☆ भारतीय संस्कृती जपणारी* टिकली… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
भारतीय संस्कृती जपणारी* टिकली
टिकली
तिच्या कपाळावर ची
टिकली चमकलीपैठणी नेसून ती झोकात चालली
आज चंद्र ढगाआड का लपला
स्त्रीच्या जीवनात कुंकू किंवा टिकलीचे महत्त्व खूप आहे. सोळा शृंगारातही कुंकवाला महत्त्वाचे च स्थान आहे.
*चिरी कुंकवाची लखलख करिते
जीव जडला जडला जडला
खरं वाटंना वाटंना वाटंना*
या जुन्या मराठी चित्रपट गीतात कुंकवाची चिरी असा उल्लेख आहे. खरंचपूर्वी स्त्रिया कुंकवाची आडवी रेघ म्हणजेच चिरी कपाळा वर रेखत असत.माझी आई, मावशी यांच्या कडे फणीकरंड्याची लाकडी पेटी असायची. त्यात पिंजर कुंकू, मेणाची
डबी,फणी(कंगवा),काजळाची डबी आणि लहान साआरसा असायचा. त्या आधी कपाळावर मेण लावून मग गोलाकार कुंकू लावायच्या. मावशी सांगायची ते मेणही मधमाशीच्या पोळ्यातील असे.कुंकूही सात्विक (भेसळीविना)असे.
टिकली विषय इतका जिव्हाळ्याचा आहे कि त्यावर त्रिवेणी करण्याचा मोहच आवरत नाही.
त्रिवेणी
तिच्या कपाळावरची टिकली लक्ष वेधत होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठंतरी आडोशाला थांबावं म्हणतोय .
भारतीय संस्कृतीत कुंकवा चे महत्त्व अनन्य साधारण आहे.कुंकवाचा इतिहास पाहता फार पूर्वीच्या काळात डोकावावे लागेल.पूर्वी आर्य-अनार्य (द्रविड) टोळ्या होत्या. त्यांच्यात सतत युध्दे होत.त्यावेळी आर्य स्त्रियां ना द्रविड किंवा अनार्य पळवून नेत.मग आर्य पुन्हा
आपल्या स्त्रियांना युध्दात जिंकून परत आणत.मग या स्त्रियांना शुध्द करण्या साठी घोड्याच्या रक्ताने त्यांना स्नान घालत. पुढे पुढे त्याऐवजी घोड्याच्या रक्ताचा टिळा स्त्रीच्या कपाळी लावत व तिला शुध्द करून घेत. यातूनच मग कुंकवाची प्रथा उदयास आली. हा इतिहास रक्त रंजित जरी असला तरी कपोल कल्पित नाही.
शुध्द कुंकू हळद हिंगूळ आदि पदार्थ वापरून तयार केले जाते. कुंकू कोरडे असेल तर त्याला पिंजर म्हणतात. ओल्या कुंकवा लागंधम्हणत.शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्ण पणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्त वर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत.
असं म्हणतात. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कली युगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.’
१. `कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.
२. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. कुंकवा मुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रा तून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो, असे समजतात.कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. म्हणून पूजापाठ,धार्मिक विधीं वेळी पुरुषांच्या कपाळा वर सुध्दा कुंकूम तिलक रेखतात.
योगशास्त्रानुसार शरीरातील षट्चक्रांपैकी आज्ञाचक्राचे स्थान कपाळा वर ज्याठिकाणी कुंकू किंवा टिकली लावली जाते तेथे आहे. म्हणजे कुंकू लावणे हे एक प्रकारे आज्ञाचक्राचे पूजन आहे.
त्रिवेणी बघाः
टिकली
काल ती चांदणी आकाशात चमकत होती
आज ती तिच्या कपाळावरील टिकली म्हणून चमकत होती
हल्ली चांदण्या कुठंही लुकलुकत असतात कालानुरूप या कुंकवाची जागा टिकल्यां नी घेतली. कारण लावाय ला सोपी, बाळगायला सोपी, तसेच घाम,पाऊस
याने ओघळायची भीती नाही. टिकली लावली किंवा कुंकू तरी संस्कृती शी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो. भले त्या त आकार, रंग,वेगवेगळे असतील. फँशनचा विचार असेल तरीही टिकलीचे महत्त्व ही कमी होत नाही.
☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं.) — इथून पुढे —
त्याला पेज, खिमट असं भरवताना बऱ्याचदा ते बाहेर सांडतं, म्हणजे त्याला ते नीटपणे गिळता येत नाही, त्याची लाळ इतरही वेळा गळत असते, असंही करूणानं केलेल्या नोंदीत लिहिलं होतं.
ही सगळी लक्षणं गंभीर होती. डाॅक्टरांनी त्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्या. MRI आणि इतर मनोवैज्ञानिक चाचण्यांनंतर cerebral palsy with multiple disorders म्हणजेच मेंदूचा पक्षाघात आणि बहुविकलांगता असं निदान झालं.
