मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ गझल ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

द्या मला आनंद देतो मी सुपारी

मागतो माझ्यात थोडीशी उभारी

*

या नभाचा केवढा विस्तार सारा

वाटते मीही भरावी ना भरारी

*

टाकले होते सुखासाठीच जाळे

दुःख फसले जाहलो कच्चा शिकारी

*

बासरी प्रेमातली झाली मुकी अन

स्वागताची वाजली नाही तुतारी

*

गोड होते बोलले सारे तरीही

झाकल्या होत्या कटांच्या रे कट्यारी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट

फेब्रुवारी महिना हा घरातील लग्नकार्यामुळे खुप जास्त गडबडीत गेला आणि आता मार्च महिना तर कायमच आम्हा बँकर लोकांसाठी धावपळीचाच. मात्र फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याची सुरवात ही भ्रमंती साठी एकदम बेस्ट. ह्या दिवसात गारठा तर कमी होतो पण उन्हाची काहीली सुध्दा सुरू झालेली नसते. त्यामुळे हा मोसम फिरण्यासाठी खासच.

तसही ह्या मोसमामध्ये जरा शहराबाहेर भटकंती करण्याची मजा काही ओरच.मस्त सगळीकडे पळस फुललेला असतो.पळस म्हणजे अफलातून सौंदर्याचे काँम्बीनेशन.त्याचा तो मखमली केशरी रंग, त्या केशरीरंगाला साजेसा शेवाळी हिरवा पर्णसांभार,आणि ह्या सगळ्यांनी बनलेला त्याचा लफ्फेदार तुरा,खरचं वेडं लावतो अक्षरशः. एखादा ह्या फुलांचा गुच्छ खूप सुंदर भासावा आणि लगेच दुस-या गुच्छाकडे नजर टाकावी तो दुसरा त्याहुनही सुंदर भासावा,अशी ही सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करणारा हा पळसाच्या फुलो-याचा आपला फेब्रुवारी, मार्च महिना हा खासच. अमरावती जवळ पोहो-याच्या जंगलात टिमटाळ्याला ह्या केशरी फुलांचे विस्तीर्ण पसरलेले जणू पठारच आहे असे म्हणतात. त्या सौंदर्य स्थळालाही एक दिवस निश्चितच भेट देईनच.पळसाचे नानाविध रंग असतात असे म्हणतात पण ज्याप्रमाणे नानारंगाच्या पैठण्या असल्या तरी पैठणी म्हंटली की डोळ्यासमोर ती जांभळट रंगाची टिपीकल पैठणीच उभी राहते त्याचप्रमाणे पळसाचे फुलं म्हंटले की ते मखमली केशरीच.

अजून जरा गावाबाहेर शेतांच्या बाजूला भटकंती वळवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या बाळकै-या झाडांना लटकून हवेच्या झोताबरोबर हिंदोळे देत आपल्याला खुणावत असतात.बाळकै-या बघितल्या की खूप द्विधा मनस्थिती होते.त्यांचं ते अजून पूर्ण विकसित न झालेलं,पिल्लासारखं, अवखळ रुप आपल्याला त्याला तोडण्यासाठी हात लावण्यापासून दूर खेचतं,तर त्याची किंचीत तुरट,आंबट चव ही जिभेवर रेंगाळायला मोहात टाकते डेरेदार लटपट लागलेल्या आंबट चिंचानी लदलदलेले झाड बघून अगदी दिवसभरलेली पहिलटकरीण वा लेकुरवाळी माहेरवाशीण घरी आल्याचा फील येतो.

खरचं कारमध्ये ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला बसून, खिडकी उघडी करून अलवार मंद हवेच्या झुळुका अंगावर झेलतं,वा-यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या अवखळ केसांच्या बटांना दूर सारतं फुललेल्या केशरी पळसाच्या सौंदर्याचे मनमुराद निरीक्षण करणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही हे त्याक्षणी तरी वाटतं.

