मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अभी ना जाओ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

अभी ना जाओ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

सर्वकाही ठरवल्याप्रमाणे होईल असं गृहीत धरून दिवसाची सुरवात करतो परंतु आयुष्य कधी,कुठं अन कसं वळण घेईल हे सांगता येत नाही.असंच काहीसं कर्नलच्या बाबतीत घडलं.रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेल्या बायको नलिनीला कारनं धडक दिली.अंगावर चार-पाच ठिकाणी खरचटलं परंतु जोरात डोकं आपटल्यानं जागेवरच शुद्ध हरपली.मेंदूला जबर मार बसल्यानं दहा दिवस झाले तरी बेशुद्धच होत्या.त्या एका घटनेनं सगळंच बदललं.कर्नल,त्यांच्या दोन्ही मुली,जावई सगळेच प्रचंड तणावाखाली होते.

आयसीयूतला राऊंड संपवून डॉक्टर आले तेव्हा नातेवाईकांनी गराडा घातला.पेशंटविषयी माहिती दिल्यावर शेवटी डॉक्टर कर्नल बसले होते तिथं आले.हातातली काठी सावरत कर्नल उभे राहायला लागले.तेव्हा डॉक्टर म्हणाले“तुम्ही बसा”

“एनी गुड न्यूज..”कर्नलनी विचारलं तेव्हा डॉक्टरांनी नकारार्थी मान डोलावली. 

“तब्येतीत काहीच फरक नाही.जैसे थे. वेंटीलेटर सुरू करूनही आता बरेच दिवस झालेत. एकूण परिस्थिती पाहता सुधारणा होण्याची शक्यता नाही. तुम्हांला खोट्या आशेवर ठेवत नाही.पेशंटला होणारा त्रास,वेळ आणि पैसा याचा विचार करता निर्णय घेण्याची वेळ आलीय.”डॉक्टरांचं निर्वाणीचं बोलणं ऐकून मुलींच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तर दोन्ही जावई सुन्न.कर्नल मात्र बर्फासारखे थंड.

“काहीच करता येणार नाही का”थोरलीनं विचारलं.

“दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊ”धाकटी. 

“आपण शक्य ते सगळे प्रयत्न केलेत पण पेशंटकडून काहीच प्रतिसाद नाही.तुम्हांला सेकंड ओपिनीयन किवा शिफ्ट करायचं असेल तर हरकत नाही.पुन्हा सांगतो,नो होप्स,इट्स टाइम टु टेक फायनल कॉल.”कर्नलच्या हातावर थोपटत डॉक्टर पुढच्या राऊंडला गेले.अनपेक्षितपणे समोर आलेल्या वास्तवामुळे मुली बावरल्या.जावई भावूक झाले.एवढं होऊनही कर्नल जरासुद्धा विचलित न होता शांत बसलेले होते. 

“पपा,”दोघी बहिणी वडिलांना बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या.त्यांना धीर देताना कर्नलचे डोळे कोरडे तर चेहरा नेहमीसारखाच करारी,भावविरहीत.

“पपा,काहीतरी बोला”थोरली.

“काय बोलू!!आता बोलण्यासारखं काहीच राहील नाही.”कर्नल

“म्हणजे तुम्ही मान्य केलंत”

“दुसरा पर्याय आहे का?डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय.आता निर्णय आपल्याला घ्यायचाय.”

“काही निर्णय बिर्णय घ्यायचा नाही.ममाला दुसरीकडं शिफ्ट करू’”थोरली. 

“येस,”म्हणत धाकटीनं बहिणीच्या बोलण्याला दुजोरा दिला. 

“जागा बदलली तरी वास्तव तेच राहणार.डॉक्टरांचे प्रयत्न आपण पाहिलेत.नियतीनं वेगळाडाव टाकला.” कर्नल एकदम बोलायचं थांबले.

“इतक्या लवकर हार मानलीत.” 

“हार नाही,वास्तव स्वीकारलयं.तुम्हीही ते मान्य करा.”

“अजूनही वाटतंय की काहीतरी चमत्कार घडेल आणि ममा सुखरूप बाहेर येईल.”

“चमत्कार वैगरे फक्त सिरियल,सिनेमात होतात.खऱ्या आयुष्यात नाही.बी ब्रेव्ह,भावनेपेक्षा वस्तुस्थितीचा स्वीकार करा.ममा असती तर तिनं हेच सांगितलं असतं.”

“पपा,काहीच वाटत नाही का? किती सहज स्वीकारलं.”