सुयशचा IQ – भावनिक बुद्ध्यांक ३० पेक्षा कमी होता. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास होऊ शकत नव्हता. तो कायम परावलंबीच राहणार होता. आपल्या नैसर्गिक विधींवरही त्याचं नियंत्रण राहणं कठीण होतं.
सुवर्णा आणि सुशीलवर हा फार मोठा आघात होता. सुवर्णाला तर नैराश्याचा झटका आला. त्यासाठी तिला मानसोपचार आणि औषधांची मदत घ्यावी लागली. पुढचे सहा महिने ती रजेवरच होती. हळूहळू ती या धक्क्यातून बाहेर आली. नंतर तिच्यावर ओढवलेल्या एकंदर परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून, तिला बँकेच्या घाटकोपर येथील शाखेत बदली देण्यात आली.
सुशीलने ही परिस्थिती खूपच संयमाने हाताळली. या सगळ्या घडामोडींच्या काळात करूणाने सुयशची खूप व्यवस्थित काळजी घेतली. ती त्याचं सर्व काही अगदी निगुतीने करत राहिली. शिवाय घरकामाची जबाबदारीही सांभाळत होती.
काळ पुढे सरकत राहिला. यमुनाबाईंच्या खटपटीमुळे करूणाचं परत लग्न ठरलं. तिचा होणारा नवरा आणि सासू सायनला राहात होते. आतापर्यंत करूणाचा मुक्काम सुवर्णाच्या घरी होता. पण लग्नानंतर तिला इथे राहणं शक्य नव्हतं. सकाळी लवकर येऊन, संध्याकाळी सातनंतर घरी जायची तयारी तिनं दर्शवली. गरज पडली तर एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती थांबणार होती. सायन तसं फार लांब नव्हतं.तिचा नवरा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यामुळे येण्या-जाण्याची सोय होती. तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केलं. करूणाला जेवण-खाण्याशिवाय महिन्याला दहा हजार मिळत होते, हेही त्यांच्या होकाराचं एक कारण होतंच.
सुयशला आणि सुशील- सुवर्णालाही करूणावर अवलंबून राहायची सवय झाली होती. सुयश आता या तिघांचा स्पर्श ओळखत होता. आपली रोजची अंघोळ वगैरे नित्यकर्म या तिघांकडूनच शांतपणे करून घ्यायला लागला होता. इतर कोणाला मात्र तो जवळपास फिरकू देत नसे. कोणी तसा प्रयत्न केलाच तर आरडाओरडा करून घर डोक्यावर घ्यायचा तो. त्याच्यासाठी चारीकडून उंच कडा असलेला खास बेड बनवून घेतला होता. त्यावरच खेळत काहीतरी करत बसायचा तो.
करूणाचा सुयशवर जीव होता. तिचंच बाळ होता जणू. त्याच्या कलानं घेत ती त्याचं सगळं करायची. त्याला स्वच्छ ठेवणं, जेऊ घालणं, व्हीलचेअरवर घालून फिरवणं, त्याच्याशी सतत बोलत राहणं सारंच ती ममतेनं करत होती. त्याच्या हावभावांवरून, अस्पष्ट ओरडण्यावरून त्याला काय हवंय, काय होतंय, हे तिला बरोब्बर कळायचं. एक अबोल सांकेतिक भाषा तयार झाली होती त्यांच्यात.
बारा वर्षे उलटली. त्या दरम्यान करूणाला दोन मुलंही झाली. एक मुलगा आणि मुलगी, तिची सासू दिवसभर नातवंडांची देखभाल करत होती. मुलं शाळेत शिकत होती. नवरा निर्व्यसनी होता, त्यामुळे करूणाचा संसार सुखाचा होता.
एक दिवस अचानक सुयशला फीट आली. अंगही तापलं होतं त्याचं! करूणानं फोन करून सुवर्णाला सांगितलं आणि टॅक्सी घेऊन नवऱ्याला बोलावलं. मग तिघेजण सुयशला घेऊन घाटकोपरच्या हाॅस्पिटलमध्ये गेली. तिथे ़सुयशचा उपचार होण्यासारखा नाही, त्याला परेलला लहान मुलांच्या हाॅस्पिटलमध्ये न्यायला तिथल्या डाॅक्टरांनी सांगितलं. त्याप्रमाणे हे तिकडे गेले आणि सुशीलला फोन करून तिकडेच यायला सांगितलं. परेलला सुयशला अॅडमिट करून घेतलं.तो कोमात गेला होता. पंधरवडाभर त्याच्यावर उपचार चालू होते. पण उपयोग झाला नाही. सुयश वाचला नाही.
कामतांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कसंही असलं तरी आपलं मूल आई-बापांना प्यारंच असतं. करूणालाही आपलं मूल गमावल्यागत दुःख झालं. त्याच्या जन्मापासून त्याला सांभाळलं होतं तिनं! नियतीपुढे माणसाचं काही चालत नाही हेच खरं!
