मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नातं… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

नातं… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नात्यास आपल्या जरीही,

रुढ नाव कोणतेच नाही.

तरी  कसे निक्षून सांगू,

आपल्यांत नातेच नाही.

भान ठेऊ अंतराचे,

जे आजही रुंदावले.

थंडावले आवेग सारे,

मनोवेगही मंदावले.

मेघ कांही भरुन आले,

आत्ताच ते बरसून गेले.

मागमूस अवघे पुसोनी,

आकाश माझे स्वच्छ झाले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