“ जेव्हा आपण काहीही करू शकत नाही तेव्हा समोर येईल ते निमूटपणे स्वीकारणं केव्हाही चांगलं!! आयुष्य म्हणजेच व्यवहार बाकी भावना,प्रेम,आपुलकी, जिव्हाळा हे मनाचे खेळ.रोजच्या आयुष्यात त्याचा काडीमात्र उपयोग नाही उलट त्रासच.ममाला आता जास्त त्रास द्यायला नको.तिला मोकळं करू” दोघीं बहिणींनी एकदमच वडिलांकडं पाहीलं तेव्हा त्यांची नजर शून्यात होती.

“ग्रेट,मानलं पपांना,एवढं मोठा दु:खाचा डोंगर कोसळला पण तरीही मनाचा तोल ढळलेला नाही.”जावई. 

“पहिल्यापासून ते असेच आहेत.आनंद असो वा दु:ख ते नेहमीच बॅलन्स असतात.कधीच एक्साईट झालेलं पाहिलं नाही.नेहमीच प्रॅक्टिकल वागणारे.त्यांच्या मनातलं फक्त ममालाच समजायचं पण आता तीच…” धाकटीनं आलेला हुंदका दाबला. 

“मी नलूला भेटायला जातोय.कृपा करून कोणाला आत येऊ देऊ नका.आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ हर,सो प्लीज…”सावकाश पावलं टाकत कर्नल चालायला लागले.—-

थरथरत्या हातानं काचेचा दरवाजा ढकलून कर्नल आत आले.नर्सला थोड्यावेळासाठी बाहेर जाण्याची विनंती केली.बेडजवळ जाऊन उभे राहिले.गाढ झोपलेली नलिनी डोळे उघडून नेहमीसारखं प्रसन्न हसेल अन बोलायला लागेल अस क्षणभर वाटलं परंतु लगेच वास्तवाची जाणीव झाल्यानं वेदनेची जोरात कळ तळपायापासून मस्तकात गेली.हातपाय लटपटायला लागले.डोळ्यासमोर अंधारी आली.हातातली काठी जमिनीवर घट्ट रोवत तोल सावरला.भावनेचा भर ओसारल्यावर शांत झालेले कर्नल नलिनीच्या हातावर हात ठेवत म्हणाले “नलू,तुला असं बघायची सवय नाही.बास आता,हट्ट सोड,डोळे उघड.आम्हांला सोडून तू जाऊ शकत नाहीस. माझ्यासाठी,पोरींसाठी तुला थांबावं लागेल.आयुष्यभर समजूतदारपणे वागलीस.मग हे आत्ताच असं का वागतेयेस.तुझ्याशिवाय आयुष्य……बाप रे!!.तुला असं पाहून खूप असहाय्य वाटतंय,पूर्ण उद्ध्वस्त झालोय.मुलींना आधार देताना खंबीरपणाचा आव आणतो पण आतल्या आत ……..”इतका वेळ रोखलेला बांध फुटला.डोळे घळाघळा वहायला लागले.घशाला कोरड पडली.कर्नल स्टूलावर बसले.

“37 वर्षापूर्वी आयुष्यात आलीस.फार मोठी पुण्याई म्हणून तुझ्यासारखी जोडीदार मिळाली.माझ्या लहरी,विक्षिप्त वागण्याला कायमच सांभाळलं.खूप तडजोडी केल्या परंतू कधी बोलून दाखवलं नाहीस.सांभाळून घेतलंस.तक्रार न करता निमूट त्रास सहन केलास.सुखाचे दिवस केवळ तुझ्यामुळं पाहतोय.मुली आपआपल्या संसारात सुखी आहेत.मी देखील निवांत झालोय.तू खूप केलंस म्हणूनच आता तुला आनंद द्यायचा होता.नेहमी मी सांगायचं अन तू ऐकायच असं चालत आलं.हे बदलायचं होतं. तुझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या.सगळा वेळ तुझ्यासाठीच.तू म्हणशील तसं वागून तुला हे सरप्राइज देणार होतो.अजून खूप बोलायचंयं राहिलंय, मन मोकळं करायचंय अन तू तर …….धिस ईज नॉट फेअर.ऐकतेयेस ना.तू चिडवायचीस तसा मी ‘इमोशनलेस माणूस’ नक्कीच नाहीये.स्वभावामुळे कधी बोललो नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नलू.. तुला माझी शपथ!!हे बघ,तुझ्या आवडीचं चाफ्याचं फूल आणलयं आणि ऐक,तुझं ऑल टाइम फेवरेट गाणं…..”मोबाईलवर रफीसाहेब गायला लागले  अभी ना जाओ छोडके……के दिल अभी भरा नही”  कर्नलनी सुद्धा भसाड्या आवाजात सुरात सूर मिसळला तेव्हा ट प ट प पडणाऱ्या डोळातल्या थेंबांनी मोबाईल भिजत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय माउली – – ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ माऊलींचा हरिपाठ १.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

प्रिय माउली – – 

बा विठ्ठला, 

देवा, तू असा आहेस ना ? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…..

आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो……

मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…..

खरं सांगू का ?

प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…..) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते…. आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते….

तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल….

तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,…. कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय ?

देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न ? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…..

देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…..

विठू माउली,

तुला सगळंच ठावे….., तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना….

तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…..

अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती…. पण  चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली….. आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू….? अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…. एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…. हे तुला करायला आवडेल….

तुझ्या मनातलं बोललो ना….?

मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…..

बरं, आता परतीला निघतो…

जाताना रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जातो….

देवा, आणखी एक गोष्ट मागाविशी वाटते…, मागू का ?

तू नाही म्हणायच्या आधीच मागतो…..

.. तुझ्या नामाचे प्रेम दे……!

देशील ना ?

तुझाच

एक वारकरी…..!

शब्दांकन:- संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य ) 

मो।  ८३८००१९६७६

*********

 वारकऱ्यांच्या पत्राला माउलीचे उत्तर ..

लेकरा,

अनेक आशीर्वाद.

तुझं कौतुक व्हावं म्हणून मी तुझ्याकडुन पत्र लिहून घेतलं असे तू लिहिलेस….

बाप से बेटा सवाई हेच खरे….

तुम्हीच मला सगुण रूप दिलेत, त्यामुळे सगुणाचे गुण मला येऊन चिकटणार यात नवल ते काय ?

निर्गुण निराकार असलेल्या मला आपण विविध आकार देऊन साकार केलेत. रंग रुपाप्रमाणे मला विविध नावे दिलीत आणि माझे माहात्म्य विविध प्रकारे असे काही वर्णन केलेत की मला तसेच प्रगट व्हावे लागले, आणि पुढेही…….

असो….

लेकरा, यावर्षी तू पायी वारीला न येता मानसिक वारी केलीस…. तुझी नवीन कल्पना मला अधिक भावली…. शेवटी तुझ्या अंतरात असलेलं मन मीच आहे आणि त्यानेच तू वारी केलीस…..

व्वा!! खूप छान!!

मी आपल्या सर्वांसाठी विठू माउली नक्कीच आहे, पण माझे खरे रूप ओळखून तुम्ही माझ्या ज्ञाना, तुका, जनी, चोखामेळा, सखू सारखे संत व्हावे असे मला वाटते…

पिंडी ते ब्रम्हांडी या उक्तीची अनुभूती तुम्ही घ्यावी असे मला वाटते…..

माझ्या लेकीने (गडबडू नकोस, तुझ्या बायकोने) दिलेली यादी चंद्रभागेमध्ये मीच वाहू दिली…. कारण तुला ती यादी पुढे करताना खूप अवघड झाले असते….., प्रेमात कोण, कुठे आणि कसली मागणी करणार….सगळा त्यागाचा मामला……

– अरे साऱ्या सृष्टीची काळजी मी घेतो, तुला वाऱ्यावर सोडेन….? घरी गेलास की बघ, सारे घर माझ्या सान्निध्याने भारलेले असेल……

एक वचन देतो तुला बाळा,

तू यत्न कसून कर, शर्थीने प्रयत्न कर. मग, यश तुझेच आहे…., पडायला लागलास तर सावरायला मी आहेच….. निर्धास्तपणे जा, जपून रहा. मी तुझ्या सोबत आहे की नाही याची काळजी करू नकोस…

एक मात्र कर. तू सतत नाम घेत रहा म्हणजे तुझ्या सोबत रहायला मला अडचण वाटणार नाही…..

मी तुझी लाज नक्कीच राखेन……

आशीर्वाद !!!!!

तुझी 

माउली

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

नेहमीचीच व्यस्त संध्याकाळ, डोंबिवली स्थानकातली, बिन चेहऱ्याची. स्त्री पुरुषांची घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आटापिटा करणारी गर्दी. दिवसभराच्या श्रमाने थकलेले, घामेजलेले चेहेरे. मी ही  त्यांच्यातलाच एक. कल्याण दिशेकडल्या पुलावरून घरी जायच्या ओढीने, पाय ओढत निघालेला, पाठीवर लॅपटॉपची गोण घेतलेला पांढऱ्या सदऱ्यातला श्रमजीवी. असे असंख्य जीव सोबत चालत असलेले, माझ्यासारखेच श्रांत. आता लवकर रिक्षा मिळेल, का परत मोठ्या लांबलचक रांगेत जीव घुसमटत राहील या विवंचनेत. माझं एक बरं असतं. मी आपला चालत चालत थोडीफार खरेदी करत घरी जातो. रिक्षाच्या भानगडीत पडतच नाही कधी. तो नकार ही नको आणि ती अरेरावीही नको पैसे देऊन. विकतचं दुखणं नुसतं!!!

