कोणालाही हेवा वाटेल अशी चाळीस वर्षांची आमची घट्ट मैत्री .जीवश्च कंठश्च अशा आम्ही दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा अख्खा दिवस एकत्र घालवतो. गप्पांना उधाण येतं. हास्याचे फवारे उडत असतात .सुखदुःखाची देवाणघेवाण होते .. डाएट,डायबेटीस रक्तदाब सगळं त्या दिवसा पुरतं थोडं शिथिल करीत जेवणावर ताव मारला जातो ..पुन्हा भेटण्याची तारीख ठरवून ताज्यातवान्या होऊन घरी परततो .
गप्पांचा फड जमवताना आम्हाला एकही विषय वर्ज्य नसतो .सासू ,नवरा ,मुलं,घरातले वाद,असे टिपिकल बायकी विषय ..तोंडी लावण्यापुरतेच ..
गाॅसिपिंगला तर थाराच नाही .
पण प्रवासातले अनुभव ,पाहिलेलं नाटक किंवा सिनेमा ,वाचलेलं काहीही ..खवय्या असल्यामुळे रेसिपीज् ..भटकंती …कश्शा कश्शावरही बोलायला वेळ पुरत नाही आम्हाला.
गेल्या दोन तीन भेटीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमचा एक सूर अस्थायी लागतोय का ..?
हसत हसत ,सहजपणे आमच्या तोंडून यायला लागलय ..”ए ..आपल्याला आता पाच सहा वर्षच बास आहेत हं ..” सत्तर परफेक्ट आहे बाय बाय करायला ..”
खरं तर आर्थिकद्रृष्ट्या सुस्थितीत ,खूप काही गंभीर आजार नाहीत ,मुलं सेटल्ड ..जबाबदाऱ्या संपलेल्या ….
असं असताना आम्ही हा सूर का आळवतो ..
शिक्षक असलेले माझे वडील नव्वदाव्या वर्षी निवर्तले . गरीबी ..वारावर जेवण .शिक्षणासाठी अपार कष्ट …अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या..अशात मध्यम वय संपलं, तरी एकही दिवस मी त्यांच्या तोंडून नव्वदाव्या वर्षी सुद्धा “बास झालं आता जगणं “असं ऐकलं नाही ..
मग आम्ही का अशा कंटाळलो ?
अडीअडचणी ,संकटं ,चढउतार, काळज्या ,तणाव हे सर्व जरी प्रत्येकीच्या आयुष्यात असलं, तरी संघर्षमय जीवन नव्हतं ..मग तरी सुद्धा ..?
काय असेल कारण ?
ऐंशीच्या घरातली जवळची माणसं विकलांग होताना पहावी लागली म्हणून ?
की तसं धावपळीचं दगदगीचं जीवन जगावं लागलं ..लागतय म्हणून??
स्त्रीने घर सांभाळायचं आणि पुरूषांनी कमाई आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या उचलायच्या , अशी कामाची विभागणी वडिलांच्या पिढीत होती .म्हणून दोघंही थकले नाहीत का ?
आम्ही हिरीरीने ,मनापासून घरची – दारची जबाबदारी उचलून थकलो ?
की त्यांच्या ठायी असलेलं समाधान,.संतुष्टता आमच्यात नाही .?
की त्यांची मुलंबाळं त्यांच्याजवळ असल्यामुळे उत्साहाचा झरा अखंड वाहता होता .रोज काहीतरी उद्देश असायचाच तो दिवस पार पडायला ?.
या विचाराशी येऊन मात्र मी थोडीशी चमकले .
दहाजणींपैकी आम्हा आठ जणींची मुलं नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशी आहेत .हे तर कारण नसेल ..?
दोघं दोघं रहातो म्हणून कंटाळतो?
…कारण मुलांबरोबरअसतो तेव्हा “सत्तरी बास “काय ..दुखणं खुपणं ही आठवत नाही …
थोडी सटपटले …असला रडा सूर लावणं म्हणजे जरा self pity त जाणं वाटलं मला.
माझाच मला राग आला ..हे कसलं भरल्या ताटावरचं रडणं ..
इतकं मजेत आयुष्य जगण्याचं भाग्य लाभलय .आणि कसले हे “सत्तरी बास चे डोहाळे “
पुढच्या वेळेला भेटू तेव्हा एकीलाही असा “अस्थायी “सूर लावू द्यायचा नाही ..बजावूनच टाकलं मी स्वतःला ..
लेखिका : नीलिमा जोशी
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला. आईंचा कॉल संध्याकाळी 7:30 ला कसा काय आला या विचारातच तिने फोन कानाला लावला.
“हॅलो वैशाली! खूप कामात आहेस का ग?”
“नाही आई! बोला न?”
“अग पियुने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातलाय! कोणाशीतरी फोनवर जोरजोरात बोलत होती… रडत होती. मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली.. ‘पहिली खाली जा तू.. अजिबात वर येऊ नकोस.’ आणि आता दरवाजा लॉक करून बसलीये. नक्की काय झालंय ते कळत नाही ग!” वैशालीच्या सासूबाईंनी चिंतीत स्वरात पण एका दमात सांगितलं.
“बरं बरं, मी येते. तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका. स्वराला ही जाऊन देऊ नका वरती.”
“येशील न लवकर.”
“निघालेच.१५-२० मिनिटात येतेच.”
घरापासून जवळच वैशालीचं कपड्यांचं छोटंसं बुटीक होतं. तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत. प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली. पियू नववीत तर स्वरा सहावीत.
संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसांवर दुकान टाकून ती रिक्षात बसली. बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली. “ताईने खोलीची वाट लावलीये बहुतेक.” ती बोलली. स्वराच्या चेहेऱ्यावर वरती नक्की काय घडलंय याची उत्सुकता होती तर आजी आजोबांचे चेहेरे पडलेले होते.
“ओके. नो प्रॉब्लेम. मी बघते नं काय झालंय ते..” वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवत म्हंटले. “तुम्ही सर्वजण मस्त tv बघा. मी आलेच.”
“पियू…!” दरवाज्यावर टकटक करत वैशालीने हाक दिली. “दरवाजा उघडतेस न बाळा?”
दरवाज्याचं लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली. खोलीत वादळ आलं होतं. टेबलावरची पुस्तकं, नोटस् जमिनीवर आल्या होत्या. पलंगावरच्या उशांनीही जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंदके देत पडलं होतं.
“काय झालं माझ्या सोनूला?” तिने खोलीत शिरत विचारलं. पियुने अजूनच डोकं उशीत खुपसले. “तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येईल नं राणी.” पियूच्या बाजूला बसत वैशाली बोलली.
हुंदके देतच ती उठून बसली. हुशार, गोरीपान, दिसायला ही गोड असणारी पियु आता मात्र रडूनरडून लाललाल झाली होती. “He left me. He said आता आपलं breakup झालंय” रडतरडत पियु बोलली.
“म्हणजे?” बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली. “मला काही कळेल अस नीट बोलशील का तू?”
“मम्मा.. थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता. तो मला बोलला की यापुढे I am not your boyfriend. आपलं ब्रेकअप झालय.”
“अगं, पण राज तुझा फक्त friend होता नं?”
“Friend होता, पण 4 months पासून boyfriend होता.” पियुने रडक्या आवाजात उत्तर दिलं. “मम्मा, मी आता school ला कशी जाऊ. सर्वजण हसतील मला… चिडवतील.. मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू? मी काय करू मम्मा?” वैशालीच्या मांडीत पडत हुंदके देत देत ती बोलली.
चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं, रडावं की चिडावं हेच वैशालीला कळत नव्हतं. मनात विचारांचं चक्र चालू झाले. हे काय वय आहे का पियुचं boyfriend असण्याचं. हिच्या वयाची मी असताना घरात असं काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असतं देवास ठाऊक. हिला चांगलं दमात घ्यावं असं वाटतंय.. पण याक्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही.
‘आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने, संवाद साधूनच सोडवलेत आणि म्हणूनच विश्वासाने पियुने ही गोष्ट माझ्याशी share केली. मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे.’ क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले.
तिने पियुकडे बघितले. तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली.. “पियू तुला माहीतच आहे पप्पांचं आणि माझं lovemarriage आहे. पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं.. मी घरी सांगितलं आणि दोन्ही घरच्या संमतीने आमचं लग्न झाले. त्यामुळे boyfriend वगैरे या गोष्टीबद्दल मला थोडं कमीच कळते. मला काही शंका आहेत, तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी.”
“हो. विचार की.”
“मग पहिलं मला सांग, boyfriend आणि bestfriend मधला फरक काय?”
“अगं bestfriend म्हणजे फक्त मित्र, आणि बॉयफ्रेंड म्हणजे… love. आपण त्याच्यासोबत सतत राहतो. Lunch time, free periods, school मधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबतच घालवतो. आणि न मम्…
– अनामिक
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(एका आगळ्या-वेगळ्या ढंगाने केलेले पुस्तक- परीक्षण )
साहित्यप्रकार : लेखसंग्रह
लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन.
प्रिय अरीन, तेजस आणि माही
तुम्हाला त्रिकुट म्हणू का थ्री इडीयटस… काही कळत नाही. पण त्यानं मला जे काही म्हणायचं आहे त्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही मला ओळखत नसणारच कारण मी एक सर्वसामान्य वाचक आहे. पण मी मात्र गेले कितीतरी दिवस तुम्हाला पाहतेय असं वाटण्याइतकी छान ओळखते. दोनतीन वर्षांपूर्वी लोकसत्तातल्या एका सदरात मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं. तेव्हाही मला तुमच्या मैत्रीचं, कायप्पाचा(व्हॉटस्अप) ग्रुपचं अप्रूप वाटलं होतं… पण का कोण जाणे मी तेव्हा तुमच्याशी कनेक्ट नाही होऊ शकले. पण विशी-तिशी-चाळिशी या पुस्तकातून तुम्ही भेटलात आणि मी नकळतच तुमच्याशी भावनिकरित्या जोडले गेले. नक्की कशाचा परिणाम… हे काही सांगता येत नाही पण आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यांच्याशी काही काळानेच आपली नाळ जुळते. त्यात मैत्र हे नातंच असं की ते कधी… कुठे… कसं… का… जुळेल याबाबत काहीही सांगता येत नाही. आणि त्यात वय, शिक्षण, लिंग हे मुद्दे गौण असतात.
