मराठी साहित्य – विविधा ☆ दार आणि खिडकी…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!

दार ही राजवाट आहे  जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते.ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.

बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!

सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत.!जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..

जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.

साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.

मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला , नोकरीमधील संधी वाढल्या..

पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.

अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!

दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड ,मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!

संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दाखला !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “दाखला !श्री संभाजी बबन गायके 

मध्यरात्रीनंतरचा वाढतच जाणारा काळोख त्यात थंडीच्या दिवसांत पडलेलं धुकं. सतरा एकर माळावरच्या एका कोप-यात असलेली सात-आठ खोल्यांची कौलारू शाळा आणि शाळेपासून पायी सात-आठ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिक्षकांसाठीच्या क्वॉर्टर्स या धुक्यात हरवून गेल्या होत्या. गुरूजी आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी नुकत्याच या क्वार्टर्समध्ये रहायला आले होते. पाच-सातच खोल्या होत्या इथे पण फक्त एक शिपाईच तिथे मुक्कामाला असे. इतर शिक्षकांनी गावातल्या वस्तीत भाड्याने जागा घेऊन राहणं पसंत केलं होतं. कारण माळारानाजवळ सोबतीला वस्ती नव्हती. विंचु-काट्याची,चोरा-चिलटांची भीती होतीच. हे पती-पत्नी दोघंही एकाच संस्थेत असल्यानं दोघांच्या बदल्याही एकाच वेळी आणि एकाच शाळेत होत असत, ते बरं होतं. नुकतंच लग्न झालेलं, नवीन संसार उभा करायचा होता. गावात भाडं भरून राहण्यापेक्षा क्वॉर्टर मध्ये राहणं परवडण्यासारखं होतं. आणि गुरूजींकडे मुख्याध्यापक म्हणून चार्ज असल्याने त्यांनी शाळेजवळच राहणं सोयीचं होतं. शिवाय शिपायाचं कुटुंब सोबतीला होतंच. शिक्षकाच्या घरात चोरांना मिळून मिळून मिळणार तरी काय म्हणा? घाबरायचं काही कारण नाही अशी एकमेकांची समजूत घालून गुरूजी आणि बाई नव्या जागेत रमण्याचा प्रयत्न करीत होते. एके रात्री दरवाजाच्या फटीतून एक नाग घरात शिरला होता. पण गुरूजींनी त्याला वेळीच पाहिल्यामुळे अनर्थ टळला होता. ती आठवण दोघांनाही अस्वस्थ करीत होतीच. 

दोन वाजत आलेले असावेत. दरवाजावर थाप पडली. नव्या जागेत आधीच लवकर झोप लागता लागत नाही. गुरूजींची झोप तशीही जागसूदच असे. ते चटकन अंथरूणवर उठून बसले. बाईही जाग्या झाल्या आणि दाराकडे पाहू लागल्या. एवढ्या रात्री कोण आलं असावं? एरव्ही फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकण्याची सवय असलेल्या त्या माळालाही दरवाजावरची ही थाप ऐकू गेली असावी. गुरूजींनी खोलीतला चाळीस वॅटचा बल्ब लावला. दाराबाहेरचा बल्ब गेलेला होता. बाई म्हणाल्या… एकदम दरवाजा उघडू नका…खिडकीच्या फटीतून पहा आधी! आणि त्या गुरूजींच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. डोक्याला मुंडासं, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर काळी घोंगडी पांघरलेले कुणीतरी दरवाजात उभे होते. सोबत अर्ध्या बाहीचा सदरा आणि आणि पांढरा पायजमा घातलेला पोरसवदा तरूण उभा होता. थंडीमुळे कानावर रुमाल बांधलेला होता त्याने. दोन्ही हात काखेत घालून उभा होता पोरगा. म्हाता-याच्या हातात काठी आणि कंदील होता. दारावरचा आवाज शिपाईही जागा झाला होता, पण त्यानेही लगेच दार उघडायची हिंमत केली नाही. साहजिकच होतं ते. 

गुरूजी खिडकीशी आल्याचं पाहून म्हाता-यानं कंदिल त्याच्या चेह-यावर उजेड पडेल असा धरला आणि म्हणाला, “गुरूजी, माफी असावी. पण कामच तातडीचं आहे. म्हणून तुम्हांला त्रास देतो आहे.” त्याच्यासोबत असलेल्या त्या तरूणाने गुरूजींना पाहून हात जोडून नमस्कार केला. गुरूजींनी दरवाजा उघडला आणि ते बाहेर गेले. 