आज पण तसाच विचार करत जात असताना पुलाच्या कडेशी एक अंध विक्रेता दिसला. बूट पॉलिशच्या डब्या आणि ब्रश विकत असलेला. बऱ्याच दिवसांपासून एक पॉलिश ची डबी घेऊन घरच्या घरी बूट चमकवायचा मी विचार करत होतो. मागे पण असा प्रयत्न केला होता पण डबी आणायचो, एकदोनदा उत्साहात पॉलिश करायचो आणि मग मावळायचा उत्साह. डबी अडगळीत पडायची आणि मग नंतर कधीतरी परत वापर करावा म्हंटलं तर आतलं मलम  वाळून कडकोळ झालेलं असायचं. या वेळी मात्र खूप जाज्वल्य वगैरे निश्चय केला आणि त्या विक्रेत्यापाशी रेंगाळलो. 

या लोकांना कसं कळतं कोणास ठाऊक, पण मी उभा आहे समोर हे कळलं त्याला आणि काय हवंय विचारलं मला त्यानं . मी थोडा वाकलो त्याच्या समोर आणि म्हणालो काळं पॉलिश हवंय. त्याने हात लांब करून तपकिरी झाकणाची एक डबी उचलली आणि म्हणाला घ्या. मी म्हणालो, अहो ही तर तपकिरी आहे.  मला काळं हवंय पॉलिश. म्हणाला आत काळं पॉलिशच आहे. मी चक्रावलो. घरी तांदुळ लिहिलेल्या  डब्यात डाळ आणि डाळीच्या डब्यात पोहे हे ठाऊक होतं  पण इथेही तेच बघून जाम आश्चर्य वाटलं मला. मी म्हणालो नक्की ना? बेलाशक घेऊन जा म्हणाला. नसेल काळं तर नाव बदलेन!!

उघडून बघू का ? विश्वास नसेल तर बघा !! काय तो आत्मविश्वास !!! मी न उघडता डबी खिशात ठेवली. 

किती द्यायचे? ५० रुपये. मी नाही घासाघीस करत अशा विक्रेत्यांशी. सांगितलेली रक्कम देतो त्यांना आढेवेढे न घेता. QR code दिसतोय का बघितलं त्याच्या शेजारी. नव्हता दिसत. मी पाकीट काढलं आणि जांभळी, नवी १०० ची नोट दिली त्यांच्या हातात. चाचपली त्यानं आणि म्हणाला  साहेब आज अजून बोहनी नाही झाली. ५० नाहीयेत माझ्याकडे परत द्यायला. पंचाईत झाली आता. मी माझ्या पाकिटात ५० ची नोट किंवा सुट्ट्या नोटा आहेत का ते शोधलं, पण नव्हते. थांबलो दोन मिनिटं, पण कोणीच गिऱ्हाईक येत नव्हतं त्याच्याकडे. मी म्हणालो, जाऊद्या ठेवा तुम्ही ५० रुपये तुमच्याकडे, मी उद्या संध्याकाळी घेईन परत. 

अचानक तो म्हणाला उद्याचा काय भरोसा साहेब? मी असेन नसेन. कोणी पाह्यलंय ? तुमच्या पन्नास रुपयांचं ओझं नको मला डोक्यावर.  मी परत बघितलं त्याच्याकडे, गळ्यात तुळशीमाळ वगैरे नव्हती पण तत्व आणि स्वत्व तेच जाणवत होतं. डोळ्यातले नव्हे पण मनातले भाव वाचता येत होते त्याच्या, स्पष्ट. तिढा पडला होता. मी उपाय काढला. त्याला म्हणालो, तुम्ही शंभर ठेवा, मी दोन डब्या घेतो. उद्या संध्याकाळी एक परत करेन आणि उरलेले पन्नास घेऊन जाईन. 

हे ऐकल्यावर चेहरा खुलला त्याचा. चालेल म्हणाला. फक्त डबी उघडू नका. मी हो म्हणालो. एक संपवायची मारामार असताना दोन डब्या घेतल्या. त्याला विचारलं एक फोटो काढू का ? खुशाल काढा म्हणाला. मी कसा दिसतो ते मलातरी कुठे ठाऊक आहे…. मी भांबावून बघतच राहिलो त्याच्याकडे. गर्दीत कसाबसा त्याचा फोटो काढला आणि निघालो घराकडे. 