त्याच आठवड्यात सुशीलचं प्रमोशन झालं. त्याला दोन वर्षे फ्रान्सला राहावं लागणार होतं. सुयशच्या जाण्यानं सुवर्णा आणि सुशील सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यानं हे पोस्टिंग स्वीकारून सुवर्णासह फ्रान्सला जावं, असं सगळ्या आप्तेष्टांना वाटत होतं. नव्या ठिकाणी दुःखाचा थोडा विसर पडेल हा विचार होता. दोन महिन्यांनंतर फ्रान्सला जाॅईन व्हायचं होतं. सुवर्णाची नोकरी तेवीस वर्षे झाली होती. तिला पेंशन मिळणार होती. तिने स्वेच्छा निवृत्ती घेऊन सुशीलसोबत जायचं ठरवलं. तोपर्यंत करूणा त्यांच्याकडे कामाला येणार होती. घाटकोपरच्या फ्लॅटचा विक्रीचा व्यवहार त्यांनी पूर्ण केला होता.
सर्व सोपस्कार पूर्ण झाले, चार दिवसांनी ती दोघं फ्रान्सला प्रयाण करणार होती. त्याआधी सुवर्णा आणि सुशीलने करूणाचा पगार चुकता केला. तिच्या मदतीचं मोल पैशात होणार नव्हतंच. फूल ना फुलाची पाकळी म्हणून, त्यांनी तिच्यासाठी एकरकमी पाच लाख रुपये गुंतवून आयुर्विम्याची पेंशन पाॅलिसी घेतली. त्यायोगे तिला आयुष्यभर दरमहा २१००रूपये मिळणार होते आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसाला पाच लाख रूपये एकरकमी मिळणार होते. ती पाॅलिसी त्यांनी करूणाच्या हवाली केली.
निरोप घेताना करूणाला आणि त्या दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. सुयश सोबत काढलेले फोटो करूणानं सुवर्णाकडे मागून घेतले होते. तिचा पाय या घरातून निघत नव्हता, पण आता जायला हवे होते. एवढ्यात सुशीलचा फोन वाजला. बोलता बोलता त्याने हाताने खूण करून करूणाला थांबायची खूण केली.
फोन परेलच्या लहान मुलांच्या हाॅस्पिटलमधून होता. त्या हाॅस्पिटलमध्ये दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी एक विशेष विभाग उघडण्यात येणार होता. त्यांना अशा मुलांना सांभाळण्याचा अनुभव असलेली मदतनीस हवी होती. सुयश तिथे अॅडमिट असताना तिथल्या डाॅक्टरांनी करूणाला बघितलं होतं, ती किती आस्थेवाईकपणे आणि निगुतीनं त्याचं सगळं करत होती.
परेलचं हाॅस्पिटल खूप मोठं आणि नामांकित होतं. करूणाला चांगला पगार आणि इतर सवलती व लाभही मिळणार होते. तिची तयारी असेल तर येत्या एक तारखेपासून तिची नियुक्ती तिथे केली जाणार होती. आर्थिक दृष्ट्या तिची चांगली सोय होईल याचं सुवर्णा आणि सुशीलला समाधान वाटत होतं. सुयशचा फोटो छातीशी धरून ओक्साबोक्शी रडणार्या करूणाला मात्र आजवर सगळं आपल्याला सुयशमुळेच मिळालं आणि तो गेल्यावरही हे मिळतंय याची जाणीव तीव्रतेने होत होती. सुयश बाळाच्या या ऋणातून ती कशी मुक्त होणार होती?
जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं, तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस.
नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!
तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना.
लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली.
अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.
पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?
माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?
पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना, मी काय म्हणू?
सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “
☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण बघितले,
‘हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है
हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है
धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से
मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है… ) आता इथून पुढे —
कथेच्या ओघात दोन बोचरी सत्ये लेखकाने प्रगट केली आहेत. एनकाऊंटरमधे शहीद झालेल्या आपल्या परममित्राची आठवण काढता काढता, मोहितच्या मनात येतं, जोर्यंत तुम्ही शहीद होत नाही, तोपर्यंत तुम्ही बहादूर नसता. ज्या देशासाठी तुम्ही जीव गमावला, त्या देशवासीयांना क्षणभर थांबून तुमच्यासाठी दु:ख करायला वेळ नसतो. दुसरं सत्य म्हणजे, आपण बहादूर आहात की नाही, हे दाखवण्यासाठी, आपण कुठे लढलात, ती जागा महत्वाची. दूर चीड – देवदारच्या जंगलात झालेलं राहूलचं युद्ध, दिल्ली-मुंबईच्या परिसरात झालं असतं, तर तो आत्तापर्यंत हीरो झाला असता. आता मात्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांच्या खाली धावणार्या पट्टीपुरतं त्याचं हिरोइझम मर्यादित झालय.