तर मुद्दा हा की तुम्ही तिघांनी मला फारच कॉम्प्लेक्स दिलात. अगदी तेजसच्या बायकोसारखा! म्हणजे आपला का नाही असा एखादा मैत्रीचा ग्रूप…. निदान एखादा तरी मित्र असावा अरीन किंवा तेजस सारखा असं राहून राहून मनात येतंय. काय हरकत आहे – कल्पना असली तरी वास्तवात साकार व्हायला ? सगळ्याच कल्पना काही पूर्णतः काल्पनिक नसतात त्यात थोडातरी तथ्यांश असेलच की. आता बघा वधू – वर पाहिजे अशा जाहिराती सर्रास दिसतात – तसे मिळतातही. पण मैत्र पाहिजे अशी जाहिरात नाही नं देता येत आणि लग्न जुळवण्यासारखं मैत्र नाही जुळवता येत. आता उदाहरण घ्यायचं तर माही रिकीच्या आठवणीनं डिस्टर्ब झालेली असते तेव्हा अरीनशी ज्या पद्धतीनं मोकळं होऊन बोलते आणि तो तिला समजून घेतो ते किती भारी आहे. सॉरी टू से माही, पण तेव्हा मी अगदी जेलस झाले होते तुझ्यावर… फार फार हेवा वाटला होता तुझा. आणि धीरजशी लग्न करण्याबाबत तू साशंक होतीस तेव्हा तेजसनं तुला समजावलं, धीर दिला ते वाचून नकळत डोळे ओलावले. इतकं मोकळं होता येतं कधी? कुणापाशी? आणि इतकं मोकळं झाल्यावर ज्याच्यापाशी मोकळं होऊ त्याच्याशी नंतरही इतकं जिव्हाळ्याचं नातं राहू शकतं? कमाल आश्चर्य वाटलंय मला. नाही म्हणजे ब्रेकअप होणं, पूर्वीचं अफेअर असणं ते जोडीदाराला सांगणं इथपर्यंत गोष्टी घडतातही . पण त्या किती खरेपणानं आणि किती सोयीनं सांगितल्या जात असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे. इतकंच नाही तर रेळेकाकांसारख्या वडिलधाऱ्या व्यक्तीनंही हे नातं समजून घ्यावं. त्यात मनापासून सहभागी व्हावं हे सारं फारच सुखद धक्कादायक आहे. अरीनचा रुममेट अस्मित, गीता मावशी अशा कितीतरी मंडळींनी त्यांच्या वागण्याबोलण्यातून आपलंस केलं त्यामुळं हे मैत्र फक्त तुमचं राहिलं नाही, तर मैत्रीसाठी आसुसलेल्या प्रत्येकाचं झालं. प्रत्येकालाच तुमच्यामध्ये त्याचा किंवा तिचा मित्र-मैत्रीण दिसू लागले. जगण्याच्या नकळत राहून गेलेल्या जागा सापडल्या. आपल्या भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी संवाद साधला गेला. इथं मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आमचा विशी-तिशीतला जोश आणि तुमचा जोश यात कुठं काहीच कमी नाही. पण मोठा फरक आहे तो व्यक्त होण्यात. तुमच्यातला ठामपणा पाहता जगण्यातली अपरिहार्यता आणि क्षणभंगुरता तुमच्या पिढीला अधिक जास्त कळली आहे आणि तुम्ही त्याचा खुलेपणानं स्वीकार केलाय. सोलो ट्रीपबाबत जे विचार तेजसच्या मनात येतात तेच त्याच वयोगटातल्या आम्हाला पटतात. पण तिशीतल्या माहीला एक स्त्री म्हणून सोलो ट्रीप करतानाचे जे अडथळे जाणवतात ते इतरही वयातल्या स्त्रियांनाही जाणवत असतीलच की. अरीनच्या पिढीकडे पाहून जाणवतं की सतत सामाजिक दडपण पांघरण्याचं व्रतच जणू आम्ही घेतलंय. कसंय ना आसपास पसरलेली गरीबी आम्ही पाहिलीये, वेळ प्रसंगी सोसलीये आणि आता वेगानं वाढणारी सुबत्ताही आम्ही पाहत, अनुभवत आहोत. जी आत्ताच्या विशीतल्या पिढीला फारशी जाणवणार नाही. तेही खास करून मिडलक्लास, अप्पर मिडलक्लास, हायक्लासमधल्या तरुणांना. लोअर क्लासमध्ये विशी, तिशी आणि चाळिशी यांचे प्रश्नच वेगळे असतील. त्यांच्यातलं मैत्र कसं असेल, ते नात्यांकडे कसे बघत असतील असाही प्रश्न यानिमित्ताने मला पडला. कारण आत्ताच्या काळात फक्त आर्थिकच नव्हे तर वैचारिक दरीदेखील वाढत चालली आहे.
जगण्याचे अनेक प्रश्न नव्यानेच निर्माण होतायत. सुखाच्या व्याख्या अनेक मितींनी बदलल्यात. त्यामुळे पारंपारिक ठोकताळे आता पूर्णतः समाधानकारक ठरत नाहीत. अशा वेळी होणारी घुसमट ही फक्त कुणा एका पिढीची नाहीये तर सगळ्याच पिढ्या या घुसमटीला आज तोंड देत आहेत. आत-बाहेर कुठेच ताळमेळ नाही, अनंत कोलाहल माजलाय. म्हणून मग तुमच्या या विशी-तिशी-चाळिशी ग्रूपचं फारच कौतुक वाटतं. आणि असे ग्रूप व्हायला हवेत असं प्रकर्षानं वाटतं. मोकळं होता आलं पाहिजे, योग्य पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. तरच या कोलाहलातून आपला निभाव लागणार आहे. प्रत्येकाला सच्चा सूर सापडणार आहे. असे ग्रुप समाजाच्या सर्व स्तरात अधिकाधिक तयार होवोत. असं मैत्र अधिकाधिक विस्तारित होत जावं. हीच शुभ कामना.
ता.क.