आज आठवडा झाला. मी रोज जातो त्याच्यासमोरून, त्याच्याकडे बघत आणि संभाषण आठवत. बूट पॉलिश विकणाऱ्या, डोळ्यांनी अंध पण मनाने डोळस असणाऱ्या त्याच्यातल्या प्रामाणिकपणाला प्रणाम करत, मनोमन.  ती डबी अजून तशीच आहे माझ्याकडे. नाही परत केली मी. वापरली जाणार नाही ती कदाचित माझ्याकडून, पण ठेऊन देईन एका आंधळ्याच्या डोळसपणाची आठवण म्हणून… 

आणि हो, सांगायचं राहिलंच, तपकिरी झाकणाच्या डबीत काळंच पॉलिश होतं !!! 

लेखक : श्री पराग गोडबोले.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १२ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १२ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।

यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥१२॥

*

व्योम जरी व्यापुनिया ये तेजे सहस्र सूर्याच्या

तुल्य व्हायचे ना तेजा विश्वरूप परमात्म्याच्या ॥१२॥

*

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।

अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥१३॥

*

अनेक देवांना विविध रूपे दिसली दृष्टीला

श्रीकृष्णा देही पाहुन स्थित धन्य पार्थ झाला ॥१३॥

*

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।

प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥१४॥

*

चकित होऊनिया तदनंतर रोमांचित झाला पार्थ 

हात जोडुनी नमन करूनी परमात्म्या झाला कथित ॥१४॥

अर्जुन उवाच

पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्‍घान्‌ ।

ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्‌ ॥१५॥

कथित अर्जुन 

दिसती मजला तव देहात भूत विशेष देव

महादेव कमलस्थ ब्रह्मा ऋषी सर्प दिव्य ॥१५॥

*

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रंपश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्‌ ।

नान्तं न मध्यं न पुनस्तवादिंपश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥१६॥

*

तुमच्या ठायी विश्वेश्वरा मजला दिसती

अनेक बाहू उदर नयन आनन ते किती

आदि मध्य ना अंत जयाला ऐसे हे रूप

आकलन ना दृष्टी होई अगाध विश्वरूप ॥१६॥

*

किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्‌ ।

पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्‌ ॥१७॥

*

गदा चक्र मुकुट युक्त दिव्य तेजःपुंज रूप

दाहीदिशांनी प्रकाशमान तेजोमय रूप

ज्योती अनल भास्कर यांच्या तेजाचे रूप

प्रमाण नाही कसले ऐसे तुमचे दिव्य रूप ॥१७॥

*

त्वमक्षरं परमं वेदितव्यंत्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥१८॥

*

तुम्हीच परब्रह्म शाश्वत परमात्मा आश्रय विश्वाचा 

तुम्ही सनातन पुरुष अविनाशी रक्षक अनादि धर्माचा॥१८॥

*

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्‌ ।

पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रंस्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्‌ ॥१९॥

*

आदिमध्यअंत नाही चंद्रसूर्य नयन तुमचे

अनंत भुजा तुम्हाला सामर्थ्य अनंत तुमचे 

दर्शन मज तुमच्या हुताशनीपूर्ण आननाचे 

तम हटवुनी उजळितसे विश्वा तेज तयाचे ॥१९॥

*

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।

दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदंलोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्‌ ॥२०॥

*

आस्वर्ग वसुंधरा तुम्हीच व्यापिले अवकाश

अलौकिक तुमच्या या उग्र विराट रुपास

त्रैलोक्यवासी समस्त  अवलोकून चकित

अंतर्बाह्य जाहले विचलित होउनी भयभीत ॥२०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, “बोला! काय काम आहे?”

ते म्हणाला, “भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता, म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.” मी म्हटले, “माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”

“अहो, ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!”

काही बोलणार इतक्यात मागून आई आली…

“एकटा काय उभा आहेस? इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे, आत येऊन चहा पी. “ आईला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, “अग आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?”

एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले, “अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे.”

“बस् मी जिथं असेन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा माझ्यापुढे… मी म्हटले, ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊ दे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता.

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोललो, आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज.

ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काही न बोलता, “काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम” असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता, ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ,अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, “भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.

घरी पोहोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो आणि, “प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या.” मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, “आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी.

प्रभूनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, “आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.” खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की, “तो पहात आहे”, त्या दिवशीपासून आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 205 ☆ जाहि निकारि गेह ते… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “जाहि निकारि गेह ते…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 205 ☆ जाहि निकारि गेह ते

वैचारिक रूप से समृद्ध व्यक्ति सही समय पर सही फैसले करता है। जनकल्याण उसके जीवन का मूल उद्देश्य होता है। कहते हैं-

प्रतिष्ठा का वस्त्र जीवन में कभी नहीं फटता, किन्तु वस्त्रों की बदौलत अर्जित प्रतिष्ठा, जल्दी ही तार- तार हो जाती है।

अक्सर लोग कहते हुए दिखते हैं- चार दिन की जिंदगी है, मौज- मस्ती करो, क्या जरूरत है परेशान होने की। कहीं न कहीं ये बात भी सही लगती है। अब बेचारा मन क्या करे? सुंदर सजीले वस्त्र खरीदे, पुस्तकें पढ़े, सत्संग में जाए या मोबाइल पर चैटिंग करे?

