मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किती झालो आम्ही आता कणा हीन ☆ श्री लक्ष्मण उपाध्ये

कवितेचा उत्सव ☆ किती झालो आम्ही आता कणा हीन ☆ श्री लक्ष्मण उपाध्ये ☆ 

किती झालो आम्ही आता कणा हीन !

माय मराठी भाषा झाली दीन !

नाही बोलू शकत आम्ही आता शुद्ध मराठी !

नसे परि आम्हां त्याची मुळी क्षीति !

व्याकरणाची सदा हत्या करतो !

ऱ्हस्व, दीर्घ उच्चार विसरून जातो !

“पूर्व“, “क्रीडा“,  “आशीर्वाद“ असले शब्दही अशुद्ध लिहितो !

“पाणी“ नी “पाणि“ मधला फरक न जाणतो !

“माझी मदत कर “, असे बिनदिक्कत बोलतो !

“गृह “ आणि “ ग्रह “ दोन्ही एकच मानतो !

नाही धड इंग्रजी भाषा लिहितो !

ना अस्सखलित इंग्रजीही बोलू शकतो !

नाही मराठी, नाही इंग्रजी !

ना खंत, ना खेद, ना लाज याचीही !

आज सत्तर वर्षे लोटूनही

मराठी भाषेची अवस्था शोचनीय ही !

 

©  श्री लक्ष्मण उपाध्ये

१९.०२.२०२१

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