खरंतर ही भेट अपुरी वाटतेय. इतरही भरपूर गप्पा मारायच्यात (कंसातल्यासुद्धा). तुम्ही पुन्हा काही नवीन विषय घेऊन याल तेव्हा नक्की भेटूयात.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख चित्र नहीं चरित्र। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 134 ☆
☆ चित्र नहीं चरित्र ☆
‘ईश्वर चित्र में नहीं, चरित्र में बसता है। अपनी आत्मा को मंदिर बनाओ’ चाणक्य का यह संदेश अनुकरणीय है, क्योंकि मंदिर में जाकर देवताओं की प्रतिमाओं के सम्मुख नतमस्तक होने से कोई लाभ नहीं; उनके सद्गुणों को आत्मसात् करो और मन को मंदिर बना लो तथा कबीर की भांति उन्हें नैनों में बसा लो। ‘नैना अंतर आव तूं, नैन झांपि तोहे लेहुं/ ना हौं देखूं और को, ना तुझ देखन देहुं’ यह है प्रभु से सच्चा प्रेम। उसे देखने के पश्चात् नेत्रों को बंद कर लेना और जीवन में किसी को भी देखने की तमन्ना शेष न रहना। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित पंक्तियां ‘मैं मन को मंदिर कर लूं/ देह को मैं चंदन कर लूं/ तुम आन बसो मेरे मन में/ मैं हर पल तेरा वंदन कर लूं’ यही है मन को मंदिर बना उसके ध्यान में स्वस्थित हो जाना। देह को चंदन सम घिस कर अर्थात् दुष्प्रवृत्तियों को त्याग कर सच्चे हृदय से स्वयं को प्रभु के चरणों में समर्पित कर देना और उसका दरश पाने पर किसी अन्य को न निहारना व वंदन करना–आसान नहीं है; अत्यंत दुष्कर है। वास्तव में स्अपने अंतर्मन को परमात्मा के दैवीय गुणों से आप्लावित करना व अपने चरित्र में निखार लाना बहुत टेढ़ी खीर है। राम आदर्शवादी व पुरुषोत्तम राजा थे तथा उन्होंने घर-परिवार व समाज में सामंजस्य स्थापित किया। वे आदर्श पुत्र, आदर्श भाई, आदर्श पति व आदर्श राजा थे तथा त्याग की प्रतिमूर्ति थे। कृष्ण सोलह कलाओं के स्वामी थे। उन्होंने अपनी दिव्य शक्तियों से दुष्टों को पराजित किया तथा कौरवों व पांडवों के युद्ध के समय अर्जुन को युद्ध के मैदान में संदेश दिया, जो भगवद्गीता के रूप में देश-विदेश में मैनेजमेंट गुरू के रूप में आज भी मान्य है।
‘अहं त्याग देने के पश्चात् मनुष्य सबका प्रिय हो जाता है; क्रोध त्याग देने से वह शोकरहित; काम त्याग देने से धनवान व लोभ त्याग देने से सुखी हो जाता है।’ युधिष्ठिर का यह यह कथन मानव को अहं त्यागने के साथ-साथ काम, क्रोध व लोभ को त्यागने की सीख भी देता है और जीवन में प्यार व त्याग की महत्ता को दर्शाता है। महात्मा बुद्ध भी इस ओर इंगित करते हैं कि ‘जो हम संसार में देते हैं; वही लौटकर हमारे पास आता है।’ इसलिए सबको दुआएं दीजिए, व्यर्थ में किसी के प्रति राग-द्वेष व स्व-पर का भाव हृदय में मत आने दीजिए। दूसरी ओर त्याग से तात्पर्य अपनी इच्छाओं पर अंकुश लगाना है, क्योंकि इससे मानव तनाव मुक्त रहता है। वैसे भी बौद्ध व जैन मत में अपरिग्रह अथवा संग्रह न करने की सीख दी गई है, क्योंकि हम सारी धन-सम्पदा के बदले में एक भी अतिरिक्त सांस उपलब्ध नहीं करा सकते। दूसरी ओर ‘यह दुनिया है एक मेला/ हर शख़्स यहां है अकेला/ तन्हाई में जीना सीख ले/ तू दिव्य खुशी पा जायेगा’ स्वरचित गीत की यहां पंक्तियाँ उक्त भाव को दर्शाती हैं कि इंसान इस संसार में अकेला आया है और उसे अकेले ही जाना है। एकांत, एकाग्रता व प्रभु के प्रति समर्पण भाव कैवल्य-प्राप्ति का सर्वश्रेष्ठ साधन हैं।