ह्या सौंदर्याच्या बरोबरीनेच वसंत ऋतू हा प्रेमाचे प्रतीक. कोणाचा व्हँलेटाईन तर कोणाला भारुन टाकणारी वसंतपंचमी ह्याच महिन्यातील.फेब्रुवारी महिना हा आम्हां नोकरदारांसाठी पण जरा आवडता महिना.अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा महिना का कोण जाणे पण लौकर आला आणि लौकर गेला असा भासणारा हा मास.  ह्या आवडत्या फेब्रुवारी मासाचा,पळसाच्या सौंदर्याचे आणि प्रेमाच्या वसंतपंचमी चे काहीतरी अनोखे नाते मात्र असते.ह्या निमित्ताने मी मागेच केलेली एक रचना खालीलप्रमाणे…

सुरु आहे सध्या फेब्रुवारी मास,

प्रेमीजीवां साठी पर्वणी खास ,

आसमंतात दरवळे प्रेमाचा सुवास,

खरेच असेल प्रेम की निव्वळ आभास?।।।

 

काहीवेळा जाणवे विरहातही गहिरे प्रेम,

कधी उपभोगापेक्षा  त्यागातही भासे प्रेम,

कधी अंतरातील दूरी घालवे हे प्रेम,

स्वच्छ नजरेने अनुभवले तरच कळेल हे पारदर्शी प्रेम।

 

प्रेमात असे ताकद, प्रेमात अनोखी शक्ती,

न्यारी असे राधेची श्रीकृष्णावरील भक्ती,

ना चाले ह्यात कधीच कुणाची सक्ती,

खरचं प्रेम ही नितांतसुंदर अनुभूती ।।।

 

प्रेमात सगळंच आपलं असतं ,

तुझं माझं काही नसतं,

पाडगावकर म्हणालेच ना हे  सेम टू सेम असतं,

सगळ्यांचचं सेम टू सेम असतं ।।।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ का गं तुझे डोळे ओले? – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

का गं तुझे डोळे ओले– भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

कमलाबाई अजूनही आल्या नव्हत्या. सकाळचे आठ वाजून गेले होते. त्यांची यायची वेळ टळून गेली होती. वाट बघून इतक्या उशिरा स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणजे आज निमाची खूप धावपळ होणार होती. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कमलाबाई स्वयंपाकाला येत होत्या. स्वयंपाक चवीचा आणि काम नीटनेटकं करायच्या. अघळपघळ गप्पा नव्हत्या, कुठे सांडलवंड  नव्हती. तळणीतलं उरलेलं चार चमचे तेलसुद्धा त्या निगुतीने झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी आमटी भाजीला वापरायच्या. आजपर्यंत कधी एक दिवस त्या आल्या नाहीत असं झालेलंच नव्हतं. आणि आज असं अचानक ..आधी न सांगता, कांही निरोप न देता…? निमाला अचानक आपला आधार तुटल्यासारखंच वाटलं. तरीही चटपटीतपणे तिने कुकरची तयारी केली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.’कमलाबाईच असणार.. नक्कीच..’ ती सावरली. त्यांच्या न येण्यामुळे नकळत मनात साठू लागलेली अस्वस्थता क्षणात विरून गेली. ती दार उघडायला धावली. दारात कमलाबाई नव्हत्याच. एक मुलगा होता. अनोळखी.

” कमलाबाई आज स्वयंपाकाला येणार नाहीत”

” कां..?”

” घरी भांडणं झालीयत.” त्यानं निर्विकारपणे सांगितलं. आणि पुढं काही विचारणार तोपर्यंत तो निघूनही गेला. कमलाबाई आणि भांडण या दोन गोष्टी कल्पनेतसुद्धा एकत्र येणं निमाच्या दृष्टीने अशक्यच होतं.   

पण.. मग हा.. असा निरोप? तिनं दार लावून घेतलं. आत येऊन कुकर गॅसवर चढवला. आता कणिक भिजवायला घेण्याशिवाय गत्यंतर  नव्हतं. सकाळच्या वेळीसुद्धा एरवी मिळणारा थोडाफार निवांतपणा कमलाबाईंनी असा हिरावून घेतला होता!

निमाचा नवरा बाथरूममधे नेहमीप्रमाणे मजेत गाणी गुणगुणत यथासांग आंघोळ करत होता!

” आंघोळ आवरून जरा लवकर या बरं बाहेर “

त्याचा गाण्याचा आवाज मधेच तुटला. अंगावर पाणी ओतल्याचा आवाज मधेच थबकला. बादलीत सोडलेला नळ क्षणभर बंद झाल्याचं तिला बाहेरूनसुद्धा जाणवलं.

” काय गं?” तो खेकसला.

“कांही नाही.जरा लवकर आवराss” कपाळाला आठ्या घालून ती पुन्हा कामाला लागली. नवऱ्याचा राग आपल्याला नेमका कशाबद्दल आलाय याचा क्षणभर तिलाच उलगडा होईना.आता बाथरूममधून बाहेर येऊन त्यानं काही विचारलं तर..?

तो आलाच. 

“काय गंs? का ओरडत होतीस?”

आपल्याला आता हुंदकाच फुटणार असं वाटताच निमा महत्प्रयासानं छानसं हसली.

“ओरडत कुठं होते? तुम्हाला आत ऐकू यावं म्हणून मोठ्यानं बोलले “

“तेच ते. पण कां?”

” आज कमलाबाई येणार नाहीयेत.”

” बरं मग?” मी काय करू?” त्याचा तिरसट ति-हाईत प्रश्न! ऐकलं आणि ती त्रासिकपणे त्याच्याकडे पहात राहिली.   

“चिडतेयस कशाला ? येतील अजून.”

” येतायत कुठल्या? एक मुलगा येऊन निरोप सांगून गेलाय”

” फक्त आजच?की उद्यासुद्धा?”

त्याही मन:स्थितीत निमाला नवऱ्याच्या धोरणीपणाचं थोडं कौतुकच वाटलं. किती साधा पण नेमका प्रश्न! तो आपल्याला का नव्हता सुचला?…

” उद्याचं उद्या बघू. तुम्ही आता असं करा, पटकन् कपडे करून या आणि आपल्या तिघांचे डबे घासून घ्या “

“आणि मग?नंतर पोळ्या घेऊ करायला?” त्यानं उपरोधानं विचारलं.

” पोळ्या मी करतेय हो. तुम्ही तिघांची पानांची तयारी करून ठेवा आणि बाहेर जरा केदारकडे बघा.या गडबडीत आज त्याच्याजवळ बसून त्याचा अभ्यास घ्यायला मला जमणार नाहीये आणि तो आपापलं कांही करणार नाहीय” 

कपाळाला आठ्या घालून नवरा कपडे बदलायला निघून गेला….!

आपल्या नवऱ्याकडून गडबडीच्या वेळी एखादं हलकसं काम किंवा केदारकडून त्याचा अभ्यास न चिडता करून घ्यायची अशी आणीबाणीची वेळ काही आज प्रथमच आलेली नव्हती. पण आज तिचा तिने मनातून थोडा धसकाच घेतला होता. आता यावेळी नेमकं परीक्षा बघायला आल्यासारखे कुणी पाहुणे येऊन टपकू नयेत असं निमाला मनापासून वाटत असतानाच दारावरची बेल वाजली.

“बघा हो कोण आहे?” ती आतूनच ओरडली.

” निमाss..” त्याची त्रासिक हांक.

बारीक गॅसवर तवा तापत ठेवून निमा बाहेर आली. आता या गडबडीत कुणाचं स्वागत करायला लागतंय याचा तिला अंदाज बांधता येईना. बाहेर येऊन तिने पाहिलं तर दार आतून तसंच बंद होतं. सिगरेटचे झुरके घेत नवरा पेपर घेऊन आरामात सोफ्यावर बसून होता.

“काय हो?”

“कुठं काय? अगं बघ ना कोण आलंय?”

” एवढ्यासाठी मला आतून बोलावलंत? अहो जागचे न उठता हात लांब करून बसल्या जागेवरून सुद्धा दार उघडू शकला असतात की हो. मुकाट्याने दार उघडा न्  बघा कोण आहे ते.” ती तणतणत आत वळणार तेवढ्यात बेल पुन्हा वाजली. चडफडत तिने वळून दार उघडलं. दारात कमलाबाई उभ्या होत्या! नेहमीसारख्याच हसतमुख,प्रसन्न!

“आज उशीर झाला हो थोडा..” चप्पल काढता काढताच बोलत त्या गडबडीने आत आल्या आणि पदर खोचून तशाच स्वयंपाकघराकडे निघाल्या. थोडसं आश्चर्य आणि थोडासा अनपेक्षित आनंद यामुळे निमा क्षणभर खिळून उभीच राहिली.

पेपरमधून डोकं वर काढून नवऱ्याने क्षणभर निमाकडे रोखून पाहिलं. ते पहाणं असं, जसंकाही ‘कमलाबाई येणार नाहीयत’ असं खोटंच सांगून त्याला कामाला जुंपायचा हिचाच काहीतरी डाव होता. तिने हळूच नवऱ्याकडं पाहिलं.नजरानजर होताच कपाळाला आठ्या घालून त्याची पेपरची पारायणं पुन्हा सुरू झाली होती. अभ्यासाचं दप्तर तसंच पसरून केदार कॉमिक्स वाचत अंथरुणावर लोळत होता. अजून अंथरूणं गोळा व्हायचीत हे तिला प्रथमच जाणवलं आणि कमलाबाई अनपेक्षितपणे आल्याचा मनाला स्पर्शू पहाणारा आनंद तिथेच विरून गेला..!आज कमलाबाई आल्याच नसत्या तर..?

— क्रमश: भाग पहिला

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठवणीतल्या आठवणी– ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साठवणीतल्या आठवणी–’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते आणि प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचीच मालमत्ता असु शकते व त्यात कडू गोड आठवणींचा भरगच्च  खजिना असतो. कडू आठवणी मनाच्या तळाशी दाबल्या की मग वर येतो तो सुंदर आनंदी आठवणींचा    साठा. मग त्या आठवणींचा ठेवा दुसऱ्यांना वाटावासा वाटतो. अगदी तसंच झालं आहे माझं.   

महाशिवरात्र आली की वडीलधाऱ्यांच्या आठवणी उफाळून येतात. वडीलधारी काळाच्या पडद्याआड जातात आणि आपण पोरकं होतो. अकाली पोक्तपणा येतो.

प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो ‘तुझ्यापेक्षा मला तुझ्या आठवणीच जवळच्या वाटतात, कारण त्या सतत माझ्याजवळ राहतात.’ अशीच एक माझ्या आई -वडिलांची सुखद आठवण आठवली.

माझे मेव्हणे श्री. दत्तात्रय पंडित, पंजाबच्या गव्हर्नरांचे, श्री काकासाहेब गाडगीळ यांचे  P. A. होते. त्यांच्यामुळे पुणे ते चंदीगड अशा लांबच्या प्रवासाचा योग आला. त्यावेळी सोयीस्कर गाड्या नव्हत्या. प्रवासात दोन-चार दिवस जात असत.

माझे वडील ति. नाना, दत्तोपंत स. माजगावकर कट्टर शिवभक्त होते. रोज सोवळं नेसून त्यांनी केलेल्या पार्थिव पूजेचा सोहळा अवर्णनीय असायचा. दंडाला कपाळाला भस्माचे पट्टे लावून स्पष्ट मंत्रोच्चारांनी केलेल्या मंत्रध्वनीने शंखनिनादाने आमची प्रभात, सुप्रभात व्हायची. रोज महादेवाची सुबक पिंड तयार करून यथासांग पूजा करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. 

तर काय सांगत होते! आमचा प्रवास सुरू झाला. पळणाऱ्या झाडांमधून सूर्याची सोनेरी किरणे आत आली तर कापराचा सुगंध नाकात शिरला. किलकीले डोळे विस्फारले गेले, कारण धावत्या गाडीत मांडी घालून प्रवासातही नेम न मोडता  नानांची पूजा चालू होती. शिवभक्त मंडळी सरळ मार्गी असतात. वाकडी वाट करून नेम मोडणं त्यांच्या तत्वात बसत नाही.

प्रवासातही आई -नाना पूजेच्या तयारीनिशी आले होते. नानांच्या पुण्यकर्माला आईची साथ होती. त्यावेळी लकडी पुलावर नदीकाठी काळीशार माती भरपूर असायची. आई अवघड लकडी पूल उतरून, नदी काठावरची काळी माती पिशवी भरून, खांद्यावरून आणायची. ती चाळणीने मऊशार चाळायची आणि देवघराच्या फडताळ्यात डब्यात भरून ठेवायची. देवाची तांब्याची उपकरणी लख्ख करण्याचं काम आम्हा मुलींकडे असायचं आणि त्याबद्दल आम्हांला बक्षीस काय मिळायचं माहित आहे? श्रीखंडाची गोळी. पण ती चघळतांना आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. आजकालची कॅडबरी पण त्याच्यापुढे नक्कीच फिक्की ठरेल.

तर त्या चंदीगड प्रवासात आईने काळ्या मातीचे बोचकंही बरोबर आठवणीने घेतलं होतं. आणि हो! काळीमाती भिजवायला पुरेसं घरचं पाणी फिरकीच्या तांब्यातून घ्यायला आई विसरली नव्हती. तेव्हा पितळीचे छान कडी असलेले तांबे प्रवासात सगळेजण वापरायचे. थर्मास चा शोध तेव्हां लागला नव्हता आणि प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तर अस्तित्वातच नव्हत्या.

ति. नानांनी महादेवाची पिंड इतकी सुबक, इतकी सुबक बनवली की, रेल्वेच्या जनरल बोगीतली लोकं महादेवाची पिंड बघायला गोळा झाले. पार्थिव पूजा, मंत्र जागर, उत्तर पूजा पण गाडीतच झाली. सगळ्यांना इतकी अपूर्वाई वाटली. नानांच्या भोवती ही गर्दी झाली.

त्यावेळी रेल्वे डब्याच्या खिडक्यांना गज नव्हते. इतकी गर्दी झाली की एका पंजाबी ‘टीसी’ नें ही बातमी स्टेशन मास्तरला पुरवली. प्लॅटफॉर्मवर नानांची पूजा बघायला हा घोळका झाला.

योगायोग असा की कुणालातरी जवळच असलेलं बेलाचं झाड दिसलं.. गाडी सुटायला अवकाश होता. वयस्करांनी तरुणांना पिटाळलं. पटापट गाडीतून माकडा सारख्या उड्या मारून पोरांनी बेलाची पाने तोडली. भाविकांनी पिंडीवर मनोभावे वाहिली. भाविकांच्या श्रद्धेने छोटीशी पिंड हां हां म्हणता बेलाच्या पानाने झाकली गेली. 

रेल्वे डब्यात आपण चहा नाश्ता करतो ना त्या छोटेखाली टेबलावर ही पूजा झाली होती. गाडीच्या त्या जनरल बोगीला मंदिराचं स्वरूप आलं होतं. असा आमचा एरवी कंटाळवाणा वाटणारा प्रवास मजेशीर झाला. नंतर तर लोक नानांच्याही आणि जोडीने  आईच्या पण पाया पडायला लागले.   आई नाना अवघडले, संकोचले. आम्ही मात्र तोंडावर हात ठेवून हा सोहळा बघतच राह्यलो. खरं सांगु, तेव्हा तर माझे आई-वडिल मला शंकर-पार्वतीच भासले.

तर मंडळी, अशी ही भावभक्तीने भारलेल्या शिवभक्ताची ही आठवण कथा.

शिवशंभो  महादेवा तुला त्रिवार दंडवत. 

माझी सासरेही महा पुण्यवान  शिवभक्त होते. कारण महाशिवरात्रीलाच ते जीवा शिवाच्या भेटीला गेले. अशा या थोर वडीलधाऱ्यांच्या पूर्वपुण्याई मुळेच आपण सुखात आहोत नाही कां?

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी सत्यनारायण पूजा, सप्तशतीचा पाठ, लघुरुद्र, हे सर्व  पुरुष करत असत. 1975 साली थत्ते मामांनी स्त्रियांनी हे शिकायला हरकत नाही असा विचार मांडला. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच तेव्हाच्या समाज रचनेनुसार हे स्वाभाविक होते. तरीसुद्धा मामांनी उद्यान प्रसाद पुणे येथे खास स्त्रियांसाठी हे वर्ग सुरू केले.

स्वाभाविकच स्त्रियांचा प्रतिसाद अल्प होता. स्त्रियांच्या मनातील भीती, घरातून विरोध, वेळ कसा काढायचा, शिवाय संस्कृत भाषा…. इत्यादी अनेक अडचणी समोर दिसत होत्या. मात्र काही स्त्रियांना घरातून परवानगी मिळाली आणि त्या वर्गाला आल्या.

पहिली बॅच सुरू झाली. त्यात आमच्या गुरु मालती जोशी होत्या. सदाशिव पेठेत अनाथ विद्यार्थी गृहासमोर असलेले नरसिंहाचे देऊळ बाईंचे आहे.  त्या तिथेच राहत आहेत. मुळातच हुशार असल्याने त्या भराभर शिकत गेल्या.

थत्ते मामांनी सर्वांना प्रार्थने पासून सर्व  शिकवले. संसाराची  जबाबदारी सांभाळून हे सर्व तोंड पाठ करायचे होते. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली .

आठ दहा बायका हे शिकल्या.थत्ते मामांना अतिशय आनंद झाला. जोशीबाई अनेक वर्ष  थत्तेमामांबरोबर   पुजा पाठ करायला जात होत्या.

काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचे वर्ग त्यांच्या घरी सुरू केले. अत्यंत अल्पशा फी मध्ये त्या  शिकवत असत.

बाईंचा एक अलिखित नियम होता..

की जे शिकवलं असेल ते पुढच्या वेळी म्हणून दाखवायचे .आम्ही 55 ते 60 वर्षाच्या होतो. खूप वर्षांनी पुस्तकं अभ्यासासाठी हातात घेतली होती. पाठ असलं तरी बाईंच्या समोर म्हणून  दाखवताना  चुका व्हायच्या.

बाई गप्पा मारायच्या, चहा करायच्या, लाडू खायला द्यायच्या पण पाठांतर केलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कडक शिस्त असायची.चुकलं तर परत म्हणावे लागे.

बाईंची आम्हाला भिती वाटायची. नंतर त्यात गोडी वाटायला लागली. पाठांतराची सवय झाली….प्रेरणा द्यायला बाई होत्याच…

अनेक जणी बाईंच्या कडे शिकून तयार झाल्या . बाईंच्या बरोबर आम्ही पुण्यात आणि बाहेरगावी कार्यक्रम केले.  त्यातल्या काहीजणी आता इतरांना शिकवत आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी  मृत्युंजयेश्वर मंदिरात आम्ही रुद्र म्हणायला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात एके दिवशी सारसबाग गणपती समोर ब्रह्मणस्पती म्हणायला जातो.  बाईंच्या बरोबर देवीच्या देवळात सप्तशतीचे पाठ  करायला जातो हे सर्व सेवा म्हणून करतो.हे  बाईंच्या मुळे शक्य झाले आहे.

आज शांतपणे घरी बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त ,त्रिसुपर्ण, विष्णुसहस्त्रनाम, शीव महिम्न  म्हणताना   अपार आनंद होतो … बाईंनी आम्हाला हा बहुमूल्य ठेवा दिलेला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी थत्ते मामांनी बायकांच्यावर विश्वास ठेवला. आणि  त्या पण हे करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. आज त्यांची पण आठवण येत आहे. थत्ते मामांना माझा विनम्र नमस्कार.

त्यांनी लावलेले हे झाड आज बहरलेले आहे .आज अनेक स्त्रिया पौरोहित्य करत आहेत .

याचे श्रेय मामांना जाते.

खरं तर घरं संसार, मुलं बाळं, आला गेला ..हे सगळं सांभाळून बाईंनी हे शिकवायला सुरुवात केली हे किती विशेष वाटते.

शिवाय त्याचा कुठेही गर्व अभिमान नाही शांतपणे प्रेमाने त्या शिकवत  राहिल्या.

बाईंच्या 95 व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जानेवारीला आम्ही सर्वांनी परत एकदा बाईंचा घरी सगळ्यांनी जमुन  वर्ग भरवला .

स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हंटले. बाई आमच्याबरोबर म्हणत होत्या.

शेवटी बाईंनी आशीर्वाद मंत्र म्हटला तेव्हा डोळे भरून आले होते. ..

अशा गुरू लाभल्या हे आमचे परमभाग्य.

त्या माझ्या बाईंना माझा त्रिवार साष्टांग नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा,

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा.

 

मनसोक्त काढलेली झोप आणि

तिच्या हातचा गरम चहा,

सुख म्हणजे काय असतं हो ?

देवा एकदा अनुभवून पहा.

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात,

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात.

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड-लोणचे, मुरांबे-चटण्या,

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या.

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून,

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून.

 

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ,

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या, तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून,

मायापती देवा तुम्ही !

तुम्हीही जाल गहिवरून.

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत.

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाटमाट,

पैज लावून सांगते

विसराल वैकुंठाची वाट.

 

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ,

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ.

 

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई,

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा कोणताच स्वर्ग नाही.

 

कवयित्री :सौ. वैष्णवी कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महादेव शिवशंकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– महादेव शिवशंकर – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

सर्व देवांच्यात सर्वश्रेष्ठ,

असती हर हर महादेव!

सृष्टीचा तारणहार,

शिवस्तुती करावी सदैव! …..१

 

पत्नी पार्वती, 

पुत्र कार्तिकेय -गणपती ! 

पुत्री अशोक सुंदरी, 

भक्तांच्या हाकेला धावती!….२

 

शिरी चंद्रकोर धारण, 

हातात त्रिशूल डमरू! 

नंदीवर होई स्वार,

भोलेनाथ बाबा अवतरू! …..3

 

जटातून वाहे गंगा ,

म्हणती कुणी गंगाधर!

कंठात हलाहल प्राशन करून

नीळकंठ परमेश्वर ! …..४

 

चिताभस्म नित्य लावे,

कंठाभोवती वासुकी नाग!

व्याघ्र चर्मावर बैसे,

त्रिकाळाची असे जाग!   …..५

   

त्रिनेत्र सामर्थ्य शिवाचे ,

पाही भूत ,भविष्य, वर्तमान!

तांडव नृत्य करून, 

नृत्यात नटराज सामर्थ्यवान! …..६

 

त्रिदल बेल वाहता, 

होई भोलेनाथ प्रसन्न!

मनोप्सित वर देऊन,

भक्तांना करी धन्य! …..७

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 180 – याद के संदर्भ में दोहे… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपके अप्रतिम दोहे – याद के संदर्भ में दोहे।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 180 – याद के संदर्भ में दोहे …  ✍

याद हमारी आ गई, या कुछ किया प्रयास।

अपना तो यह हाल है, यादें बने लिबास।।

*

 फूल तुम्हारी याद के, जीवन का एहसास।

 वरना है यह जिंदगी, जंगल का रहवास।।

*

 यादों की कंदील ने ,इतना दिया उजास।

 भूलों के भूगोल ने, बांच लिया इतिहास ।।

*

बादल आकर ले गए ,उजली उजली धूप ।

अंधियारे में कौंधते, यादों वाले स्तूप।।

*

 सांसो की सरगम बजे, किया किसी ने याद।

 शब्दों का है मौन व्रत, कौन करे संवाद ।।

*

यादों के आकाश में,फूले खूब बबूल ।

सांसों की सर फूंद भी, अधर रही है झूल ।।

*

सांसों का संकीर्तन, मिलन क्षणों की याद।

 मन – ही – मन से कर रहा, एकाकी संवाद।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 181 – “पहिन धूप ढूंढती-…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  “पहिन धूप ढूंढती-...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 181 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “पहिन धूप ढूंढती-...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

अधबहियाँ छाँव

के सलूके

पहिन धूप ढूंढती-

छेद कुछ रफू के

 

आ बैठी रेस्तराँ

 दोपहरी

देख रही मीनू को

टिटहरी

 

हैं यहाँ तनाव

फालतू के

 

स्वेद सनी गीली

बहस सी

सभी ओर असुविधा

उमस सी

 

मैके में मौसमी

बहू के

 

श्वेत- श्याम धरती

के द्वीपों

गरमी है खुले

अन्तरीपों

 

पेड़ सभी बन गये

बिजूके

 

इधर- उधर भटकी

छायायें

अब उन्हें कहो कि

घर चली जायें

 

बादल शौकीन

कुंग-फू के

©  श्री राघवेन्द्र तिवारी

25-11-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पदचाप ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पदचाप ? ?

मेरी पदचाप,

तुम्हारी पदचाप,

इंसानी पदचाप..,

इसकी पदचाप,

उसकी पदचाप,

भेड़ियाई पदचाप..,

शनै:-शनै:

इंसानी पदचाप

दबती गई,

भेड़ियाई पदचाप

उभरती गई,

दबना हमेशा

ख़त्म होना नहीं होता,

दबना और दबे रहना

निष्क्रिय होना होता है,

यही समय है;

बटोरकार सारी इंसानियत

कदमताल करो,

निश्चय का महामंत्र पढ़ो;

पदचाप बढ़ाओ,

आगे बढ़ो,

शाश्वत सत्य है-

मनुष्य के अंगदी

पैरों की पकड़ के आगे

चौपायों की  गद्देदार

पकड़ टिकती नहीं है,

सक्रिय मानवता के आगे

दानवता ठहरती नहीं है..!

© संजय भारद्वाज  

(16 जून 2017, प्रातः 7:53 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ श्रीमद्वाल्मीकीय रामायण का 51 दिन का प्रदीर्घ पारायण पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन। 🕉️

💥 साधको! कल महाशिवरात्रि है। शुक्रवार दि. 8 मार्च से आरंभ होनेवाली 15 दिवसीय यह साधना शुक्रवार 22 मार्च तक चलेगी। इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print