म्हातारा त्या पोराचा आज्जा होता. पोरगा याच शाळेत मामाच्या घरी राहून सातवी पर्यंत शिकला होता. त्याचा बाप मरून गेला म्हणून त्याची आई माहेरी येऊन राहिली होती. आता आईही वारल्यानं पोरगं पुन्हा आज्ज्याकडं राहायला गेलं होतं. या गावापासून त्याच्या वडिलांचं गाव वीस बावीस कोसावर असावं. पोरगं काही पुढं शिकलं नाही. पण शेतात कामं करून, तालमीत कसून त्याची तब्येत मात्र काटक झाली होती. तालुक्याच्या गावात फौजेची भरती निघाल्याचं त्याला आज सांजच्यालाच समजलं होतं. त्यानं आज्ज्याकडं फौजेतच जाणार म्हणून हट्ट धरला होता. शाळा सोडल्याचा दाखला लागणार होता भरतीत दाखवायला. आणि शाळा सोडली तेंव्हा त्यानं दाखला नेला नव्हता. आणि उद्या शाळा उघडेपर्यंत थांबण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. सकाळी सात वाजता भरती मैदानावर कागडपत्रांसह हजर राहायचं होतं. म्हाता-यानं गुरूजींना हात जोडले, “मास्तर, एवढा एक उपकार करा. पोरगं फौजेत गेलं तर चार घास सुखानं खाईल तरी…रांकेला लागंल.” 

बाई दारात उभे राहून सारं ऐकत होत्या. गुरूजींनी बाईंकडे पाहिलं. खोलीत आले,शर्ट,पॅन्ट चढवली. खिशाला पेन आहे याची खात्री केली,छोटी विजेरी घेतली आणि बाहेर पडले. तोवर शिपाई बाहेर आला होता. गुरूजींनी त्याच्याकडून शाळेची किल्ली मागून घेतली. तू बाईंना सोबत म्हणून इथंच थांब असं त्याला म्हणून गुरूजी त्या दोघांसोबत शाळेकडे निघाले सुद्धा.

त्या अंधारात, त्या माळावर आता ही सहा पावलं पायाखालचं वाळलेलं गवत तुडवत तुडवत निघाली होती. तुम्हाला उगा तकलीप द्यायला नको वाटतंय मास्तर, पण नाईलाज झालाय असं काहीबाही म्हातारा बोलत होता. पोरगा मात्र थोडंसं अंतर ठेवून अपराधी भावनेनं चालत होता, त्यालाही इतक्या रात्री गुरूजींना त्रास द्यावसा वाटत नव्हता. पण शेती धड नाही,रोजगार नाही. वय वाढत चालेलं. काहीतरी केलं पाहिजे पोटापाण्यासाठी , यासाठी फौजेसारखी दुसरी संधी मिळणार नाही, असा त्याचा विचार होता. त्याच्या गावातले जवान सुट्टीवर आलेले तो पहायचा. रूबाबादार युनिफॉर्म,काळी ट्रंक,त्यात घरच्यांसाठी आणलेलं काहीबाही. त्यात नोकरी संपवून गावी आलेले लोकही त्याला माहित होते. फौजेतच जायचं असं त्याने मनोमन ठरवलं होतं. 

गुरूजींनी शाळेचे कार्यालय उघडलं. कपाटातून रजिस्टर बाहेर काढलं. पोराचं प्रवेशाचं आणि शाळा सोडल्याचं वर्ष विचारून घेतलं. पोरानं अंदाजे वर्ष सांगितलं. गुरूजींना अचूक नोंद शोधून काढली. आपल्या वळणदार अक्षरात शाळा सोडल्याचा दाखला लिहून काढला. दाखल्याच्या कागदाखाली कार्बन पेपर ठेवायला ते विसरले नाहीत. त्यांच्या सहीचा त्या शाळेतून दिला जात असलेला तो पहिला दाखला होता. गुरुजींनाही त्यांच्या तरूणपणी फौजेत जायचं होतं पण तो योग नव्हता.

म्हाता-याचे डोळे भरून आले होते. त्याने गुरूजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्या हातांवर त्याचं मस्तक ठेवलं…उपकार झालं बघा! पोरगं खाली वाकून पाया पडलं आणि ते तिघेही शाळेच्या बाहेर पडले. म्हाता-याला आणि त्या पोराला शाळेपासून पुढच्या बाजूला असलेल्या रस्त्याने त्यांच्या मार्गाला जाता आलं असतं. पण ते दोघं गुरूजींना सोडवायला पुन्हा क्वॉटरपर्यंत आले. 

भरती झाल्यावर सुट्टीवर आलास की शाळेत येऊन जा. बाकीच्या पोरांनाही स्फुर्ती मिळेल देशसेवेची. बाईंनी त्या पोराला सांगितलं आणि त्याच्या हातावर साखर ठेवली. वीस रुपयाची नोट त्याच्या खिशात ठेवली. आईकडून आलेल्या लाडवांमधून चार लाडू त्याला शिदोरी म्हणून रुमालात बांधून दिले. पोरगं बाईंच्याही पाया पडलं आणि निघालं. पहाटेचे तीन वाजत आले होते. त्याला तालुक्यापर्यंत पायी जायला तीन-साडेतीन तास लागणार होते. सह्याद्रीचा पोरगा हिमालयाच्या रक्षणाला निघाला होता… त्याच्या पाठमो-या आकृतीकडे गुरूजी आणि बाई पहात राहिले ते दृष्टीआड होईपर्यंत. बाहेर झुंजुमुंजु होऊ लागलं होतं….गुरूजी आणि बाई यांच्या मनात समाधानाची पहाट उगवू लागली होती! 

(बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्धगर्जना, मानचिन्हात अशोकस्तंभातील तीन सिंह,तुतारी असलेल्या, कर्तव्य,मान,साहस असे ब्रीदवाक्य असलेल्या लढवय्या ‘दी मराठा लाईट इन्फंट्री’चा आज ४ फेब्रुवारी हा स्थापना दिन. यानिमित्ताने एका गुरुजींची ही सत्यकथा सादर केली आहे. देशासाठी लढणा-या सैनिकांना आणि विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र तत्पर असणा-या शिक्षकांना विनम्र अभिवादन.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काही वेळा आपल्या बघण्यात येते, लोक तरी किती विविध प्रवृत्तीचे असतात ना. कोणी फक्त भविष्यात जगतात तर कोणी भूतकाळात.

वर्तमानात जगायचे, पण भविष्याची स्वप्ने बघायची,हा तर मानवी स्वभाव आहे. त्यात गैर काहीच नाही पण काही लोक असे बघण्यात येतात जे फक्त आणि फक्त भूतकाळातच रमलेले असतात.

मी डॉक्टर असल्याने आपोआपच माझा समाजाशी जास्त संबंध आला,येत असतोही. निरनिराळ्या वेळी माणसे कशी  वागतात, हेही मला चांगलेच अनुभवाला आलेले आहे.

काहीवेळा आडाखे चुकतात पण आपण बांधलेले अंदाज तंतोतंत खरे आले की मजा वाटते. माझ्या बघण्यात आलेले काही लोक खूप मजेशीर आहेत. 

माझी एक मैत्रीण आहे… ती कधीही भेटली तरी मी – माझे – मला, या पलीकडे जातच नाही. कधीही भेटली की “ अग ना, काय सांगू, आमचे हे ! इतके बिझी असतात.. इथपासून,आमची पिंकी कशी हुशार, हे आख्यान सुरू. लोकांना बोलायला मध्ये जागाच नाही. मग मी नुसती श्रोत्यांची भूमिका घेऊन “ हो का ? वावा, “ इतकेच म्हणू शकते.

दवाखान्यात  अप्पा बोडस यायचे. अतिशय सज्जन साधे मध्यमवर्गीय गृहस्थ. पण सतत भूतकाळातच रमलेले… “ काय सांगू  बाई तुम्हाला.. .काय ते वैभव होते आमचे. मोठा वाडा, पूर्वापार चालत आलेला,रोज १५-२० माणसे असत पंक्तीला. गेले ते दिवस.” .. मग मला विचारायचा मोह अनावर व्हायचा की “ अहो, मग ते राखले का नाही कोणी? तुम्ही का चाळीत रहाताय?” पण मी हे नुसते ऐकून घेते. त्यांचा विरस मी का करू? 

मग आठवतात इंदूबाई. सध्या करतात दहा घरी पोळ्या आणि स्वयंपाकाची कामे. पण आल्या की सुरूच करतात. “ काय सांगू बाई तुम्हाला ? किती श्रीमंत होतो आम्ही. काय सुरेख माझं माहेर. पण ही वेळ आली बघा. तुमच्यासारखी शिकले असते, तर हाती पोळपाट नसता आला.” .. मला हसायला येते. मी त्यांना विचारले, “ अहो,मग तेव्हा का नाही शिकलात?” .. उत्तर असे..  “ तेव्हा कंटाळाच यायचा बघा मग दिली शाळा सोडून.” — आता अशा इंदूताईंचे भविष्य सांगायला ज्योतिषी नको. पण त्या रमतात आपल्याच आठवणीत. माझा दवाखाना हे एक चावडीचे ठिकाण होते लोकांना.

निम्न वस्तीत माझा दवाखाना, त्यामुळे उच्चभ्रू लोकांचे नियम यांना लागू नाहीतच. मी जराशी रिकामी बसलेली दिसले की सरळ येऊन,  आपल्या मनीची उकल करायला सुरुवात.

लता एक कॉलेज कन्यका… बुद्धी अतिशय सामान्य, रूप बेताचेच. माना वेळावत दवाखान्यात यायची.     “ बाई,येरहोष्टेश व्हायला काय करावे लागते हो? “ मी कपाळावर हात मारून घेतला.

“लता, तो शब्द एअरहोस्टेस असा आहे. आणि अगं लता तुझे स्वप्न खूप छान आहे, पण त्याला डिग्री लागते. इंग्लिश लागते उत्तम. तू आधी बी ए तर हो, मग मी सांगते पुढचे.” 