‘इक तो सजन मेरे पास नही रे’ ही संग्रहातील अतिशय सुरेख, भावुक, हळवी कथा. कथेच्या सुरूवातीला एका दृश्याचं वर्णन येतं. झेलमच्या साथीने जाणारा रस्ता जिथे तिची साथ सोडतो, तिथे चिनारचा एक पुरातन वृक्ष आहे. गावाची वस्ती जिथे संपते, तिथे हा वृक्ष आहे. नियमित पेट्रोलिंगसाठी जाणार्या विकास पाण्डेयला नेहमी वाटतं, तिथे उभ्या असलेल्या देखण्या, चित्ताकर्षक तरुणीला त्याला काही तरी सांगायचय आणि ते खरंच असतं. एक दिवस आपली जीप थांबवून तो तिची चौकशी करतो. ती सुंदर तर आहेच. पण तिचे डोळे त्याला दल आणि वुलर सरोवराचा तळ गाठणारे वाटतात आणि तिच्या नाजूक देहातून उमटणारा आवाज अतिशय गंभीर वाटतो. वेगळीच ओढ लावणारा. व्याकूळ करणारा. त्याला पाकिस्तानी गायिका रेशमाची आठवण होते. विशेषत: तिचं गाणं, ‘चार दिना दा प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदाई.’ तिच्या डोळ्यातली तळ गाठणारी दल आणि वुलरची सरोवरं, तर कधी त्यात उसळलेलं झेलमच तूफान आणि तिचा रेशमासारखा व्याकूळ करणारा आवाज आणि रेशमाचं ते गाणं.. लंबी जुदाई… याची गुंफण कथेमधून अनेक वेळा इतकी मोहकपणे आणि मार्मिकपणे झाली आहे, की सगळी कथा प्रत्यक्ष वाचायलाच हवी.
ती तरुणी रेहाना. तिचा प्रियकर सुहैल गेल्या महिन्यापासून गायब आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती ती मेजर विकास पाण्डेयला करते. तो तिला त्याचा शोध घेण्याचं आश्वासन देतो.
सुहैलचा शोध घेतल्यावर असं लक्षात येतं की तो सरहद्दीपलीकडे जिहादी कॅम्पमधे दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाय. सुलतान नावाचा मेंढपाळ पाच हजार रुपये आणि दोन पोती आटा, डाळ याच्या मोबदल्यात, सुहैलशी मोबाईलवर बोलणं करून देण्याचा मान्य करतो. दिल्या शाब्दाला आणि दिल्या पैशाला, आटा-डाळीला तो जागतो. विकासाचं सुहैलशी बोलणं होतं. तो जन्नत म्हणून तिकडे गेलेला असतो. प्रत्यक्षात जहन्नूमचा अनुभव घेत असतो. आपल्याला यातून बाहेर काढण्याची तो विनंती करतो. विकास त्याला ‘सरहद्द पार करून या बाजूला ये, पुढचं सगळं मी बघेन’, असं सांगतो. एका जिहादी गटाबरोबर तो इकडे यायचं ठरवतो पण…
एके दिवशी विकासच्या चौकीवर, सरहद्दीजवळ एनकाऊंटर झाल्याची बातमी येते. सरहद्द पार करून येणार्या एका जिहादी दहशतवादी गटाला, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सैन्याच्या तुकडीने मारून टाकल्याची ती बातमी असते. सुलताना नावाच्या कुणा मेंढपाळाने पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात, ही खबर दिलेली असते. मेलेल्यांच्या यादीत सुहैलचंही नाव असतं.
त्या रात्री सायलेंट मोडवर असलेल्या विकासच्या मोबाईलवर रेहानाचा नंबर वारंवार फ्लॅश होत होता आणि त्याच्या लॅपटॉपवर रेशमा गात होती…
‘इक तो साजण मेरे पास नाही रे
दूजे मीलन दी कोई आस नही रे
‘गर्ल फ्रेंड’ ही कथा दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष झालेल्या चकमकीचं वर्णन करते. एका मोठ्या घरात दोन अफगाण दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळते. त्यांचा सफाया करण्याचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणे अंमलबजावणी होते, पण अनपेक्षितपणे चकमकीला वेगळं वळण लागतं. मेजर प्रत्यूशचा बड्डी तळघर झाकणारी पट्टी उचकटणार असतो आणि प्रत्यूश आत ग्रेनेड टाकणार असतो. मेजर सिद्धार्थ व त्याचा बड्डी त्यांना फायरिंग कव्हर देणार असतात. सिद्धार्थ म्हणतो, ‘सर, तुम्ही अनेक यशस्वी ऑपरेशन्स पार पाडलीत, यावेळी मला ग्रेनेड आत टाकू द्या. प्रत्यूश मान्य करतो आणि दोघे आपआपल्या जागा बदलतात आणि अनपेक्षितपणे अफगाणीच अंदाधुंद गोळीबार करत, पट्टी उचकटून बाहेर येतात. या गोळीबारात सिद्धार्थ आणि त्याचा बड्डी धराशायी होतात. आपल्यासाठी बाहेर पडलेली गोळी सिद्धार्थचा जीव घेणारी ठरली, या विचाराने प्रत्यूश कासावीस होतो. त्याला सतत वाटत रहातं, आपण सिद्धार्थचं म्हणणं मान्यच केलं नसतं तर…
इतक्या गंभीर कथेचा शेवट मात्र नर्म विनोदाने होतो. इथे नर्स शकुंतलाला तो सांगतो, ‘मृत्यू समोर दिसत असताना मी माझ्या गर्ल फ्रेंडचे नंबर मोबाईलवरून डीलीट करत होतो कारण मी मेल्यानंतर माझ्या सामानासकट मोबाईल माझ्या बायकोकडे जाईल आणि मी तर तिला सांगितलं होतं की आता मी कुठल्याही गर्ल फ्रेंडच्या संपर्कात नाही. तिला हे नंबर बघून काय वाटलं असतं?’
