मराठी साहित्य – विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी
डाॅ. व्यंकटेश जंबगी
☆ विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार श्री भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆
(27 फेब्रुवारी माघ पौर्णिमा निमित्ताने)
आपला भारत देश हा अनेक ऋषी, मुनिंच्या परंपरेने आणि ज्ञानाने समृद्ध झाला आहे. बहुतेक सर्व मुनिनी वेद, अध्यात्म, यज्ञ, याग, कर्मकांड, विज्ञान इ.अनेक विषयांवर विस्तृत विवेचन केले आहे.पण “नाट्यशास्त्र” या विषयावर सुबद्धविवेचन करणारे मुनि म्हणजे भरतमुनि होय.
भरतमुनि – कलर पेन्सिल पेंटींग – श्री मिलिंद महाबळ (साभार)
भरतमुनिंचा कालखंड निश्र्चित नाही. साधारणपणे इ.स.पू. ४०० ते १०० असा मानला जातो. “दशरूपक विधान” या ग्रंथाच्या १८ व १९ व्या अध्यायात नाट्यशास्त्र हा विषय आला आहे.संगीत हा विषय २८ व्या अध्यायात आहे. ६ व ७ या अध्यायात रससिद्धांत सांगितला आहे .शृंगार,वीर,करुणा,भय,हास्य,बिभत्स, अद्भुत, शांत आणि रौद्र हे ९ रस सांगितले आहेत.
त्यांच्या नाट्यशास्त्रातील ठळक मुद्दे :-
१) नाटकाचा विषय प्रख्यात कथेवर असावा.(उदा.रामायण, महाभारत, कृष्णलीला इ.)
२) ५ ते १० अंक असावेत.
३) दोन अंकाच्या मध्ये “विष्कंभक” (निवेदक)असावा
४) आवश्यक तेवढीच पात्रे असावीत.कथेला पूरक तेवढीच.
५) अभिनय ४ प्रकारचा सांगितला आहे-१)अंगिक(Body language) 2) वाचिक (oral) 3) सात्त्विक (expressions) 4) आहार्य म्हणजे ( with essential property)
६) कथानक रंजक हवे, क्रौर्य नको, प्रवाही असावे, सुखान्त
७) पात्रांचे चित्रण व्यवस्थित समजेल असे असावे.
८) रंगमंच किती,कसा असावा हे सविस्तर सांगितले आहे.
९) सर्व ९ रस शक्यतो यावेत.
१०) नाटकाचा उद्देश- मनोरंजन,कलादर्शन, लोकांना आनंदी करणे, संदेश/ बोध देणे.
याशिवाय प्रेक्षागृह कसे असावे ? कोणी कोठे बसावे ?
अभिनेता, दिग्दर्शक, कपडेपटवाला इ.लोकानी कसे कष्ट घ्यावेत ?
या सर्वांचा सविस्तर विचार मांडला आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु त्या काळात मांडलेल्या सूचना आजही मानल्या जातात. भरतमुनिंची जयंती संस्कार भारती दरवर्षी माघ पौर्णिमेस साजरी करते. त्यांना वंदन करून मी इथे थांबतो.
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