मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  राष्ट्र निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर  जी के १२८ वीं जंयती पर “काव्य विचार मंच  द्वारा राज्यस्तरीय लेख प्रतियोगिता हेतु रचित शोधपूर्ण लेख  जिसमें  डॉ  आंबेडकर जी  एवं रमाई जी के सम्बन्धों का उल्लेख मिलता है।)  )

उजेडाच्या झाडाखाली, रमा मातेची  पाखर.

शब्दा शब्दांतून झरे, तिच्या स्नेहाचा पाझर.. . !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक  उजेडाच झाड. रमाबा ई आंबेडकर या नावाची पखरण वैवाहिक जीवनात होताच हे  उजेडाच झाड आपल्या कार्य कर्तृत्वाचा परीघ वाढवीत गेलं. रमा वलंगकर हे रमाबाईचे माहेरचे नाव. भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये इ. स. 1906 मध्ये रमाबाई आणि भीमराव आंबेडकर विवाह बद्ध झाले. चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचे दोनाचे चार हात झाले.  अवघ्या नऊ वर्षाची रमाई बाबासाहेबांची सहचारिणी झाली  आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.

गतीमान  आयुष्याची, नितीमान वाटचाल

भवसागरी झेलली,  सुख दुःखे दरसाल. . .!

      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेरची परीस्थिती जेमतेम होती.  कुठलाही डामडौल नाही दिखावा नाही.  अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला  आणि रमाबाईच आयुष्य गतीमान झालं. दाभोळच्या बंदरात वडील मासेमारी करायचे.  तीन बहिणी  आणि लहान भाऊ  असा परिवार  असताना  घरच्या जबाबदाऱ्या लहानग्या रमा ला स्वीकाराव्या लागल्या.  फुलत्या वयात आई, वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून या  उजेडाच्या झाडाखाली विसावली.

वैवाहिक जीवन सुरू झाले पण  कष्टमय जीवन पाठराखण करीत होते.  सासू,  सासरे यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले त्यावेळी रमाई ने बाबासाहेबांना वयाने लहान असूनही खूप मोठा  आधार दिला.  मायेचं छत हरवलेली रमा प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्येक वार पावसाची सर झेलावी इतक्या सहजतेने झेलत होती.

जेव्हा रमा वयात आली तेव्हापासून हे मृत्यू सत्र ती अनुभवीत होती. ‘पोटच्या मुलाचे निधन’ हा ही धक्का रमाबाई ने कणखर पणे पचवला.

मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या अजाण वयात रमाईच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. इ.स. १९१३ साली बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांचे निधन झाले. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेशचा याचे अकाली निधन झाले. १९१७  सालच्या  ऑगस्ट मध्येच बाबासाहेबांची सावत्र आई  जिजाबाई यांचे निधन झाले. याच दरम्यान  मुलगी इंदू, रमाईचा दिर,   आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा यांचे निधन झाले . हे मृत्यू सत्र एकोणीशे सव्हीस पर्यंत चालूच राहिले  इ.स. १९२१  मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू अविस्मरणीय दुःख या काळात पचवावे लागले.  भीमराव  आणि रमाई दोघांनी परस्परांना धीर देत,स्वतःला सावरत या परिस्थितीतून मार्ग काढला.  रडत बसण्यापेक्षा पडेल ते काम करून संसार सावरण्याची रमाई ची जिद्द महत्वाची ठरली.

संसारात प्रतिकूल परिस्थिती पाठ सोडत नव्हती. प्रसंगी शेणी,गोव-या थापून त्या बाजारात विकून संसार सावरला. भल्या पहाटे उठून रस्त्यावर पडलेले शेण  उचलून  आणायचे काम सोपे नव्हते पण मोठ्या जिद्दीने रमाई कष्ट करीत राहिले. तिने केलेले हे कष्ट भीमस्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक वेळी उपयोगी पडले.

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी  अतिशय बिकट परिस्थिती आलेली. कुटुंबाची  खूपच वाताहत होत होती.  दुष्काळाच्या आगीत सारे कुटुंब  होरपळत होते भीमरावांच्या समकालीन निष्ठावान  कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही आर्थिक मदत रमाई ला देऊ केली.  . तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्विकारले नाहीत. स्वाभिमानी  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी झगडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर.