असाच नर्म विनोदी शेवट ‘हॅशटॅग’ कथेचा आहे. ही समर प्रताप सिंह या तरुणाच्या एकतर्फी विफल प्रेमाची कहाणी. या कथेत प्रामुख्याने मिल्ट्री कॅंडिडेट्सना जे कठोर प्रशिक्षण दिलं जातं, त्याची माहिती येते. ही माहिती, समर आपल्या बहिणीला मुनमूनला आपल्या दिनचर्येची माहिती देतो, त्यावरून कळते.
लॅपटॉपवरून जेव्हा त्याला कळतं त्याची प्रेयसी सगुना हिचा साखरपुडा आदित्यशी झाला आहे, तेव्हा तो कासावीस होतो. सगुनाशी प्रत्यक्ष बोललं, तर ती आपलं प्रेम मान्य करेल अशीही त्याला भाबडी आशा आहे. यावेळी त्याच्या कंपनीतली सगळी मुले एकजुटीने कसं कारस्थान रचतात आणि दोन दिवसांसाठी वरिष्ठांच्या नकळत त्याला सगुनाला भेटायला कसं पाठवतात, याचं मोठं खुसखुशीत वर्णन कथेत येतं. हे सारं प्रत्यक्षच वाचायला हवं. तो रात्री तिला भेटतो. ती अर्थातच त्याचं बोलणं धुडकावून लावते. मग तो त्याचा रहात नाही. फळं कापायची सूरी तो तिच्या पोटात खुपसतो आणि आपल्या कॅम्पसवर निघून येतो.
नंतर त्यांची पहिली टर्म संपते. सगुना सुखरूप असल्याचे त्याला कळते. त्याला आनंद होतो. सगुणा-आदित्यचं लग्नं होतं, हे कळल्याने त्याला दु:ख होतं. घरी आल्यावर सगुनाला एकदा तरी बघावं, म्हणून तो तिच्या घराजवळ रेंगाळतो. त्याला एकदा रिक्षात ती दिसते. त्याला पहाताच ती आदित्यला अधीकच खेटून बसते. त्यावेळी तो दोन प्रतिज्ञा करतो. एक म्हणजे तो आजन्म अविवाहित राहील आणि कधी तरी आपल्या विरह-व्यथेवर एक कथा लिहील, पण त्यात सगुना आदित्यला खेटून बसणार नाही, तर त्याच्यापासून दूर सरकून बसेल. वरील दोन्ही कथांमधून कठोर कथानायकांच्या निरागसतेचं मोठं मनोज्ञ दर्शन घडतं.
‘चिलब्लेन्स’ म्हणजे हिमदंश. या कथेत ‘दर्ददपुरा’ या कुपवाड शहरापासून सुमारे ७० की.मीटर अंतरावर असणार्या खेड्याची आणि त्याच्या ‘दर्द’ची म्हणजे दु:खांची कहाणी येते. गाव इतकं सुंदर, जसं काही भोवतालच्या पहाडांनी आपले बाहू पसरून स्वर्गालाच कवेत घेतलय. पण गावाची दु:खे अनेक. वीज नाही. डॉक्टर नाही. उपचारासाठी लोकांना थेट कुपवाडाला जावं लागतं. मेजर नीलाभचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या माजीदचं हे गाव. आपल्या दोन सुंदर मुलींना, शायर नवर्याला, भरल्या संसाराला सोडून माजीदची बायको एका जिहादीबरोबर गेलीय. गावात घरटी एक तरी जिहादी. त्यामुळे तरुण मुले बरीचशी गारद झालेली. उपवर मुलींसाठी मुलेच नाहीत. हे दु:ख तर काश्मीर घाटीतल्या अनेक ठिकाणांचे.
माजीदच्या वडलांच्या डाव्या हाताला चार बोटे नाहीत. त्याचे कारण नीलाभने विचारले असता, त्याला कळते, हिमदंशामुळे बोटात होणार्या वेदानांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वत:च केलेला हा उपचार आहे. बोटंच तोडण्याचा. नीलाभला वाटतं, सगळा ‘दर्ददपुरा’ आपल्याकडे बघून रडतो आहे. तो तिथून परत येताना ठरवतो, ‘हेडक्वार्टरकडे प्रस्ताव द्यायचा, की कंपनीच्या. डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा ‘दर्ददपुरा’ गावाला व्हिजीट द्यावी आणि त्याला वाटतं ‘दर्ददपुरा’ आता आपल्याकडे बघून हसतोय.