यदि हम आसन्न तूफ़ानों व आग़ामी आपदाओं के प्रति पहले से सजग व सचेत रहते हैं, तो शांत, सुखी व सुरक्षित जीवन जी सकते हैं और वे सहसा प्रकट नहीं हो सकती। हमें ‘खाओ, पीओ और मौज उड़ाओ’ के सिद्धांत को जीवन में न अपना कर, भविष्य के प्रति सजग व सचेत रहना चाहिए। शायद! हमें इसलिए ही ‘खाओ, पीओ व मौज उड़ाओ’ के सिद्धांत को जीवन में न अपनाने की सीख दी गयी है। इस सिद्धांत का अनुसरण न करने पर हमारी जग-हंसाई होगी और हमें दूसरों के सम्मुख हाथ पसारना पड़ेगा। ‘मांगन मरण समान’ अर्थात् किसी के प्रति के सम्मुख हाथ पसारना मरने के समान है। विलियम शेक्सपियर के मतानुसार ‘हमें किसी से उम्मीद नहीं रखनी चाहिए, क्योंकि एक न एक दिन उम्मीद टूटती अवश्य है और उसके टूटने पर दर्द भी बहुत होता है।’ वैसे तो उम्मीद पर दुनिया क़ायम है। परंतु मानव को उम्मीद दूसरों से नहीं, स्वयं से रखनी चाहिए। इसके साथ-साथ हमारे अंतर्मन में कर्ता भाव नहीं आना चाहिए, क्योंकि अहं मानव को पल भर में अर्श से फर्श पर ला पटकता है।
लोग विचित्र होते हैं। स्वयं तो ग़लती स्वीकारते नहीं और दूसरों को ग़लत साबित करने में अपना अमूल्य समय नष्ट कर देते हैं। सफल इंसान की नींव उसके विचार होते हैं। महात्मा बुद्ध भी अच्छे व अनमोल विचार रखने की सीख देते हैं, क्योंकि कर्म ख़ुद-ब-ख़ुद अच्छाई की ओर खिंचे चले आते हैं और अच्छे कर्म हमें अच्छाई की ओर अग्रसर करते हैं। सफलता जितनी देर से मिलती है, व्यक्ति में उतना निखार आता है, क्योंकि सोना अग्नि में तप कर ही कुंदन बनता है। गुरूनानक जी भी मानव को यही सीख देते हैं कि ‘नेकी करते वक्त उम्मीद किसी से मत रखो, क्योंकि सत्कर्मों का बदला भगवान देते हैं। किसी को प्रेम देना सबसे बड़ा उपहार है और प्रेम पाना सबसे बड़ा सम्मान।’ सो! अपनी सोच मोमबत्ती जैसी रखें। जैसे एक मोमबत्ती से दूसरी मोमबत्ती जलाने पर उसका प्रकाश कम नहीं होता, वैसे ही जीवन में बाँटना, परवाह व मदद करना कभी बंद मत करें; यही जीवन की सार्थकता है, सार है। सब अंगुलियों की लंबाई बराबर नहीं होती, परंतु जब वे झुकती व मुड़ती हैं, तो समान हो जाती हैं। इसी प्रकार जब हम जीवन में झुकना व समझौता करना सीख जाते हैं; ज़िंदगी आसान हो जाती है और तनाव व अवसाद भूले से भी दस्तक नहीं सकते।
वास्तव में हम चुनौतियां को समस्याएं समझ कर परेशान रहते हैं और संघर्ष नहीं करते, बल्कि पराजय स्वीकार कर लेते हैं। वैसे समाधान समस्याओं के साथ ही जन्म ले लेते हैं। परंतु हम उन्हें तलाशने का प्रयास ही नहीं करते और सदैव ऊहापोह की स्थिति में रहते हैं। नेपोलियन समस्याओं को भय व डर की उपज मानते थे। यदि डर की स्थिति विश्वास के रूप में परिवर्तित हो जाए, तो समस्याएं मुँह छिपा कर स्वत: लुप्त हो जाती हैं। इसलिए मानव आत्म-विश्वास को थरोहर सम संजोकर रखना चाहिए; यही सफलता की कुंजी है। वैसे भी ‘मन के हारे हार है, मन के जीते जीत।’ विवेकानंद जी के मतानुसार ‘यदि आप ख़ुद को कमज़ोर समझते हो, तो कमज़ोर हो जाते हो; अगर ताकतवर समझते हैं तो ताकतवर, क्योंकि हमारी सोच ही हमारा भविष्य निर्धारित करती है ।’ इसलिए हमें अपनी सोच को सकारात्मक रखना चाहिए–यह आत्म-संतोष की परिचायक है। हमारे अंतर्मन में निरंतर आगे बढ़ने का जज़्बा होना चाहिए; लक्ष्य को जुनून बनाकर उसकी पूर्ति में अपनी शक्तियों को झोंक देना चाहिए। ऐसी स्थिति में सफलता प्राप्ति निश्चित है। सो! हमें निष्काम कर्म को पूजा समझ कर निरंतर आगे बढ़ना चाहिए, क्योंकि यह सफलता प्राप्ति का सर्वोत्तम उपाय है।