अनेक नातलगांचे मृत्यू पहाताना रमाई खचत गेली. पण हार न मानता भीमस्वप्न पूर्ण करण्यासाठी  आणि  बाबा साहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून  काही दुःखे  स्वतः पचवीत गेली.त्यांना तातडीने  कळविले नाही. परदेशा गेलेल्या  बाबासाहेबांना  रमाईने  कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. ज्ञानसाधना करताना  कुठलाही  अडथळा नको म्हणून काही परिवाराचे हालअपेष्टा, संसार खस्ता रमाई ने स्वतः सहन केल्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  शिक्षणासाठी परदेशी  असताना . रमाई एकट्याने संसाराचा डोलारा सांभाळत होती.. घर चालवण्यासाठी तिने शेणी, गोवर्‍या विकल्या .. सरपणासाठी वणवण फिरत,  पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत ती जायची. त्या वेळी  बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते या बातमीने बाबासाहेबांना कमी पणा येईल . म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर, रमाई वरळीला जाऊन गोवर्‍या थापायची काम करायची.   मुलांसाठी उपास तापास करत रमाई भीमरावाच्या भीमस्वप्नांना आकार देत गेली.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून  निघालेले बाबासाहेब जेव्हा  समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले,तेव्हा ही रमाई अर्धपोटी उपाशी राहून बाबासाहेबांना भक्कम साथ देत गेली. तिच्या सहयोगाने बाबासाहेब  अठरा  अठरा  तास अभ्‍यास करु लागले, पण रमाई ने त्या ज्ञानसाधनेत कधी व्यत्यय येऊ दिला नाही.  रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने ,स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत तर केलीच पण पत्नीची सारी कर्तव्ये चोख पार पाडली.

संकटांचा  केला नाश, ध्येय पूर्तीचाच ध्यास

कधी ऋतू विरहाचा, कधी सौभाग्याचा श्वास. . !

नाही धडूत नेसाया,तरी हार ना मानली.

भरजरी फेट्यातून, परिस्थिती हाताळली. . !

      डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी मुंबईत परतले तेव्हा  त्यांच्या स्वागताला सर्व  समाज बांधव मोठ्या प्रमाणावर  मुंबई बंदरात आले होते.  रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी देखील  नव्हती.  अशावेळेस बोभाटा न करता रमाई ने मोठ्या शिताफिने हा प्रश्न सोडवला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा त्याची साडी  नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाई सामोरी गेली.

डॉक्टर बाबासाहेब रमाई ला रामू म्हणून हाक मारायचे. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने संपूर्ण  बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना शुभेच्छा देत  होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र  या सा-यातून लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते  त्या गर्गेदीतून वाट काढीत  रमाई जवळ गेलेत्यांनी विचारले,” रामू तू लांब का उभी राहीलीस? ” तेव्हा रमाई म्‍हणाली,” तुम्हाला भेटण्यासाठी  समाज बांधव आतूर झालेले  असताना मी तुमचा इथे वेळ घेणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. आपण  एकमेकांना  कधीही भेटू शकते” हे पारिवारीक नात रमाई ने जीवापाड जपले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाई  प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायची. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर , प्रत्येकाशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात,  वाचनात , महत्वाच्या कामात आहेत, नंतर सवडीने  भेटा.” असे सांगे. अशी पाठवण करताना रमाई प्रत्येकाचे त् नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत त्या व्यक्तीला नोंद करून ठेवण्यास  सांगत.

मानव्याची उषःप्रभा, असणारी, तमाम भीमलेकरांची  संजीवनी रमाई संस्काराचे ज्ञानपीठ, मनोमनी रूजवीत गेली.  संसार करताना आलेले अडीनडीचे दिवस,  शिताफीने दूर केले. अनेक छोट्या मोठ्या गृहोपयोगी वस्तूची सचोटीने विक्री करून पै पे जोडत परीस्थिती सावरणारी रमाई बाबासाहेवांच्या जोडीने समाज कार्यात सहभागी झाली.दागदागिन्यांचा सोस नसलेली रमाई दुसर्‍याला  आनंद देण्यासाठी जगली.

