मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प पाचवे #5 – ☆ धावती भेट. . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प पाचवे  – धावती भेट. . . . !” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प पाचवे  #-5 ☆

 

धावती भेट. . . . !

 

किती बरं वाटतं  *धावती भेट* हा शब्द  ऐकल्यावर. खरच  आजच्या स्पर्धेच्या युगात ही धावती भेट  आवश्यक झाली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या  अलिशान वातानुकुलित गाडीतून विहंगम दृश्यांची धावती भेट मनाला टवटवीत करून जाते.

ब-याच वर्षानी  महाविद्यालयीन जीवनातील  एखादा मित्र लोकलमध्ये, प्रवासात बसमध्ये  घाई  घाईत  आपला मोबाईल क्रमांक घेतो. अचानक पणे कधीतरी  आपला पत्ता शोधत आपल्या  ऑफिस वर, घरी येऊन धडकतो. त्याच अस  अवचित येण मनापासून  आवडत.  एकमेकांना कडकडून भेटताना दोघांच्या चेहर्‍यावरचा आनंद खूप काही देऊन जातात. हे समाधान मिळण्यासाठी योग यावा लागतो. हल्ली मित्रांच्या गाठी भेटी व्यावहारिक पातळीवर अस्तित्वात येतात. पार्टी साठी येणारा मित्र जेव्हा पार्ट टी वर खूष होतो ना तेव्हा ते समाधान काही औरच असते.

धावत्या भेटीत मिळालेली  आठवणींची वस्त्रे आपल्याला मनाने चिरतरुण ठेवतात. धावत्या भेटीत  वेळेचा हिशेब नसतो पण ही भेट संपू नये असे वाटत  असतानाच  एकमेकांचा निरोप घ्यावा लागतो.  धावती भेट घ्यायला कुठल्याही नियोजनाची गरज नसते.  एक विचार मनात येतो आणि परस्परांना भेटण्याची  ओढ ही धावती भेट घडवून  आणते.

कौटुंबिक जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी  आपल्या  आवडत्या पर्यटन स्थळाला धावती भेट दिली तर मिळणारं समाधान नवी उमेद देत ही उर्मी,  उर्जा मनाला  उभारी देते. हल्ली या व्यवहारी जगात  एकमेकांच्या मनाचा फारसा विचार कुणी करत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करून मोकळा होतो. सहजीवनात याच गोष्टी वादाचे कारण बनतात.  एकमेकांशी मनमोकळा संवाद साधायचा असेल तर  अशा धावत्या भेटी व्हायला हव्यात.  आवडती वस्तू,  आवडत्या व्यक्तीला  आठवणीने देण्यात जे समाधान मिळते ते अनमोल आहे. त्यासाठी पैसा नाही थोडा समंजस पणा हवा.  आपले पणा हवा.

देवाचे दर्शन घेताना देवळाबाहेर उभे राहून चप्पल बूट न काढता केवळ बाहेरून हात जोडून देवदर्शन करता येते पण जरा थोडा वेळ काढून गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन घेतल्यावर मनाला मिळणारे समाधान अवर्णनीय आहे. तेव्हा या  धकाधकीच्या जीवनात आपल  आयुष्य  अधिक  आनंदी करायचे  असेल लोकाभिमुख रहायचे असेल तर धावती भेट घ्यायलाच हवी.  संवाद साधताना मी देखील घेतोय धावती भेट. . . तुमच्यातल्या रसिकाची आणि माणसातल्या माणसाची. . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.