प्रश्न तो सारे ही कठिन लग रहे हैं, एक अकेली जान अपनी तारीफ़ सुनने के लिए क्या करे क्या न करे?

15 लोगों का समूह जिन्हें एक जैसी परिस्थितियों में रखा गया , भले ही वे अलग- अलग पृष्ठभूमि के थे किन्तु मिलजुलकर रहने लगे। इस सबमें थोड़ी बहुत नोकझोक होना स्वाभाविक है। यहाँ अवलोकन इस आधार को ध्यान में रखकर किया गया कि सबसे ज्यादा सक्रिय कौन सा सदस्य है। जो लगातार न केवल स्वयं को योग्य बना रहा है वरन वो सब भी करता जा रहा है जिसके कारण उसका चयन यहाँ हुआ है।

देखने में स्पष्ट रूप से पाया गया कि जमीन से जुड़ी प्रतिभा न केवल शारीरिक दृष्टि से मजबूत है बल्कि उसकी सीखने की लगन भी उसे शिखर पर पहुँचा रही है। वहाँ उपस्थित सभी लोग उसका लोहा मान रहे हैं। कुछ लोग दबी जुबान से उसकी तारीफ करते हैं।

कहने का अर्थ यही है कि लगातार सीखने की इच्छा आपको सर्वश्रेष्ठ बनाती है। केवल एक पल का विजेता बनना आपको शीर्ष पर भले ही विराजित कर दे किंतु हर क्षण का सदुपयोग करने वाला सच्चा विजेता होता है। उसका मुकाबला कोई नहीं कर सकता।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Rooted Memories… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Rooted Memories ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ ~ Rooted Memories…  ~? ☆

Sometime in the past, my life was grounded,

moored in the time and space, inexplicably

With  the dreams and memories unsolvable

like a conundrum, so much irreconcilably…

*

However  hard,  I  tried  to  unshackle it,

it got more and more entangled only

Tried  intensifying  the  efforts  but  in  vain 

The love  refused  to sojourn  lonely…

*

My will steadily forces me to move forward

but the heart  still resides in the yore

Enmeshed in time, gathered new experiences

as the zeitgeist  gave me offers,  galore

*

In  the  twisted  spiral  cloisters  of  time,

echoes of lost laughters, resonate endlessly

Silent  sighs, buried in the anguished secrets,

stepped forward, but got dragged back only…

  *

Testament is there, even when you’re absent,

love thrives, which was never there before

So what, if in the past, life was somberly stuck,

but  now lovelorn heart flourishes, galore..!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पर्यायवाची ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पर्यायवाची ? ?

कितना ही डराओ,

दबाओ, कुचलो,

मारो, पीटो, वध करो,

बार-बार संघर्ष करते हो,

हर बार उठ खड़े होते हो,

तुम पर क्या

मृत्यु का असर नहीं होता?

मैं हँस पड़ा,

मात्र शरीर नश्वर होता है,

पर शब्द ईश्वर होता है..,

सुनो,

अशेष का पर्यायवाची होता है,

सर्जक, जगत में

आठवाँ चिरंजीवी होता है!

© संजय भारद्वाज  

प्रातः 5 :05 बजे, 18 जुलाई 2024

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 422 ⇒ खुरचन… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “असंग्रह (अपरिग्रह)।)

?अभी अभी # 422 ⇒ खुरचन? श्री प्रदीप शर्मा  ?

खुरचन एक अकर्मक क्रिया भी है, जिसमें कड़ाही, तसले आदि में चिपका तथा लगा हुआ किसी वस्तु का अंश किसी उपकरण अथवा चम्मच आदि से रगड़कर निकाला जाता है। त्वचा में खुजाल चलने पर, त्वचा को खुरचने की क्रिया के लिए खुर, यानी नाखूनों का उपयोग भी किया जाता है। पीठ की खुजाल का कोई हल नहीं, आप मेरी खुजालो, मैं आपकी खुजालूं।

बच्चे अक्सर नाखूनों से दीवार को खुरचने की कोशिश किया करते हैं। दीवार अथवा फर्श पर, इस तरह अकारण नाखून रगड़ने से, देखने वाले को, न जाने क्यूं, खीझ पैदा होती है। मां के मुंह से एक अक्सर एक शब्द सुनने में आता था, कुचराई, जिसका सामान्य अर्थ अनावश्यक छेड़छाड़, दखल अथवा टांग अड़ाना होता था। सभ्य समाज आजकल उसे उंगली करना कहता है।