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली रमाईचे शरिर अतोनात केलेल्या कष्टाने पोखरुन गेल होते.दरम्यान रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच गेला. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला त्यावेळी  बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. पण कुठल्याच औषधोपचारारला रमाईचे शरीर साथ देईना. या काळात  बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे ती बोलू शकत नव्हत्या. आपल्या रामूला  बाबासाहेब स्वतः  औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असे. पण काही केल्या रमाईचा  आजार  बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला . २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांची रामू बाबासाहेबांना सोडून गेली.

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात बाबासाहेबांनी या भावना शब्दांकित केल्या आहेत. . ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला तेव्हा अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले  की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या,रमाई बद्दलच्या या  भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या. आणि रमाई भीमराव यांच नात समाज बांधवांच्या काळजात घर करून राहिल.

मान द्यावा,  मान घ्यावा, ही रमाईची शिकवण आजही भीम लेकरांच्या मनी, एक एक साठवण.. म्हणून शिलकीत आहे  पोलादी पुरूष झालेली रमाई जीवनाच्या वादळात  कधी डगमगली नाही. भीमरावाच्या कार्याला, तीन दशकांची साथ देणारी  रमाई, अनाथांची  नाथ…  झाली. अशी, माता, पत्नी, गुणी कन्या जगती आदर्श ठरली.  ‘रमा ची रमाई झाली’ तिला समाजाने, मान दिला.  तिचे स्वागत सहर्ष… सर्व ठिकाणी केले गेले. तिच्या कर्तृत्वात,  संस्काराची मोतीमाळ हीती. तिच्या कार्याची  प्रेरणा,  सदा सर्वकाळ… मना मनात तेवत राहिल.

घटनेचे शिल्पकार डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जेव्हा जेव्हा घेतल जाईल तेव्हा तेव्हा ही माता रमाई आसवांची शाई बनून जगताला सांगत राहिल.

“असे होते भीमराव,  आणि  अशी होते मी”

 

© विजय यशवंत सातपुते

100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.

मोबाईल  9371319798.

 




आध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता – पद्यानुवाद – द्वितीय अध्याय (45) प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

द्वितीय अध्याय

साँख्य योग

( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )

(कर्मयोग का विषय)

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।

निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌।।45।।

 

त्रिगुण विषय से युक्त है वेद तू त्रिगुणातीत

हो,अर्जुन निद्र्वन्द औ मन से भावातीत।।45।।

 

भावार्थ : हे अर्जुन! वेद उपर्युक्त प्रकार से तीनों गुणों के कार्य रूप समस्त भोगों एवं उनके साधनों का प्रतिपादन करने वाले हैं, इसलिए तू उन भोगों एवं उनके साधनों में आसक्तिहीन, हर्ष-शोकादि द्वंद्वों से रहित, नित्यवस्तु परमात्मा में स्थित योग (अप्राप्त की प्राप्ति का नाम ‘योग’ है।) क्षेम (प्राप्त वस्तु की रक्षा का नाम ‘क्षेम’ है।) को न चाहने वाला और स्वाधीन अन्तःकरण वाला हो।।45।।

 

The Vedas deal with the three attributes (of Nature); be thou above these three attributes, O Arjuna! Free  yourself  from  the  pairs  of  opposites  and  ever  remain  in  the  quality  of  Sattwa (goodness), freed from the thought of acquisition and preservation, and be established in the Self. ।।45।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर

[email protected]

मो ७०००३७५७९८

(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

 




योग-साधना LifeSkills/जीवन कौशल ☆ आइये सीखें – हास्य योग कैसे करें? ☆ Shri Jagat Singh Bisht

 

 

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator and Speaker.)

How to do Laughter Yoga ? Tutorial in Hindi….. 

Video Link >>>>>>>>

 

Jagat Singh Bisht

Founder: LifeSkills

Seminars, Workshops & Retreats on Happiness, Laughter Yoga & Positive Psychology.
Speak to us on +91 73899 38255
[email protected]
Courtesy – Shri Jagat Singh Bisht, LifeSkills, Indore




ई-अभिव्यक्ति: संवाद-21 – हेमन्त बावनकर

ई-अभिव्यक्ति:  संवाद–21        

आपसे संवाद करना और आपकी प्रतिक्रियाएँ जानना फिर उन पर अमल करना मुझे इस क्षेत्र में कुछ करने हेतु सकारात्मक ऊर्जा देता है।