‘द बार इज क्लोज्ड ऑन च्युजडे. ही एक अगदी वेगळ्या प्रकारची कथा. रहस्यमय अशी ही भूतकथा तीन तुकड्यातून आपल्यापुढे येते आणि शेवट तर भन्नाटच. प्रत्यक्ष वाचायलाच हवा असा.
दुसरी शहादत, हैडलाईन, हीरो, आय लव्ह यू फ्लाय बॉय, अशा एकूण 21 कथा यात आहेत. अनेक विषयांवरच्या या सगळ्याच कथा वेधक आहेत. लेखकाची चित्रमय शैली, स्थल, व्यक्ती, घटना-प्रसंग यांचा साक्षात् अनुभव देणारी आहे. याला बिलगून आलेले काव्यात्मकतेचे तरल अस्तर, कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. ‘गर्ल फ्रेंड’, ‘हॅशटॅग’, ‘एक तो सजन …’ सारख्या काही कथा वाचताना वाटत राहातं, यावर उत्तम दर्जेदार चित्रपट होऊ शकतील. यातील कथांबद्दल किती आणि काय काय लिहावं? प्रत्येकाने प्रत्यक्षच वाचायला आणि अनुभवायला हवा, हिरव्या हास्याचाकोलाज.
प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य वेगळे. एकच हिंदी महासागर पण त्याची अनंत रूपे. बाली मधल्या वास्तव्यात या उदात्त सागरदर्शनाने आम्ही खरोखरच प्रसन्न तर झालोच पण एका अज्ञात गूढ शक्तीने अंतर्मनात कुठेतरी पार शुद्धी मिळाल्यासारखे वाटले. निसर्गाशी तद्रूप होणे म्हणजे काय हे अंशत: अनुभवले.
दक्षिण कुटा येथील बारुंग मधला पांडव बीच हा असाच एक दूरस्थ समुद्रकिनारा. दोन उंच टेकड्यांनी वेढलेला. यापैकी एका टेकडीवर वरपासून खालपर्यंत कुंती, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे पुतळे कोरलेले आहेत. खाली पसरलेल्या अथांग समुद्राचे आणि संथ किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या लाटांचे निसर्ग चित्र केवळ अप्रतिम! हे थोडे अवघड पर्यटन स्थळ होते. निदान आमच्या वयाचा विचार करता. त्यामुळे आपण येथे तरुण असताना का आलो नाही हा प्रश्न घेऊनच आम्ही परतलो.
बाली म्हणजे सागर तसेच बाली म्हणजे मंदिरे. हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरे येथे आहेत. बालीनीज तसे धार्मिक, श्रद्धाळु.
रस्त्यातून जाताना लाल कौलांची सुरेख बैठी घरं पाह्यला मिळायची. प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन सदृश बांधकाम दिसायचं आणि खजुराच्या पानांच्या टोपलीत ठेवलेल्या तृणपात्या, चाफ्याची, जास्वंदीची फुले, पाने वाहिलेली असत. अगदी प्रत्येक टॅक्सी मध्ये सुद्धा डॅशबोर्डवर अशा प्रकारचं पूजन केलेलं असायचं. त्याला ते अर्पण म्हणजेच त्यांच्या भाषेत कनांगसाडी असे म्हणतात. शिवाय अनेक ठिकाणी झाडांवर इतरत्र कृष्णधवल चौकडे असलेले कापडही गुंडाळलेले दिसले. तोही एक भक्तीचाच प्रकार आहे. अशा प्रकारच्या पताका, रुमाल अथवा वस्त्रं ईशान्य भारताच्या भागातही आढळतात. एकप्रकारे,”देवा! तुझ्या कृपेची उब मला सदैव मिळो“ अशी विनवणी त्याद्वारे केली जात असावी. एकंदरच इंडोनेशियन आणि भारतीय संस्कृतीतले साम्य बऱ्याच बाबतीत दिसून येते.
एका मंदिराला भेट देण्याचे आम्ही ठरवले. तसे ते उंच पर्वतावरच होते. मात्र आमचा टॅक्सीवाला आणि तेथील काउंटर वरचे लोक म्हणाले,” फारसे कठीण नाही. थोड्या पायऱ्या आहेत आणि दहा-पंधरा मिनिटांची चाल आहे.” म्हणून आम्ही या स्थळाला भेट देण्याचे ठरवले. प्रत्येकी २५ हजार आयडीर भरून तिकीटेही काढली आणि मंदिराच्या दिशेने कूच केले. बरेचसे चढ-उतार, पायऱ्या चढत, उतरत चालत राहिलो. वाटलं तितकं सोपं नव्हतं पण आता इतके आलोच आहोत तर अजून थोडे पुढे जाऊया करत चालत राहिलो, चढत राहिलो. सभोवताली गर्द झाडी आणि वरून दिसणारा सागर मनभावन, लुभावणारा होता. पण झाडांवरच्या माकडांनी मात्र उच्छाद मांडला होता. कुणाचा चष्मा पळव, कुणाची पर्स, मोबाईल, चप्पल, टोपी. माकडचेष्टा या शब्दाचा खरा अर्थ अनुभवत होतो. आम्ही अगदी सावधानतेने आपापल्या वस्तू घट्ट सांभाळत चाललो होतो तरी सतीश ची कॅप आणि साधनाची चप्पल माकडांनी पळवलीच.