वैसे खिसियानी बिल्ली खंभा ही नोचती है, यह सभी जानते हैं।।

बोलचाल की भाषा में बचे खुचे को भी खुरचन ही कहते हैं। जब भी घर में खीर अथवा कोई मिठाई बनती थी, तो खुरचन पर हमारा अधिकार होता था। 

बर्तन भी साफ हो जाता था, और माल मलाई हमारे हाथ लग जाती थी।

खुरचन नाम से जले को खुरच कर बनाया हुआ मत समझिए, ये मिठाई है, मिठाई, वो भी शुद्ध मलाई से बनी हुई, मखमली स्वाद देने वाली। वैसे तो बुलंदशहर जिले का खुर्जा अपने पॉटरी उद्योग के लिए बेहद मशहूर है लेकिन इसके साथ-साथ इसकी पहचान एक अनोखी मिठाई से भी है। ऐसी मिठाई जिसका इतिहास 100 साल से भी ज्यादा पुराना है। ये मिठाई है शुद्ध दूध की मलाई से बनी खुरचन, जो मलाई की कई परतें जमने के बाद मखमली सी दिखती है। हालांकि इस मिठाई पर किसी एक जगह का एकाधिकार नहीं. हम इंदौर वाले भी किसी से कम नहीं।।

जो साहित्य में बरसों से जमे हुए हैं, और जिन्होंने कभी सृजन रस बरसाया भी है, और मलाई खाई भी है, वे भी देखा जाए तो अब बचा खुचा ही परोस रहे हैं, लेकिन हाथी दुबला होगा तो भी कितना और जो स्वाद के भूखे होते हैं, वे तो पत्तल तक चाट जाते हैं।

जिस तरह किसी भक्त के भाव के लिए ठाकुर जी के प्रसाद का एक कण ही पर्याप्त होता है, और गंगाजल की केवल दो बूंद ही अमृत समान होती है, उसी प्रकार काव्य, शास्त्र और साहित्य के चुके हुए मनीषियों की खुरचन भी पाठकों और प्रकाशकों द्वारा दोनों हाथों से बटोर ली जाती है।।

वरिष्ठ, सफेद बाल, खल्वाट और वयोवृद्ध नामचीन प्रसिद्धि और पुरस्कार प्राप्त, साहित्य को समृद्ध करने वाले कर्णधारों पर जब कोई असंतुष्ट यह आरोप लगाता है कि उनमें से अधिकांश चुक गए हैं और केवल खुरचन ही परोस रहे हैं, तो प्रबुद्ध पाठकों के कोमल मन को ठेस पहुंचती है।

बंदर क्या जाने खुरचन का स्वाद ! ज्ञानपीठ और राजकमल जैसी साहित्य की ऊंची दुकानों पर कभी फीके पकवान नजर नहीं आते। जो अधिक मीठे से परहेज करते हैं, केवल वे ही ऐसी खुरचन में मीन मेख निकालकर आरोप लगाते हैं, ऊंची दुकान फीके पकवान।।

साहित्य की खुरचन में भी वही स्वाद है, जो छप्पन भोग में होता है। कल के नौसिखिए हलवाई नकली खोए और कानपुरी मिलावटी घी से बने पकवान बेच साहित्य की असली खुरचन से बराबरी करना चाहते हैं। लेकिन दुनिया जानती है, खुरचन ही असल माल है। खुरचन से साहित्य जगत मालामाल है।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 14 – आधुनिक गधे की कहानी ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना आधुनिक गधे की कहानी।)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 14 – आधुनिक गधे की कहानी ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

किसी गाँव में एक सीधा-सादा गधा रहता था, जिसका नाम गधेराम था। गधेराम बेहद मेहनती था, दिन-रात अपने मालिक के खेतों में काम करता था। गाँव के लोग उसे सम्मान की नजर से देखते थे, क्योंकि वह कभी किसी से शिकायत नहीं करता था और हमेशा अपने काम में लगा रहता था। लेकिन क्या मेहनत और ईमानदारी का जमाना सच में बीत चुका है?

एक दिन, गधेराम के मालिक ने सोचा, “क्यों न गधेराम को शहर ले जाया जाए और वहाँ उसका इस्तेमाल किया जाए?” मालिक की यह सोच सुनकर गधेराम बहुत उत्साहित हुआ। उसने सोचा, “शहर की चमक-धमक और आराम की जिंदगी का मजा लूंगा।” लेकिन क्या सच में शहर की चमक-धमक गाँव की सादगी से बेहतर है?