सम्मानित लेखक मित्रों की रचनाएँ अधिक से अधिक पाठकों द्वारा पढ़ी और सराही जाती है तो लगता है कि लेखक मित्र का लेखन सफल हो गया है और मेरा प्रयोग/ प्रयास सार्थक हो रहा है।

इस सम्पूर्ण प्रक्रिया में लेखक/पाठक मित्रों का योगदान सराहनीय है। आज प्रातः इन पंक्तियों के लिखे जाने तक  जब e-abhivyakti के डेशबोर्ड पर दृष्टि डाली तो हृदय प्रफुल्लित हो उठा। लेखक पाठक मित्रों द्वारा पोर्टल पर विजिटर्स की बढ़ती हुई संख्या (12,600+) का बढ़ता हुआ ग्राफ कुछ और नया प्रयोग करने हेतु प्रोत्साहित करता है।

आज के दौर में जब स्तरीय पत्रिकाएँ बाजार से गुम होती जा रहीं हैं ऐसे में डिजिटल मंच पर ई-अभिव्यक्ति जैसे प्रयोग आशा की किरण हैं।

कुछ लेखक मित्रों ने उत्सुकता वश जानना चाहा कि उनकी रचनाएँ कितने पाठकों द्वारा पढ़ी गई?

यदि आप इसे तुलनात्मक दृष्टि से न लें और स्वस्थ प्रतियोगिता की दृष्टि से लें तो मैं गत एक माह में पाठकों द्वारा दस सर्वाधिक पढ़ी गई रचनाएँ एवं उनका लिंक आपसे शेयर करना चाहूँगा। इन्हें आप सांकेतिक रूप से ले सकते हैं क्योंकि इनमें वे संख्याएं सम्मिलित हैं जो पाठकों द्वारा शॉर्ट लिंक का उपयोग करते हुए पढ़ी गईं हैं। इनमें वे संख्याएँ  सम्मिलित नहीं हैं जो पाठकों द्वारा सीधे पोर्टल पर जाकर पढ़ी गईं हैं। अतः वास्तविक पाठकों की संख्या इससे अधिक हो सकती है। 

  • APRIL 4 मराठी कविता – ☆ असीम बलिदान ‘पोलीस’ ☆ – श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर – 263 पाठक – ly/2CWKVcW
  • APRIL 11 हिन्दी कविता – ? सुनहरे पल……… ? – सुश्री बलजीत कौर ‘अमहर्ष’ – 242 पाठक – ly/2GdvHlD
  • APRIL 6 – मराठी आलेख – ? आनंदाचं फुलपाखरू ?- श्रीमती रंजना मधुकरराव लसणे – 150 पाठक – ly/2G2Evuy
  • APRIL 3 – हिन्दी कविता ☆ दोहे ☆ – सुश्री शारदा मित्तल – 116 पाठक -ly/2WCzTRi
  • MAR 18 – मराठी आलेख – * विषवल्ली.. . ! * – डॉ. रवींद्र वेदपाठक – 77 पाठक – ly/2TGFglD
  • APRIL 5 – हिन्दी कविता – ☆ मैं तेरा प्रणय तपस्वी आया हूँ ☆ – डॉ प्रेम कृष्ण श्रीवास्तव – 68 पाठक – bit.ly/2UiieBV
  • MAR 26 – रंगमंच स्मृतियाँ – “कोर्ट मार्शल” – श्री समर सेनगुप्ता एवं श्री अनिमेष श्रीवास्तव – 66 पाठक -ly/2HHXQU8
  • APRIL 4 – हिन्दी – लघुकथा – ☆ फर्ज़ ☆ – सुश्री ऋतु गुप्ता – 59 पाठक -ly/2OMbTZv
  • APRIL 3 – मराठी कविता – ☆ अळवाचं पाणी ☆ – श्रीमति सुजाता काले – 59 पाठक – ly/2OG4VFm
  • APRIL 12 – हिन्दी कविता ☆ मुक्ता जी के मुक्तक ☆ –डा. मुक्ता – 57 पाठक -ly/2KxhX9F

आज पत्रिकाएं खरीद कर और साझा कर पढ़ने वाले पाठकों की संख्या में निरंतर गिरावट आ रही है। पुस्तकालय बंद होने की कगार पर हैं। ऐसे में यदि मित्र लेखक / पाठक विभिन्न सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर, व्हाट्सएप्प या फेसबुक पर लिंक शेयर कर अधिकतम लेखकों /पाठकों तक रचनाओं को उपलब्ध कराने में सफल होते हैं तो निश्चित ही यह प्रयोग सफल होगा।

आज बस इतना ही।

हेमन्त बावनकर 

 




English Literature – Poetry – ☆ Fear of Future ☆– Ms Neelam Saxena Chandra

Ms Neelam Saxena Chandra

☆ Fear of Future ☆

(Ms. Neelam Saxena Chandra’s  poem “Fear of Future”  is amazing.  Feeling of an unborn child in a foetus can be only imagined and felt by a women author.  Truly, as a gentleman author I can only honour the  feelings of a women.)