‘यूं ही नहीं आती खूबसूरती रिश्तो में/ अलग- अलग विचारों को एक होना पड़ता है’ में निहित है–पारस्परिक स्नेह, सौहार्द व त्याग का भाव। यदि मानव में उक्त भाव व्याप्त हैं, तो रिश्ते लंबे समय तक चलेंगे, अन्यथा आजकल रिश्ते भुने हुए पापड़ की तरह पलभर में टूट जाते हैं। सो! अपने अहं को मिटाकर, दूसरे के अस्तित्व को स्वीकारना आवश्यक है। इसलिए जहाँ दूसरे को समझना मुश्किल हो; वहाँ ख़ुद को समझ लेना बेहतर है। इससे तात्पर्य यह है कि मानव को आत्मावलोकन करना चाहिए और अपने भीतर सुप्त शक्तियों को पहचानना चाहिए।
इंसान की पहचान दो बातों से होती है– एक उसका सब्र; जब उसके पास कुछ न हो और दूसरा उसका रवैया अथवा व्यवहार; जब उसके पास सब कुछ हो। ऐसे लोग आत्म-संतोषी होते हैं; वे और अधिक पाने की तमन्ना नहीं करते, बल्कि यही प्रार्थना करते हैं कि ‘मेरी औक़ात से ज़्यादा मुझे कुछ ना देना मेरे मालिक/ क्योंकि ज़रूरत से अधिक रोशनी भी मानव को अंधा बना देती है।’ ऐसे लोगों का जीवन अनुकरणीय होता है, क्योंकि वे प्रत्येक जीव में परमात्मा की सत्ता का आभास पाते हैं तथा प्रभु के प्रति सदैव समर्पित रहते हैं। वे अपनी रज़ा को उसकी रज़ा में मिला देते हैं। सो! ईश्वर चित्र में नहीं; चरित्र में बसता है। भगवान राम, कृष्ण व अन्य देवगण अपने दैवीय गुणों के कारण पहचाने जाते हैं तथा उनकी संसार में पूजा-अर्चना व उपासना होती है। सो! मानव को उन दैवीय गुणों व शक्तियों को अपने जीवन में जाग्रत करना चाहिए, ताकि वे भी संसार में अनुकरणीय व वंदनीय बन सकें।
(श्री घनश्याम अग्रवाल जी वरिष्ठ हास्य-व्यंग्य कवि हैं. आज प्रस्तुत है आपकीअत्यंत विचारणीय दो लघुकथाएं – “विश्व विवशता दिवस” – [1] सिलेक्शन [2] औरत का गहना)
☆ कथा-कहानी ☆ लघुकथाएं – “विश्व विवशता दिवस” – [1] सिलेक्शन [2] औरत का गहना ☆ श्री घनश्याम अग्रवाल ☆
आज विश्व विवशता दिवस है? मुझे पता नहीं। होता भी है या नहीं, में नहीं जानता। हाँ, इतना अवश्य जानता हूँ कि जब विश्व में ऐसी विवशताएँ हैं, तो हम सभ्य हैं, विकसित हैं, आदमी हैं, ये भ्रम टूट जाता है।
तो फिर पढ़िए, ऐसी ही दो विवश लघुकथाएं:-
[1] सिलेक्शन
वह हर सवाल का जबाव देता था सिर्फ एक सवाल को छोड़कर, और वह सवाल होता था, “यदि तुम्हारा सिलेक्शन होता है तो बदले में तुम हमें क्या दोगे ? “इस सवाल पर वह हमेशा चुप रह जाता। खाली पेट और खाली जेब लिए लौट आता।
आज भी वह थका-हारा, निराश, बोझिल कदमों से अपने ख्यालों में खोया चला जा रहा था। उसे अपनी बीमार माँ और ब्याह लायक बहन याद आ रही थी। वह खुद भी दो दिन से भूखा था। सूर्य अभी अस्त नहीं हुआ था, लेकिन उसकी आँखों के आगे अँधेरा-सा छाने लगा। तेजी से आती हुई एक कार से वह अचानक टकरा गया। उसके मुँह से एक चीख निकल पड़ी। लोग जमा हो गए। असहनीय वेदना और नीम बेहोशी में उसने देखा, उसकी एक टाँग बुरी तरह टूट गई थी।
“अरे, इसे अस्पताल ले चलो,” भीड़ मे से कोई बोला।
“नहीं-नहीं, मुझे अस्पताल मत ले चलिए”, कराहते हुए उसने कहा।
“देखो, तुम्हारी टाँग टूट चुकी है। हम अस्पताल ले चलते हैं। घबराओ मत, अस्पताल का सारा खर्च मैं दूँगा।” कारवाले ने कार का दरवाजा खोलते हुए कहा।
“प्लीज़, मुझे अस्पताल मत ले चलिए।” कुछ संयत हो हाथ जोड़ते हुए वह पुनः बोला- “मैं सात साल से बेकार हूँ। मुझे नौकरी तो नहीं मिलेगी। पर हाँ, टाँग टूटने से भीख तो मिल सकती है। ” कहते हुए उसने जेब से अपनी डिग्री निकाली। उसके टुकड़े-टुकड़े कर हवा में उछालते हुए, अपनी हथेली लोगों के सामने फैला दी। हथेली पर कुछ सिक्के जमा हो गए। उसने एक क्षण अपनी हथेली को और दूसरे क्षण अपनी कटी हुई टाँग को देखा। उसे लगा यह उसका एक सौ छत्तीसवाँ इंटरव्यू है, जिसमें उसने उस सवाल का भी जवाब दे दिया है : ” अगर तुम्हारा सिलेक्शन होता है तो बदले में तुम हमें क्या दोगे?”