मंदिरापर्यंत पोहोचलो. कमरेवर बाली पद्धतीप्रमाणे निळ्या, भगव्या सिल्कचे काही लुंगी टाईप वस्र गुंडाळावे लागले होते. मात्र इतके चढून आल्यानंतर कळले की मंदिराचे द्वार बंद आहे. बाहेरून मंदिराच्या आतला भाग दिसत होता. उंच खांबावर एक राजदंड होता आणि त्याचे बाहेरूनच दर्शन घ्यायचे होते. ते प्रतिकात्मक हनुमान मंदिर होते आणि सभोवतालची माकडे मंदिराचं खोडकर प्रतिनिधित्व करत होते!
निसर्गाचा नजारा मात्र अवर्णनीय होता आणि देव आम्हाला त्या दूर क्षितिजावर, विस्तीर्ण जलाशयात हलकेच मावळणाऱ्या सूर्याच्या रूपातच भेटला हे मात्र अगदी खरं.आम्ही मनोभावे त्या मावळणार्या भास्कराला वंदन केले.
प्रचंड थकलो होतो. कसेबसे पाय ओढत उतरलो आणि टॅक्सीत बसून बंगल्यावर परतलो.
दरम्यान एका वाईट प्रसंगाचे साक्षी व्हावे लागले होते. मंदिरावरून खाली सेंटरवर परतलेल्या एका माणसाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तो तिथेच कोसळला. लोकांची धावपळ झाली. गर्दी जमली. मदतीचे अनेक हात पुढे आले. स्थानिक लोकांपैकी कुणी ॲम्बुलन्स मागवली, डॉक्टर्सना फोन केले. घोळक्यात कुणी डाॅक्टर आहे म्हणून विचारले.त्या गृहस्थाच्या समवेत असलेल्यांची बावरलेली स्थिती केवीलवाणी होती. आम्ही मनातल्या मनात त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि परतलो. मानवतेचं झालेलं ते दर्शन हृदयस्पर्शी नक्कीच होतं. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असा माणूस हा माणसासाठी धावतोच हे चित्र मात्र दिलासा देणार होतं. आम्ही मात्र ऐंशी च्या उंबरठ्यावर ही घटना पाहून एकच ठरवलं” इथून पुढे फारशी धाडसं करायची नाहीत. झेपेल तेवढं आणि पचनी पडेल तेवढंच करायचं. “ बालीचा अनुभव घ्यायचा, फक्त निसर्गातच रमायचं.
टॅक्सी सुरु झाली. मन बेचैन होतं.
साधना सुरेख आवाजात गात होती,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….”
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-4 – यह आकाशवाणी का जालंधर केंद्र है ☆ श्री कमलेश भारतीय ☆
(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)
जालंधर की यादों का सिलसिला जारी है और सुझाव भी आया कि एक बार जालंधर आकाशवाणी व दूरदर्शन को अच्छे से याद करूँ क्योंकि संयुक्त पंजाब के यही केंद्र थे और इनमें प्रसिद्ध हिदी लेखकों ने अपनी सेवायें दीं और इन केंद्रों को संवारने में अमूल्य सहयोग दिया।
मेरी जानकारी में प्रसिद्ध नाटककार हरिकृष्ण प्रेमी, गिरिजा कुमार माथुर, विश्व प्रकाश दीक्षित बटुक, श्रीवर्धन कपिल, लक्ष्मेंद्र चोपड़ा आदि जालंधर आकाशवाणी केंद्र में निदेशक रहे। जहाँ हरिकृष्ण प्रेमी व गिरिजा कुमार माथुर हिंदी के प्रसिद्ध नाटककार रहे। गिरिजा कुमार माथुर को प्रसिद्ध लेखक अज्ञेय जी के संपादन में तार सप्तक में संकलित किया गया और चर्चित कवियों में उनका नाम बड़े आदर के साथ लिया जाता है। इनकी पत्नी शकुंत माथुर भी अच्छी रचनाकार थीं। वहीं श्रीबर्धन कपिल अपनी आवाज़ के दम पर राष्ट्रीय स्तर पर कमेंटेटर रहे। पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी की अमृतसर से पाकिस्तान की बस यात्रा की बहुत ही शानदार कमेंट्री की थी। राष्ट्रीय दिवसों का आंखों देखा हाल भी सुनाते रहे। विश्व प्रकाश दीक्षित बटुक को वीर प्रताप समाचारपत्र के संपादक वीरेंद्र वीर जी ने सम्मानित भी किया था। इनके बेटे विजय बर्धन दीक्षित भी जालंधर आकाशवाणी केंद्र में प्रोड्यूसर पद पर रहे ।