 

Embedded in the womb of time,

The foetus of an unborn child stretched its feet;

It kicked and growled and roared,

Tremendous energy existed in the frame petite!

 

It troubled the mom by playing mischief,

Now and then it would kick the womb’s wall;

As if that was not enough

It would move around violently like a football!

 

Pestered by the waywardness of the foetus,

The desolate mother would wail tears;

Perturbed by its tricks and guiles,

The pitiful mother would shiver with fears!

 

An illegitimate and unwanted child it was,

The mother knew not how to abort it;

Her nervousness kept multiplying every moment,

And her forlorn tummy grew bit by bit!

 

The foetus was nothing but the fear of the future

And though it didn’t exist, it hounded the body,

Let not anxiety and phobias torture your heart,

Live the present with happiness and glee!

 




हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ मॉम है कि मानती नहीं ☆ श्री शांतिलाल जैन 

श्री शांतिलाल जैन 

☆ मॉम है कि मानती नहीं ☆

(प्रस्तुत है श्री शांतिलाल जैन जी का आधुनिक समाज को आईना दिखाता हुआ एक सटीक, सार्थक एवं सामयिक व्यंग्य।)

माय मॉम इज द बेस्ट मॉम. उन्होंने मुझे कभी रोने नहीं दिया. आया-माँ बताती हैं कि जब मैं अबोध शिशु था, तभी से, जब जब रोने लगता मॉम यूट्यूब पर ‘लकड़ी की काठी’  लगाकर फ़ोन थमा देतीं. ऊंगली पकड़कर चलना सिखाने की उम्र में मॉम ने मुझे मोबाइल चलाना सिखा दिया था. मॉम का दूसरावाला स्मार्टफ़ोन मुझे हमेशा थप्पड़ खाने से बचाता. होता ये मैं मॉम से कुछ न कुछ पूछने की भूल कर बैठता. एक बार मैं जोर का थप्पड़ खाते खाते बचा जब मैंने पूछा  – “मॉम ये सन ईस्ट से ही क्यों राइज करता है?”

“आस्क योर डैड”

“मॉम होली पर कलर क्यों लगाते हैं ?”

“आय डोंट नो.”

“मॉम, सम्स करके ले जाने हैं कल.”

“अभी मिस आएगी तेरी, ट्यूशन वाली, कराएगी.”

“मॉम प्लीज. आप कराओ ना.”

“जान मत खा मेरी.” मन किया था मॉम का कि एक जोर का थप्पड़ रसीद कर दें. बुदबुदाईं वे, थोड़ी देर चैन से व्हाट्सएप भी नहीं देखने देता. रुककर बोलीं – “थोड़ा कीप क्वायट बेटा. हाऊ मच बकर बकर यू आर डूइंग.  पता नहीं कब सुधरेगा ये लड़का. सुधरेगा भी कि नहीं. ” वे अपना टेबलेट फोर-जी छोड़कर उठीं, टेम्पर पे कंट्रोल किया, दूसरावाला स्मार्ट फ़ोन उठाया और कहा – “बेटा,  प्ले इट फॉर थोड़ी देर”. यही नहीं उन्होंने मेरे चिक पर किस करते हुवे एक सेल्फी ली और इन्स्टाग्राम पर पोस्ट कर दी. फ़ोन मुझे मार से हमेशा बचाता रहा. अब समझ गया हूँ, जब मॉम फेसबुक पर ऑनलाइन हों तब मैं उसे बिलकुल डिस्टर्ब नहीं करता. हाँ, उस दिन मॉम का गाल चूमना मुझे अच्छा लगा और सेल्फी की फोटो ग्रुप की बाकी मम्मियों को. लाइक्स के इतने अंगूठे मिले मॉम को कि वे मुझे खाना देना भूल ही गईं.