गधेराम को शहर लाया गया और उसे एक बड़े उद्योगपति के हवाले कर दिया गया। उद्योगपति ने गधेराम को देखा और हँसते हुए कहा, “यह गधा हमारे ऑफिस के लिए एकदम सही रहेगा।” अब सोचिए, एक गधे को ऑफिस में काम करने के लिए सही कैसे माना जा सकता है? क्या यह आधुनिक समाज की मानसिकता पर एक तंज नहीं है?

गधेराम को अब एक नयी जिम्मेदारी सौंपी गई – ऑफिस के कागजात और फाइलें इधर-उधर ले जाना। शहर के ऑफिस की जिंदगी बिल्कुल अलग थी। गधेराम ने देखा कि वहाँ के लोग अपने काम के लिए नहीं बल्कि अपनी चालाकी और होशियारी के लिए जाने जाते हैं। ऑफिस में सभी लोग एक-दूसरे की तारीफ करते थे, लेकिन पीठ पीछे बुराई करने से बाज नहीं आते थे। क्या यह सच में तरक्की का रास्ता है?

गधेराम ने अपने काम में पूरी मेहनत और लगन दिखाई, लेकिन ऑफिस के लोग उसे कभी गंभीरता से नहीं लेते थे। वे हमेशा उसे नीचा दिखाने की कोशिश करते थे। एक दिन, ऑफिस के एक कर्मचारी ने गधेराम से कहा, “अरे गधेराम, तुम तो बड़े मेहनती हो, लेकिन इस ऑफिस में मेहनत से नहीं, चालाकी से काम होता है।” क्या यह सीखने की बात है या फिर एक कटाक्ष?

गधेराम ने सोचा, “शायद मैं समझ नहीं पा रहा हूँ कि यहाँ कैसे काम किया जाता है।” उसने अपने आप को बदलने की कोशिश की। अब वह भी ऑफिस की राजनीति में शामिल हो गया। लेकिन क्या ईमानदारी और सच्चाई को छोड़कर सफल होना सही है?

अब गधेराम भी चालाकी और धूर्तता की राह पर चल पड़ा। लेकिन फिर भी, उसके साथियों ने उसे कभी स्वीकार नहीं किया। ऑफिस के लोग उसे पहले से भी ज्यादा परेशान करने लगे। उसे छोटे-मोटे कामों में उलझा कर रखा जाने लगा, ताकि वह कभी अपने असली काम में सफल न हो सके। गधेराम के आँखों में आँसू आने लगे। उसे अपने गाँव और वहाँ की सादगी भरी जिंदगी याद आने लगी। क्या वास्तव में सच्चाई और ईमानदारी का कोई मोल नहीं?

एक दिन, गधेराम ने अपने मालिक से कहा, “मालिक, मुझे गाँव वापस जाने दो। यहाँ की जिंदगी मेरे लिए नहीं है।” मालिक ने गधेराम की बात सुनी और उसे गाँव वापस भेजने का फैसला किया। लेकिन क्या वापस लौटने से समस्याओं का समाधान हो जाएगा?

गधेराम जब गाँव लौटा, तो वहाँ के लोगों ने उसका स्वागत किया। सभी ने देखा कि गधेराम ने शहर की चमक-धमक से क्या सीखा है। गधेराम ने गाँव के लोगों से कहा, “शहर की जिंदगी में चमक-धमक तो बहुत है, लेकिन सच्चाई और ईमानदारी का कोई मूल्य नहीं। वहाँ हर कोई एक-दूसरे को नीचे गिराने की कोशिश करता है। लेकिन यहाँ गाँव में, सादगी और मेहनत का सम्मान होता है।” क्या यह हमारे समाज की असली तस्वीर नहीं है?

गधेराम की यह बात सुनकर गाँव के लोग भावुक हो गए। उन्होंने गधेराम से वादा किया कि वे कभी भी अपनी सादगी और ईमानदारी नहीं छोड़ेंगे। गधेराम ने भी यह वादा किया कि वह हमेशा अपने गाँव और वहाँ की सादगी भरी जिंदगी के लिए मेहनत करेगा। लेकिन क्या वास्तव में यह वादे निभाए जा सकते हैं?

यह कहानी हमें सिखाती है कि चाहे दुनिया कितनी भी बदल जाए, सादगी और ईमानदारी का मूल्य हमेशा बना रहता है। गधेराम की कहानी एक प्रेरणा है उन सभी के लिए जो अपनी मेहनत और सच्चाई से कभी पीछे नहीं हटते। लेकिन सवाल यह है कि क्या हम वास्तव में इस प्रेरणा को अपनाते हैं? क्या हम भी गधेराम की तरह सच्चाई और ईमानदारी की राह पर चल सकते हैं? या फिर हम भी आधुनिक समाज की चालाकियों में उलझ कर रह जाएंगे?

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares