ्या कामाप्रती श्रद्धा ठेवली असल्याने आणि माझे काम हे ईश्वराचे काम मी मानत असल्याने माझ्याही ह्रदयात श्रीराम वास नक्कीच आहे.

हनुमंताने श्रीरामाची सेवा मनोभावे केली तशी मी माझ्या या रघुवीरची करतो. त्याने दिवसभर माझे काम केले असले तरी मी रात्री त्याचे पाय चेपतो, त्याला चांगले न्हाऊमाखू घालतो आणि हो मला स्वतःला मी कपडे नाही घेतले तरी मी नेहमी याच्यासाठी नवे कपडे घेतो. अशी मी त्याची सेवा माझा राम म्हणून करतो.

मला खात्री आहे की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम ईश्वराचे काम समजून केले, आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणत्याही कामात सफलता मिळाल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत चांगले घडल्या शिवाय राहणार नाही.

श्रद्धा असेल तर भक्ती नकळत होते आणि अशी निस्वार्थ, निष्काम भक्ती केली तर तुमचे चांगलेच होणार.

आयुष्यात राम मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही हनुमान व्हायला पाहिजे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