ऐसा नहीं है कि मॉम को मेरी भूख का ख्याल नहीं रहता. बल्कि इस पर तो उन्हें क्लब में बेस्ट मॉम का अवार्ड मिला है. एन आईडियल मॉम. मेरे लिए टाईम निकालना जानती है. क्या नहीं रखा है  फ्रिज़ में. सेंडविचेस, मैगी, चाऊमिन, पास्ता, पिज़्ज़ा, फ्रोजन फ़ूड, चोकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स. दो मिनिट में तैयार. बाकी फिफ्टी एट मिनिट इन बॉक्स में.

एक बार एक राईम में मैंने गार्डन देखा, फ्लावर देखे, मंडराती तितलियाँ देखीं,  ऑल एनीमेटेड. मॉम ने प्रॉमिस किया है, पक्का, एक बार वे मुझे सच्ची-मुच्ची के गार्डन में जरूर ले जायेंगी. इन दिनों मैं बहुत मुटा गया हूँ. किसी ने मॉम को ध्यान दिलाया तो उन्होंने कहा – डोंट वरी, बेरियाटिक सर्जरी करा दूँगी. वो एक ‘केयरिंग मॉम’ है.

एक दो बार ऐसा हुआ कि टॉयलेट तक जाने से पहले ही मेरी पॉट्टी निकल गई. तब से मॉम रिस्क नहीं लेती, डायपर पहनाकर ही रखती है. अब मैं पॉट्टी के बाद भी दो-तीन घंटे बिना क्लीन कराये घूम सकता हूँ. मोबाइल मेरा ट्वेंटी-फोर बाय सेवेन का साथी भले हो, ये दिया तो मॉम ने ही है ना, शी इज द बेस्ट मॉम.

© शांतिलाल जैन 

F-13, आइवोरी ब्लॉक, प्लेटिनम पार्क, माता मंदिर के पास, TT नगर, भोपाल. 462003.

मोबाइल: 9425019837




मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ अंतरात या. . . .  !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ अंतरात या. . . .  !☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  रचित  काव्य रचना की पृष्ठभूमि पर कवि हृदय की भावपूर्ण कल्पना पर आधारित कविता।) 

 

आयुष्याशी घेतो बोलून

जगणे उसवत जाताना

अंतरात या घडतो आहे

एकेक कविता जगताना. . . . !

 

एकांताशी करतो सलगी

मनात माझ्या रमताना.

अंतरात या माझे मी पण

पहाट स्वप्ने फुलताना.. . . . !

 

दैनंदिन गरजांची यमके

जुळवीत जातो घडताना .

अंतरात या सालंकृत मी

काव्य प्रपंची झिजताना.. . . !

 

सुखदुःखाचे चाळ बांधतो

अनुभव सारे टिपताना .

अंतरात या येतो उमलून

भावभावना सजताना.. . . . !

 

धगधगत्या जीवनाची गाथा

बाप आठवे रडताना.

अंतरात या एक समर्पण

माय माऊली स्मरताना. . . . !

 

जबाबदाऱ्यांचे ते कुंपण

या जीवनाच्या परिघाला.

अंतरात या येतो बहरून

ह्रदयसुता ही खुलताना.. . . . .!

 

© विजय यशवंत सातपुते

100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.

मोबाईल  9371319798.




आध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता – पद्यानुवाद – द्वितीय अध्याय (42-44) प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

द्वितीय अध्याय

साँख्य योग

( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )

(कर्मयोग का विषय)

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ।।42।।

 

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌।

क्रियाविश्लेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ।।43।।

 

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌।

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ।।44।।

 

वेदों पर वार्तायें मधु करते जो विद्वान

उससे अधिक न और कुछ कर लेते अनुमान।।42।।

 

जन्मकर्म फलदायी ले स्वर्ग प्राप्ति की चाह

भोग-ऐश्वर्य क्रियाओे की करते है परवाह।।43।।

 

ऐसे भोगासक्त की कोई न स्थिर बात

 समय समय पर बेतुकी करते रहते बात।।44।।

 

भावार्थ :  हे अर्जुन! जो भोगों में तन्मय हो रहे हैं, जो कर्मफल के प्रशंसक वेदवाक्यों में ही प्रीति रखते हैं, जिनकी बुद्धि में स्वर्ग ही परम प्राप्य वस्तु है और जो स्वर्ग से बढ़कर दूसरी कोई वस्तु ही नहीं है- ऐसा कहने वाले हैं, वे अविवेकीजन इस प्रकार की जिस पुष्पित अर्थात्‌दिखाऊ शोभायुक्त वाणी को कहा करते हैं, जो कि जन्मरूप कर्मफल देने वाली एवं भोग तथा ऐश्वर्य की प्राप्ति के लिए नाना प्रकार की बहुत-सी क्रियाओं का वर्णन करने वाली है, उस वाणी द्वारा जिनका चित्त हर लिया गया है, जो भोग और ऐश्वर्य में अत्यन्त आसक्त हैं, उन पुरुषों की परमात्मा में निश्चियात्मिका बुद्धि नहीं होती।।42 -44।।

 

Flowery speech is uttered by the unwise, who take pleasure in the eulogising words of the Vedas, O Arjuna, saying: “There is nothing else!” ।।42।।

 

Full of desires, having heaven as their goal, they utter speech which promises birth as the reward of one’s actions, and prescribe various specific actions for the attainment of pleasure and power. ।।43।।

 

For those who are much attached to pleasure and to power, whose minds are drawn away by such teaching, that determinate faculty is not manifest that is steadily bent on meditation and Samadhi (the state of Super consciousness). ।।44।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर

[email protected]

मो ७०००३७५७९८

 

(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

 




योग-साधना LifeSkills/जीवन कौशल ☆ Yoga Nidra By Swami Satyananda Saraswati ☆ Shri Jagat Singh Bisht

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator and Speaker.)

Yoga Nidra By Swami Satyananda Saraswati

Video Link >>>>>>>>

Yoga Nidra is a systematic method of inducing complete physical, mental and emotional relaxation.

The term yoga nidra is derived from two Sanskrit words, yoga meaning union or one-pointed awareness, and nidra which means sleep.

Yoga nidra is a more efficient and effective form of psychic and physiological rest and rejuvenation than conventional sleep.

A single hour of yoga nidra is as restful as four hours of ordinary sleep.

Yoga nidra is a technique which can be used to awaken divine faculties, and is one of the ways of entering samadhi.

The practice was created by Swami Satyananda Saraswati who established the Bihar School of Yoga.

There is a touch of divinity in this rendering of yoga nidra by Swami Satyananda Saraswati.

I have been listening to it again and again.

Jagat Singh Bisht

Founder: LifeSkills

Seminars, Workshops & Retreats on Happiness, Laughter Yoga & Positive Psychology.
Speak to us on +91 73899 38255
[email protected]
Courtesy – Shri Jagat Singh Bisht, LifeSkills, Indore




हिन्दी साहित्य – हिन्दी कविता – ? मैं प्रेम चंद नहीं ? – डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’

डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’ 

? मैं प्रेम चंद नहीं ?

(डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’ पूर्व प्रोफेसर (हिन्दी) क्वाङ्ग्तोंग वैदेशिक अध्ययन विश्वविद्यालय, चीन)

 

सब्जी लेने क्यों जाना

तीन मील दूर मंडी तक

क्यों जाना

सवेरे-सवेरे

मिस्त्री,

मज़दूर खोजने

चौराहे पर

खपाने दिमाग

टुटपुँजिया गृहस्थी पर

जीना ही क्यों वह ज़िंदगी

जो तपाए जीवन भर

क्यों सुनना कोई दुःखद समाचार

किसी घटना के घटने का

क्यों हो मेरी नज़र में

किसी दुखियारी का दुःख

या नीलगायों के फ़सल चर लेने पर

आँगन  में पड़ी

उलटी सरावन -सी

किसान की लाश

मैं प्रेमचंद नहीं

जो दीये की रोशनी में

आँखें फोड़ूँ

एक उपयोगितावादी

साहित्यकार हूँ

फिर क्यों न किसी वातानुकूलित कक्ष में

बैठ कर

गढ़ूँ लल्लनटॉप पटकथाएं

या फिर

गूगल पर खोजूँ कोई उपयोगी चरित्र

और लिखूँ

किसी ऐसे नेता की वैसी जीवनी

जिस पर मिल सके

भारत रत्न

पद्मश्री, पद्म भूषण

और कुछ नहीं तो

साहित्य अकादमी,

ज्ञान पीठ या व्यास सम्मान।

 

© डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’© डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’