“अपनी टाँग।” एक दर्दभरी मुस्कान के साथ वह बुदबुदा उठा।
और इस बार उसका सिलेक्शन हो गया, एक भिखारी की पोस्ट के लिए।
[2] औरत का गहना
इदरिस बहुत बीमार था। पाँच बच्चों का बोझ ढोते-ढोते उसे पता ही नहीं चला, कब मामूली खाँसी धीरे-धीरे उसकी साँसों में समा गई।
अबकि बार खाँसी का दौरा उठा तो नूरा काँप गई। उसे प्राइवेट डाक्टर को बुलाना ही होगा, मगर उसकी फीस ? अचानक उसकी निगाह उँगली में पड़े पुराने चाँदी के छल्लों पर गई। ये छल्ले इदरिस ने उसे सुहागरात को दिए थे। कहा था- “नूरा, ये मेरे प्यार की निशानी है, इन्हें कभी जुदा मत करना।” जब देनेवाला ही जुदा हो जाए तो ये किस काम के।
थोड़ी देर बाद नूरा की उँगली में छल्लों की जगह सौ-सो के दो नोट थे। एक घंटे बाद डाक्टर ने ये नोट लेते हुए कहा- “तुमने बहुत देर दी, खुदा पर भरोसा रखो।”
डाक्टर के जाते ही नूरा इदरिस के पास आकर उसकी छाती सहलाने लगी। इदरिस का ध्यान उसकी उँगली पर गया। वह बोला-” अरे, तुम्हारे छल्लों का क्या हुआ,? लगता है, तुमने बेच दिए। ले-दे के यही तो एक गहना था तुम्हारे पास।”
“ये क्या कहते हैं आप? हया औरत का सबसे बड़ा गहना होता है, और फिर गहने मुसीबत के वक्त ही तो बेचे जाते हैं, अच्छे हो जाना, फिर आ जाएँगे।”
इदरिस न अच्छा हो सकता था और न हुआ।
इदरिस के चले जाने के बाद नूरा टूट गई। जब घर के डिब्बे खाली हों तो पेट कैसे भर सकता है! नूरा सोचती ही रही, न जाने कब हारून बड़ा होगा, अभी तो बारह बरस का ही है। जमीला भी तो सयानी हो गई। जवानी गरीबी-अमीरी कुछ नहीं देखती, बस चढ़ी ही चली जाती है। इदरिस था तो आधा पेट तो भर जाता था, अब उसके भी लाले पड़ गए। इदरिस का खयाल आते ही उसे हारून याद आया।
एक दिन हारून को हल्का-सा बुखार हो आया, साथ ही कुछ खाँसी भी। नूरा ने गौर से देखा, न केवल हारून का चेहरा, बल्कि उसकी खाँसी भी इदरिस से मिलती-जुलती है। उसके कानों में प्राइवेट डाक्टर के शब्द गूँज उठे- “तुमने बहुत देर कर दी।”
“या अल्लाह, रहम कर मेरे हारून पर। ” नूरा बुदबुदा उठी। अपनी उँगलियों को देखकर बोली-” अब तो छल्ले भी नहीं है, समझ में नहीं आता, क्या करूँ?”
“तू फिक्र मत कर अम्मा, अब देर नहीं होगी।प्राइवेट डाक्टर जरूर आयेगा।” जमीला ने अम्मा को हिम्मत दी।
शाम को डाक्टर आया। सूई लगाते बोला- “घबराने की कोई बात नहीं। मै ठीक वक्त पर आ गया। ये जल्दी ठीक हो जायेगा। “जमीला ने डाक्टर को फीस दी। हारून के लिए फल भी लायी। डाक्टर के जाते ही नूरा ने पूछा – “अरी जमीला, मैं पूछती हूँ, ये फीस, ये दवा, ये फल, तू पैसे कहाँ से लायी?”
“अम्मा, मुझे कुछ काम मिल गया था।” यह कह जमीला औंधी पड़ सुबकने लगी। उसे नूरा के शब्द याद आए -” हया औरत का सबसे बड़ा गहना होता है, और फिर गहने मुसीबत के वक्त ही तो बेचे जाते हैं।”
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 1
‘हम हैं, इसलिए मैं हूँ’ अनन्य होते हुए भी सहज दर्शन है। सामूहिकता में व्यक्ति के अस्तित्व का बोध तलाशने की यह वृत्ति पाथेय है। मछलियों की अनेक प्रजातियाँ समूह में रहती हैं। हमला होने पर एक साथ मुकाबला करती हैं। छितरती नहीं और आवश्यकता पड़ने पर सामूहिक रूप से काल के विकराल में समा जाती हैं।
लोक इसी भूमिका का निर्वाह करता है। वहाँ ‘मैं’ होता ही नहीं। जो कुछ हैे, ‘हम’ है। राष्ट्र भी ‘मैं’ से नहीं बनता। ‘हम’ का विस्तार है राष्ट्र। ‘देश’ या ‘राष्ट्र’ शब्द की मीमांसा इस लेख का उद्देश्य नहीं है। अंतरराष्ट्रीय मानकों ने राष्ट्र (देश के अर्थ में) को सत्ता विशेष द्वारा शासित भूभाग माना है। इस रूप में भी देखें तो लगभग 32, 87, 263 वर्ग किमी क्षेत्रफल का भारत राष्ट्र् है। सांस्कृतिक दृष्टि से देखें तो इस भूमि की लोकसंस्कृति कम या अधिक मात्रा में अनेक एशियाई देशों यथा नेपाल, थाइलैंड, भूटान, मालदीव, मारीशस, बाँग्लादेश, पाकिस्तान, अफगानिस्तान, श्रीलंका, म्यांमार, कम्बोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, तिब्बत, चीन तक फैली हुई है। इस रूप में देश भले अलग हों, एक लोकराष्ट्र है। लोकराष्ट्र भूभाग की वर्जना को स्वीकार नहीं करता। लोकराष्ट्र को परिभाषित करते हुए विष्णुपुराण के दूसरे स्कंध का तीसरा श्लोक कहता है-
उत्तरं यत समुद्रस्य हिमद्रेश्चैव दक्षिणं
वर्ष तात भारतं नाम भारती यत्र संतति।
अर्थात उत्तर में हिमालय और दक्षिण में सागर से आबद्ध भूभाग का नाम भारत है। इसकी संतति या निवासी ‘भारती’ (कालांतर में ‘भारतीय’) कहलाते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “भावना के दोहे”।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं आपकी मनाली यात्रा पर “संतोष के दोहे … ”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 123 ☆
☆ मनाली यात्रा … संतोष के दोहे ☆ श्री संतोष नेमा ☆
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (27 जानेवारी 1901 – 27 मे 1994) हे थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, पुरोगामी विचारांचे प्रकांड पंडित, सृजनशील साहित्यिक व चिकित्सक तत्त्वज्ञ होते.
प्रथम वडिलांकडून व नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत त्यांनी अध्ययन केले. पुढील अध्ययनासाठी ते वाराणसीला गेले.कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली.