लक्ष्मेंद्र चोपड़ा का हिंदी लघुकथा में विशेष स्थान है। वे मुम्बई दूरदर्शन के निदेशक के रूप में सेवानिवृत्त हुए और आजकल गुरुग्राम में रहकर साहित्य सेवा कर रहे हैं। प्रसिद्ध पंजाबी कवि सोहन सिंह मीशा भी आकाशवाणी केंद्र, जालंधर में रहे और उन्हें साहित्य अकादमी अवार्ड मिलने पर नवांशहर के अपने आर के आर्य काॅलेज में भी आमंत्रित किया था। मैं और मुकेश सेठी उनको आमंत्रित करने गये थे और वे सहर्ष आये भी और अपनी प्रसिद्ध कविता -चीक बुलबली का बहुत शानदार पाठ किया था जिसका मूल भाव यह था कि जहाँ कहीं वे अन्याय देखते हैं, वे चुप नहीं रह पाते और विरोध में ऊंची चींख निकल ही आती है। दुखांत यह रहा कि वे कपूरथला की कांजली नदी में नौका विहार करते नदी में ही गिर गये और बाद में प्राण नहीं बचाये नहीं जा सके थे। आज तक उनकी कविता चीक बुलबली का सार याद है और मीशा जी भी। जालंधर आकाशवाणी केंद्र के जानकी प्रसाद भारद्वाज व हेमराज शर्मा आकाशवाणी केंद्र से बाहर अनेक कार्यक्रमों में खूब हंसाते और आकाशवाणी पर ग्रामीण कार्यक्रम बहुत बढ़िया प्रस्तुत करते। भारद्वाज की बेटी चंद्रकला भी प्रोड्यूसर रहीं। यदि हिंदी कार्यक्रम प्रोड्यूसर डाॅ रश्मि खुराना को याद न करूँ तो अन्याय होगा। उन्होंने मुझे सिखाया कि आकाशवाणी के माइक के आगे कैसे बोलना है और ऐसे ही एक प्रोड्यूसर कैलाश शर्मा ने मुझे आकाशवाणी पर बड़े अवसर दिये। वे दिल्ली से ट्रांस्फर होकर आये थे और आकाशवाणी केंद्र के पास ही रहते थे। हरभजन बटालवी और देवेंद्र जौहल पंजाबी कार्यक्रमों के प्रोड्यूसर रहे। विनोद धीर व पुनीत सहगल ड्रामा प्रोड्यूसर रहे। आजकल पुनीत सहगल दूरदर्शन केंद्र, जालंधर केंद्र के प्रोग्राम प्रमुख हैं।
आकाशवाणी केंद्र, जालंधर की बात अपने मित्र राजेन्द्र चुघ के बिना भी अधूरी रहेगी। वे आकाशवाणी के जालंधर केंद्र पहले कैजुअल अनाउंसर रहे बाद में उन्नति करते करते दिल्ली से पौने नौ बजे के प्रमुख समाचार वाचक रहे और मैं उन्हें मुलाकात होने पर मज़ाक में कहता कि अब आप राजेन्द्र चुघ से राष्ट्रीय समाचार सुनिये। वे अच्छे कवि भी हैं। जब मुझे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से पुरस्कार मिलना था तब मुझे हरियाणा भवन में बधाई देने आए थे और हमने जालंधर के मित्रों को याद किया था।
जालंधर दूरदर्शन केंद्र के समाचार संपादक प्रसिद्ध हिंदी उपन्यासकार जगदीश चन्द्र वैद थे जिनका उपन्यास धरती धन न अपना हिंदी के बहुचर्चित उपन्यासों में से एक है और अनेक भाषाओं में अनुवादित भी हुआ। बलविंदर अत्री भी समाचार संपादक रहे और हिंदी के अच्छे कवि हैं और अनुराग ललित के नाम से लिखते हैं । रवि दीप ड्रामा प्रोड्यूसर रहे और उनका निर्दशित नाटक खींच रहे हैं आज तक याद है कि हम सब अपनी इच्छाओं को बढ़ाते जाते हैं जैसे बच्चे पतंग उड़ाते हैं, ऐसे ही हम अपनी इच्छायें बढ़ाते जाते हैं। रवि दीप आजकल मुम्बई में रहते हैं। सुरेंद्र शर्मा भी ड्रामा प्रोड्यूसर थे और उन्होंने स्वदेश दीपक की तमाशा कहानी का नाट्य रूपांतरण करवाया था। लखविंदर जौहल लिश्कारा नाम से कार्य क्रम बनाते थे जिसे प्रसिद्ध पंजाबी कवि सुरजीत पात्र होस्ट करते थे। इंदु वर्मा भी यहीं और मित्र डाॅ कृष्ण कुमार दत्त भी रहे और विपिन गोयल भी याद आ रहे हैं। दत्तू अच्छे लेखक भी हैं।
मैं सोचता हूँ कि आज के लिए इतना ही काफी है। अभी भी बहुत मित्र छूट रहे होंगे। मुझ अज्ञानी, खलकामी समझ कर माफ कर देंगे।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “अब हमसे वो मिलने को कतराते हैं…” ।)
ग़ज़ल # 109 – “अब हमसे वो मिलने को कतराते हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’