मग कधीतरी यायचे एक कवी… “ बाई वेळ आहे का?” नसून कोणाला सांगते. पेशंट नाहीत हे बघूनच ते आलेले असत. “ बघा किती सुंदर कविता केलीय आत्ताच. तुम्हीच पहिल्या हं ऐकणाऱ्या.” – ती निसर्ग कविता,पाने फुले मुले प्रेम,– असली ती बाल कविता ऐकून मला  भयंकर वैताग यायचा. कवी आणि कविता दोन्हीही बालच..

मग आठवतात काळे आजी. या मात्र इतक्या गोड ना. “ बाई,तुमच्यासाठी ही बघा मी स्वतः पर्स विणली आहे.आवडेल का ?वापराल का? “ किती सुंदर विणायच्या त्या. पुन्हा जराही मी मी नाही. ती माझी पर्स बघून माझ्या बहिणीने त्यांना बारा पर्सेस करायची ऑर्डर दिली आणि नकळत त्यांचा तो छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले अगदी सहज. असेही उद्योगी लोक मला भेटले.

असेच मला काळेकाका आठवतात. आले की हातात स्मार्ट फोन आणि फेसबुक उघडून, मला त्या पोस्ट दाखवण्याची हौस ! वर,वावा किती छान म्हणावे ही अपेक्षा. सतत यांच्या पोस्ट्स फेसबुकवर. त्याही जुन्या,अगदी जपून ठेवलेल्या. हे फेसबुक प्रकरण माझ्या आकलनापलीकडले आहे.

— काय  ते  अहो रुपम् अहो ध्वनिम्… आपल्या कविता,आपल्या पाककृती लोक वेड्यासारखे टाकत असतात. बघणारे रिकामटेकडे, तयार असतातच, लाईक्स द्यायला,अंगठे वर करायला. काय हा वेळेचा अपव्यय… 

तर हेही  माझे असेच एक पेशंट !!—  मी  2000 साली गेलो होतो ना चीनला, ते बघा फोटो. ही माझी बायको. बघा,कशी दिसतेय चिनी ड्रेस घालून..  हे आम्ही,आफ्रिकेला गेलो होतो तेव्हाचे फोटो. हा माझा लेख बघा बाई..  २०११  साली आला होता .” —-  सतत जुन्या गोष्टींचा यांना नॉस्टॅल्जिया.  हे जपून तरी किती ठेवतात असले फुटकळ लेख , कोणत्यातरी  सदरात आलेले.  मग त्यांनी केलेल्या परदेशीच्या ट्रिप्स. पुन्हा,मी मी आणि मी… लोकांना काय असणार हो त्यात गम्य. नाईलाज म्हणून देतात आपले  भिडेखातर   लाईक्स. पण लोकांनी कौतुक करावे याची केवढी हो हौस. त्यातूनही  खरोखरच चांगले ध्येय  असणारे, काहीतरी करून दाखवायची जिद्द असणारे लोकही भेटले.

अशीच भेटली अबोली. अतिशय हुशार, गुणी, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेले. बारावीला उत्तम मार्क्स

आणि आईवडील म्हणाले ‘ बस झालं शिक्षण.आता लग्न करून टाकू तुझं.’ बिचारी आली रडत माझ्याकडे. “ बाई,मला नाही लग्न करायचं इतक्यात. मी काय करू ते सांगा. मला पायावर उभं रहायचं आहे माझ्या.”  मी तिला ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करायला आवडेल का ते विचारलं. पहिली फी मी भरली तिची. तिने तो कोर्स मन लावून पूर्ण केला. छान मार्क्स मिळवून पास झाली आणि तिला एका चांगल्या ट्रॅव्हल कंपनीत नोकरीही मिळाली. तिच्या ऑफिसमध्ये मी मुद्दाम तिने बोलावले म्हणून भेटायला गेले होते. सुंदर युनिफॉर्म घातलेली अबोली किती छान दिसत होती ना. मला फार कौतुक वाटलं तिचं. असेही जिद्दी लोक भेटले मला माझ्या आयुष्यात.

असाच अभय अगदी गरीब कुटुंबातला. सहज आला होता भेटायला. तेव्हा माझा  मर्चंट नेव्ही मधला भाचा काही कामासाठी दवाखान्यात आला होता. मी अभयची त्याच्याशी ओळख करून दिली. अभय म्हणाला, “ दादा,मला माहिती सांगाल का मर्चंट नेव्हीची. अभय त्याच्या घरी गेला. माझ्या भाच्याने, अभयला सगळी माहिती नीट सांगितली.अभयकडे एवढी फी भरण्याइतके पैसे नव्हते. इतके  पैसे भरण्याची ऐपतच नव्हती त्यांची. पण मग त्याने माझ्या भाच्याच्या सल्ल्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. तो पास झाला,आणि आज इंडियन नेव्हीमध्ये छान ऑफिसर आहे तो… त्या मुलाने, मानेवर बसलेले दारिद्र्य मोठ्या जिद्दीने झटकून टाकले. आज त्याचा मोठा फ्लॅट,  छान बायको मुले बघून मला अभिमान वाटतो.

— असेही छान जिद्दी लोक मला भेटले आणि नकळत का होईना, हातून त्यांचे भलेही झाले.

तर लोकहो, असे जुन्या वेळेत सतत भूतकाळात गोठलेले राहू नका. इंग्लिशमध्ये छान शब्द आहे,

‘फ्रोझन  इन  टाईम.’  जुन्या स्मृती खूप रम्य असतात हे मान्य. पण त्या तुमच्या पुरत्याच ठेवा, नाही तर हसू होते  त्याचे. आपला आनंद आपल्या पुरताच असतो… असावा. लोकांना त्यात अजिबात रस नसतो.

म्हणून तर आपले रामदासस्वामी  सांगून गेलेत ना…

                                             आपली आपण करी जो स्तुती,

                                                         तो येक पढत मूर्ख.

आणि केशवसुत म्हणतात …… 

                                         जुने जाऊद्या, मरणा लागुनी

                                          जाळूनी किंवा पुरुनी टाका 

                                          सडत न एक्या ठायी ठाका 

                                           सावध ! ऐका पुढल्या हाका 

— आपणही हे नक्कीच शिकू या.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

Pin-drop silence —

तुम्ही कधी निस्तब्ध शांतता अनुभवली आहे ?

टाचणी पडली तरी ऐकायला येईल अशी शांतता ?

Pin drop silence …. याचा नेमका अर्थ सांगणाऱ्या खालील काही घटना आहेत, जेव्हा शांतता आवाजापेक्षाही मोठ्याने बोलू शकली होती.

प्रसंग 1

फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या आयुष्यातला एक प्रसंग.

एकदा सर सॅम बहादूर माणेकशॉ एका सभेमध्ये भाषण करण्यासाठी अहमदाबादला गेले होते. सरांनी भाषणाला सुरुवात केली. ते अर्थातच इंग्रजीमधून बोलत होते.. श्रोत्यांमधे अचानक गडबड सुरू झाली… .. 

“ आपण गुजराथीत बोला. गुजराथीत बोललात तरच आम्ही आपले भाषण पुढे ऐकू.”

सर माणेकशॉ बोलायचे थांबले, त्यांनी श्रोत्यांवरून त्यांची करडी नजर फिरवली. आणि काही क्षणांत अगदी ठामपणे ते म्हणाले …. 

“  मित्रांनो, मी माझ्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक लढाया लढलो आहे, आणि त्या दरम्यान बऱ्याच भाषा बोलायलाही  शिकलो आहे. म्हणजे बघा ….
मी माझ्या शीख रेजिमेंटमधल्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो…

मराठा रेजिमेंटच्या सैनिकांकडून मराठी शिकलो.

मद्रास सॅपर्समध्ये असणाऱ्या सैनिकांकडून तमीळ शिकलो. बेंगॉल सॅपर्सबरोबर काम करत असतांना  बंगाली शिकलो. हिंदी शिकलो ते बिहार रेजिमेंटबरोबर असतांना.  इतकंच काय, गुरखा रेजिमेंटकडून नेपाळी भाषाही शिकलो…..

… पण दुर्दैवाने …. ज्याच्याकडून मला गुजराथी भाषा शिकता आली असती असा गुजरातमधला एकही माणूस भारतीय सेनेत मला भेटला नाही .. अगदी एकही नाही.”

आणि अहमदाबादच्या त्या भल्यामोठ्या सभागृहात टाचणी पडली तरी ऐकायला येईल एवढी शांतता पसरली होती.

प्रसंग 2

स्थळ : पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ.

नुकत्याच लँड झालेल्या एका अमेरिकन विमानातून रॉबर्ट व्हायटिंग, वय ८३, हे गृहस्थ पँरिस विमानतळावर उतरले. तिथल्या फ्रेंच कस्टमस् ऑफिसपाशी गेल्यावर खिशातला पासपोर्ट काढण्यासाठी ते आपले खिसे चाचपत होते.

” महोदय, फ्रान्सला भेट देण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे का ? ”  त्यांना जरासा वेळ लागल्याचे पाहून त्यांचा उपहास करण्याच्या हेतूने एका उद्धट कस्टम ऑफिसरने विचारणा केली..

आपण याआधीही फ्रान्सला येऊन गेल्याचं रॉबर्टनी सांगितलं..अजूनही ते पासपोर्टसाठी खिसे चाचपत होते पण हाताला पासपोर्ट काही लागत नव्हता.

“ मग इथे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा पासपोर्ट हातात तयार ठेवला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे “

“ हो. पण मागच्या वेळी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला कुणालाही पासपोर्ट दाखवावा लागला नव्हता.” — तो वयस्कर अमेरिकन माणूस म्हणाला.

 “ हे शक्यच नाही. अमेरिकन माणसांना फ्रान्समध्ये उतरल्या उतरल्या आपला पासपोर्ट दाखवावाच लागतो. “ .. कस्टम ऑफिसर कुत्सितपणे म्हणाला.

त्या वृद्ध अमेरिकन माणसाने समोरच्या फ्रेंच माणसाकडे काही क्षण जराशा रागानेच रोखून पाहिलं, आणि मग शांतपणे म्हणाला .. “ नीट ऐका ..  १९४४ साली * D-Day*च्या दिवशी पहाटेच्या ४:४० ला तुमच्या ओमाहा समुद्रकिनाऱ्यावर मी आणि माझे सहकारी विमानातून उतरलो होतो …. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या देशात आलो होतो ….  आणि तेव्हा माझा पासपोर्ट दाखवण्यासाठी त्या किनाऱ्यावर एकही फ्रेंच माणूस मला सापडला नव्हता. 

हे ऐकून त्या कक्षात एकदम निस्तब्ध शांतता पसरली होती. टाचणी पडली असती तरी आवाज ऐकू आला असता. 

(दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सची नामुष्की कोण विसरेल ? …. * D-Day…* ६ जून १९४४ – दुसऱ्या महायुद्धातला तो पहिला दिवस, ज्या दिवशी मित्रराष्ट्रांच्या सैन्याने नॉर्मनडीच्या समुद्रकिनाऱ्यांवर उतरून उत्तर फ्रान्सवर आक्रमण केले) 

प्रसंग 3

सन १९४७ …. 

ब्रिटिश राजवतीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशातल्या महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यासाठी विचार विनिमय करणे चालू झाले होते.  याच कारणासाठी भावी अघोषित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती — भारताचे पहिले “जनरल ऑफ इंडियन आर्मी ‘ यांची निवड करण्यासाठी 

“मला असे सुचवावेसे वाटते की आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करावी. कारण हे  पद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा अनुभव असणारी व्यक्ती आपल्याकडे नाही.”

… ब्रिटिशांकडून जे आजपर्यंत फक्त आज्ञापालन करायलाच शिकले होते — नेतृत्व करायला नाही –  अशा सर्वांनी.. ज्यात काही प्रतिष्ठित नागरिकही होते आणि सैन्यातले गणवेशधारीही – अशा सर्वांनीच नेहरूंच्या या प्रस्तावाला माना हलवत दुजोरा दिला..

…  मात्र एक वरिष्ठ अधिकारी नथुसिंह राठोड यांनी यावर आपले वेगळे मत मांडण्याची परवानगी मागितली. त्या अधिकाऱ्याचा आपल्यापेक्षा काही वेगळा आणि स्वतंत्र विचार आहे हे नेहरूंसाठी अनपेक्षित होते, त्यांना खरं तर आश्चर्यच वाटले होते . पण तरी त्यांनी राठोड यांना त्यांचे मत मोकळेपणाने मांडायची परवानगी दिली.

“सर, असं बघा की देशाचे नेतृत्व करण्यासाठीसुद्धा पुरेसा अनुभव नाही आहे आपल्याकडे. तर मग भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही आपण एखाद्या ब्रिटिश माणसाची नेमणूक का करू नये ? —–

आणि सभागृहात एकदम निस्तब्ध शांतता पसरली …. टाचणी पडली असती तर तो आवाजही अगदी स्पष्ट ऐकू आला असतं

.. पंडित नेहरूंनी चमकून राठोड यांचेकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले..  “ तुम्ही तयार आहात का भारताचे पहिले ‘ जनरल ऑफ आर्मी स्टाफ ?’ व्हायला ? “

हा प्रस्ताव नम्रपणे नाकारत राठोड म्हणाले, “ नाही सर, मी नाही. पण आपल्याकडे एक अतिशय बुद्धिमान असे एक लष्करी अधिकारी आहेत .. माझे वरिष्ठ.. जनरल करिअप्पा. आणि ते या पोस्टसाठी आपल्यापैकी सर्वात जास्त अनुभवी आणि सर्वात जास्त योग्य असे आहेत.”

राठोड यांचा प्रस्ताव ऐकून बैठकीत पुन्हा एकदा एक निस्तब्ध शांतता पसरली. कर्नल राठोड यांच्या सूचनेने बैठकीचा नूरच बदलला. पं. नेहरू आणि उपस्थित इतर सर्वांनीच  एकमताने जनरल करिअप्पा यांच्या नावाला संमती दिली.  

अशा रीतीने अत्यंत बुद्धिमान असणारे जनरल करिअप्पा हे भारताचे पहिले ‘जनरल ऑफ आर्मी स्टाफ‘ म्हणून नेमले गेले. आणि  भारतीय सैन्याचे सर्वात पहिले ‘लेफ्टनंट जनरल ऑफ आर्मी स्टाफ’ म्हणून नथू सिंह राठोड यांची नेमणूक झाली.

(लेफ्टनंट जनरल निरंजन मलिक, PVSM (Retd) यांच्या एका इंग्लिश लेखावरून)

अनुवाद आणि प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडतांना एका पाकिटात फक्त एक कागद अन् एक रुपयाचा ठोकळा हातात लागल्यानं त्यांची उत्सुकता वाढली. कागदाची घडी उघडली अन् त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहील होत, ” माफ करा. मी तुमच्या नात्यातला काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई-वडीलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्चशिक्षित बेरोजगार तरूण आहे मी. कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जातांना हे लग्न दिसलं. तसाच आत शिरलो नि भूक शमवली. या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे पुरेपूर जाणून आहे मी. तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता, म्हणून यात हा रुपया टाकला आहे.” 

— या एकाच गोष्टीला किती पैलू आहेत !

भूक पापी आहे.

परिस्थिती नाइलाजाची आहे.

हातून अपकृत्य घडलं आहे.

त्याची मनाला खंत आहे.

कांटा बोचरा आहे.

पश्चात्तापाची भावना आहे.

पापक्षालनाची इच्छा आहे.

पण तेव्हढीही ताकद खिशात नाहीये.

रुपयाला अर्थ नाही याची जाण आहे.

पाकिटातल्या रुपयाला नुकसानभरपाई म्हणावं की आहेर म्हणावं? समजत नाही !

या साऱ्या प्रकाराला एकच गोष्ट जबाबदार आहे – पापी भूक.

ती सुद्धा रोज रोज लागते.

उपाशी माणसाने अन्नाची चोरी करावी कां – हा प्रश्नच अमानुष आहे.

“पापी पेटका सवाल है भाई”

पण माणूस नेक आहे.

त्याच्यापाशी देण्यासारखं असलेलं सर्वस्व –

एक रुपया – देऊन त्यानं  लाखमोलाचं पुण्य जोडलं आहे.

म्हणूनच ही कथा कोटीमोलाची आहे !

मित्रांनो, काळजी घ्या…. कृपया अन्न वाया घालू नका. भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 176 – गीत – सुबह सुबह देखा है सपना…. ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका एक अप्रतिम गीत – सुबह सुबह देखा है सपना।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 176 – गीत  – सुबह सुबह देखा है सपना…  ✍

सुबह सुबह देखा है सपना

तेरी गोदी में सिर अपना।

अवचेतन में जो कुछ होता

वही स्वप्न में ढल जाता है

अंधे को दिख जाती दुनिया

पगविहीन भी चल जाता है।

ऐसा ही कुछ किस्सा अपना

सुबह सुबह देखा है सपना।

 *

कहते सपने वे सच होते

जो भी देखे जायें सबेरे

कितनी आँखें सच्ची होंगी

कितने लोग तुम्हें हैं घेरे।

अपना तो जीवन ही सपना

सुबह सुबह देखा है सपना

 *

सुबह सुबह देखा है सपना

तेरी गोदी में सिर अपना।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 175 – “एक चित्र बादल का…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  “एक चित्र बादल का...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 173 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “एक चित्र बादल का...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

सूरज की किरनों को

ऐसे मत टाँक री

फिसल रहा हाथों से

ईश का पिनाक री

 *

खुद की परछाईं जो

दुबिधा में छोटी है

उसको इतना छोटा

ऐसे मत आँक री

 *

ऐंठ रही धूप  तनिक

खड़ी कमर हाथ धरे

देखती दुपहरी को

ऊँची कर नाक  री

 *

एक चित्र बादल का

ऐसे दिखाई दे

ज्यों दबा दशानन हो

बाली की काँख री

 *

छाया छत से छूटी

टँगी दिखी छींके पर

लगा छींट छप्पर की

जा गिरी छमाक री

 *

घिर आई शाम धूप

फुनगी पर पहुँच गई

पीली उम्मीद बची

एक दो छटाँक री

 *

हौले हौले नभ में

उतर रहा चन्द्रमा

लगता है लटक रही

मैंदा की गाँकरी

©  श्री राघवेन्द्र तिवारी

06-02-2024 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈



हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पिरामिड ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पिरामिड  ? ?

जाने मुझमें

क्या नज़र आया;

मित्रों ने

पिरामिड बनाया,

मुझे फलदार

वृक्ष पर चढ़ाया;

मैं तोड़-तोड़कर

नीचे फेंकता रहा फल,

घनी पत्तियों से

देख भी नहीं

पा रहा था

किसे कितना मिला,

अब,

पेड़ पर

कोई फल नहीं बचा;

पत्तियों से

निकलकर देखा,

एक भी मित्र

नहीं था खड़ा,

पेड़ अब मेरी

दयनीयता पर हँस रहा था;

वृक्ष पर आकर भी

बिना फल चखे

लौटने पर

व्यंग्य कस रहा था,

कथित मित्र

चर्चा कर रहे थे;

आनेवाले अवसर

का नेता चुन रहे थे,

पेड़ अगले मौसम की

तैयारी कर रहा था;

मैं चुपचाप

पेड़ से उतर रहा था!

© संजय भारद्वाज 

(अपराह्न 12:28 बजे, 6 दिसंबर 2015)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




English Literature – Poetry ☆ – Apostle of Tolerance… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Apostle of Tolerance… ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

~ Apostle of Tolerance…  ~?

They clasped her viciously,

Like a sharp piercing spear

Tried  hard  to  free  them  off

But Alas! She couldn’t do so…!

*

Some unwanted ghastly thorns

audaciously  pricked  her feet

Tried  hard  to  pull  them out

But Alas! She couldn’t do so..!

*

Some  unwanted  pricks came

to  wrap  around  her  fingers,

Tried  hard  to  jerk  them  off

But Alas! She couldn’t do so…!

*

Yet her bleeding soul kept smiling

despite  the  repeated  lancinations,

That’s why for

enduring ever excruciating pain…

Woman is called ‘Apostle of Tolerance’..!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈




हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 279 ⇒ अस्मिता… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “अस्मिता।)

?अभी अभी # 280 ⇒ अस्मिता… ? श्री प्रदीप शर्मा  ?

अहंकार, आसक्ति और अस्मिता तीनों एक ही परिवार के सदस्य हैं। वे हमेशा आपस में मिल जुलकर रहते हैं। अस्मिता सबसे बड़ी है, और अहंकार और आसक्ति जुड़वा भाई बहन हैं। वैसे तो जुड़वा में कोई बड़ा छोटा नहीं होता, फिर भी अहंकार अपने आपको आसक्ति से बड़ा ही मानता है। अहंकार को अपने भाई होने का घमंड है, जब कि आसक्ति अहंकार से बहुत प्रेम करती है, और उसके बिना रह नहीं सकती।

अहंकार आसक्ति को अकेले कहीं नहीं जाने देता। अहंकार जहां जाता है, हमेशा आसक्ति को अपने साथ ही रखता है।

अहंकार की बिना इजाजत के आसक्ति कहीं आ जा भी नहीं सकती।

अस्मिता को याद नहीं उसका जन्म कब हुआ।

कहते हैं अस्मिता की मां उसे जन्म देते समय ही गुजर गई थी। अस्मिता के पिता यह सदमा बर्दाश्त नहीं कर सके और तीनों बच्चों यानी अस्मिता, अहंकार और आसक्ति को अकेला छोड़ कहीं चले गए। बड़ी बहन होने के नाते, अस्मिता ने ही अहंकार और आसक्ति का पालन पोषण किया।।

अब अस्मिता ही दोनों जुड़वा भाई बहनों की माता भी है और पिता भी। अहंकार स्वभाव का बहुत घमंडी भी है और क्रोधी भी। जब भी लोग उसे अनाथ कहते हैं उसकी अस्मिता और स्वाभिमान को चोट पहुंचती है और वह और अधिक उग्र और क्रोधित हो जाता है, जब कि आसक्ति स्वभाव से बहुत ही विनम्र और मिलनसार है। वह सबसे प्रेम करती है और अस्मिता और अहंकार के बिना नहीं रह सकती।

कभी कभी अहंकार छोटा होते हुए भी अस्मिता पर हावी हो जाता है। उसे अपने पुरुष होने पर भी गर्व होता है। रोज सुबह होते ही वह अस्मिता और आसक्ति को घर में अकेला छोड़ काम पर निकल जाता है। एक तरह से देखा जाए तो अहंकार ही अस्मिता और आसक्ति का पालन पोषण कर रहा है।।

अहंकार को अपनी बड़ी बहन अस्मिता और जुड़वा बहन आसक्ति की बहुत चिंता है। बड़ी बहन होने के नाते अस्मिता चाहती है अहंकार शादी कर ले और अपनी गृहस्थी बना ले, लेकिन अस्मिता और आसक्ति दोनों अहंकार की जिम्मेदारी है, वह इतना स्वार्थी और खुदगर्ज भी नहीं। वह चाहता है अस्मिता और आसक्ति के एक बार हाथ पीले कर दे, तो बाद में वह अपने बारे में भी कुछ सोचे।

लेकिन होनी को कुछ और ही मंजूर होता है। अचानक अस्मिता के जीवन में विवेक नामक व्यक्ति का प्रवेश होता है, और वह बिना किसी को बताए, चुपचाप, अहंकार और आसक्ति को छोड़कर विवेक का हाथ थाम लेती है। एक रात अस्मिता विवेक के साथ ऐसी गायब हुई, कि उसका आज तक पता नहीं चला।।

बस तब से ही आज तक अहंकार और आसक्ति अपनी अस्मिता को तलाश रहे हैं, लेकिन ना तो अस्मिता ही का पता चला है और ना ही विवेक का।

अस्मिता का बहुत मन है कि विवेक के साथ वापस अहंकार और आसक्ति के पास चलकर रहा जाए। लेकिन विवेक अस्मिता को अहंकार और आसक्ति से दूर ही रखना चाहता है। बेचारी अस्मिता भी मजबूर है।

उधर अस्मिता के वियोग में अहंकार बुरी तरह टूट गया और बेचारी आसक्ति ने तो रो रोकर मानो वैराग्य ही धारण कर लिया है।

अगर किसी को अस्मिता और विवेक का पता चले, तो कृपया सूचित करें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