भारताच्या स्वातंत्र्यआंदोलनात, सन 1930-32च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.
मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते.
अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांना धर्मशास्त्रांचा आधार असल्याचे दाखवून आपल्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी परिवर्तनवादी शक्तींना पाठबळ मिळवून देण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी शंकराचार्य व इतर सनातनी मंडळींचा रोष ओढवून घेतला.
तर्कतीर्थांनी विपुल लेखन केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे काही ग्रंथ : ‘शुद्धिसर्वस्वम’, ‘आनंदमीमांसा’, ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘जडवाद’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’ व ‘रससिद्धांत’ इत्यादी.
वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे करण्यात आलेल्या धर्मकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले.
मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. सुमारे एक हजार पृष्ठांचा एक, असे चौदा खंड त्यांच्या संपादकत्वाखाली तयार झाले. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष या पदावरही त्यांनी बरीच वर्षे काम केले.
1954मध्ये दिल्लीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.
1973 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ ही पदवी दिली . मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘एलएल.डी.’ ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
☆☆☆☆☆
रा. ग. जाधव
रावसाहेब गणपतराव जाधव (24 ऑगस्ट 1932 – 27 मे 2016) हे वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी व समीक्षक होते.
पुणे विद्यापीठातून एम.ए.झाल्यावर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय, औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे त्यांनी 11 वर्षे मराठीचे अध्यापन केले. त्यापूर्वी ते एस.टी. मध्ये 10 वर्षे कार्यरत होते.
नंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पात दोन दशके काम करून जाधव यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. 2000ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी कोशाच्या सतराव्या खंडापर्यंत काम केले. या खंडांतून त्यांनी साहित्यविषयक महत्त्वाचे लेखही लिहिले. त्याचप्रमाणे विश्वकोश आकर्षक होण्यासाठी त्यातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
ग. प्र. प्रधान यांच्यासमवेत जाधव यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांत संपादन केले.
‘निळी पहाट’, ‘ निळी क्षितिजे’ व ‘निळे पाणी’ या जाधवांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले. केवळ विद्रोहाचा डांगोरा पिटण्यापेक्षा विद्रोह समजून घेऊन त्याच्या पलीकडची दिशा पाहावी, असे त्यांचे म्हणणे होते.
याशिवाय जाधवांची ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘आनंदाचा डोह’, ‘कला, साहित्य व संस्कृती’, ‘बापू’ (गांधीजींवरील 91 कवितांचा संग्रह), ‘कविता आणि रसिकता’, ‘काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे’, ‘ खेळीमेळी'(ललित), ‘निवडक समीक्षा’, ‘वाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये ‘ वगैरे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
मराठी विश्वकोश व ‘साधना’चे खंड याव्यतिरिक्त जाधवांनी ‘आधुनिक मराठी कवयित्रींची कविता'(1980 ते 1995 या काळातील), ‘ निवडक साने गुरुजी’, तसेच मराठी साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचेही संपादन केले.
‘निवडक समीक्षा’ या जाधवांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्कार मिळाला.
औरंगाबाद येथील 2004 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने विंदा करंदीकर यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
☆☆☆☆☆
प्रल्हाद नरहर देशपांडे
डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे (17सप्टेंबर 1936 – 27 मे 2007)हे लेखक, संपादक व इतिहास संशोधक होते.
पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादला पूर्ण करून तिथेच ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागात सर्वेक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी देवगिरी (दौलताबाद) या किल्ल्याचे सर्वेक्षण करताना ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ त्यांना मिळाला. पुढे जाऊन ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.
नंतर ते धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात इतिहासाचे व्याख्याते म्हणून रुजू झाले.
त्या दरम्यानच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या मुख्य चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली.मंडळातील ऐतिहासिक दस्तऐवज व इतर सामग्रीची जपणूक करणे, त्यात भर घालणे, त्यासाठी संग्रहालय उभे करणे, खानदेशातील ऐतिहासिक, पुरातात्त्विक सर्वेक्षण करणे,’थाळनेर’सारख्या ठिकाणी उत्खनन करणे, मंडळात येणाऱ्या संशोधकांना मदत व मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी मनोभावे केली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’ व ‘109 कलमी बखर’ हे दोन्ही ग्रंथ त्यांनी प्रस्तावनेसह संपादून प्रसिद्ध केले. राजगड व रायगड या छत्रपतींच्या दोन राजधान्यांवर स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तिका, ‘महाराष्ट्र संस्कृती – जडणघडण, मराठ्यांचा उदय व उत्कर्ष’ हे क्रमिक पुस्तक तसेच अनेक इतिहासविषयक संशोधन लेख त्यांच्या नावावर आहेत.
स. मा.गर्गे यांच्या मराठी रियासतीच्या पहिल्या खंडाच्या संपादनास त्यांनी हातभार लावला.
राजवाडे मंडळाच्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाचे त्यांनी 25 वर्षे संपादन केले.
राजवाडे संपादित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या दुर्मिळ झालेल्या मालिकेचे त्यांनी पुनःसंपादन केले.
डॉ. देशपांडे हे उत्तम संस्थापकही होते. ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’, ‘खानदेश इतिहास परिषद’ इत्यादी संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेतील कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या आधारे शोधनिबंध लिहिणे यासाठी खानदेशातील तरुण संशोधकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, तंजावर पेपर्स कमिटी, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, नवी दिल्ली इत्यादी मंडळावर त्यांची नियुक्ती झाली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. ग.जाधव व प्रल्हाद नरहर देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या तिघांनाही आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